Posts

....तर आमचे राजवाड़े परत दया :- अजय सिंह सेंगर

Image
....तर आमचे राजवाड़े परत दया :- अजय सिंह सेंगर मुंबई दि.22 SC/ST Act , Ugc Act, आरक्षण सारखे कायदे देशात जातीवाद व विषमता निर्माण करत आहे जर देशातील ही विषमता दूर झाली नाही तर आमचे राजवाड़े परत दया असे "महाराष्ट्र करणी सेना" प्रमुख अजय सिंह सेंगर यानी भाषणात मत व्यक्त केले, पुढे ते म्हणाले की देशात सामिल होताना  जे 400/450 राजवाड्याच्या राजासोबत भारत सरकारने केलेले एग्रीमेंट पाळल्या गेले नाही. एससी एसटी Act, यूजीसी Act, आरक्षण सारख्या कायद्याने क्षत्रियांची मुस्कट दाबी झालेली आहे, या कायद्यामुळे देशात विषमता निर्माण झालेली आहे या संविधानाने समानतेचे अधिकार दिलेले असताना  समानता या मूलभूत अधिकाराचे अर्थात संविधानातिल आर्टिकल 14,15 चे हनन करण्यात आले. ज्या क्षत्रियांनी या देशाकरता या धर्माकरिता प्रार्णाचे बलिदान इतिहासामध्ये दिलेले आहे, हिंदूच्या सर्वश्रेष्ठ गीता या धर्मग्रंथेमध्ये क्षत्रियांनी राज्यकारभार करावे असे नमूद केलेले असताना क्षत्रियांना बाजूला सत्तेतून बाहेर केलेले आहे.  राजकारणाच व्यापारीकरण झालेले आहे. व्यापारी सत्तेत जाऊन बसल्यामुळे पैसा हाच ...

एआय-आधारित होम इंटीरियर ब्रँड शुभारंभ

Image
एआय-आधारित होम इंटीरियर ब्रँड शुभारंभ  मुंबई / रमेश औताडे  होमलेन या भारतातील आघाडीच्‍या तंत्रज्ञान व एआय-आधारित होम इंटीरियर ब्रँडने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे आपला पहिला स्टुडिओ लाँच केला आहे. प्रबळ पायाभूत सुविधा आणि मुंबई महानगर क्षेत्राशी असलेल्या उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे बेलापूर हे महत्त्वाचे व्यापारी आणि निवासी केंद्र म्हणून ओळखले जाते.  हा स्टुडिओ संतोष कुमार जे आणि  पार्थिबन सुधमन यांच्या भागीदारीत सुरू करण्यात आला आहे . होमलेनचे सह-संस्थापक आणि सीओओ तनुज चौधरी म्हणाले, नवी मुंबई आमच्यासाठी नेहमी महत्त्वाची बाजारपेठ राहिली आहे, विशेषतः सीबीडी बेलापूरसारखी ठिकाणे, जिथे प्रबळ पायाभूत सुविधांमुळे निवासी क्षेत्रात शाश्वत वाढ होत आहे.  या सहयोगाबाबत मत व्‍यक्त करत  संतोष कुमार जे म्हणाले, नवी मुंबईसारख्या बाजारपेठांमध्ये आता संघटित इंटीरियर सोल्यूशन्सला अधिक पसंती दिली जात आहे.  या लाँचसह, होमलेनने शहरी बाजारपेठांमध्ये आपला विस्तार सुरूच ठेवला आहे, तसेच सुलभ उपलब्धता, स्थानिक भागीदारी आणि तंत्रज्ञानावर आधारित सुव्यवस्थित इंटीरियर अ...

प्रकाश खंडागळे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह रामदास आठवले यांच्या पार्टीत प्रवेश

Image
मुंबई / रमेश औताडे  पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत, रिपब्लिकन सेनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रकाश खंडागळे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह औपचारिकपणे पक्षात प्रवेश केला. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पक्षाला वाढता पाठिंबा मिळत असून, याचे स्पष्ट उदाहरण काल ​​दिसून आले.  मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत रिपब्लिकन सेनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रकाश खंडगळे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह औपचारिकपणे पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील गटबाजी संपवून एकसंध रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक गट असले तरी देशातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकच रिपब्लिकन पक्ष आहे. त्यामुळे नवीन गट तयार करण्याऐवजी सर्वांनी एकत्र यावे. त्यांच्या या आवाहनाला समाजात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रकाश खंडगळे यांनीही आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आणि वेग...

निदा खानवरील आरोप एकतर्फी व तथ्यहीन असल्याचा दावा

Image
मुंबई / रमेश औताडे  नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस  प्रकरणातील आरोपी निदा खान हिच्या समर्थनार्थ गुरुवारी मुंबई प्रेस क्लब येथे  ए पी सी आर संस्थेने पत्रकार परिषद घेतली.  निदा खानवर लावण्यात आलेले आरोप तपासाअंती खरे खोटे बाहेर येईल, त्यामुळे माध्यमांनी व सरकारने दोन्ही बाजू पाहून बोलावे व छापावे अशी मागणी केली. या प्रकरणाला जाणीवपूर्वक धार्मिक रंग देण्यात येत असल्याची टीका करत, ए पी सी आर संस्थेचे महासचिव शाकीर भाई शेख म्हणाले, “हे प्रकरण तपासाआधीच ‘कॉर्पोरेट जिहाद’ किंवा ‘धर्मांतर’ अशा स्वरूपात सादर केले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. वक्त्यांनी सांगितले की, सध्या प्रकरणाची चौकशी सुरू असून अनेक बाबी अद्याप सिद्ध झालेल्या नाहीत. काही सामाजिक संस्थांच्या अहवालांचा दाखला देत, “पुरावे आणि सार्वजनिक चर्चेत मोठा फरक आहे,” असेही ते म्हणाले.  यावेळी पत्रकार निरंजन टकले, तिस्ता सटेलवाड, संध्या गोखले, ॲड, नदीम खान, डॉल्फी डिसुझा, शाकीर भाई शेख उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांवरही टीका करत, “काही मीडिया ट्रायलमुळे आरोपींच्या बाजूने असलेले मुद्दे...

ब्रँड ॲम्बेस्टर बदलले… पण ‘लाल परी’ अजूनही रुग्णालयातच!

Image
मुंबई / रमेश औताडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (ST) पुन्हा एकदा आकर्षक चेहरा पुढे करत अभिनेता रितेश देशमुख यांची ब्रँड ॲम्बेस्टर म्हणून नियुक्ती केली. मात्र, प्रत्यक्षात ‘ लाल परी ’ची अवस्था सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच खालावत चालली असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ब्रँड ॲम्बेस्टर बदलून प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न होत असताना, जमिनीवरची परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळी आहे. बसस्थानकांवर स्वच्छतेचा अभाव, पिण्याच्या पाण्याची सुविधा बंद, डेपो मधील पंखे बंद अवस्थेत, तसेच इंडिकेटरनुसार बस न लागल्याने प्रवाशांना बॅगा घेऊन धावपळ करावी लागत आहे. परिणामी प्रवाशांचा त्रास वाढत असून, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी हा प्रवास अधिकच कष्टदायक ठरत आहे. याशिवाय, वाढलेले अपघात, कंत्राटी पद्धतीने भरती केलेले वाहक चालक आणि कर्मचाऱ्यांवरील ताण यामुळे एस टी सेवेच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे सरकार विविध सवलतींचा गाजावाजा करत असताना, दुसरीकडे मूलभूत सुविधा पुरवण्यातच प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, याआधीही अनेक ...

वाहन चालक मालकांच्या अन्यायाविरोधात आंदोलनाचा इशारा

Image
मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्र राज्य परिवहन विभागामध्ये हप्ते वसुलीबाबतचा मोठा भ्रष्टाचार तसेच वाहन चालक मालक यांची आर्थिक लूट, वाहन चालकांवर होणाऱ्या अन्याय त्वरित बंद करावा अशी मागणी ऑल इंडिया चालक मालक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा कामगार नेते रमेश समुखराव यांनी केली. सरकारने आमच्या मागण्यांबाबत गांभीर्याने विचार केला नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला.  राज्यातील सर्व जिल्हयामध्ये आर. टी. ओ. अधिकारी ओव्हरलोडच्या नावाखाली वाहन चालक मालकांकडून प्रती महिना सर्रास हप्ते वसुली करीत असतात. आर.टी. ओ. कार्यालयामध्ये वाहन चालक व मालकांची गाडी पासिंग व ड्रायव्हर लायसन्स रिनिव्ह करण्याच्या नावाखाली आर्थिक लूट होत आहे. राज्यातील सर्व चेक पोस्ट वर वाहन पेपर तपासणीच्या नावाखाली वाहन चालक व मालकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जाते. राज्यामध्ये वाहन चालक एन्ट्री देत नाही म्हणून वाहन चालकास गंभीर मारहाण केली जाते. गाडी मालक व वाहन चालक यांनी आर.टी.ओ. अधिकारी किंवा वाहतुक पोलिस यांना एन्ट्री नाही दिली तर अक्षरशा पैसे न दिल्यामुळे रागाच्या भरात गाडीला आग लावले...

स्वच्छता दूत फाउंडेशनची राज्यभर स्वच्छता मोहीम

Image
मुंबई / रमेश औताडे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर गेल्या १४ दिवसांपासून स्वच्छता दूत फाउंडेशन तर्फे राज्यभर स्वच्छता प्रशिक्षण व जनजागृती मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.  अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मुकेश पाखरे यांनी दिली. स्वच्छता मनाची स्वच्छता घराची स्वच्छता परिसराची स्वच्छता देशाची अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर हा संदेश घुमला. या मोहिमेत गावपातळीपासून शहरांपर्यंत स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे, प्रात्यक्षिके आणि जनजागृती केली. आपला परिसर स्वच्छ मोहीम कार्यक्रमाचे आयोजन फाउंडेशनचे अध्यक्ष मुकेश पाखरे, रिविका पाखरे व मार्गदर्शक रीना राव यांनी केले. राज्याच्या विविध भागांत रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर, तसेच वस्ती भागांमध्ये स्वच्छता उपक्रम राबवून परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करण्यात आला.  डॉ. आंबेडकर यांच्या समतेच्या आणि स्वच्छ समाजाच्या विचारांना अभिवादन म्हणून ही मोहीम राबविण्यात येत असून, नागरिकांनीही याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.  पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  संस्थापक संपादक ...