Posts

भारतीय मजदूर संघाचे २१वे त्रैवार्षिक अखिल भारतीय अधिवेशन संपन्न

Image
नवीन अखिल भारतीय कार्यकारिणीची घोषणा जगन्नाथ पुरी (ओडिशा), दि. ८ फेब्रुवारी २०२६ : भारतीय मजदूर संघाचे (BMS) तीन दिवसीय २१वे त्रैवार्षिक अखिल भारतीय अधिवेशन धर्मनगरी जगन्नाथ पुरी येथे यशस्वीरीत्या संपन्न झाले. ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या राष्ट्रीय अधिवेशनात देशभरातील विविध क्षेत्रांतील हजारो प्रतिनिधींनी सहभाग घेतला. अधिवेशनात कामगारांच्या हिताशी निगडित गंभीर राष्ट्रीय प्रश्नांवर सखोल चर्चा व मंथन करण्यात आले. अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात अखिल भारतीय अध्यक्ष श्री एस. मलेशम यांनी देशातील कामगारविरोधी धोरणांवर तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी जाहीर केले की दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरातील सर्व राज्यांतील जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालये, शासकीय कार्यालये, कामगार कार्यालये व ई-कार्यालयांसमोर धरणा आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाच्या माध्यमातून कामगार हितांचे संरक्षण, कामगार संहितांमधील (Labour Codes) आवश्यक सुधारणा, तसेच “सरकार जागे व्हा” या मागणीसाठी जनजागृती करण्यात येणार आहे. नवीन अखिल भारतीय कार्यकारिणीची घोषण...

महाराष्ट्र राज्य पाणी स्वच्छता कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Image
मुंबई / रमेश औताडे  स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जलजीवन मिशन अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन, सेवा-सुरक्षा व सामाजिक संरक्षणाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीने राज्य सरकारकडे केली असल्याचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड कार्याध्यक्ष सचिन जाधव उपाध्यक्ष ऋषिकेश शिलवंत उपाध्यक्ष बंडू हिरवे यांनी आझाद मैदानात आंदोलन दरम्यान सांगितले. याबाबतचा निवेदनपत्र ४ फेब्रुवारी २०२६ रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात आले आहे. राज्यातील ग्रामीण भागात स्वच्छता, पाणीपुरवठा, जनजागृती, क्षमता बांधणी आणि घराघरात नळजोडणी (हर घर जल) यांसारख्या महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या ऑक्टोबर २०२५ पासून मानधन प्रलंबित असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. निधीअभावी ही परिस्थिती निर्माण झाली असून, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.असे सचिन जाधव व संदीप पाटील यांनी सांगितले. या कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे राज्यातील हजारो गावे ओ डी एफ...

धगधगती मुंबईच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा

Image
    २०२६ चे पुरस्कार जाहीर जेष्ठ पत्रकार अजित जगताप यांना जीवन गौरव पुरस्कार तर सिनेअभिनेते विजय पाटकर, योगेश चिकटगावकर, के.के.शेलार,रमेश कदम यांचाही पुरस्कारांमध्ये समावेश मुंबई / रमेश औताडे धगधगती मुंबई वृत्तपत्राच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पुरस्कार सोहळा तसेच नवप्रेरणा कर्तृत्ववान महिला सन्मान सोहळा शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील सभागृह, सेक्टर ४–५, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. धगधगती मुंबई हे वृत्तपत्र गेली सोळा वर्षे अखंडपणे जनतेच्या न्यायहक्कासाठी लढणारे माध्यम म्हणून कार्यरत आहे. मुद्रित वृत्तपत्रासह यूट्यूब चॅनल व ऑनलाईन वेब पोर्टलच्या माध्यमातून सोशल मीडियावर वेगळे वलय निर्माण करत सर्वसामान्यांचा आवाज म्हणून धगधगती मुंबई ओळख निर्माण करत आहे. या वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिले जात असून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना मुख्यमंत्री ...

महाराष्ट्र में ईसाई (ख्रिश्चन) समाज का अस्तित्व खत्म हो रहा है या इसे खत्म करने की साजिश हो रही है

महाराष्ट्र में ईसाई (ख्रिश्चन) समाज का अस्तित्व खत्म हो रहा है या इसे खत्म करने की साजिश हो रही है  मुंबई / प्रतिनिधी   महाराष्ट्रा और देश के प्रगति एवं उन्नति मे ईसाई (ख्रिश्चन) समाज के योगदान को नजरअंदाज नहीं किया जा सकता है, परंतु फिर भी पिछले 40 सालों मे महाराष्ट्रा के मंत्रीमंडल मे किसी भी ईसाई व्यक्ति को मौका नही दिया गया है. ऐसे नोवेल साळवे यांनी सांगितले. ये बात अलग है कि ईसाई समाज का वोट बॅंक बटा हुआ होने के कारण आज के तारीख मे इस समाज का कोई विधायक महाराष्ट्र मे चुनाव जीत कर नही आ सकता है, किन्तु ईसाई समाज को प्रतिनिधित्व देने के लिए महाराष्ट्र के राजनीतिक पार्टीयों ने बढा दिल दिखाकर ईसाई समाज के व्यक्ति को विधानपरिषद के जरिये मंत्रीमंडल मे स्थान देने का इतिहास बना सकते है.  लेकिन अफ़सोस कि बात तो यह है की ईसाई ( ख्रिश्चन) समाज के साथ महाराष्ट्र के राजकारण मे अक्सर दुजा भाव किया जाता रहा है, इसलिए आज भी महाराष्ट्र के राजकारण मे इस बात से ये पुष्टि की जा सकतीं है की महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग पर एक भी ईसाई ( ख्रिश्चन) व्यक्ती की नियुक्ती नही की गई है...

बदलत्या जगात आपल्या कुटुंबाला ' कवच ' कसे द्यावे ?

Image
विशेष लेख | रमेश औताडे  डिजिटल सुरक्षा आणि कौटुंबिक आरोग्य आजच्या धकाधकीच्या आणि इंटरनेटच्या युगात बाहेरील जगातील बातम्या वाचून अनेकदा मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. मग ते 'द मार्क' सारख्या चित्रपटांतील मानवी स्वभाव असो किंवा 'एपस्टीन फाईल्स' सारखी भीषण सत्ये. अशा वेळी आपल्या कुटुंबाला, विशेषतः लहान मुलांना आणि महिलांना सुरक्षित ठेवणे ही सर्वात मोठी जबाबदारी ठरते. घरातील वातावरण सुरक्षित आणि आनंदी ठेवण्यासाठी खालील 'पंचसूत्री' अत्यंत महत्त्वाची आहे: १. 'गुड टच आणि बॅड टच'चे शिक्षण (लहान मुलांसाठी) मुलांना अगदी लहानपणापासूनच त्यांच्या शरीराबद्दल साक्षर करा. कोणाचे स्पर्श सुरक्षित आहेत आणि कोणाचे नाहीत, हे त्यांना सहज भाषेत समजावून सांगा. त्यांना हे पटवून द्या की, त्यांच्या शरीरावर त्यांचा स्वतःचा अधिकार आहे. २. संवाद: सर्वात मोठे शस्त्र आपल्या मुलांशी आणि जोडीदाराशी दिवसातून किमान १५-२० मिनिटे मनापासून संवाद साधा. मुलांना असे वाटले पाहिजे की, जगात काहीही चुकीचे घडले तरी ते सर्वात आधी आपल्या पालकांना सांगू शकतात. भीतीपोटी मुले अनेकदा गो...

असोसिएशन ऑफ क्लिनिकल् परफ्यूशनिस्ट महाराष्ट्र संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ.विजय व्यवहारे यांची नियुक्ती

Image
पनवेल / प्रतिनिधी असोसिएशन ऑफ क्लिनिकल् परफ्यूशनिस्ट महाराष्ट्र संस्थेची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली असून यामध्ये अध्यक्षपदी डॉ.विजय व्यवहारे यांची सन 2026 या सालाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सदर कार्यकारिणीमध्ये डॉ.विजय व्यवहारे (अध्यक्ष), अभय अनंत चव्हाण (सचिव) किरण आंब्रे (खजिनदार), राजू दौड, सौ. श्रीमती कुलकर्णी (उपाध्यक्ष), सहसचिव प्रशांत धुमाळ, वैशाली मेटे, सुरेश काळे, शशी काळे, डॉ.विश्‍वास पॉल (सल्लागार), ई.सी.मेंबर प्रतापसिंग चौहान, विनयचंद्रा शिंपी, डॉ.विजया लांजे, लहु सुपेकर, अमित पाटील, प्राची सोनावणे, विराज शिगवाण, अक्षय रेवडेकर, पंकज पाटील, अभिषेक शेट्ये व विवेक पॉल यांची निवड करण्यात आल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

गरजू महिलांना घरघंटी, शिलाई मशीनचे वाटप

Image
मुंबई / रमेश औताडे  मुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या परंतु अद्यापही महापौर आणि उपमहापौर यांची निवड करण्यात आलेली नाही. परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ सारिका शशीकांत झोरे यांनी गरजू महिलांना मदतकार्य करण्याचे विधायक कार्य सुरु केले आहे.  मुंबई महानगरपालिका प्रभाग क्र.१२ बोरिवली आर मध्य विभागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगरसेविका सौ. सारिका शशिकांत झोरे यांच्या माध्यमातून महिलांना घरघंटी, शिलाई मशीन, मसाला कांडप मशीनचे वाटप माजी महापौर, शिवसेनेच्या महानगरपालिका गटनेत्या सौ किशोरी पेडणेकर यांच्या शुभहस्ते झाले.  याप्रसंगी माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, महिला विभागसंघटक सौ. शुभदा शिंदे, विधानसभाप्रमुख अशोक म्हामूणकर, विधानसभा निरीक्षक सिनेट सदस्य शशिकांत झोरे, नगरसेवक धरम काळे, माजी नगरसेवक सौ सुजाता पाटेकर, चेतन कदम, सुनिल चव्हाण, सिनेट सदस्य मिलिंद साटम, सचिन मोरे, इतिश्री महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.*