Posts

जेफ्री एपस्टीन अहवालाच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे आंदोलन

Image
मुंबई / रमेश औताडे  आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या जेफ्री एपस्टीन प्रकरणासंदर्भात अलीकडे समोर आलेल्या अहवालांमुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून या प्रकरणातील सत्य बाहेर यावे, पारदर्शकता राखली जावी आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण व्हावे, या मागणीसाठी मुंबई प्रदेश युवक काँग्रेस युवक अध्यक्ष झीनत शब्रीन यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान जवळ मुंबई प्रेस क्लब समोर निषेध आंदोलन करण्यात आले. जेफ्री एपस्टीन प्रकरणात मानवी हक्क, सत्तेचा गैरवापर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते. अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये सत्य दडपले जाऊ नये, जनतेसमोर सर्व बाबी स्पष्ट व्हाव्यात, यासाठी युवक काँग्रेसने आपली भूमिका मांडली. यावेळी पंकज चौधरी,हुसेन शेख, अमनदीप सैनी, आणि तेजस चांदुरकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलन पूर्णतः अहिंसक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. आंदोलनासाठी मुंबई पोलिसांची पूर्वपरवानगी घेण्यात आली होती. सार्वजनिक सुव्यवस्था, वाहतूक किंवा कायदा-सुव्यवस्थेला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता आयोजकां...

बारामतीतील खाजगी विमान धावपट्टीवर प्रश्नचिन्ह

Image
मुंबई / रमेश औताडे  बारामती (पुणे) येथे उभारण्यात आलेल्या विमान धावपट्टीबाबत सुरक्षितता आणि नियमपालनाच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी या धावपट्टीच्या कार्यपद्धतीवर चिंता व्यक्त करत केंद्र सरकारकडे तक्रार केल्याची माहिती दिली आहे. सेंगर यांच्या म्हणण्यानुसार, बारामती परिसरात सुरू असलेली ही विमान धावपट्टी आवश्यक मूलभूत सुविधा आणि सुरक्षा यंत्रणांशिवाय कार्यरत असल्याचा दावा करण्यात येत आहे. विमान वाहतुकीसाठी आवश्यक असलेली सिग्नल व्यवस्था, नियंत्रण प्रणाली आणि आपत्कालीन सुविधा या ठिकाणी अपुऱ्या असल्याचे ते सांगतात. या पार्श्वभूमीवर, संबंधित यंत्रणांनी या धावपट्टीची सखोल तपासणी करावी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. बारामती परिसरात यापूर्वी घडलेल्या एका दुर्दैवी विमान दुर्घटनेचा संदर्भ देत, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी नियमांचे काटेकोर पालन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्...

सरकारी बाबूंच्या हप्त्यांमुळे रस्त्यावरील अतिक्रमण कायम

Image
      प्रशासन लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे अपघाताचा धोका मुंबई / रमेश औताडे  राज्यातील प्रमुख शहरे आणि उपनगरांमध्ये रस्ते, फुटपाथ आणि सार्वजनिक मोकळ्या जागांवरील अतिक्रमणांनी अक्षरशः विळखा घातला असून लोकप्रतिनिधी सोबतच सरकारी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासन मात्र केवळ तात्पुरत्या कारवायांपुरतेच मर्यादित राहत असल्याचा आरोप पादचारी करत आहेत. अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाल्याने आपत्कालीन सेवा अडथळ्यात सापडण्याचा धोका वाढला आहे. रुग्णवाहिका किंवा अग्निशमन वाहन वेळेत पोहोचू शकणार नाही, अशी स्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. फुटपाथवर अतिक्रमण झाल्याने पादचाऱ्यांना थेट वाहनांच्या मार्गातून चालावे लागत आहे. परिणामी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गर्दीच्या भागात वाहतुकीचा वेग मंदावत असून अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती व...

स्वीकृत नगरसेवक यांचा अर्थपुर्ण व्यवहार

Image
ज्यांनी प्रामाणिकपणे निवडणूक लढवली, पक्ष टिकवला, त्यांनाच संधी मिळायला हवी. अन्यथा, पक्षाची अवस्था 'असून अडचण आणि नसून खोळंबा' अशी होईल. - रमेश गुडेकर (ज्येष्ठ नेते, शिवसेना) मुंबई / रमेश औताडे  पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धुराळा खाली बसतो न बसतो, तोच आता राजकीय वर्तुळात 'खोक्यांच्या' चर्चेने वादळ उठवले आहे. १५ जानेवारीला पार पडलेल्या निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवले असले, तरी विजयाच्या या गुलालानंतर आता 'स्वीकृत नगरसेवक' पदावरून शिवसेना ज्येष्ठ नेते रमेश गुडेकर यांनी  खळबळ उडवून दिली आहे. निवडणुकीत उमेदवारांनी रक्ताचे पाणी केले, पदरचे पैसे खर्च केले आणि काहींनी तर निवडणुकीसाठी चक्क कर्जाचा डोंगर अंगावर ओढून घेतला. मात्र, आता फळ मिळण्याची वेळ आली असताना "एक जागा-एक कोटी" असा व्यवहार सुरू असल्याचा गंभीर आरोप गुडेकर यांनी केला आहे. ज्यांचा पक्षाशी किंवा निवडणुकीशी दुरान्वयेही संबंध नाही, असे धनदांडगे केवळ पैशाच्या जोरावर 'नगरसेवक' होण्याचे स्वप्न पाहत असल्याचे चित्र आता समोर येत आहे. रमेश गुडेकर यांनी अत्यंत आक्रमक शब्द...

ग्राहकांची ऑनलाईन तक्रार प्रक्रिया ठप्प

Image
मुंबई / रमेश औताडे  कंज्युमर गाइडन्स सोसायटी ऑफ इंडिया या नामांकित स्वयंसेवी संस्थेची ग्राहकांसाठीची हेल्पलाईन सेवा सध्या खंडित झाल्याने नागरिकांना ऑनलाईन तक्रार नोंदवता येत नाही. या तांत्रिक अडचणीमुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या संस्थे मार्फत मार्फत ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेणे, त्यावर मार्गदर्शन करणे तसेच योग्य ती कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याचे काम केले जाते. मात्र हेल्पलाईन व ऑनलाईन तक्रार प्रणाली बंद असल्याने अनेक ग्राहकांचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. यासंदर्भात संस्थेचे कर्मचारी तुकाराम पवार यांनी सरकारकडे  मागणी केली असून, ग्राहक हित लक्षात घेता ही हेल्पलाईन सेवा तातडीने सुरू करण्यात यावी असे त्यांनी सांगितले.  ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीने ही सेवा अत्यंत महत्त्वाची असून, ती दीर्घकाळ बंद राहणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. सरकारने याची दखल घेऊन तांत्रिक अडचणी दूर करून संस्थेची हेल्पलाईन व ऑनलाईन तक्रार सेवा लवकरात लवकर कार्यान्वित करावी अशी मागणी होत आहे.

आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांचा रेल्वे स्थानकात अनपेक्षित सत्कार

Image
मुंबई / रमेश औताडे  कसारा रेल्वे स्थानकावर केवळ चहा घेण्यासाठी थांबले असताना आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष नारायण बागडे यांचा कार्यकर्त्यांनी अनपेक्षित व उत्स्फूर्त सत्कार केल्याचा प्रसंग घडला. विशेष म्हणजे, कोणतीही पूर्वसूचना नसताना स्थानिक कार्यकर्त्यांना त्यांच्या उपस्थितीची माहिती कशी मिळाली, याचेच सर्वांना आश्चर्य वाटले. बागडे स्थानकावर उभे असल्याची खबर लागताच कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली. काही क्षणांतच हार, तुरे आणि शाल घेऊन कार्यकर्ते स्थानकावर दाखल झाले. सत्काराची घाई असल्याने एका कार्यकर्त्याने गाडी सुटू नये म्हणून साखळी ओढून ठेवली. त्यानंतर  यांच्या गळ्यात पुष्पहार घालून व शाल देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. अचानक घडलेल्या या प्रसंगाने स्थानकावरील प्रवासीही क्षणभर थबकले. कार्यकर्त्यांचे प्रेम, आपुलकी आणि संघटनेप्रती असलेली निष्ठा या क्षणातून स्पष्टपणे दिसून आली, असे बागडे यांनी यावेळी भावना व्यक्त करताना सांगितले. हा संपूर्ण प्रसंग उपस्थितांनी पाहिलेला एक अविस्मरणीय क्षण ठरला.

चार किलोमीटर लांब अनंत साडीतून लैंगिक हिंसाचाराकडे लक्ष

Image
मुंबई / रमेश औताडे  रेड डॉट फाउंडेशन या संयुक्त राष्ट्रसंघ मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थेतर्फे महिलांचा सन्मान आणि न्याय यांचे प्रभावी प्रतीक म्हणून साकारलेल्या अनंत साडी चे अनावरण करण्यात आले. भारतीय दंड संहितेतून वैवाहिक बलात्काराला दिलेली कायदेशीर सूट रद्द करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नामवंत फॅशन डिझायनर निवेदिता साबू यांनी या अनंत साडीची रचना केली असून, ही साडी म्हणजे न्यायाची मागणी करणाऱ्या शेकडो स्वाक्षऱ्या असलेली, भरतकाम आणि खास प्रिंट असलेली ही प्रतीकात्मक याचिका आहे. साडी वरील प्रत्येक स्वाक्षरी ही धैर्याचा एक धागा आहे आणि या साडीच्या पदराची प्रत्येक नीरी म्हणजे महिलेला निवड करण्याचा आणि मौन बाळगण्यास नकार देण्याचा अधिकार आहे. असे रेड डॉट फाउंडेशनच्या सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुप्रीत के. सिंग म्हणाल्या. डिझायनर निवेदिता साबू म्हणाल्या, “संस्कृतीच्या माध्यमातूनच संस्कृतीला आव्हान देत परिवर्तन घडवण्याचे काम हि साडी करते. सध्याच्या कायद्यानुसार १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पत्नीशी संमतीशिवाय केलेले लैंगिक संबंध बलात्कार म्हणून ओळ...