Posts

सायकल दान

Image
 *परिवर्तन फाउंडेशन, Adyen व ConnectFor यांच्या ‘सायकल दान – Pedals of Joy’ उपक्रमातून ५२ विद्यार्थ्यांना सायकल वितरण*  परिवर्तन फाउंडेशनतर्फे, Adyen व ConnectFor यांच्या सहकार्याने “सायकल दान – Pedals of Joy” या उपक्रमांतर्गत जनसेवा संघ ट्रस्ट संचालित नेरे हायस्कूल येथे सायकल वितरण व सायकल सुरक्षितता जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाअंतर्गत शाळेतील ५२ विद्यार्थ्यांना सायकली वितरित करण्यात आल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना होणारा त्रास कमी करून त्यांच्या शिक्षणाला गती मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. परिवर्तन फाउंडेशनने नेरे हायस्कूल ही शाळा दत्तक घेतली असून येणाऱ्या पाच वर्षांमध्ये शाळेचा सर्वांगीण कायापालट करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. जनसेवा संघ ट्रस्ट संचालित नेरे हायस्कूलची कार्यकारिणी यासाठी सदैव तत्पर राहील असेही नमूद करण्यात आले. या कार्यक्रमाचे *अध्यक्ष श्री दत्तात्रय शेठ पाटील* हे होते, तर *प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अरुण कुमार मुळे* उपस्थित होते. कार्यक्रमास डॉ. गिरीश इंगळे – ...

दक्षिण मुंबईत ७४ मजली ‘ वन मरीना’ प्रकल्पाची घोषणा

Image
दक्षिण मुंबईत ७४ मजली ‘ वन मरीना’ प्रकल्पाची घोषणा मुंबई / रमेश औताडे  दक्षिण मुंबईतील मरीन लाइन्स परिसरात ७४ मजली आलिशान निवासी टॉवर उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘वन मरीना’ या नावाचा हा प्रकल्प वायएम इन्फ्रा समूह आणि अश्विन शेठ समूह यांच्या संयुक्त सहकार्याने साकारला जाणार आहे. सुमारे १५ लाख चौरस फूट बांधकाम क्षेत्रफळ असलेल्या या प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत सुमारे २८०० कोटी रुपये आहे. या भागातील हा सर्वात उंच निवासी टॉवर ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या टॉवरमध्ये २, ३ आणि ४ बेडरूमच्या सदनिका तसेच ड्युप्लेक्स आणि पेंटहाऊस प्रकारातील घरे असतील. घरांच्या किमती सुमारे ७ कोटी रुपयांपासून ४५ कोटी रुपयांपर्यंत असतील. प्रत्येक मजल्यावर सुमारे सहा सदनिका ठेवण्यात येणार असून, गोपनीयता आणि प्रशस्त समुद्रदृश्य यावर भर देण्यात आला आहे. सुमारे ९५ टक्के घरे अरबी समुद्राकडे तोंड करून असतील. समुद्रसपाटीपासून १३१ फूट उंचीवर पहिला राहण्यायोग्य मजला असेल, अशी माहिती देण्यात आली. या टॉवरमध्ये ६९ व ७० व्या मजल्यावर विशेष सुविधा देण्यात येणार आहेत. इमारतीचा काचांचा दर्शनी भाग उ...

आशियातील धारावी कोळीवाड्यात शिवजन्मोत्सव उत्साहात

Image
मुंबई / रमेश औताडे  आशिया खंडात नावाजलेल्या धारावीतील कोळीवाडा परिसरात हिंदू धर्म रक्षक युवा हिंदुत्व संघटनेच्या वतीने शिवजन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कोळीवाडा होळी मैदान येथे कार्यक्रमाची सुरुवात झाली. गड-किल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहिमेतील कार्यकर्त्यांचा प्रमुख सत्कार करण्यात आला.  प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे डबेवाले, शिवसेनेचे धारावी विधानसभा संघटक विठ्ठल पवार, शाखाप्रमुख किरण काळे, नवनिर्वाचित नगरसेवक जोसेफ कोळी, नगरसेविका अर्चना शिंदे, मनसेचे धारावी विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सोनावणे तसेच धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिटकर यांची विशेष उपस्थिती होती.  कोळीवाडा येथून सुरू झालेली मिरवणूक संत कक्कया मार्ग, कामराज हायस्कूल ९० फीट रोड, संत रोहिदास मार्ग, धारावी मेन रोड मार्गे पुन्हा होळी मैदान येथे विसर्जित झाली. या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे अध्यक्ष कौशिक कोळी, समीर भोईटे यांनी केले. “कोणताही पक्ष नाही, एकच झेंडा तोही भगवा” हाच उद्देश होता.

एलआयसी म्युच्युअल फंडकडून तंत्रज्ञानाधारित नवीन योजना जाहीर

Image
मुंबई, १९ फेब्रुवारी २०२६ :  रमेश औताडे ( प्रतिनिधी )  एलआयसी म्युच्युअल फंडाने तंत्रज्ञान क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारी नवीन समभागाधारित गुंतवणूक योजना जाहीर केली आहे. या योजनेद्वारे डेटा केंद्रे, डिजिटल व्यासपीठे आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योजनेचा नवीन निधी उभारणी कालावधी २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होऊन ६ मार्च २०२६ रोजी संपणार आहे. त्यानंतर ११ मार्च २०२६ पासून योजना सातत्याने खरेदी-विक्रीसाठी खुली राहील. या योजनेचे व्यवस्थापन करण दोशी आणि जयप्रकाश तोंगावळे हे संयुक्तपणे पाहणार असून, तिचे प्रदर्शन बीएसई टेक एकूण परतावा निर्देशांकाच्या मानदंडाशी तुलना करून केले जाईल. ही योजना पारंपरिक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रापुरती मर्यादित नसून सेमीकंडक्टर उत्पादनाशी संबंधित कंपन्या, डेटा केंद्रांचे संचालन करणाऱ्या संस्था, डिजिटल वाणिज्य व्यासपीठे, इंटरनेट आधारित व्यवसाय तसेच तंत्रज्ञानावर आधारित नवउद्योग यांचा समावेश करणार आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. झा यांनी सा...

शिवजन्मोत्सव सोहळा २०२६ उत्साहात साजरा होणार

Image
    शिवजन्मोत्सव सोहळा २०२६ उत्साहात साजरा होणार मुंबई / रमेश औताडे दक्षिण मध्य मुंबईतील सायन कोळीवाडा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘शिवजन्मोत्सव सोहळा २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने परिसरात शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर कार्यक्रमात शिवप्रतिमेचे पूजन, अभिवादन, शिवचरित्रावरील व्याख्यान, तसेच युवक-युवतींसाठी प्रेरणादायी संदेश यांचा समावेश असणार आहे. शिवजन्मोत्सव हा केवळ उत्सव नसून स्वराज्य, शौर्य, न्याय आणि संघटनशक्ती यांची प्रेरणा देणारा दिवस असल्याचे आयोजकांनी सांगितले. सकल मराठा समाज, द. मध्य मुंबई (रजि.) चे अध्यक्ष युवराज सूर्यवंशी यांनी सर्व शिवभक्त, समाजबांधव आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळा यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आदर्श नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी जयंती साजरी करण्याची भावना आहे,” असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचेही...

महाराष्ट्र करणी सेनेच्या मागणीला न्यायालयात यश

Image
      महाराष्ट्र करणी सेनेच्या मागणीला न्यायालयात यश         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे कौतुक मुंबई / रमेश औताडे  मुस्लिम हे अल्पसंख्याक म्हणून धार्मिक आरक्षण घेत असताना त्यांना जातीचे पण आरक्षण कॉंग्रेस सरकारने घटनाबाह्य दिले होते. मुस्लिम धर्मात जाती व्यवस्था नसल्याने त्यांचे जातीचे आरक्षण रद्द करा अशी महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यानी केली होती. त्याची दखल घेत मुस्लिमाचे जात आरक्षण भाजपा सरकारने रद्द केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या अतिशय योग्य अशा निर्णयाचे स्वागत सेंगर यांनी केले आहे. हिंदूधर्म त्याग केल्यावर हिंदू धर्माचे जातीचे सदस्य होण्याचे ऑटोमॅटिक बंद होते. इस्लाम व इतर धर्मात ज्या हिंदूंनी प्रवेश केला त्यांचा हिंदूधर्माशी कसलाही संबंध राहत नाही त्यांना पुनच्छ हिंदू जातीचे आरक्षण देणे हे बेकायदेशीर आहे. अल्पसंख्यक धर्म म्हणून सवलतीचा लाभ घेतात मग का त्याना दुहेरी लाभ दयावा ? असा सवाल सेंगर यांनी केला आहे. "महाराष्ट्र करणी सेना" यांनी मागील वर्षी मुस्लिम व ख्रिश्चन या धर्मात जातीय व्यवस्था नाही...

शिवजयंती निमित्त विशेष लेख !

Image
शिवजयंती निमित्त विशेष लेख !                                                                                               दंतकथांमुळे खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचलाच नाही !                                                           ...