Posts

देवस्थान इनाम जमीन कायदा सर्वांना न्याय देणार असेल

Image
मुंबई / रमेश औताडे  मंत्रालय प्रतिनिधी राज्यातील देवस्थान इनाम जमिनींचे संवर्धन करण्यासह वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले समस्या मार्गी लावण्यासाठी सर्वंकष कायदा तयार करण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत.  सोमवारी मंत्रालयात ‘देवस्थान इनाम जमीन धोरण प्रारूप समिती'ची पहिली बैठक पार पडली. यावेळी कायद्याचा कृती आराखडा निश्चित करण्यासाठी टप्पे ठरविण्यात आले. हा नवा कायदा करताना उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तसेच इतर जुन्या कायद्यांचा सखोल अभ्यास केला जावा आणि भविष्यात कोणतीही नवीन कायदेशीर गुंतागुंत किंवा सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी, असे महसूलमंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.  समितीचे सचिव कैलास गायकवाड यांनी मागील प्रारूपावर राज्यभरातून आलेल्या हरकती व सूचनांची माहिती दिली. पुणे विभागातून १६ हजार, नाशिक साडेपाच हजार, कोकण १३५०, नागपूर २२५ तर अमरावती विभागातून ५० सूचना व हरकती आल्या आहेत.  महसूल विभागाचे अप्पर मुख्य व समितीचे अध्यक्ष सचिव खारगे यांनी समितीच्या कामकाजा...

आंतरराष्ट्रीय विधवा दिन साजरा करा ....पण आमचे म्हणणे पण ऐका - लता बोराडे यांचे सरकारला साकडे

Image
मुंबई  / रमेश औताडे  दरवर्षी २३ जून रोजी आंतरराष्ट्रीय विधवा दिन साजरा करून विधवा महिलांच्या सन्मान, संरक्षण आणि सक्षमीकरणाच्या घोषणा केल्या जातात. यंदाही महिला व बालविकास विभागाने विविध कार्यक्रम, जनजागृती उपक्रम आणि विशेष मोहिमा राबविण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात विधवा महिलांच्या अनेक मूलभूत मागण्या अद्यापही शासन दरबारी प्रलंबित असल्याची खंत विधवा महिला विकास प्रतिष्ठान , आटपाडी या संस्थेच्या अध्यक्षा व  विधवा महिलांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या लता बोराडे यांनी खंत व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लता बोराडे यांनी निवेदन देऊन विधवा महिलांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले होते. निवेदनात आर्थिक सहाय्य, सन्मानाने जगण्याचा हक्क, शासकीय योजनांचा लाभ मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करणे, तसेच पुनर्वसनासाठी विशेष धोरण राबविण्याची मागणी करण्यात आली होती. शासनाच्या परिपत्रकांमध्ये विधवा महिलांच्या सक्षमीकरणाची भाषा असली तरी प्रत्यक्षात अनेक महिला आजही आर्थिक, सामाजिक आणि मानसिक संघर्षाला सामोऱ्या जात असल्याचे लता बोराडे या...

महसूलमंत्र्यांच्या दारात " न्याय द्या " आंदोलनाचा इशारा

Image
मुंबई / रमेश औताडे मंत्रालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मुंबईतील आझाद मैदानावर अनेक वेळा आंदोलने करूनही शासनाकडून न्याय मिळत नसल्याचा आरोप करत बिगर सातबारा शेतकरी संघटनेने आता थेट महसूलमंत्र्यांच्या दारात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. बिगर सातबारा शेतकरी, भूमिहीन कष्टकरी आणि विविध महसुली प्रश्नांबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. आझाद मैदानावर आंदोलने, निवेदने आणि बैठका घेऊनही प्रश्न प्रलंबितच राहिले आहेत. त्यामुळे आता आंदोलनाची दिशा बदलून थेट महसूलमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी दिला आहे. राज्यातील हजारो बिगर सातबारा शेतकरी जमीन हक्क, नोंदी दुरुस्ती, वारसा नोंद, मालकी हक्क आणि इतर महसुली प्रश्नांमुळे अडचणीत आहेत. या समस्यांवर तातडीने निर्णय घेण्यात यावा, अन्यथा राज्यभरातील शेतकऱ्यांना एकत्र करून तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. महसूल विभागाने संबंधित प्रश्नांवर ठोस भूमिका जाहीर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी...

आभार एवं संकल्प

Image
मुझे आज शिवसेना – उत्तर भारतीय संगठन, मगाठाणे विधानसभा के उपाध्यक्ष पद की जिम्मेदारी सौंपे जाने पर अत्यंत हर्ष एवं गर्व की अनुभूति हो रही है। इस सम्मान और विश्वास के लिए मैं माननीय श्री एकनाथ शिंदे साहब का हृदय से आभार व्यक्त करता हूँ। साथ ही श्री गुलाब दुबे जी, श्री जयप्रकाश जी एवं श्री राजेश जी का भी विशेष धन्यवाद, जिनके मार्गदर्शन और सहयोग से मुझे यह अवसर प्राप्त हुआ। मैं विशेष रूप से पालांडे साहब का भी आभारी हूँ, जिनके करकमलों द्वारा मुझे यह पद एवं दायित्व प्रदान किया गया। मैं विश्वास दिलाता हूँ कि मुझे सौंपी गई इस जिम्मेदारी का पूर्ण निष्ठा, ईमानदारी एवं समर्पण के साथ निर्वहन करूँगा तथा संगठन और समाज के हित में सदैव कार्यरत रहूँगा। जय महाराष्ट्र! जय हिंद! जय शिवसेना! 🚩 एड. राहुल उपाध्याय उपाध्यक्ष, उत्तर भारतीय संगठन शिवसेना, मगाठाणे विधानसभा 📞 7208148649                                      P R NEWS MEDIA NETWORK 

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे महाअधिवेशन

Image
मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २० जून शनिवारी दुपारी २ वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडगाव येथील आदिती लॉन्स येथे राज्यस्तरीय महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती राज्य सचिव अशोक कुथे यांनी दिली. या महाअधिवेशनाला राज्यभरातील सुमारे ६० हजार ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती राज्य सचिव अशोक कुथे यांनी दिली. कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अधिवेशनात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करणे, बहुसंख्य कामगारांना डीसीपीएस योजनेअंतर्गत पेन्शन योजना लागू करणे, १० टक्के आरक्षणाबाबत नियमित भरती प्रक्रिया राबविणे, तसेच कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांवर शासनाने मंजुरी देऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्यांवर चर्चा होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यम...

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

Image
मुंबई / रमेश औताडे  बेस्ट प्रवासी आणि कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष करून कंत्राटदारांच्या फायद्याचे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप करत, अशा धोरणांना पाठिंबा देणाऱ्या सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात सर्व कामगार संघटना एकत्रितपणे १८ जून पासून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने दिला. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत हा इशारा दिला. ऍड.उदयकुमार अनंत आंबोणकर, पवन गायकवाड, कॉ. विजय कुलकर्णी, कॉ. बशीर अहमद, कॉ. हरीश गायकवाड, गजानन नागे, नितीन पाटील, गौरीशंकर खोत, विलास पवार व इतर संघटनांचे नेते यावेळी समितीच्या झेंड्याखाली राजकारण सोडून कामगारांच्या व प्रवाशांच्या हितासाठी एकत्र आले आहेत. बेस्टचा क अर्थसंकल्प महापालिकेच्या अ अर्थसंकल्पात विलीन करा, निवृत्त कामगारांची कायदेशीर देणी एकरकमी द्या, २०१६ ते २०२६ चा वेतन करार ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे थकबाकीसह द्या, बेस्टचे परिवहन व विज विभागाचे कंत्राटीकरण रद्द करून वेटलिज कामगारांना बस सह बेस्ट मध्ये सामावून घ्या, बेस्टच्या स्वः मालकीच्या ५००० बस आणा, आवश्यक कामगार भरत...

नाचणी, शेंगदाणे आणि चणेच ठरू शकतात मुलांसाठी खरे पोषण!

Image
मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  मुलांच्या उंची, वजन, मेंदूचा विकास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या दाव्यांसह बाजारात विविध हेल्थ ड्रिंक्स, सप्लिमेंट्स आणि पौष्टिक पावडरची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. आकर्षक जाहिराती आणि सेलिब्रिटींच्या प्रचारामुळे अनेक पालक आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी महागडी उत्पादने खरेदी करतात. मात्र पोषणतज्ज्ञांच्या मते, या उत्पादनांमध्ये असलेले बहुतांश पोषक घटक घरगुती आणि स्वस्त अन्नपदार्थांमधूनही मिळू शकतात. अनेक हेल्थ ड्रिंक्समध्ये प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि इतर पोषक घटक असतात. मात्र हेच घटक नाचणी, शेंगदाणे, हरभरा, मूग, मटकी, तीळ, गूळ, दूध, अंडी आणि हंगामी फळांमधून नैसर्गिक स्वरूपात मिळू शकतात. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हे पदार्थ अधिक परवडणारे पर्याय ठरू शकतात. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, मुलांच्या शारीरिक विकासासाठी केवळ हेल्थ ड्रिंक पुरेसे नसून संतुलित आहार, नियमित व्यायाम, सूर्यप्रकाश आणि पुरेशी झोप यांचीही तितकीच गरज असते. बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक उत्पादनांमध्ये प्रति सर्व्हिंग ...