मंत्रालयातील भ्रष्टाचाराविरोधात ९० कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात आमरण उपोषण
मुंबई / रमेश औताडे ( पी आर न्यूज मिडिया नेटवर्क ) मुंबई मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागात झालेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात आणि ६५ कर्मचाऱ्यांना हक्काच्या वेतनाची रक्कम न देता बनावट रेकॉर्ड तयार करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टी कर्मचारी कामगार संघ, महाराष्ट्र च्या वतीने ९० कर्मचाऱ्यांनी ०९ जून २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात कालेलकर आस्थापनेवर असलेले आणि ५ वर्षांनंतर रूपांतरित आस्थापनेवर शासकीय सेवेत सामावून घेतलेल्या कामगारांकडून अत्यंत कठीण परिस्थितीत काम करून घेण्यात आले. रस्त्यावरील झाडे तोडणे, झाडे लावणे, खड्डे बुजविणे आणि रस्ता मजबुतीकरण यासारख्या कामांसाठी एका मजुराला तब्बल ५ कि.मी. अंतराचा रस्ता दिला गेला होता. प्रत्यक्ष कामासाठी पाचपेक्षा जास्त कामगारांची गरज असताना, एकाच व्यक्तीकडून दिवस-रात्र काम करून घेण्यात आले. एवढेच नव्हे तर, शनिवार-रविवार किंवा सणांच्या दिवशीही त्यांना सुट्टी दिली जात नव्हती, असा गंभीर आरोप कामगार संघाने केल...