Posts

तर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची गरज पडणार नाही

Image
मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  आपला देश हा अफगाणिस्तान, इराण, इराक या देशातून औषधीकरिता कोट्यावधी रुपयाची अफू आयात करतो. अशी आयात बंद करा व आपल्या देशातील शेतकऱ्याला शेतीच्या दहा टक्के भागावर अफू लागवड करण्याची परवानगी द्या व आपणच जगाला अफू निर्यात करूया. असे केले तर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची सुद्धा गरज पडणार नाही. अशी मागणी  महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी  मुख्यमंत्र्यांना दिले आहे. हवामान बदल, अवकाळी पाऊस आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. अशा काळात महायुती सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी, पीक विमा, सिंचन प्रकल्प आणि कृषी पायाभूत सुविधांद्वारे बळीराजाला सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत तरीसुद्धा शेतकरी  आत्महत्या करीत आहेत. तसेच महाराष्ट्रातील उर्वरित भागात शेतकरी हा चिंतेच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे. खासगी कंपन्यांना अपू उत्पादन करण्याची परवानगी देण्याचा विचार सुरू आहे. त्यांना परवानगी दिली तर बजान हेल्थकेअर ही कंपनी परवानगी मिळणारी पहिली कंपनी ठरेल. सरकारने ज्या जिल्ह्यात शेतकरी आत्मह...

चार किलोमीटर लांब साडीला चौदा जागतिक पुरस्कार

Image
मुंबई / रमेश औताडे  विवाहित महिलांवरील लैंगिक अत्याचाराविरोधात जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ४ किलोमीटर लांबीच्या विशेष साडीला आणि त्यावर आधारित मोहिमेला जगभरात मोठा सन्मान मिळाला आहे. या मोहिमेने आरोग्य आणि सामाजिक जनजागृती क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील १४ प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले आहेत. तसेच महिलांच्या आरोग्य आणि हक्कांसाठी दिला जाणारा सर्वोच्च ग्रँड क्लिओ पुरस्कार देखील या मोहिमेला मिळाला आहे. मुंबईतील मिडिया मेडिक कम्युनिकेशन आणि कॅनडातील क्लिक हेल्थ यांनी रेड डॉट फाऊंडेशन  या संस्थेसाठी ही मोहीम राबवली होती. या मोहिमेत भारतीय स्त्रीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या साडीचा वापर करून महिलांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवण्यात आला. देशभरातून जमा झालेल्या हजारो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या या ४ किलोमीटर लांबीच्या साडीवर भरतकामाद्वारे नोंदवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ही साडी महिलांच्या न्यायासाठीची लोकभावना व्यक्त करणारे प्रतीक ठरली. प्रसिद्ध फॅशन डिझायनर निवेदिता सभो यांनी या साडीची रचना केली होती. मुंबईतील रॉयल ऑपेरा हाऊस येथे या विशेष साडीचे प्रदर्शन भरविण...

नाल्यात उतरून मनसेचा निषेध

Image
नवी मुंबई /  रमेश औताडे  नवी मुंबई घणसोली  विभागातील नोसिल नाका ते रिद्धी सिद्धी सोसायटी ब्रिज पर्यंत नाले साफसफाईच्या  कामाबाबत नाराजी व्यक्त करत घणसोली मनसेचे विभाग अध्यक्ष नितीन नाईक, रोहन पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नाल्यात उतरून निषेध व्यक्त केला.  घणसोली विभाग सचिव संजय कोळी म्हणाले,  नाल्यातील गाळ न काढल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने  नागरिकांना नाहक त्रास होत आहे. मनसेचे उपविभाग अध्यक्ष योगेश गायकर, शाखाध्यक्ष भरत लोंढे, दीपक साबले,केतन कोळी, संदीप डाकवे, महाराष्ट्र सैनिक भानुदास पाटील यांनी निषेध नोंदवला 

आंतरराष्ट्रीय विधवा दिन साजरा करा ....पण आमचे म्हणणे पण ऐका - लता बोराडे यांचे सरकारला साकडे

Image
मुंबई  / रमेश औताडे  दरवर्षी २३ जून रोजी आंतरराष्ट्रीय विधवा दिन साजरा करून विधवा महिलांच्या सन्मान, संरक्षण आणि सक्षमीकरणाच्या घोषणा केल्या जातात. यंदाही महिला व बालविकास विभागाने विविध कार्यक्रम, जनजागृती उपक्रम आणि विशेष मोहिमा राबविण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात विधवा महिलांच्या अनेक मूलभूत मागण्या अद्यापही शासन दरबारी प्रलंबित असल्याची खंत विधवा महिला विकास प्रतिष्ठान , आटपाडी या संस्थेच्या अध्यक्षा व  विधवा महिलांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या लता बोराडे यांनी खंत व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लता बोराडे यांनी निवेदन देऊन विधवा महिलांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले होते. निवेदनात आर्थिक सहाय्य, सन्मानाने जगण्याचा हक्क, शासकीय योजनांचा लाभ मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करणे, तसेच पुनर्वसनासाठी विशेष धोरण राबविण्याची मागणी करण्यात आली होती. शासनाच्या परिपत्रकांमध्ये विधवा महिलांच्या सक्षमीकरणाची भाषा असली तरी प्रत्यक्षात अनेक महिला आजही आर्थिक, सामाजिक आणि मानसिक संघर्षाला सामोऱ्या जात असल्याचे लता बोराडे या...

महसूलमंत्र्यांच्या दारात " न्याय द्या " आंदोलनाचा इशारा

Image
मुंबई / रमेश औताडे मंत्रालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मुंबईतील आझाद मैदानावर अनेक वेळा आंदोलने करूनही शासनाकडून न्याय मिळत नसल्याचा आरोप करत बिगर सातबारा शेतकरी संघटनेने आता थेट महसूलमंत्र्यांच्या दारात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. बिगर सातबारा शेतकरी, भूमिहीन कष्टकरी आणि विविध महसुली प्रश्नांबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. आझाद मैदानावर आंदोलने, निवेदने आणि बैठका घेऊनही प्रश्न प्रलंबितच राहिले आहेत. त्यामुळे आता आंदोलनाची दिशा बदलून थेट महसूलमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी दिला आहे. राज्यातील हजारो बिगर सातबारा शेतकरी जमीन हक्क, नोंदी दुरुस्ती, वारसा नोंद, मालकी हक्क आणि इतर महसुली प्रश्नांमुळे अडचणीत आहेत. या समस्यांवर तातडीने निर्णय घेण्यात यावा, अन्यथा राज्यभरातील शेतकऱ्यांना एकत्र करून तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. महसूल विभागाने संबंधित प्रश्नांवर ठोस भूमिका जाहीर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी...

आभार एवं संकल्प

Image
मुझे आज शिवसेना – उत्तर भारतीय संगठन, मगाठाणे विधानसभा के उपाध्यक्ष पद की जिम्मेदारी सौंपे जाने पर अत्यंत हर्ष एवं गर्व की अनुभूति हो रही है। इस सम्मान और विश्वास के लिए मैं माननीय श्री एकनाथ शिंदे साहब का हृदय से आभार व्यक्त करता हूँ। साथ ही श्री गुलाब दुबे जी, श्री जयप्रकाश जी एवं श्री राजेश जी का भी विशेष धन्यवाद, जिनके मार्गदर्शन और सहयोग से मुझे यह अवसर प्राप्त हुआ। मैं विशेष रूप से पालांडे साहब का भी आभारी हूँ, जिनके करकमलों द्वारा मुझे यह पद एवं दायित्व प्रदान किया गया। मैं विश्वास दिलाता हूँ कि मुझे सौंपी गई इस जिम्मेदारी का पूर्ण निष्ठा, ईमानदारी एवं समर्पण के साथ निर्वहन करूँगा तथा संगठन और समाज के हित में सदैव कार्यरत रहूँगा। जय महाराष्ट्र! जय हिंद! जय शिवसेना! 🚩 एड. राहुल उपाध्याय उपाध्यक्ष, उत्तर भारतीय संगठन शिवसेना, मगाठाणे विधानसभा 📞 7208148649                                      P R NEWS MEDIA NETWORK 

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे महाअधिवेशन

Image
मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २० जून शनिवारी दुपारी २ वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडगाव येथील आदिती लॉन्स येथे राज्यस्तरीय महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती राज्य सचिव अशोक कुथे यांनी दिली. या महाअधिवेशनाला राज्यभरातील सुमारे ६० हजार ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती राज्य सचिव अशोक कुथे यांनी दिली. कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अधिवेशनात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करणे, बहुसंख्य कामगारांना डीसीपीएस योजनेअंतर्गत पेन्शन योजना लागू करणे, १० टक्के आरक्षणाबाबत नियमित भरती प्रक्रिया राबविणे, तसेच कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांवर शासनाने मंजुरी देऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्यांवर चर्चा होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यम...