Posts
कुणी घर देता का घर असा नारा देत आंदोलनाचा इशारा
- Get link
- X
- Other Apps
मुंबई / रमेश औताडे सरकारने बेघर कोणी राहणार नाही असा आदेश निर्गमित केला आहे. मुंबई भाडेकर रहिवासी संघामध्ये जिथे भाडेकरू आहेत, त्या सर्वांना घरी मिळाले पाहिजेत. मुंबई शहरात गेल्या अनेक पिढ्यांपासून जुन्या चाळी, इमारती आणि झोपडपट्टी या वस्त्यांमध्ये मोठ्या संख्येने भाडेकरू राहत आहेत पुनर्वसनाच्या अनेक योजना राबविल्या जात असल्या तरी विखुरलेल्या वैयक्तिक घर मालकांकडे राहणारे भाडेकरू मात्र या योजनांपासून वर्षानुवर्ष वंचित राहतात. त्यामुळे मराठी भूमिपुत्र बेघर होण्याची भीती निर्माण झाली आहे. मुंबई भाडेकरू रहिवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे, प्रभाकर कांबळे मुंबई भाडेकरू संघ अध्यक्ष, वनिता कांबळे मुंबई भाडेकरू महासंघ जिल्हाध्यक्ष, वनिता निकाळजे मुंबई जिल्हा सचिव भाडेकरू रहिवासी संघ, संकल्पना कांबळे मुंबई कोषाध्यक्ष भाडेकरू रहिवासी महासंघ यांनी सरकारकडे याबाबत मागणी केली आहे. म्हाडा व एस आर ए च्या पुनर्विकास योजनांमध्ये विखुरलेल्या भाडेकरूनना स्वतंत्र घटक म्हणून समाविष्ट करावे. पुनर्विकासातून निर्माण होणाऱ्या एकूण सदनिकांपैकी किमान २० टक्के सद...
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे महाराष्ट्र महा अधिवेशन गोवा येथे संपन्न
- Get link
- X
- Other Apps
मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे महाराष्ट्र महा अधिवेशन गोवा येथे पार पडले यावेळी गोवा राज्याचे मुख्यमंत्री नामदार डॉक्टर प्रमोद सावंत, गोव्याचे समाज कल्याण मंत्री नामदार सुभाष फळदेसाई , भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राम कृष्ण वेताळ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने, आयुष्यमान भारत योजनेचे महाराष्ट्राचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत पणजी गोव्याचे खासदार सदानंद शेठ तानावडे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय नामदार उदय सामंत साहेब गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील साहेब यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन संपन्न झाले यावेळी गोवा राज्याचे मुख्यमंत्री नामदार डॉक्टर प्रमोद सावंत, गोव्याचे समाज कल्याण मंत्री नामदार सुभाष फळदेसाई , भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राम कृष्ण वेताळ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने, आयुष्यमान भारत योजनेचे महाराष्ट्राचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे अखिल भार...
अन्यायाविरोधात दिव्यांग नागरिकाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
- Get link
- X
- Other Apps
हक्कासाठी लढतोय , पण ऐकणार कोण ! मुंबई / रमेश औताडे अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशाची खेडचे तहसीलदार यांनी अंमलबजावणी करून आदेश पारित केल्यानंतर खेडच्या उपविभागीय अधिकाऱ्याने तातडीने स्थगिती दिली. यामुळे खेड तालुक्यातील सायगाव येथील जमीनप्रकरणी अन्यायग्रस्त दिव्यांग नागरिक सुदाम शंकर बोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे उपोषण सुरू केले आहे. उपविभागीय अधिकारी,खेड यांचा आदेश १२ एप्रिल २०१६ रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांनी रद्द केला होता. तहसीलदार खेड यांना फेरचौकशी आदेश दिले होते. त्यानंतर अप्पर विभागीय आयुक्त पुणे यांचेकडे स्थगिती नसतानाही नऊ वर्षे अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. तहसीलदार खेड यांनी २५ मार्च २०२६ रोजी अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांचा आदेश कायम ठेवल्याने प्रतिवादींनी खेडचे उपविभागीय अधिकारी, प्रांत यांचेकडे अपिल दाखल केले. स्थगिती दिली नाही तर जमीनीची विक्री सुदाम बोरकर व इतर करतील हा मुद्दा ग्राह्य धरून खेडचे उपविभागीय अधिकारी, प्रांत ...
सुसंवादाने जगण्यासाठी आंतर-धार्मिक एकता परिषद
- Get link
- X
- Other Apps
मुंबई / रमेश औताडे सर्व धर्मांमधील वाईट विचारधारेला नाकारणे आणि निसर्गाशी सुसंवादाने जगणे या दोन मुद्यावर आंतर-धार्मिक एकता परिषद होत आहे. मॅगसेसे पुरस्कार विजेते टी. एम. कृष्णा हे या परिषदेत प्रमुख भाषण देणार आहेत. आंतर-धार्मिक एकता परिषदेचे संयोजक आणि इस्कॉनचे पदाधिकारी केशव चंद्र दास , आयआरएससीचे सह-संयोजक आणि सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझमचे संचालक इरफान इंजिनिअर, दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग, रामकृष्ण मिशन, मुंबई धर्मप्रांत आणि अजमेर शरीफ दर्गा यांसारख्या संस्थांचे प्रतिनिधी, धार्मिक नेते परिषदेत सहभागी होणार आहेत. जेसुइट धर्मगुरू आणि शिक्षणतज्ज्ञ फादर फ्रेझर मास्कारेन्हास, डॉ. सुरिंदर कौर, अभिनेते जॉय सेनगुप्ता, टी. एम. कृष्णा आणि त्यांच्या चमूच्या कर्नाटकी संगीताच्या सायंकाळच्या कार्यक्रमाने याची सांगता होईल. सत्य बोला आणि आपल्यातील प्रामाणिकपणाचा स्वीकार करा. असा संदेश देण्यात येणार आहे. आपण एकमेकांच्या श्रद्धा समजून घ्यायला आणि स्वीकारायला शिकले पाहिजे. जेव्हा धर्मामागे दुष्ट हेतू असतो, तेव्हा तो अतिरेकी बनतो. आम्ही टप्प...
दर्पण, आरसा, मिरर आणि आता आईना ....
- Get link
- X
- Other Apps
मुंबई / रमेश औताडे दर्पण आरसा आईना आणि आता मिरर....सर्वसामान्य माणसाच्या जीवनात रोज शंभर वेळा येणारी वस्तू एका नाटकाच्या माध्यमातून मुंबई मराठी पत्रकार संघ येथे प्रेक्षकांना अनुभवण्यास मिळाली. पुण्यातील जागर नाट्यसंस्थेने निर्मित ‘आईना’ हा मराठी-अहिराणी भाषेतील दीर्घांक नुकताच मुंबई मराठी पत्रकार साहित्य संघात यशस्वीरीत्या सादर केला. ‘जागर’ या संस्थेची स्थापना वासुदेव पाळंदे यांच्यासह माधव वझे, श्याम भुतकर, गजानन परांजपे, सुधीर भडकमकर आणि आनंद घाणेकर या रंगकर्मीनी केली होती. संस्थेचे सध्या अविरत ४८ वे वर्ष सुरू आहे. ‘आईना’ हा दीर्घांक एका जपानी लोककथेवर आधारित आहे. जंगलात साधे, स्वयंपूर्ण जीवन जगणाऱ्या एका चौकोनी कुटुंबाच्या आयुष्यात अचानक आलेला एक साधा आरसा त्यांच्या भावविश्वात कुतूहल, भीती, आनंद आणि गंमत निर्माण करतो. स्वतःचे प्रतिबिंब पहिल्यांदाच अनुभवताना उलगडणारी ही कथा निरागसता, विनोद आणि भावनिक खोली यांचा सुंदर मिलाफ घडवते. मूळ जपानी लोकथेवरील हे नाटक चिओमी हारा ह्यांनी लिहिले आहे. या नाटकाचे हिंदी भाषांतर अशोक चतुर्वेदी ह्यांनी केल...