Posts

Showing posts from June, 2026

आध्यात्मिक बहाई सभेची सामूहिक प्रार्थना

Image
मुंबई / रमेश औताडे मुंबईतील बहाई समुदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या  मुंबई बहाई आध्यात्मिक सभा या संस्थेच्या वतीने सामूहिक प्रार्थना आणि त्यासोबतच एका चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. दक्षिण मुंबईतील न्यू मरीन लाइन्स येथील कोर्ट चेंबर हॉल मध्ये बहाई समुदायाचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने एकत्र आले होते.  या कार्यक्रमात बोलताना सुश्री सोराबजी यांनी नमूद केले की, मानवता, शांतता आणि प्रेम ही या धर्माची मूळ तत्त्वे असून शतकांपूर्वी त्याची स्थापना झाली होती. बहाई धर्माचे संस्थापक बहाउल्लाह यांनी सरकारी छळ सोसूनही आपल्या अनुयायांच्या माध्यमातून अनेक देशांमध्ये या धर्माचा प्रसार केला.  मुंबई बहाई समुदायाच्या नेत्या नर्गिस गौर यांनी सांगितले की, जात आणि सामाजिक उतरंडीच्या पलीकडे जाऊन, मानवतेचा संदेश घेऊन सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे ही त्यांच्या आध्यात्मिक नेत्याची एक प्रमुख शिकवण आहे.  १८९२ मध्ये 'बहजी' (Bahji) येथे बहाउल्लाह यांचे निधन झाले, ज्याची आठवण आजही जपली जाते. आदरणीय बहाउल्लाह यांनी आपले जीवन मानवतेच्या एकतेसाठी समर्पित केले; जगाच्या कल्याणासाठी त्यांनी हद्द...

तर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची गरज पडणार नाही

Image
मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  आपला देश हा अफगाणिस्तान, इराण, इराक या देशातून औषधीकरिता कोट्यावधी रुपयाची अफू आयात करतो. अशी आयात बंद करा व आपल्या देशातील शेतकऱ्याला शेतीच्या दहा टक्के भागावर अफू लागवड करण्याची परवानगी द्या व आपणच जगाला अफू निर्यात करूया. असे केले तर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची सुद्धा गरज पडणार नाही. अशी मागणी  महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी  मुख्यमंत्र्यांना दिले आहे. हवामान बदल, अवकाळी पाऊस आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. अशा काळात महायुती सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी, पीक विमा, सिंचन प्रकल्प आणि कृषी पायाभूत सुविधांद्वारे बळीराजाला सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत तरीसुद्धा शेतकरी  आत्महत्या करीत आहेत. तसेच महाराष्ट्रातील उर्वरित भागात शेतकरी हा चिंतेच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे. खासगी कंपन्यांना अपू उत्पादन करण्याची परवानगी देण्याचा विचार सुरू आहे. त्यांना परवानगी दिली तर बजान हेल्थकेअर ही कंपनी परवानगी मिळणारी पहिली कंपनी ठरेल. सरकारने ज्या जिल्ह्यात शेतकरी आत्मह...

चार किलोमीटर लांब साडीला चौदा जागतिक पुरस्कार

Image
मुंबई / रमेश औताडे  विवाहित महिलांवरील लैंगिक अत्याचाराविरोधात जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ४ किलोमीटर लांबीच्या विशेष साडीला आणि त्यावर आधारित मोहिमेला जगभरात मोठा सन्मान मिळाला आहे. या मोहिमेने आरोग्य आणि सामाजिक जनजागृती क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील १४ प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले आहेत. तसेच महिलांच्या आरोग्य आणि हक्कांसाठी दिला जाणारा सर्वोच्च ग्रँड क्लिओ पुरस्कार देखील या मोहिमेला मिळाला आहे. मुंबईतील मिडिया मेडिक कम्युनिकेशन आणि कॅनडातील क्लिक हेल्थ यांनी रेड डॉट फाऊंडेशन  या संस्थेसाठी ही मोहीम राबवली होती. या मोहिमेत भारतीय स्त्रीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या साडीचा वापर करून महिलांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवण्यात आला. देशभरातून जमा झालेल्या हजारो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या या ४ किलोमीटर लांबीच्या साडीवर भरतकामाद्वारे नोंदवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ही साडी महिलांच्या न्यायासाठीची लोकभावना व्यक्त करणारे प्रतीक ठरली. प्रसिद्ध फॅशन डिझायनर निवेदिता सभो यांनी या साडीची रचना केली होती. मुंबईतील रॉयल ऑपेरा हाऊस येथे या विशेष साडीचे प्रदर्शन भरविण...

नाल्यात उतरून मनसेचा निषेध

Image
नवी मुंबई /  रमेश औताडे  नवी मुंबई घणसोली  विभागातील नोसिल नाका ते रिद्धी सिद्धी सोसायटी ब्रिज पर्यंत नाले साफसफाईच्या  कामाबाबत नाराजी व्यक्त करत घणसोली मनसेचे विभाग अध्यक्ष नितीन नाईक, रोहन पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नाल्यात उतरून निषेध व्यक्त केला.  घणसोली विभाग सचिव संजय कोळी म्हणाले,  नाल्यातील गाळ न काढल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने  नागरिकांना नाहक त्रास होत आहे. मनसेचे उपविभाग अध्यक्ष योगेश गायकर, शाखाध्यक्ष भरत लोंढे, दीपक साबले,केतन कोळी, संदीप डाकवे, महाराष्ट्र सैनिक भानुदास पाटील यांनी निषेध नोंदवला 

आंतरराष्ट्रीय विधवा दिन साजरा करा ....पण आमचे म्हणणे पण ऐका - लता बोराडे यांचे सरकारला साकडे

Image
मुंबई  / रमेश औताडे  दरवर्षी २३ जून रोजी आंतरराष्ट्रीय विधवा दिन साजरा करून विधवा महिलांच्या सन्मान, संरक्षण आणि सक्षमीकरणाच्या घोषणा केल्या जातात. यंदाही महिला व बालविकास विभागाने विविध कार्यक्रम, जनजागृती उपक्रम आणि विशेष मोहिमा राबविण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात विधवा महिलांच्या अनेक मूलभूत मागण्या अद्यापही शासन दरबारी प्रलंबित असल्याची खंत विधवा महिला विकास प्रतिष्ठान , आटपाडी या संस्थेच्या अध्यक्षा व  विधवा महिलांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या लता बोराडे यांनी खंत व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लता बोराडे यांनी निवेदन देऊन विधवा महिलांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले होते. निवेदनात आर्थिक सहाय्य, सन्मानाने जगण्याचा हक्क, शासकीय योजनांचा लाभ मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करणे, तसेच पुनर्वसनासाठी विशेष धोरण राबविण्याची मागणी करण्यात आली होती. शासनाच्या परिपत्रकांमध्ये विधवा महिलांच्या सक्षमीकरणाची भाषा असली तरी प्रत्यक्षात अनेक महिला आजही आर्थिक, सामाजिक आणि मानसिक संघर्षाला सामोऱ्या जात असल्याचे लता बोराडे या...

महसूलमंत्र्यांच्या दारात " न्याय द्या " आंदोलनाचा इशारा

Image
मुंबई / रमेश औताडे मंत्रालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मुंबईतील आझाद मैदानावर अनेक वेळा आंदोलने करूनही शासनाकडून न्याय मिळत नसल्याचा आरोप करत बिगर सातबारा शेतकरी संघटनेने आता थेट महसूलमंत्र्यांच्या दारात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. बिगर सातबारा शेतकरी, भूमिहीन कष्टकरी आणि विविध महसुली प्रश्नांबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. आझाद मैदानावर आंदोलने, निवेदने आणि बैठका घेऊनही प्रश्न प्रलंबितच राहिले आहेत. त्यामुळे आता आंदोलनाची दिशा बदलून थेट महसूलमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी दिला आहे. राज्यातील हजारो बिगर सातबारा शेतकरी जमीन हक्क, नोंदी दुरुस्ती, वारसा नोंद, मालकी हक्क आणि इतर महसुली प्रश्नांमुळे अडचणीत आहेत. या समस्यांवर तातडीने निर्णय घेण्यात यावा, अन्यथा राज्यभरातील शेतकऱ्यांना एकत्र करून तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. महसूल विभागाने संबंधित प्रश्नांवर ठोस भूमिका जाहीर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी...

आभार एवं संकल्प

Image
मुझे आज शिवसेना – उत्तर भारतीय संगठन, मगाठाणे विधानसभा के उपाध्यक्ष पद की जिम्मेदारी सौंपे जाने पर अत्यंत हर्ष एवं गर्व की अनुभूति हो रही है। इस सम्मान और विश्वास के लिए मैं माननीय श्री एकनाथ शिंदे साहब का हृदय से आभार व्यक्त करता हूँ। साथ ही श्री गुलाब दुबे जी, श्री जयप्रकाश जी एवं श्री राजेश जी का भी विशेष धन्यवाद, जिनके मार्गदर्शन और सहयोग से मुझे यह अवसर प्राप्त हुआ। मैं विशेष रूप से पालांडे साहब का भी आभारी हूँ, जिनके करकमलों द्वारा मुझे यह पद एवं दायित्व प्रदान किया गया। मैं विश्वास दिलाता हूँ कि मुझे सौंपी गई इस जिम्मेदारी का पूर्ण निष्ठा, ईमानदारी एवं समर्पण के साथ निर्वहन करूँगा तथा संगठन और समाज के हित में सदैव कार्यरत रहूँगा। जय महाराष्ट्र! जय हिंद! जय शिवसेना! 🚩 एड. राहुल उपाध्याय उपाध्यक्ष, उत्तर भारतीय संगठन शिवसेना, मगाठाणे विधानसभा 📞 7208148649                                      P R NEWS MEDIA NETWORK 

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे महाअधिवेशन

Image
मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २० जून शनिवारी दुपारी २ वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडगाव येथील आदिती लॉन्स येथे राज्यस्तरीय महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती राज्य सचिव अशोक कुथे यांनी दिली. या महाअधिवेशनाला राज्यभरातील सुमारे ६० हजार ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती राज्य सचिव अशोक कुथे यांनी दिली. कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अधिवेशनात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करणे, बहुसंख्य कामगारांना डीसीपीएस योजनेअंतर्गत पेन्शन योजना लागू करणे, १० टक्के आरक्षणाबाबत नियमित भरती प्रक्रिया राबविणे, तसेच कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांवर शासनाने मंजुरी देऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्यांवर चर्चा होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यम...

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

Image
मुंबई / रमेश औताडे  बेस्ट प्रवासी आणि कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष करून कंत्राटदारांच्या फायद्याचे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप करत, अशा धोरणांना पाठिंबा देणाऱ्या सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात सर्व कामगार संघटना एकत्रितपणे १८ जून पासून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने दिला. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत हा इशारा दिला. ऍड.उदयकुमार अनंत आंबोणकर, पवन गायकवाड, कॉ. विजय कुलकर्णी, कॉ. बशीर अहमद, कॉ. हरीश गायकवाड, गजानन नागे, नितीन पाटील, गौरीशंकर खोत, विलास पवार व इतर संघटनांचे नेते यावेळी समितीच्या झेंड्याखाली राजकारण सोडून कामगारांच्या व प्रवाशांच्या हितासाठी एकत्र आले आहेत. बेस्टचा क अर्थसंकल्प महापालिकेच्या अ अर्थसंकल्पात विलीन करा, निवृत्त कामगारांची कायदेशीर देणी एकरकमी द्या, २०१६ ते २०२६ चा वेतन करार ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे थकबाकीसह द्या, बेस्टचे परिवहन व विज विभागाचे कंत्राटीकरण रद्द करून वेटलिज कामगारांना बस सह बेस्ट मध्ये सामावून घ्या, बेस्टच्या स्वः मालकीच्या ५००० बस आणा, आवश्यक कामगार भरत...

नाचणी, शेंगदाणे आणि चणेच ठरू शकतात मुलांसाठी खरे पोषण!

Image
मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  मुलांच्या उंची, वजन, मेंदूचा विकास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या दाव्यांसह बाजारात विविध हेल्थ ड्रिंक्स, सप्लिमेंट्स आणि पौष्टिक पावडरची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. आकर्षक जाहिराती आणि सेलिब्रिटींच्या प्रचारामुळे अनेक पालक आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी महागडी उत्पादने खरेदी करतात. मात्र पोषणतज्ज्ञांच्या मते, या उत्पादनांमध्ये असलेले बहुतांश पोषक घटक घरगुती आणि स्वस्त अन्नपदार्थांमधूनही मिळू शकतात. अनेक हेल्थ ड्रिंक्समध्ये प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि इतर पोषक घटक असतात. मात्र हेच घटक नाचणी, शेंगदाणे, हरभरा, मूग, मटकी, तीळ, गूळ, दूध, अंडी आणि हंगामी फळांमधून नैसर्गिक स्वरूपात मिळू शकतात. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हे पदार्थ अधिक परवडणारे पर्याय ठरू शकतात. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, मुलांच्या शारीरिक विकासासाठी केवळ हेल्थ ड्रिंक पुरेसे नसून संतुलित आहार, नियमित व्यायाम, सूर्यप्रकाश आणि पुरेशी झोप यांचीही तितकीच गरज असते. बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक उत्पादनांमध्ये प्रति सर्व्हिंग ...

मंत्रालयातील भ्रष्टाचाराविरोधात ९० कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात आमरण उपोषण

Image
मुंबई / रमेश औताडे  ( पी आर न्यूज मिडिया नेटवर्क ) मुंबई मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागात  झालेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात आणि ६५ कर्मचाऱ्यांना हक्काच्या वेतनाची रक्कम न देता बनावट रेकॉर्ड तयार करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टी कर्मचारी कामगार संघ, महाराष्ट्र च्या वतीने ९० कर्मचाऱ्यांनी ०९ जून २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात कालेलकर आस्थापनेवर असलेले आणि ५ वर्षांनंतर रूपांतरित आस्थापनेवर शासकीय सेवेत सामावून घेतलेल्या कामगारांकडून अत्यंत कठीण परिस्थितीत काम करून घेण्यात आले. रस्त्यावरील झाडे तोडणे, झाडे लावणे, खड्डे बुजविणे आणि रस्ता मजबुतीकरण यासारख्या कामांसाठी एका मजुराला तब्बल ५ कि.मी. अंतराचा रस्ता दिला गेला होता. प्रत्यक्ष कामासाठी पाचपेक्षा जास्त कामगारांची गरज असताना, एकाच व्यक्तीकडून दिवस-रात्र काम करून घेण्यात आले. एवढेच नव्हे तर, शनिवार-रविवार किंवा सणांच्या दिवशीही त्यांना सुट्टी दिली जात नव्हती, असा गंभीर आरोप कामगार संघाने केल...

लतादेवी बोराडे यांची सरकारकडे एक " भावनिक " साद

Image
विधवा' नव्हे, 'सौभाग्यवती किंवा सक्षम' म्हणा!  मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  पतीच्या निधनानंतर पांढरं कपाळ आणि समाजाकडून मिळणारी उपेक्षेची वागणूक... हे मरणयातनांपेक्षा कमी नसतं. पण आता या अन्यायाविरुद्ध आणि अनिष्ट प्रथांविरुद्ध सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या 'विधवा महिला विकास प्रतिष्ठान'ने थेट सरकारचे दरवाजे ठोठावले आहेत. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती लतादेवी बाळकृष्ण बोराडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे अत्यंत भावनिक आणि स्वाभिमानी मागण्या केल्या आहेत. आम्हाला सहानुभूती नको, सन्मान द्या!" "विधवांचे मानसिक खच्चीकरण न होता, त्यांनी स्वाभिमानाने आणि आनंदाने जीवन जगावे," हा मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेवून हे स्मरणपत्र मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले आहे. या पत्रातील मागण्या केवळ कागदी नसून, समाजात वर्षानुवर्षे सोसत आलेल्या वेदनेला वाचा फोडणाऱ्या आहेत. पतीच्या पश्चातही महिलांना समाजात 'सुवासिनी' इतकाच आदराचा आणि मानाचा कायदेशीर हक्क मिळावा...

१९ वर्षाच्या अन्यायाविरोधात रहिवाशांचा म्हाडा कार्यालयावर मोर्चा

Image
मुंबई / रमेश औताडे  म्हाडा न्यू पीएमजीपी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, मुलुंड (पूर्व) येथील १,३९९ सभासदांचा पुनर्विकास प्रकल्प सन २००७ पासून सुरू असून, तब्बल १९ वर्षे उलटूनही हा प्रकल्प अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. आजही ६०६सदनिका व ४७ दुकाने म्हाडा प्रशासनाकडून बांधून पूर्ण करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या प्रकल्पातील रहिवासी व सभासद गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या हालअपेष्टा सहन करीत आहेत. गेल्या वर्षभरापासून बाधित रहिवासी सभासदांनी म्हाडा मुख्यालय, बांद्रा येथे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) व उपाध्यक्ष (VP) यांची वारंवार भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना वेळ देण्यात येत नव्हती. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत जनकल्याण रहिवासी विकास समितीच्या वतीने दिनांक ९ जून २०२६ रोजी म्हाडा मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सुमारे २५० हून अधिक बाधित रहिवासी सभासद सहभागी झाले होते. तसेच छत्रपती शासन पक्षाचे संस्थापक मा. नामदेवराव जाधव साहेब व समितीचे कायदेशीर सल्लागार यांनी या आंदोलनास मोलाचे सहकार्य केले. मोठ्या संख्येने नागरिक म्हाडा कार्यालयात दाखल झा...

रेहान मेमन यांच्याकडून अनधिकृत कृत्याचे पालिकेला निवेदन

Image
मुंबई  / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  मुंबई महानगरपालिका हद्दीतील काही भागांमध्ये सुरू असलेल्या कथित अनधिकृत बांधकामे आणि परवानगीविना चालणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांबाबत संबंधित यंत्रणांनी चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी भाजप अल्पसंख्याक आघाडीचे राज्य सचिव रेहान मेमन यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या पूर्व विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिल्याचे सांगितले आहे. मेमन यांनी आपल्या निवेदनात काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप केला असून, संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच, महानगरपालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामे अथवा परवानगीविना सुरू असलेल्या व्यवसायांबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी, असेही त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, या आरोपांबाबत महानगरपालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. संबंधित विभागाकडून याबाबत प्रतिक्रिया मिळाल्यानंतर ती प्रसिद्ध करण्यात येईल.

जुनी पेन्शनसाठी शरद पवारांना निवेदन;

Image
जुनी पेन्शनसाठी शरद पवारांना निवेदन;  मुंबईत सविस्तर चर्चेसाठी भेटीचे आश्वासन मुंबई / रमेश औताडे  शिरदवाड येथे राज्याध्यक्ष विजय शिरोळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची भेट; १९८२ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मांडल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरदवाड येथे माजी आमदार कै. दत्ताजीराव कदम यांच्या शतकपूर्ती कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते Sharad Pawar यांची जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन १९८२ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत निवेदन सादर केले. यावेळी मुंबई येथे स्वतंत्र भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा करण्याची विनंती करण्यात आली असून पवार यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. शिरदवाड येथे आयोजित कै. दत्ताजीराव कदम यांच्या शतकपूर्ती कार्यक्रमासाठी शरद पवार उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष विजयजी शिरोळकर, राज्य सहसचिव सुनील कांबळे, बनसोडे सर, अदुरे सर तसेच किरणकुमार कोळी यांनी पवार यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने जुनी पेन्शन योजना ल...

बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे यांची मागणी

Image
मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित प्रकरणाबाबत ठोस भूमिका घेण्याची मागणी केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात इंगळे यांनी दावा केला की, अजित पवार यांच्या कथित विमान अपघात प्रकरणाबाबत विविध शासकीय यंत्रणांकडे पाठपुरावा करण्यात आला असून अद्याप समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. त्यांनी असेही म्हटले की, या विषयावर संसद आणि विधानसभेत प्रश्न उपस्थित झाल्याचे सांगितले जात असले तरी पुढील कार्यवाहीबाबत स्पष्टता दिसून येत नाही. इंगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी  अजित पवार यांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिकृत ठराव मंजूर करावा, अशी मागणी केली. "जर पक्षाच्या नेत्यांना या विषयावर ठोस भूमिका घेता येत नसेल, तर त्यांनी अजित पवार यांच्या नावाचा राजकीय वापर टाळावा," असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, संबंधित प्रकरणात शासन आणि प्रशासनाकडून लेखी उत्तर मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली. या विषयावर समाधानकारक प्...

भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय मंत्री बाबूभाई पटेल यांचा महाराष्ट्र दौरा

Image
भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय मंत्री  बाबूभाई पटेल यांचा महाराष्ट्र दौरा शेतकरी प्रश्नांवर राज्यव्यापी आढावा मुंबई / रमेश औताडे  पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय मंत्री तथा महाराष्ट्र प्रांत संपर्क अधिकारी बाबूभाई पटेल , सुभाष महाजन तसेच इतर मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होते,बाबूभाई पटेल यांनी पत्रकार आणि मीडिया यांच्याशी संवाद साधताना, सध्या मी  महाराष्ट्र दौऱ्यावर असून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक बैठका, शेतकरी संवाद आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. महाराष्ट्र प्रांतातील २५ जिल्ह्यांची जबाबदारी त्यांच्याकडे असून सध्या दौऱ्याचा अंतिम टप्पा सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील कार्यकारिणी बैठकीपासून या टप्प्याची सुरुवात झाली असून मुंबईनंतर पालघर, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांचा दौरा केला जाणार आहे.ते म्हणाले की, १३ व १४ जून रोजी पुणे येथे भारतीय किसान संघाच्या महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.  या बैठकीला संघाचे अखिल भारतीय अध्यक्ष श्री. साई रेड्डी तसेच अखिल भारतीय स...

तहसीलदार प्रशांत बेडसे यांचा मोठा कायदेशीर विजय

Image
मुंबई / पी आर न्यूज ( रमेश औताडे)  खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बडतर्फ तलाठ्यावरच आता होणार एफआयआर ! ​उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची शनिवारी सुट्टीच्या दिवशी 'तातडीची सुनावणी';  वरोरा न्यायालयाच्या एकतर्फी आदेशाला तत्काळ स्थगिती सविस्तर वृत्त.... शासकीय कर्तव्य बजावत असताना प्रामाणिक अधिकाऱ्यांना विनाकारण वेठीस धरणाऱ्या, ब्लॅकमेल करणाऱ्या 'भुरट्या' माहिती अधिकार कार्यकर्त्यांना आणि खोट्या तक्रारदारांना राजगुरुनगर (खेड) चे विद्यमान तहसीलदार श्री. प्रशांत बेडसे यांनी उच्च न्यायालयाच्या माध्यमातून एक सणसणीत कायदेशीर चपराक लगावली आहे. उच्च न्यायालयाच्या मुंबई-नागपूर खंडपीठाने सुट्टीच्या दिवशी (शनिवारी) या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विशेष तातडीची सुनावणी घेत, बेडसे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांवर एफआयआर (FIR) दाखल करण्याच्या वरोरा न्यायालयाच्या  आदेशाला तत्काळ स्थगिती  दिली आहे. ​या निर्णयामुळे प्रशासनात काम करणाऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, विनाकारण त्रास देणाऱ्या प्रवृत्तींना एक भक्कम जरब बसली आहे. ​प्रकरणाची पार्श्वभूमी आण...

अतिक्रमण हटविण्यासाठी सनय चे आंदोलन

Image
मुंबई / रमेश औताडे कळवा परिसरातील कथित अतिक्रमणांवर कारवाई करण्यात प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईविरोधात सनय छत्रपती शासन पक्षाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. पक्षाचे मुंबई अध्यक्ष सर्जेराव निकम यांच्या नेतृत्वाखाली ३ जून २०२६ रोजी कळवा प्रभाग समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी होणार असून, संबंधित अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. अतिक्रमण होत असताना त्याकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कळवा परिसरातील संबंधित प्रकरणात कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त ललिता जाधव यांनी केलेल्या प्रशासकीय नोंदींमध्ये अतिक्रमण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच अतिक्रमण हटविण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. मात्र, प्रक्रिया पूर्ण होऊन सुमारे चार महिने उलटून गेल्यानंतरही प्रत्यक्ष...