अनुसूचित जातीच्या आश्रमशाळांना मान्यता मिळण्याची मागणी मुंबई / रमेश औताडे सामाजिक न्याय विभागाकडे मान्यतेस्तव प्रलंबीत नस्ती क्र. १६९ /२०१७ शिक्षण-२ मधील अनु. जातीच्या आश्रमशाळांना शाहू, फुले, आंबेडकर निवासी - अनिवासी शाळा योजनेतून मान्यता देण्याची मागणी नवनिर्माण विकास सेवा संघाचे सचिव गोपाल मधुकरराव पवार यांनी शासनाकडे केली आहे. नस्ती क्र. १६९/२०१७ शिक्षण-२ ही नस्ती सामाजिक न्याय विभागात शाहू फुले, आंबेडकर निवासी अनिवासी शाळा योजनेतून मान्यतेसाठी प्रलंबित आहेत. यापूर्वी तत्कालीन मंत्री (सामाजिक न्याय) यांनी सदरील नस्त्यामधील आश्रमशाळांना शालेय शिक्षण विभागाच्या तपासणीचा अधिन राहून मान्यता दर्शविलेली आहे. तरीही या काळात आश्रमशाळा मान्यता मिळालेली नाही. सन २०१२ ते २०१८ दरम्यान आमच्या सारख्या २१ आश्रमशाळेस मान्यता दिली आहे. तसेच २०२१ ते २०२२ मध्ये अश्याच प्रकारच्या २८ अनु. जातीच्या आश्रम शाळांना शाहू फुले आंबेडकर निवासी अनिवासी शाळा योजनेतून कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिल्या आहेत. या नस्ती मधील आश्रमशाळा २००९ पासून सुरु आहेत व वेळोवेळी या आश्रमशाळांची गुनात्मक तपासण्या ...
Posts
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलेचा उद्योग शुभारंभ
- Get link
- X
- Other Apps
स्वतःचा स्वावलंबनाचा मार्ग मंगल रामचंद्र महाकाळ यांचे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अनेक थरातून कौतुक होत आहे. अनेक महिलांसाठी प्रेरणादायी देणारे प्रमाणपत्र पी आर न्यूज मिडिया नेटवर्क प्रतिनिधी दिनांक 7 मार्च 2026 8767646376 सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील वासुद गावात राहणाऱ्या एका ६० वर्षीय महिलेने परिस्थितीशी झुंज देत स्वावलंबनाचा मार्ग निवडला आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांनी घराच्या अंगणात छोटेखानी शेड उभारून देशी कोंबडीपालन व्यवसाय सुरू केला असून आज हा उपक्रम गावातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आर्थिक अडचणींचा सामना करत त्यांनी सुरुवातीला ५० लहान देशी कोंबड्या खरेदी केल्या. अंगणातच जाळीचे कंपाऊंड करून छोट्या शेडमध्ये त्यांचे संगोपन सुरू केले. मर्यादित साधनसामग्री असतानाही त्यांनी मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर हा व्यवसाय उभा केला. देशी कोंबड्यांची अंडी आणि मांसाला ग्रामीण भागात चांगली मागणी असल्याने त्यांना स्थानिक बाजारात चांगला प्रतिसाद मिळणार आहे. दररोज को...
शिक्षकांच्या जुनी पेन्शन मागणीचे श्रद्धांजली अर्पण आंदोलन यशस्वी..... प्रा. विजय शिरोळकर
- Get link
- X
- Other Apps
शिक्षणमंत्री दादा भुसे यांना निवेदन देताना राज्याध्यक्ष प्रा.विजय शिरोळकर , भास्कर देशमुख, तानाजी शेळके, तसेच रणजीत तावरे मुंबई / रमेश औताडे महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने दिनांक ५ मार्च २०२६ रोजी आझाद मैदान येथे जुनी पेन्शन लक्षवेधी धरणे आंदोलन अत्यंत यशस्वी झाले. सदर आंदोलनास आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. ज. मो. अभ्यंकर, आ. विक्रमजी काळे, आ. जयंत आसगावकर आ. सुधाकर अडबाले, आ. किरण सरनाईक, आ. अभिजीत वंजारी तसेच पेन्शन लढ्याचे संगीताताई शिंदे, प्रशांत पगार यांनी संघटनेचे निवेदन स्वीकारून न्यायिक मागण्यां सविस्तर जाणून घेतल्या. पेन्शन पीडित बांधव, मयत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय अनेक संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी बहुसंख्येने आझाद मैदान वरती उपस्थित होते. आंदोलन खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरलं कारण बहुसंख्य शिक्षक आणि पदवीधर यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रती श्रद्धांजली अर्पण करून पुढील रणनीती जाहीर केली. आमदार विक्रम काळे यांनी संघटनेच्या क...
माध्यमांवरील कॉर्पोरेट कंट्रोल कमी व्हावा : पृथ्वीराज चव्हाण
- Get link
- X
- Other Apps
मुंबई ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांवरील कॉर्पोरेट कंट्रोल कमी व्हावा अशी मागणी केली. ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांच्या ‘कटाक्ष’ या लेखसंग्रहाचे लोकार्पण करताना ते बोलत होते. व्यासपीठावर माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ‘देशोन्नती’चे मालक-संपादक प्रकाश पोहरे, माजी न्यायमूर्ती द्वय सत्यरंजन धर्माधिकारी व साधना जाधव, सदामंगल प्रकाशनच्या प्रकाशक-संपादक प्रज्ञा जांभेकर आणि जयंत माईणकर उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, आज अंबानी, अडाणी, सुभाषचंद्र यांच्याकडे किती चॅनेल्स आहेत याचा अभ्यास केला, तर त्यांचा आवाका किती मोठा आहे हे लक्षात येईल. मीडियावरील हा कॉर्पोरेट कंट्रोल कमी झाला पाहिजे, त्यावर काही मर्यादा आल्या पाहिजेत. तसेच मीडियाच्या विविध भागांत केवळ एका कॉर्पोरेट हाऊसने प्रवेश करावा का, यावरही मर्यादा असाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. हा प्रयत्न एस. जयपाल रेड्डी माहिती व नभोवाणी मंत्री असताना करण्यात आल्याचा हवाला देत ते पुढे म्हणाले की, अनेक देशांत अशा प्रकारची बंधने आहेत. भारता...
६० व्या वर्षी उभा केला स्वावलंबनाचा मार्ग
- Get link
- X
- Other Apps
देशी कोंबडीपालन अनेक महिलांसाठी प्रेरणादायी मुंबई / रमेश औताडे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील वासुद गावात राहणाऱ्या एका ६० वर्षीय महिलेने परिस्थितीशी झुंज देत स्वावलंबनाचा मार्ग निवडला आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांनी घराच्या अंगणात छोटेखानी शेड उभारून देशी कोंबडीपालन व्यवसाय सुरू केला असून आज हा उपक्रम गावातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आर्थिक अडचणींचा सामना करत त्यांनी सुरुवातीला ५० लहान देशी कोंबड्या खरेदी केल्या. अंगणातच जाळीचे कंपाऊंड करून छोट्या शेडमध्ये त्यांचे संगोपन सुरू केले. मर्यादित साधनसामग्री असतानाही त्यांनी मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर हा व्यवसाय उभा केला. देशी कोंबड्यांची अंडी आणि मांसाला ग्रामीण भागात चांगली मागणी असल्याने त्यांना स्थानिक बाजारात चांगला प्रतिसाद मिळणार आहे. दररोज कोंबड्यांची काळजी घेणे, स्वच्छता राखणे, योग्य खाद्य देणे आणि सुरक्षितता यावर त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे त्यांच्या कोंबड्या चांगल्या वाढत असून व्यवसाय हळूहळू स्थिर होत आहे. ग्रामीण भागात अनेक महिला आर्...
वांद्रेतील एसआरए प्रकल्पात २९७ भाडेकरूंची फसवणूक
- Get link
- X
- Other Apps
वांद्रेतील एसआरए प्रकल्पात २९७ भाडेकरूंची फसवणूक मुंबई / रमेश औताडे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत सुरू असलेल्या वांद्रे येथील आई कंदेश्वरी एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकास प्रकल्पात सात वर्षांचा विलंब झाल्याचा आरोप सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. प्रकल्पाचे विकासक हरे कृष्णा डेव्हलपर्स यांनी करारातील अटींचे पालन न करता प्रकल्प रखडवून ठेवला असून २९७ भाडेकरूंशी फसवणूक केल्याचा आरोप सोसायटीचे प्रमुख प्रवर्तक प्रदीप सरफरे यांनी पत्रकार परिषदेत केला. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सरफरे यांनी सांगितले की, या पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीत तब्बल सात वर्षांचा विलंब झाला असून याची नोंद एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कलम १३(२) अंतर्गत झालेल्या सुनावणीत केली आहे. प्रकल्पातील भाडेकरूंना देय असलेले भाडे १४ महिन्यांपर्यंत देण्यात आले नाही. वारंवार तक्रारी केल्यानंतरच काही प्रमाणात भाडे देण्यात आले, मात्र करारानुसार देण्यात येणारी १० टक्के वाढ अद्याप देण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच अर्धवट बांधलेल्या...
ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेचे ठाण्यात भव्य आयोजन
- Get link
- X
- Other Apps
८-९ मार्च रोजी ‘विकसित भारत नारी शक्ती संगम’ मुंबई / रमेश औताडे ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी आणि नेतृत्व विकासासाठी ८ व ९ मार्च रोजी ठाणे येथे “विकसित भारत नारी शक्ती संगम” या शीर्षकाखाली दोन दिवसीय भव्य परिषद आयोजित करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या आणि ग्रामीण भागातील स्वयंप्रेरित महिलांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ही परिषद जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर होत असून, देशातील पहिल्या महिला विधिमंडळ सदस्य मुथुलक्ष्मी रेड्डी यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या शताब्दी वर्षानिमित्त हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. देशभरातून व्यवसाय, उद्योग, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुमारे ५०० ग्रामीण महिलांचा सहभाग अपेक्षित आहे. परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, महाराष्ट्र पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षपद माजी खासदार व प्रवर्तिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय...