Posts

पात्र आणि संरक्षित फेरीवाले विक्रेत्यांचे आझाद मैदानात आंदोलन

Image
मुंबई / रमेश औताडे  मुंबईतील आझाद मैदान येथे पात्र आणि संरक्षित रस्त्यावरील फेरीवाले आणि विक्रेत्यांनी विविध मागण्यांसाठी मोठे आंदोलन केले. आझाद होकर्स युनियन यांच्या नेतृत्वाखाली हजारो फेरीवाल्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. या आंदोलनात केंद्र सरकारच्या  नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, रस्त्यावरील विक्रेत्यांचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसून अनेक ठिकाणी फेरीवाल्यांवर अन्याय होत आहे. असे युनियन चे संस्थापक अध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी सांगितले. युनियन चे सचिव जय शंकर सिंह म्हणाले, महापालिकेकडून कारवाई करताना विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर दंड आकारला जात आहे. काही ठिकाणी माल जप्त केला जात असून, परत मिळवण्यासाठी निश्चित नियम नसल्याची तक्रारही करण्यात आली.  स्थानिक स्तरावर काही गुंडांकडून नव्या फेरीवाल्यांकडून दररोज पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. या प्रकारावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी प्रतिनिधींनी राज्य सरकारकडे निवेदन देत, ...

संदीप ( भाऊ ) तळेकर यांच्याकडून आक्रमक आंदोलन

Image
मुंबई / रमेश औताडे  सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके मधील जलजीवन योजना अंतर्गत असणारे गावे  व करमाळा तालुक्यातील जलजीवन योजना अंतर्गत व रूपांतरित साठवण पाझर तलावात केम पोथरे जातेगाव कोर्टी,अर्जुननगर, सालसे,  या गावांमध्ये भ्रष्टाचार ठेकेदार शिवनेरी कंट्रक्शन केम, शिवाजी उत्तरेश्वर तळेकर यांनी संबंधित कामे निकृष्ट दर्जाचे केली शेतकऱ्यांची दिशाभूल करून व अधिकार्याला दम देऊन सर्व ठिकाणी बोगस काम करून बिले काढण्याचा प्रयत्न केला .  याचं गांभीर्य लक्षात घेऊन सर्व गावातील शेतकऱ्यांनी आवाज उठवला अनेक वेळा आंदोलन केली तरी देखील अधिकाऱ्यांनी कुठलाही न्याय शेतकऱ्यांना दिला नाही यासाठी प्रहार संघटना रस्त्यावर उतरत आहे. मुख्य अभियंता मृद व जलसंधारण विभाग येरवडा पुणे येथे दिनांक,16/12/2025  मंगळवार रोजी करमाळा तालुक्यातील सर्व संबंधित गावातील शेतकऱ्यांना एकत्रित घेऊन प्रहार संघटना संबंधित अधिकारी प्रशासन व ठेकेदार यांच्या विरोधात तीव्र अर्धनग्न आंदोलन करणार आहे.आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व व ग्रामविकास कॅबिनेट मंत्री,जयकुमार गोरे साहेब यांनी शेतकऱ्यांची व शे...

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश*

*संपावर तोडगा काढून कामगारांना त्वरित कामावर  घ्यावे* *कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश* मुंबई, दि. १२: टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड (धानिवली, ता. मुरबाड, जि. ठाणे) या कंपनीच्या  गारमेंट विभागातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कंपनी व्यवस्थापनाने संपावर तोडगा काढून निलंबित कामगारांना कामावर घ्यावे. तसेच या परिसरात औद्योगिक शांतता कायम  ठेवावी, असे निर्देश कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली.  बैठकीत कामगार मंत्री श्री. फुंडकर बोलत होते.  बैठकीस मुरबाडचे आमदार किसन कथोरे, कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी तुम्मोड, उप कामगार आयुक्त संभाजी वन्हाळकर अप्पर कामगार आयुक्त भगवान आंधळे, सहाय्यक कामगार आयुक्त अनघा क्षीरसागर,  कंपनीचे संचालक सुदर्शन सराफ आदी उपस्थित होते. कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर म्हणाले, टेक्नोक्राफ्ट कंपनीच्या गारमेंट विभागातील कर्मचारी मागील १  डिसेंबर २०२५ पासून संपावर  आहे. याबाबत तोडगा काढणे आवश्यक ...

आमदार अमित गोरखेंच्या आश्वासनानंतर मातंग समाजाचे उपोषण स्थगित

Image
मुंबई / रमेश औताडे  अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आझाद मैदान येथे सुरू असलेले मातंग समाजाचे उपोषण अखेर आमदार अमित  गोरखे यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे. या उपोषणाचे आयोजन राष्ट्रीय स्वाभिमानी मातंग संघटना व मागासवर्गीय वंचित संघ यांच्या वतीने करण्यात आले होते. आरक्षण उपवर्गीकरण, प्रस्तावित अण्णाभाऊ साठे स्मारक चिराग नगर सहित लहुजी नगर शेगाव पुनर्वसन अपंग आयोग अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न आदी विषयावर आमदार  गोरखे यांनी जबाबदारी घेऊन पूर्ण करून घेईल अशी हमी दिली आणि सरकारच्या वतीने मी मातंग समाजाची कोणतीच मागणी प्रलंबित राहू देणार नाही अशी ग्वाही दिली. उपोषणास राष्ट्रवादीचे जयंत पाटील शशिकांत शिंदे संदीप क्षीरसागर शिवसेना उबाठा चे सचिन अहिर राष्ट्रीय काँग्रेस चे भाई जगताप तर सत्ताधारी पक्षा तर्फे आमदार सत्यजीत देशमुख सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी भेट दिली  आश्वासनानंतर श्री गोरखे यांनी राजीव मानकर मोहन कांबळे प्रकाश चव्हाण अनिल साठे मोहन साठे यांना पाणी देऊन उपोषण सोडले. आयोजकाच्या वतीने  राजीव मानकर यांनी आमदार अ...

बंजारा समाज न्यायासाठी आझाद मैदानात

Image
मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाजाच्या एस. टी. आरक्षणाकरीता केंद्र सरकारच्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारने आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचेकडून अहवाल मागितल्याप्रमाणे प्रधान सचिव आदिवासी मंत्रालयाला २६ जुलै २०१९ रोजी अहवाल आणि प्रस्ताव सादर केला आहे.  तसेच राष्ट्रीय बंजारा मिशन संघटनेने अहवालातील त्रुटीचे लेखी निराकरण त्याच काळात पूर्ण करून दिले आहे.  राष्ट्रीय बंजारा विकास मिशन , भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष देवराव राठोड, महंत सुभाष आनंद सरस्वती, महंत मलेशभाई महाराज, विनोद महाराज रामावत, प्राध्यापक आकाश राठोड, चंद्रशेखर राठोड, काळू चव्हाण उपस्थित होते. नागपूर अधिवेशनात संदर्भिय निवेदन १२ डिसेंबर २०२५ सोबत ४७ पानाचे पुरावे सादर केले आहेत. या पार्श्वभूमीवर संदर्भिय प्रस्ताव आणि अहवाल महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस करावी तसेच अधिकृत एस.टी.मध्ये समावेश होई प्रयत्न धनगर समाजाच्या धर्तीवर बंजारा समाजाला एस.टी.च्या सोई सुविधा लागू करावे. न्यायमुर्ती इंद्रासहानी आणि मंडल आयोगाच्या निर्णयानुसार नॉनक्रिमीलेअर मधून काढावे. वसंतराव ...

नवी दिल्लीत रजनी पंडित यांना 'लोकमाता अहिल्याबाई होळकर' पुरस्कार प्रदान

Image
नवी दिल्ली : प्रतिनिधी देशातील पहिल्या महिला गुप्तहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रजनी पंडित यांना नवी दिल्ली येथे आयोजित एका विशेष सोहळ्यात 'लोकमाता अहिल्याबाई होळकर पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.  भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महिला सक्षमीकरण आणि आपल्या क्षेत्रात धाडसाने ठसा उमटवणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. रजनी पंडित यांनी गुप्तहेर क्षेत्रात अनेक दशके केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी रजनी पंडित यांच्या जिद्दीचे कौतुक केले आणि त्या अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान असल्याचे नमूद केले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर रजनी पंडित यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मेघमल्हारच्या रणरागिनींचा महिला दिनी सन्मान

Image
नवी मुंबई ( प्रतिनिधी ) नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धा व उपक्रमांमध्ये मेघमल्हार गृहसंकुलातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक मिळवत मेघमल्हार गृहसंकुलातील रणरागिनींनी आपले कौशल्य आणि एकजूट सिद्ध केली. या यशामध्ये विशेष योगदान देणाऱ्या भारतीताई चिकणे यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या पुढाकारामुळे गृहसंकुलातील महिलांना एकत्र येऊन आपली प्रतिभा सादर करण्याची आणि समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली. त्यांच्या प्रेरणेमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला असून सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची प्रेरणा मिळाली आहे. महिलांच्या मेहनतीची आणि कर्तृत्वाची घेतलेली ही योग्य दखल असून मेघमल्हार गृहसंकुलातील सर्व महिलांनी एकत्रितपणे केलेले हे यश प्रेरणादायी आहे. समाजात महिलांचे योगदान किती महत्त्वाचे आहे याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे. सर्व महिलांना सलाम. 🙏 रमेश औताडे 7021777291 पी आर न्यूज मिडिया नेटवर्क