Posts

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्सवाने साजरी

Image
मुंबई / रमेश औताडे  त्रिशरण बुद्ध विहार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, कफ परेड, कुलाबा,मुंबई ,येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती  माता रमाई समृद्धी सेवा सहकारी संस्था व उम्मीद अपनी फाऊंडेशन यांच्या तर्फे मोठ्या उत्सवाने साजरी करण्यात आली , त्या करिता प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक नगर सेवक श्री मकरंद नार्वेकर साहेब, श्री नरसिंग सूर्यवंशी, तुकाराम सूर्यवंशी. ओमकार जैस्वर व स्थानीक नागरिकांनी सुद्धा हजेरी लावली. कार्यक्रम व्यवस्थापक श्री देवानंद अंबादास वरघट (अध्यक्ष)यांनी केला व सूत्रसंचालन सुद्धा केले

देणं समाजाचे ....!

Image
*प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशनचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात साजरा*                   P R NEWS MEDIA NETWORK  मुंबई, दि. १२ एप्रिल २०२६  प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशनचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थापक, सदस्य, मान्यवर अतिथी आणि समाजकार्यात रुची असलेले अनेक प्रतिष्ठित यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विश्वस्त सौ. वैशाली भिडे बर्वे यांच्या ईशस्तवनाने झाली. त्यानंतर त्यांनी PPT सादरीकरणाद्वारे फाउंडेशनच्या दोन वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. Youth Athletic स्पर्धा व पराक्रम दिवस यांसारख्या उपक्रमांची माहिती देत, संस्थेचे कार्यक्षेत्र क्रीडा व संस्कृतीपलीकडे साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातही विस्तारत असल्याचे त्यांनी सांगितले. मान्यवरांनी स्वतःची ओळख करून देत आपल्या कार्याचा परिचय दिला. ६२ व्या वर्षी मॅरेथॉन सुरू करून ८२ व्या वर्षीही अविरत धावणाऱ्या धावपटूंच्या प्रेरणादायी प्रवासाने उपस्थितांना प्रेरित केले. तसेच आदिवासी भागात सोलर पॅनल, रोजगारनिर्मिती व युवक प्रबोधनासाठी कार्य कर...

राज्यातील कामगारांच्या प्रश्नावर आक्रोश मोर्चा

Image
मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्रातील कामगारांच्या प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने १६ एप्रिल २०२६ रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.  हा मोर्चा मुंबईतील बांद्रा पूर्व येथील कामगार आयुक्त कार्यालयावर धडकणार असून यात सुमारे पाच हजार कामगार सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अनिल डुमणे व महामंत्री किरण मिलगिर यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात उद्योग, ऊर्जा, कृषी, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रांसाठी धोरणे असली तरी कामगारांसाठी स्वतंत्र धोरण नाही, राज्यातील कंत्राटी, बांधकाम, घरोघरी काम करणारे कामगार, आशा व अंगणवाडी सेविका, फेरीवाले, बीडी कामगार, रिक्षा-टॅक्सी चालक, पेन्शनधारक तसेच विविध उद्योगांतील कामगार यांच्या मागण्या सरकारकडे प्रलंबित आहेत. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन २२ संघटनांच्या मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. मोर्चाच्या माध्यमातून राज्यासाठी स्वतंत्र कामगार धोरण तयार करणे, शासनातील कंत्राटी कामगारांसाठी ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोनार समाज्याच्या मागण्याबाबत सकारात्मक

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  सोनार समाज्याच्या मागण्याबाबत सकारात्मक -       गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती मुंबई  / रमेश औताडे  राज्यांतील गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन ने सरकारकडे ज्या मागण्या केल्या आहेत त्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत असून काही मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गांभीर्याने घेतल्या आहेत. लवकरच एक बैठक घेऊन मागण्या पूर्ण करू. असे आश्वासन सहकार राज्यमंत्री तथा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन ने मुंबईत आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात व्यक्त केले. सोनार समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रभावी पाठपुरावा करून न्याय मिळवून देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. आमदार चित्राताई वाघ यांनी विधान भवनात सोनार समाजाच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून त्यावर मार्ग काढण्यासाठी खूप पाठपुरावा केला. सोने गहाण ठेवण्याच्या प्रकियेत हा घटक खूप महत्त्वाचा असतो. असेही चित्रा वाघ यांनी म्हटले. प्रमुख मार्गदर्शक संजीव खडके, अध्यक्ष डॉ राजेंद्र दिंडोरकर, कार्यकारी सचिव  सतीश पितळे, खजिन...

बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कोर्टात चेंडू

Image
बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कोर्टात चेंडू महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा प्रकल्प निविदा प्रकरण  मुंबई  /  रमेश औताडे  महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांच्या रस्ता सुरक्षा प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेवर गंभीर आरोप होत असून, निविदेतील अटींमुळे स्पर्धा मर्यादित केली जात असल्याचा दावा संबंधित घटकांकडून करण्यात आला आहे. आमदार किसन कथोरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या निदर्शनास हि बाब आणून दिल्याने त्यांच्या या निविदेत थर्मोप्लास्टिक मार्किंग, रोड स्टड्स, डेलिनेटर्स, कर्ब पेंटिंग यांसारख्या विविध रस्ता सुरक्षा कामांचा समावेश आहे. मात्र, काही अटी विशिष्ट कंपन्यांनाच लाभदायक ठरत असल्याने इतर पात्र आणि सक्षम उत्पादकांना सहभागापासून दूर ठेवले जात आहे. निविदेत ओ ई एम / ओ एम साठी विशिष्ट पूर्व-पात्रता पी क्यू सी अटी घालण्यात आल्या आहेत. यामध्ये एन ए बी एल  मान्यताप्राप्त प्रयोगशाळेची अटही समाविष्ट आहे. छोट्या घटकांसाठी अशा अटी लावल्याने लहान व मध्यम उत्पादकांसाठी प्रवेश कठीण होत आहे. निविदेतील काही घटकांचा...

"My Vote, My Right "

Image
P R NEWS MEDIA NETWORK 12 April 2026 / RAMESH AUTADE The Bombay Catholic Sabha , Orlem Unit organized an orientation session on  SIR , ( Special Intensive Revision) with the tagline : "My Vote, My Right " How do I secure my Vote". While we are waiting for the Official Notification from the Maharashtra Chief Electoral Officer (CEO) Mr. S. Chockalingam on  when the SIR process with guidelines will start in Mumbai / Maharashtra ,  this awareness session was organised for the benefit of citizens to make them aware of the processes , what elements and different type of  forms to be kept in mind, various documents to be kept ready and the Booth Level Officer , ( BLO) visits to their homes. Some of them are highlighted below: 1. To start searching details of self or parents or grandparents names in 2002 electoral part. 2. To fill the enumeration form and keep it ready. 3.  To keep maximum documents ready as asked by the Election Commiss...

जनतेला अंधारात कधीच ठेवणार नाही

Image
मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्यातील वीज समस्येबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. महावितरणकडून अंधार पडल्यानंतर अचानक वीज बंद करणे व लोडशेडिंग लावणे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होत असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात देशमुख यांनी थेट ऊर्जामंत्री मेघना बोर्डीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांचा फोन न उचलल्याने त्यांच्या पीए नी तातडीने प्रतिसाद देत लगेचच संबंधित महावितरणच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क जोडला. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करून लोडशेडिंग थांबवावे, अशी ठाम मागणी देशमुख यांनी केली आहे. पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  रमेश औताडे   संस्थापक संपादक 7021777291