Posts

गाईवरील कारवाईविरोधात गोसेवक आक्रमक

Image
मुंबई / रमेश औताडे  मंदिरांसमोर पूजेसाठी ठेवण्यात येणाऱ्या गाईवर होणाऱ्या  कारवाई विरोधात नाथपंथी डवरी गोसावी समाजाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या कारवाईमुळे शेकडो कुटुंबांच्या उपजीविकेवर गदा आली असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी मागणी भटक्या व विमुक्त जाती संघ, मुंबईचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले यांनी केली. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भोसले यांनी सांगितले की, मुंबईतील मलबार हिल, नाना चौक, ग्रँट रोड, चिराबाजार, गावदेवी पोलीस ठाणे परिसर, व्ही.टी., एल.टी. मार्ग, कुलाबा, मुंबई सेंट्रल आदी भागांतील मंदिरांसमोर पूजेसाठी ठेवण्यात आलेल्या सुमारे शंभर गाईंवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत प्रत्येकी १,२५० रुपयांचा दंड आकारण्यात आला असून काही ठिकाणी गाईंना ताब्यात घेण्यात आले आहे. नाथपंथी डवरी गोसावी समाजातील गोसेविका माता-भगिनी अनेक वर्षांपासून मंदिरांमध्ये भक्तांना पूजेसाठी गाई उपलब्ध करून देण्याचे कार्य करीत आहेत. भक्तांकडून मिळणाऱ्या दानावरच त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र अलीकडे स...

Immediate response to the protest in Azad Maidan

Image
Immediate response to the protest in Azad Maidan Mumbai / Ramesh Autade  As the common people are not getting justice at the local level, when they protest in Azad Maidan in Mumbai, movements start at the senior level in the ministry. Against this backdrop, a sit-in protest has started at Azad Maidan Mumbai under the leadership of social activist Ashokrao Tavre on various issues related to revenue administration in Pune district since April 6. On the first day itself, the Azad Maidan police immediately met Joint Secretary of the Revenue Department Ajit Deshmukh.  Deshmukh has called the District Collector of Pune and asked him to send the pending report immediately and has also given a letter to the District Collector on behalf of the Revenue Department J-5 office. Along with Ashokrao Tavre, Sudam Borkar, Mangesh Nadhe, Santosh Lohokare, Vishal Khatale, Ramrao Limbole, Rahul Abhang, Yogesh Bhamre have participated in the protest at Azad Maidan. Chandoli, Taluka Khe...

दलित पॅंथरच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

Image
दलित पॅंथरच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन मुंबई / रमेश औताडे  दलित पॅंथर या संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन कामोठे, नवी मुंबई येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांनी भूषवले, तर स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. घनश्याम भोसले होते. आरपीआय कामोठे शहराध्यक्ष ॲड. मंगेश धीवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. समाजावरचा अन्याय थांबत नाही, त्यामुळे सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन दलित पॅंथरमध्ये सहभागी होण्याची गरज आहे.असे असे मुंबई अध्यक्ष प्रमोद निकम यांनी सांगितले. नगरसेवक हॅप्पी सिंग, उद्योजक दयानंद , प्रमोद लोखंडे, सुप्रिया बनसोडे, अरविंद मोरे, मुजीबभाई शेख, रमेश गवारी, सखाराम पाटील, अंकुश आवडे, आकाश बोंडे, तसेच मनोज गायकवाड (कोकण प्रांत अध्यक्ष) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुंबई अध्यक्षपदी प्रमोद निकम तर  रायगड जिल्हाध्यक्षपदी सुदर्शन साबळे यांची नियुक्ती केली. १९७२ साली पद्मश्री नामदेव दादा ढसाळ यांनी स्थापन केलेल्या या संघटनेने सामाजिक न्याय, समानता आणि स्वाभिमानासाठी मोठे योगदान दिले...

नागरिकांना न्यायासाठी न्यायालयातच जावे लागत असेल तर प्रशासन कशासाठी !

Image
नागरिकांना न्यायासाठी न्यायालयातच जावे लागत असेल तर प्रशासन कशासाठी !  अखेर धरणे आंदोलन सुरू  मुंबई / रमेश औताडे  पुणे जिल्ह्यातील खेड येथील तत्कालीन तहसीलदार यांनी एका प्रकरणी भोगावटा एकची कार्यवाही अनाधिकाराने करूनही कारवाई नाही. महसुल विभाग, ज ५ यांनी तीन पत्र एक वर्षापुर्वी देऊनही जिल्हाधिकारी पुणे यांचा अहवाल शासनास जात नाही या व इतर विषयांबाबत प्रशासन दिरंगाई करीत असल्याने सामाजिक कार्यकर्ते, कवी-लेखक अशोकराव टाव्हरे यांनी  जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे.  सुदाम बोरकर, शरद टाकळकर, गणेश मोरे, प्रदीप कर्पे, दत्तात्रय सावंत, किरण बाविस्कर हे बाधित नागरिक आंदोलनात सहभागी झाले आहेत. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याने अनेक नागरिक समस्या घेऊन येतात. काहींना अनेक हेलपाटे मारूनही तहसील व प्रांत कार्यालय खेड दाद देत नाही. १५५ अन्वये चुकीचे आदेश दिल्याबाबत महसुलमंत्री व जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे केलेल्या एका,तक्रारींमध्ये उपविभागीय अधिकारी, खेड यांनी जुलै २०२५ मध्ये १० दिवसात अहवाल देण्यासाठी तहसीलदार खेड यांना पत्र देऊनही अद...

आपल्याला हवी हवीशी वाटणारी " हे काय नवीन " मालिका

Image
आपल्याला हवी हवीशी वाटणारी " हे काय नवीन " मालिका मुंबई / रमेश औताडे  आपल्याशा वाटणाऱ्या कथाकथानाचे हक्काचे व्यासपीठ झी 5 वर  'हे काय नवीन?’ या नवीन ओरिजनल सिरीजचे आता स्ट्रिमिंग होणार असून या सिरीजमध्ये खऱ्या आयुष्यात एकमेकांचे जोडीदार असलेल्या उमेश कामतने आदित्य तर प्रिया बापट हिने रमाची भूमिका साकारली आहे. ही मालिका आकर्षण, आराम आणि प्रामाणिकपणाचा एक अतिरिक्त पदर उलगडते जो केवळ एक वास्तविक बंध निर्माण करणारा आहे.  वरुण नार्वेकर दिग्दर्शित, या सिरीजमध्ये आयुष्यातील मोठे टप्पे गाठल्यानंतर काय घडते यावर एक प्रेमळ, जीवनाच्या पैलूवरील भाष्य आहे. प्रिया बापट, उमेश कामत, शुभांगी गोखले, उदय टिकेकर, सुयोग गोऱ्हे, राजसी भावे, ओमकार गोवर्धन, तन्वी कुलकर्णी आणि पायल जाधव अशा उत्कृष्ट कलाकारांच्या टीमसह, ही सिरीज रमा आणि आदित्य यांचे चित्रण करते, ज्यांचे आयुष्य सुरळीत, पुरेसे नीट जगलेले आहेत.  दैनंदिन जीवनाच्या पार्श्वभूमीवर हे काय नवीन ? ही सिरीज अनेकदा दुर्लक्ष करत असलेल्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये, मूक विरामांमध्ये, बदलत्या स्वप्नांमध्ये आणि दीर्घकालीन नातेसंबं...

आम्रपाली ची काश्मीर ते कन्याकुमारी बाईक मोहीम

Image
वनरक्षक आम्रपाली पडघण ची 'कन्याकुमारी ते काश्मीर' ऐतिहासिक बाईक मोहीम संरक्षणासोबतच जनजागृतीचा नवा अध्याय ! मुंबई  / रमेश औताडे  निसर्ग संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणासाठी झोकून देणाऱ्या बोर व्याघ्र प्रकल्पातील वनरक्षक आम्रपाली देवीदास पडघण आता एका धाडसी मोहिमेसाठी सज्ज झाल्या आहेत. 'फॉरेस्ट टू फ्रंटियर' (Forest to Frontier) या संकल्पनेखाली त्या कन्याकुमारी ते काश्मीर (K2K) असा सुमारे ३,६०० किलोमीटरचा प्रवास सोलो बाईक राईडद्वारे पूर्ण करणार आहेत. आम्रपाली या गेल्या ९ वर्षांपासून महाराष्ट्र वन विभागात कार्यरत असून, सध्या त्या बोर व्याघ्र प्रकल्पातील 'नवेगाव बीट' येथे कार्यरत आहेत. केवळ कर्तव्य म्हणून नव्हे, तर एक पॅशन म्हणून त्या जंगलाची राखण करतात.  * वन्यजीव तज्ज्ञ: त्यांनी बोर अभयारण्यात ११४ हून अधिक फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद केली आहे.  * सर्पमित्र: मानवी वस्तीत शिरलेल्या शेकडो सापांना (ज्यात नाग आणि अजगरांचा समावेश आहे) त्यांनी सुरक्षितरीत्या जीवनदान दिले आहे. त्यांच्या सापांवरील संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर २०२५ मध...

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे " वृक्ष संजीवनी " अभियान

Image
    पर्यावरण रक्षक व स्माईल फाऊंडेशन यांचाही सहभाग मुंबई / रमेश औताडे    बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक ठिकाणांवरील वृक्षांच्या संवर्धनासाठी  ‘ वृक्ष संजीवनी ’ अभियान राबविण्यात येत आहे.  जागतिक वसुंधरा दिनानिमित्त  १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात पर्यावरण रक्षक व स्माईल फाऊंडेशन या संस्था सहभागी होणार आहेत.  बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सध्या एकूण २९ लाख ७५ हजार २८३ वृक्ष आहेत. त्यापैकी सुमारे १३ लाख ५४ हजार ९६६ वृक्ष रस्त्यांच्या कडेला, उद्यानांमध्ये व इतर सार्वजनिक ठिकाणी आहेत. या वृक्षांच्या आरोग्य संवर्धनासाठी ‘ वृक्ष संजीवनी ’ हे अभियान महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या अभियान अंतर्गत वृक्षांभोवती साचलेले सिमेंट- काँक्रिट काढून त्याजागी मोकळी लाल माती टाकणे, झाडांच्या खोडांवर ठोकलेले खिळे, जाहिरात फलक, दोऱ्या व केबल्स काढणे, तसेच पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या फांद्यांची छाटणी करणे अशा उपाययोजना केल्या जातात. झाडांच्या खोडांना गेरू-चुना लावून त्या...