Posts

मुंबईत ७-८ मार्च रोजी होणार दुसरी आंतरराष्ट्रीय वृक्ष संवर्धन परिषद

Image
"Growing Cities – Greener Canopies" या थीमवर जागतिक तज्ञ एकत्र येणार मुंबई / रमेश औताडे  जलद शहरीकरणाच्या या काळात वृक्ष हे केवळ सजावटीचे घटक नसून हवामान बदलाशी लढण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी आणि शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे सहयोगी आहेत. या संदेशासह मुंबईत दुसरी आंतरराष्ट्रीय वृक्ष संवर्धन परिषद (ATCA 2026) आयोजित करण्यात येत आहे. अमेनिटी ट्री केअर असोसिएशन (ATCA) आणि नानाजी देशमुख प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणारी ही परिषद ७ आणि ८ मार्च, २०२६ रोजी हॉटेल सहारा स्टार, विले पार्ले (पूर्व), मुंबई येथे होणार आहे. दुसऱ्या आंतरराष्ट्रीय अरबोरिकल्चर परिषदेची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर्यन पांडे, अध्यक्ष संजय पांडे, ATCA चे संचालक वैभव राजे आणि नुकुल सवानी उपस्थित होते. परिषदेचे उद्दिष्ट ATCA चे संचालक वैभव राजे यांनी सांगितले, "जलद शहरीकरणामुळे वृक्ष संरक्षण आणि काळजीकडे दुर्लक्ष झाले आहे. राज्य सरकार, महानगरपालिका आणि स्थानिक संस्थांनी वृक्...

कर्मवीर अजित दादा पवार यांचे कृषी क्षेत्राचे स्वप्न लोक विद्यापीठ, शेतकरी संचालक विस्तार व कृषी विज्ञान केंद्र स्थापनेतून साकार करणार.... डॉ मंगेश देशमुख

Image
मुंबई / रमेश औताडे भारत सरकार, कृषिमंत्रालय, नवी दिल्ली द्वारा देशात Agriculture Technology Management Agency, Atma हा सामाजिक उपक्रम, जिल्ह्याचे जिहकाधिकारी तथा अध्यक्ष आत्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उपाध्यक्ष आत्मा, सचिव प्रकल्प संचालक आत्मा, जिल्हा स्तरावर उत्तम असे कृषी व ग्रामीण विकासाचे सन २०१२ पासून प्रभावीपणे कार्य सुरू आहे. *Artificial Intelligence for Agriculture क्षेत्रात प्रभावी यशस्वीता प्राप्त करण्यासाठी लोक विद्यापीठाने आत्मा या सामाजिक संस्था चे मदतीला Farmers Power of Thinking and Motivational Training चे माध्यमातून, मानसिक परिवर्तना चे प्रशिक्षणातून अनेक संचालक विस्तार यांना सक्षम केले आहे, आणि त्यातील उत्सुक शेतकरी यांना इच्छा नुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आत्मा सोबत आजीवन कृषि व ग्रामीण क्षेत्रात सामाजिक काम करणे साठी, संचालक विस्तार Director Extension अशी पदोन्नती नियुक्ती देऊन छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ अमरावती यांनी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आत्मा या सामाजिक संस्था याला समन्वय करून दिले आहे. *आज राज्यात ५५० संचालक विस्तार ह...

यादव जी की लव्ह स्टोरी चित्रपटाविरोधात मोर्चाचा इशारा

Image
मुंबई / रमेश औताडे महाराष्ट्र करणी सेनाचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी ‘यादव जी की लव्ह स्टोरी’ या हिंदी चित्रपटाविरोधात २७ फेब्रुवारी रोजी सेन्सॉर बोर्डावर मोर्चा काढण्याचा इशारा मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. या वेळी राज्य प्रवक्ते शैलेश पन्नालाल यादव, सुभाष चंद्र यादव, किरण सोनवणे, अंबिका प्रसाद यादव आदी उपस्थित होते. चित्रपटात यादव समाजाचे व भगवान श्रीकृष्ण यांचे चुकीचे चित्रण करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी या चित्रपटामुळे हिंदू धर्म व यादव समाजाच्या भावना दुखावल्याचे सांगितले. संबंधित चित्रपटाच्या निर्माता संदीप तोमर, दिग्दर्शक अंकित भडना, अभिनेत्री प्रगती तिवारी व अभिनेता विशाल मोहन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.  २७ फेब्रुवारी रोजी विविध हिंदू संघटनांच्या सहभागातून सेन्सॉर बोर्डावर मोर्चा काढण्यात येणार असून राज्यात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा देण्यात आला. सरकारने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून चित्रपटावर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली.

स्वच्छ भारत मिशन व जलजीवन मिशन च्या आंदोलनास यश

Image
मुंबई / रमेश औताडे  आझाद मैदानावर पाणी व स्वच्छता कर्मचारी यांनी आदोलन केले नंतर  पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांने स्वच्छ भारत मिशन( ग्रामीण) व जल जीवन मिशन या योजनेमध्ये काम करणारे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कंत्राटी कर्मचारी यांचे वेतनासाठी ५ कोटी रूपसे निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती राज्य कृती समितीचे कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी दिली.  पाणी पुरवठा व स्वच्छता शासकीय कर्मचारी राज्य कृती समितीने आझाद मैदानावर आंदोलन केले होते. शासन सेवेत कायम करणे बरोबर थकीत वेतन व इतर  विविध मागण्या करणेत आले होते.  मुख्य सचिव राजेश आग्रवाल यांचे अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस ग्रामविकास विभागाचे सचिव, पाणी पुरवठा विभागाचे सचिव , अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग, प्रधान सचिव नियोजन विभाग,  अभियान संचालक  जलजीवन मिशन, अभियान संचालक स्वच्छ भारत मिशन ग्रामीण उपस्थित होते. या बैठकीत मुख्य सचिव यांचे बैठकीत न्यायप्रविष्ठ असलेले व न्यायालयाने निवाडे दिलेले कंत्राटी कर्मचारी यांचे बाबत शासन सेवेत कायम करणे साठी समिती गठित करणेचा शासन निर्णय का...

बीकेटीने ऑन-हायवे टायर पोर्टफोलिओसह भारतातील ग्राहक टायर बाजारपेठेत प्रवेश

Image
मुंबई / रमेश औताडे  बाळकृष्‍ण इंडस्‍ट्रीयल लिमिटेड (बीकेटी) या ऑफ-हायवे टायर (ओएचटी) विभागातील जागतिक अग्रणी कंपनीने आज आपला ऑन-हायवे पोर्टफोलिओ लाँच करत भारतातील ग्राहक टायर बाजारपेठेत प्रवेशाची घोषणा केली. आपल्‍या ओएचटी नेतृत्‍वापलीकडे धोरणात्‍मक विस्‍तारीकरण करत बीकेटीने दुचाकी (स्‍कूटर्स व मोटरसायकल्‍स) आणि मीडियम अँड हेवी कमर्शियल वेईकल्‍स (एमअँडएचसीव्‍ही)साठी उद्देशासह डिझाइन करण्‍यात आलेली उत्‍पादने सादर केली, ज्‍यामधून भारतातील झपाट्याने वाढत असलेल्‍या ग्राहक व रिप्‍लेसमेंट टायर विभागांप्रती त्‍यांची दीर्घकालीन कटिबद्धता दिसून येते. यासोबत कंपनीने आपली राष्‍ट्रीय ब्रँड मोहिम *'एलीव्‍हेट युअर ड्राइव्‍ह* ' देखील लाँच केली, ज्‍यामध्‍ये ब्रँड अॅम्‍बेसेडर *रणवीर सिंग* आहेत. या मोहिमेसह कंपनीने आपला ग्राहक ब्रँड प्रवास सुरू केला आहे, जेथे स्‍वदेशी विकसित जागतिक टायर उत्‍पादकासाठी नवीन अध्‍याय दिसून येतो *नवीन ब्रँड चॅप्‍टर: बीकेटी टायर्स आणि बीकेटी कार्बन :* आपली एकात्मिक ब्रँड ओळख *'बीकेटी - ग्रोईंग टूगेदर'* अंतर्गत कंपनीने दोन विशिष्‍ट ओळखीसह नवीन ब्रँड ...

पुढील तीन वर्षांत देशातील प्रत्येक शहरात 'भारत टॅक्सी' उपलब्ध होईल

Image
रमेश औताडे  पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  नवी दिल्लीच्या त्या दुपारी एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या टॅक्सी चालकांमध्ये एक साधा पण मोठा विचार पुढे येत होता – जो मेहनत करतो तोच नफ्याचा खरा हक्कदार असावा. ही केवळ साधी बैठक नव्हती, तर नव्या विचारांच्या बदलाची सुरुवात होती. सहकारी संस्थांचे खरे योद्धा अमित शहा यांच्या दृष्टीकोनाच्या केंद्रस्थानी एक सरळ प्रश्न होता – रस्त्यावर दिवस-रात्र कष्ट करणारा माणूस फक्त कमिशनवरच का जगावा? तोच मालक का होऊ नये? आणि इथूनच ‘ड्रायव्हर’पासून ‘सारथी’ होण्याची कहाणी सुरू होते. अमित शहा यांनी मांडलेल्या विचारांमध्ये ‘ड्रायव्हर’ या शब्दाऐवजी ‘हा शब्द वापरण्याचा निर्णय होता. हा केवळ शब्द बदल नव्हता, तर चालकांना सन्मान, स्वाभिमान आणि भागीदारीची देण्याचा सकारात्मक प्रयत्न होता. रस्त्यावर घाम गाळणारा व्यक्ती केवळ सेवा देणारा नसून, तो व्यवस्थेचा भागीदार आणि स्वाभिमानाने उभा असलेला मालक असावा – हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अंत्योदयाची भूमिका मांडणारे अमित शहा यांच्या परिकल्पनेतील ‘भारत टॅक्सी’ ही कोणत्याही खासगी क...

महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे आझाद मैदानात आक्रमक

Image
मुंबई / रमेश औताडे  राज्यातील संगणक परिचालकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ, कायमस्वरूपी दर्जा आणि आवश्यक सुविधा, यावलकर समितीच्या शिफारशीप्रमाणे सुधारित आकृतीबंध राबवून कर्मचारी दर्जा व किमान वेतन द्यावे, मानधनात वाढ किमान १७ हजार रुपये करण्यात यावे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले. मयूर कांबळे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, संतोष कुडले आदी पदाधिकारी उपस्थित होते  कायमस्वरूपी नोकरीची हमी देऊन कंत्राटी कामगारांप्रमाणे सर्व लाभ व सुविधा लागू कराव्यात, अनेक ग्रामपंचायतींमध्ये १४ वर्षांपूर्वी दिलेले संगणक व इतर साहित्य खराब झाल्याने  प्रत्येक ग्रामपंचायतीला नवीन संगणक, प्रिंटर व आवश्यक साहित्य तातडीने उपलब्ध करून द्यावे, महिला संगणक परिचालकांना मानधनासह प्रसूती रजा देण्याची तसेच सर्व संगणक परिचालकांसाठी किमान ५० लाख रुपयांचा अपघाती व आरोग्यविषयक विमा लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.