Posts

संघर्ष नायक नारायण बागडे वाढदिवसानिमित्त " अनुसूचित जाती ऐक्य संदेश दिवस "

Image
विविध समाजघटकांना जातीय अन्यायाचे चटके सहन करावे लागले होते. त्या सर्व पीडित समाजघटकांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एका विचारमाळेत गुंफून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. मात्र आज उपवर्गीकरणाच्या नावाखाली हे ऐक्य तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, त्याला वेळीच लगाम घालण्यासाठी राज्यभरात “अनुसूचित जाती समन्वय अभियान” राबविण्यात येणार असल्याची माहिती आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर करण्यात आली आहे. २५ मे २०२६ रोजी नारायण बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त “अनुसूचित जाती ऐक्य संदेश दिवस” साजरा करण्यात येणार असून, त्याअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात विविध समाजघटकांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमध्ये फूट पडू शकते, हा धोका विविध घटकांना समजावून सांगण्यावर या अभियानाचा भर असणार आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात साहित्यभूषण अण्णा भाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव, जिल्हा सांगली येथे कार्यक्रम होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चोंडी येथे...

मानवतेच्या पवित्र आध्यात्मिक नवीन युगाचा उत्सव

Image
मुंबई / रमेश औताडे  अत्यंत भक्ती, आध्यात्मिक आनंद आणि शांत आदराच्या वातावरणात, मुंबईतील बहाई समुदाय २३ मे रोजी सायंकाळी बहाई केंद्रात बाब यांच्या घोषणेचा पवित्र उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमला होता. हा तो क्षण होता ज्याने मानवतेच्या आध्यात्मिक इतिहासात एका नवीन युगाच्या पहाटेची घोषणा केली. या कार्यक्रमात १८४४ सालच्या त्या ऐतिहासिक रात्रीचे स्मरण करण्यात आले, जेव्हा इराणमधील शिराझ येथील एक तरुण व्यापारी असलेल्या बाब यांनी आपले दिव्य कार्य घोषित केले आणि जगातील धर्मांच्या पवित्र ग्रंथांमध्ये सांगितलेले प्रतिज्ञात पुरुष, बहाउल्लाह यांच्या लवकरच होणाऱ्या आगमनाची घोषणा केली.  तीव्र छळ, तुरुंगवास आणि अखेरच्या हौतात्म्यानंतरही, त्यांच्या शिकवणींनी मानवतेला बहाई धर्माचे संस्थापक बहाउल्लाह यांच्या आगमनासाठी तयार केले, ज्यांच्या दूरदृष्टीने मानवजातीच्या एकतेची आणि सार्वत्रिक शांततेच्या स्थापनेची मागणी केली. स्त्री-पुरुषांची समानता, विज्ञान आणि धर्माचा सुसंवाद, पूर्वग्रहांचे निर्मूलन, सार्वत्रिक शिक्षण, न्याय आणि सर्व लोक व राष्ट्रांची मूलभूत एकता. सहभागींनी आशा व्यक्त केली...

ख्रिस्ती समाज मालमत्ता विक्री विरोधात देशव्यापी मोहीम

Image
मुंबई / रमेश औताडे  मेथडिस्ट चर्च इन इंडिया या संस्थेच्या बिशप आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून देशभरातील चर्चच्या मौल्यवान जमिनी आणि स्थावर मालमत्ता कवडीमोलाने विकल्या जात असल्याचा आरोप करत ख्रिस्ती समाज बांधवांनी याविरोधात तीव्र एल्गार पुकारला आहे.  मुंबईतील आग्रीपाडा येथील मोक्याच्या जागेवरील बिशप हाऊस बेकायदेशीरपणे बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा खळबळजनक आरोप समाज बांधवांनी केला असून, याविरोधात देशभरातून मुंबई धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व अशोक नायर, अशोक मासिदास, फिलिप मकासरे, अविनाश गायकवाड, अजय गायकवाड, सतीश नायर, येशूराज बेली , प्रणिल शिंदे आणि जसपर ख्रिश्चन हे करत आहेत. त्यांनी संपूर्ण भारतातील ख्रिस्ती समाज बांधवांना या अन्यायाविरुद्ध एकत्र येण्याचे आणि पत्र मोहिमेत मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन केले आहे. आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. मेथडिस्ट चर्च इन इंडिया या नावाने कोणतीही संस्था कुठेही अधिकृत नोंदणीकृत नाही. या संस्थेचा संपूर्ण कारभार मुंबई धर्मदाय आय...

ख्रिश्चन सेल प्रदेश सरचिटणीसपदी प्रवीण तोरणे

Image
मुंबई / रमेश औताडे  सामाजिक कार्यकर्ते प्रवीण तोरणे  यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ख्रिश्चन सेल प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेश निरीक्षक सेलचे अध्यक्ष धनंजय भुजबळ यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब साळवे , खासदार निलेश लंके  जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप वर्पे, तसेच जनसेवक धामोरकर, संजय भिमाळे आदी मान्यवर उपस्थित होते.  विविध पक्षीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी प्रवीण तोरणे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रवीण तोरणे यांनी समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने काम करत जनसामान्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या वेळी खासदार निलेश लंके म्हणाले की, ख्रिस्ती समाजाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. बाळासाहेब साळवे यांनी ज्या मागण्या चे पत्र दिले आहे त्यासाठी  पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना प्रत्यक्ष भेटून पत्र देऊन पाठपुरावा करू असे त्यांनी सांगितले.

लोकसंख्या, सामाजिक समतोल आणि राष्ट्रीय धोरणांवर चर्चा आवश्यक –

Image
       महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजयसिंह सेंगर यांचे आवाहन  मुंबई  / रमेश औताडे  देशातील लोकसंख्या वाढ, संसाधनांचे नियोजन, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक समतोल या विषयांवर व्यापक राष्ट्रीय चर्चा होण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण, संस्कार, आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक जबाबदारी महत्त्वाची असते. कुटुंब व्यवस्थेबाबत निर्णय घेताना प्रत्येक नागरिकाने आपल्या परिस्थितीनुसार जबाबदारीने विचार करावा. लोकसंख्या धोरणाबाबत केंद्र सरकारने सर्व समाजांना समान निकष लागू होतील अशी स्पष्ट आणि सर्वसमावेशक भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. देशात समान नागरी संहिता, समान शिक्षण व्यवस्था, समान कायदे आणि प्रशासनातील पारदर्शकता यावर संसदेच्या माध्यमातून चर्चा व्हावी, असेही त्यांनी नमूद केले. लोकशाही मार्गाने नागरिकांनी आपल्या लोकप्रतिनिधींना निवेदन, पत्र किंवा संदेश पाठवून विविध विषयांवर भूमिका मांडावी, असे आवाहन त्यांनी केले. सेंगर यांनी सामाजिक सलोखा, स...

लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी धोरणात्मक चर्चेची गरज

Image
मुंबई / रमेश औताडे  महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या घटनांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असून, समाजात या विषयावर व्यापक आणि संवेदनशील चर्चा होणे आवश्यक असल्याचे मत महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, बलात्कारासारख्या गंभीर घटनांनंतर समाजात संतापाची लाट उसळते, मोर्चे आणि निषेध आंदोलन केले जातात तसेच सरकारवर कठोर कारवाईची मागणी होते. मात्र, अशा घटना रोखण्यासाठी दीर्घकालीन आणि व्यावहारिक उपाययोजनांवर पुरेशी चर्चा होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सेंगर यांनी सामाजिक माध्यमांवरील अश्लील सामग्री, इंटरनेटवरील अनियंत्रित प्रवेश आणि बदलती सामाजिक परिस्थिती यामुळे तरुणांवर मानसिक परिणाम होत असल्याचे सांगितले. त्यांनी असे मत मांडले की, लैंगिक आरोग्य, लैंगिक शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी या विषयांवर अधिक जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. याच संदर्भात त्यांनी देहविक्री व्यवसायात कार्यरत महिलांना कायदेशीर संरक्षण आणि “सेक्स वर्कर” म्हणून अधिकृत दर्जा देण्याबाबत सरकारने गंभीरपणे विचार करावा, अशी मागणी केली. सर्वोच्च न्यायालय...

कडक उन्हावर हिरवागार उपाय

Image
कडक उन्हावर हिरवागार उपाय ट्री आर्मी करतेय पर्यावरण संवर्धन मुंबई / रमेश औताडे  पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास  पाहता उन्हाळ्यामध्ये तापमान वाढ झाल्याने त्यावर उपाय म्हणून  हरित क्रांती उपक्रम आमदार सुहास बाबर यांनी ग्रीन आर्मी नावाने सुरू केला आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपण होत आहे.  आमदार सुहास बाबर म्हणाले की एका पिंपळाच्या झाडाच्या पुनर्वसनाच्या प्रेरणेतून आज मोठी हरित लोक चळवळ सकारात्मक बदल घडवू पाहत आहे. जनता स्वयंप्रेरणेने जागा, पाणी, झाडं, श्रमदान करण्यासाठी पुढे येत आहेत. ट्री आर्मी असं नामकरण लोकांनीच केलं असल्याचं आमदार बाबर म्हणाले. आपल्या मातोश्रींच्या श्राद्ध दिवशी ५३०० आंब्याची कलमे रुजवल्याची माहिती त्यांनी दिली. वन विभाग यांच्या माध्यमातून जपानी पद्धतीचा मियावकी जंगल तसेच गायरान जमिनीवर, रस्त्यालगत नैसर्गिकपणे उगवणारी झाडे रुजवण्याचा उपक्रम सुरु आहे.   ५ जून रोजी होणाऱ्या वसुंधरा दिनानिमित्त अधिक प्रमाणात वड, पिंपळ, बहावा, करंज, चिंच अशा डेरेदार वृक्षांची लागवड सुरु आहे. व्यक...