Posts

बदलत्या जगात आपल्या कुटुंबाला ' कवच ' कसे द्यावे ?

Image
विशेष लेख | रमेश औताडे  डिजिटल सुरक्षा आणि कौटुंबिक आरोग्य आजच्या धकाधकीच्या आणि इंटरनेटच्या युगात बाहेरील जगातील बातम्या वाचून अनेकदा मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. मग ते 'द मार्क' सारख्या चित्रपटांतील मानवी स्वभाव असो किंवा 'एपस्टीन फाईल्स' सारखी भीषण सत्ये. अशा वेळी आपल्या कुटुंबाला, विशेषतः लहान मुलांना आणि महिलांना सुरक्षित ठेवणे ही सर्वात मोठी जबाबदारी ठरते. घरातील वातावरण सुरक्षित आणि आनंदी ठेवण्यासाठी खालील 'पंचसूत्री' अत्यंत महत्त्वाची आहे: १. 'गुड टच आणि बॅड टच'चे शिक्षण (लहान मुलांसाठी) मुलांना अगदी लहानपणापासूनच त्यांच्या शरीराबद्दल साक्षर करा. कोणाचे स्पर्श सुरक्षित आहेत आणि कोणाचे नाहीत, हे त्यांना सहज भाषेत समजावून सांगा. त्यांना हे पटवून द्या की, त्यांच्या शरीरावर त्यांचा स्वतःचा अधिकार आहे. २. संवाद: सर्वात मोठे शस्त्र आपल्या मुलांशी आणि जोडीदाराशी दिवसातून किमान १५-२० मिनिटे मनापासून संवाद साधा. मुलांना असे वाटले पाहिजे की, जगात काहीही चुकीचे घडले तरी ते सर्वात आधी आपल्या पालकांना सांगू शकतात. भीतीपोटी मुले अनेकदा गो...

असोसिएशन ऑफ क्लिनिकल् परफ्यूशनिस्ट महाराष्ट्र संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ.विजय व्यवहारे यांची नियुक्ती

Image
पनवेल / प्रतिनिधी असोसिएशन ऑफ क्लिनिकल् परफ्यूशनिस्ट महाराष्ट्र संस्थेची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली असून यामध्ये अध्यक्षपदी डॉ.विजय व्यवहारे यांची सन 2026 या सालाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सदर कार्यकारिणीमध्ये डॉ.विजय व्यवहारे (अध्यक्ष), अभय अनंत चव्हाण (सचिव) किरण आंब्रे (खजिनदार), राजू दौड, सौ. श्रीमती कुलकर्णी (उपाध्यक्ष), सहसचिव प्रशांत धुमाळ, वैशाली मेटे, सुरेश काळे, शशी काळे, डॉ.विश्‍वास पॉल (सल्लागार), ई.सी.मेंबर प्रतापसिंग चौहान, विनयचंद्रा शिंपी, डॉ.विजया लांजे, लहु सुपेकर, अमित पाटील, प्राची सोनावणे, विराज शिगवाण, अक्षय रेवडेकर, पंकज पाटील, अभिषेक शेट्ये व विवेक पॉल यांची निवड करण्यात आल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

गरजू महिलांना घरघंटी, शिलाई मशीनचे वाटप

Image
मुंबई / रमेश औताडे  मुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या परंतु अद्यापही महापौर आणि उपमहापौर यांची निवड करण्यात आलेली नाही. परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ सारिका शशीकांत झोरे यांनी गरजू महिलांना मदतकार्य करण्याचे विधायक कार्य सुरु केले आहे.  मुंबई महानगरपालिका प्रभाग क्र.१२ बोरिवली आर मध्य विभागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगरसेविका सौ. सारिका शशिकांत झोरे यांच्या माध्यमातून महिलांना घरघंटी, शिलाई मशीन, मसाला कांडप मशीनचे वाटप माजी महापौर, शिवसेनेच्या महानगरपालिका गटनेत्या सौ किशोरी पेडणेकर यांच्या शुभहस्ते झाले.  याप्रसंगी माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, महिला विभागसंघटक सौ. शुभदा शिंदे, विधानसभाप्रमुख अशोक म्हामूणकर, विधानसभा निरीक्षक सिनेट सदस्य शशिकांत झोरे, नगरसेवक धरम काळे, माजी नगरसेवक सौ सुजाता पाटेकर, चेतन कदम, सुनिल चव्हाण, सिनेट सदस्य मिलिंद साटम, सचिन मोरे, इतिश्री महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.*

एक देश एक परवान्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार खते मिळणार

Image
मुंबई / रमेश औताडे  सध्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये खत विक्रीसाठी वेगवेगळे परवाने घ्यावे लागतात. त्यामुळे कंपन्यांना अडचणी येतात आणि त्याचा फटका अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांनाच बसतो. एकच राष्ट्रीय परवाना प्रणाली लागू झाल्यास देशभर एकसारखी, दर्जेदार आणि योग्य दरातील खते शेतकऱ्यांना सहज मिळू शकतील. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात घट होऊन पीक उत्पादन वाढावे, यासाठी खत व सूक्ष्म पोषक तत्त्वांच्या धोरणात बदल होणे गरजेचे असल्याचे मत  परिषदेत व्यक्त करण्यात आले. ५ व ६ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्स्चेंज येथे ही दोन दिवसांची परिषद झाली.  परिषदेत बोलताना भारत सरकारचे कृषी आयुक्त डॉ. पी. के. सिंह यांनी सांगितले की, शेतीची खरी ताकद माती, पीक आणि शेतकरी यांच्यात आहे. माती निरोगी नसेल तर उत्पादन वाढणार नाही. त्यामुळे संतुलित खत वापर आणि एकात्मिक पोषण व्यवस्थापन  शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र शासनाचे मंत्री जयकुमार जितेंद्रसिंह रावल यांनी सांगितले की, सूक्ष्म खतांनी गेल्या अनेक वर्षांत पीक उत्पादन आणि गुणवत्तेत मोठी भर घातली आहे. शेतकरी, खत उत्प...

राष्ट्रीय आपत्तीच्या काळात इराणमध्ये बहाई समुदायावर दोषारोप

Image
मुंबई / रमेश औताडे  इराणमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय संकटाच्या पार्श्वभूमीवर बहाई समुदायाला पुन्हा एकदा दोषारोपांचे लक्ष्य बनवले जात असून त्यांच्या विरोधात द्वेष भडकवला जात असल्याची तीव्र चिंता बहाई आंतरराष्ट्रीय समुदायाने व्यक्त केली आहे.  राज्य-प्रायोजित माध्यमे आणि वाढत्या छळाच्या माध्यमातून ही मोहीम चालवली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. १९७९ च्या इस्लामी क्रांतीनंतरपासून प्रत्येक सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय संकटाच्या वेळी बहाई समुदायावर खोटे आरोप, दुष्प्रचार आणि द्वेष मोहिमा राबवण्याची परंपरा इराणच्या अधिकाऱ्यांनी सातत्याने सुरू ठेवली असल्याचे बहाई आंतरराष्ट्रीय समुदायाचे म्हणणे आहे. १ फेब्रुवारी रोजी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंग  या सरकारी माध्यमसंस्थेने आंदोलनांशी संबंधित दोन बहाई व्यक्तींचे तथाकथित कबुलीजबाब प्रसारित केले. मानवाधिकार संघटनांच्या मते, इराणमध्ये दबाव, धमकी आणि छळाद्वारे कबुलीजबाब घेण्याची प्रथा दीर्घकाळापासून सुरू आहे. जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रांमध्ये बहाई समुदायाच्या प्रतिनिधी सुश्री फहांदेज यांनी सांगितले की, “इराण...

खोट्या गुन्ह्यांच्या नोंदीविरोधात आंबेडकर सेनेचे आमरण उपोषण

Image
आझाद मैदान,  मुंबई प्रतिनिधी   रमेश औताडे  पनवेल शहरातील सामाजिक कार्यकर्ते राकेश कांबळे व मनोहर कांबळे यांच्या म्हणण्यानुसार, पनवेल पोलिस जातीय वाद उकरून काढत दारू गुटखा माफियाविरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवत आहेत. सह-पोलिस निरीक्षक राजेंद्र घेवडकर यांनी कोणताही समज न देता आपल्यावर बनावट स्वरूपाचे गुन्हे दाखल करून ‘चॅप्टर केस’ लावल्याचा दावा कांबळे बंधूंनी केला आहे. यामागे दारू-गुटखा माफियांचे हितसंबंध असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. आपण बौद्ध समाजाचे समाजसेवक असून अन्यायाविरोधात सातत्याने आवाज उठवत असल्यामुळेच आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.  पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांवर खोटे व किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांचे चारित्र्यहनन केले जात असल्याचा आरोप करत आंबेडकर सेनेच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले आहे.  आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, चॅप्टर केस, प्रतिबंधात्मक कारवाई आणि किरकोळ कारणांवर गुन्हे नोंदवून सामाजिक कार्यकर्त्यांना त्रास दि...

गणेश ठाकरे यांनी केली सरकारकडे मागणी

Image
    ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियमित कामगार म्हणून कायम करा मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनची राज्य कार्यकारिणी बैठक आज गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत लोकमान्य सभागृह, मराठी पत्रकार संघ,मुंबई येथे संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी युनियनचे राज्य अध्यक्ष बच्चुभाऊ कडू हे उपस्थित होते. यावेळी युनियन चे अभ्यासू पदाधिकारी गणेश ठाकरे , कार्याध्यक्ष अल्लाउद्दीन काझी, राज्य सरचिटणीस गिरीशभाऊ दाभाडकर, जेष्ठ राज्य उपाध्यक्ष दिलीपभाऊ डिके तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय गारगोटे यांच्यासह राज्य कार्यकारिणी सदस्य, सर्व जिल्हाध्यक्ष, सचिव व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन, सेवाशर्ती, नियमित कर्मचारी म्हणून कायमस्वरूपी समावेश, तसेच शासनाकडून करण्यात आलेल्या वसुलीबाबत निर्माण झालेल्या तणावावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बच्चुभाऊ कडू यांच्या आंदोलनातूनच शासनाने वसुलीच्या प्रश्नावर दिलासा देणारा निर्णय मंत्रिमंडळात घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. मात्र, त...