दिल्लीला धडक देणार ! मराठा आरक्षणासाठी ९ ऑगस्ट नंतर 'दिल्ली बंद ' चा मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा
मुंबई / मंत्रालय प्रतिनिधी ( रमेश औताडे ) मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर ९ ऑगस्टपर्यंत वाट पाहणार, अन्यथा आंदोलन करून मुंबईसारखी दिल्लीही बंद पाडून आरक्षण मिळवणारच, असा आक्रमक इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिला. पत्रकार परिषदेत बोलताना केरे पाटील म्हणाले की, मराठा समाज गेल्या ३५ वर्षांपासून आरक्षणासाठी संघर्ष करत आहे. यापूर्वी मुंबई बंद केली तेव्हा सरकारने आश्वासन दिले होते, त्यामुळे समाजाने गुलाल उधळून आनंद साजरा केला. मात्र, तो आनंद फार काळ टिकला नाही. महाराष्ट्र सरकार जे काही आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे, ते न्यायालयात टिकत नाही. त्यामुळे आता केंद्र सरकारकडे आणि दिल्लीत धडक दिल्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जीवाचे रान करून मुंबई बंद पाडली होती. आता त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर, आता केवळ महाराष्ट्रात सीमित न राहता दिल्लीतील जंतर-मंतर येथे तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा निर्धारही रमेश केरे पाटील यांनी व्यक्त केला. पी ...