Posts

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे महाअधिवेशन

Image
मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २० जून शनिवारी दुपारी २ वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडगाव येथील आदिती लॉन्स येथे राज्यस्तरीय महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती राज्य सचिव अशोक कुथे यांनी दिली. या महाअधिवेशनाला राज्यभरातील सुमारे ६० हजार ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती राज्य सचिव अशोक कुथे यांनी दिली. कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अधिवेशनात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करणे, बहुसंख्य कामगारांना डीसीपीएस योजनेअंतर्गत पेन्शन योजना लागू करणे, १० टक्के आरक्षणाबाबत नियमित भरती प्रक्रिया राबविणे, तसेच कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांवर शासनाने मंजुरी देऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्यांवर चर्चा होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यम...

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

Image
मुंबई / रमेश औताडे  बेस्ट प्रवासी आणि कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष करून कंत्राटदारांच्या फायद्याचे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप करत, अशा धोरणांना पाठिंबा देणाऱ्या सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात सर्व कामगार संघटना एकत्रितपणे १८ जून पासून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने दिला. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत हा इशारा दिला. ऍड.उदयकुमार अनंत आंबोणकर, पवन गायकवाड, कॉ. विजय कुलकर्णी, कॉ. बशीर अहमद, कॉ. हरीश गायकवाड, गजानन नागे, नितीन पाटील, गौरीशंकर खोत, विलास पवार व इतर संघटनांचे नेते यावेळी समितीच्या झेंड्याखाली राजकारण सोडून कामगारांच्या व प्रवाशांच्या हितासाठी एकत्र आले आहेत. बेस्टचा क अर्थसंकल्प महापालिकेच्या अ अर्थसंकल्पात विलीन करा, निवृत्त कामगारांची कायदेशीर देणी एकरकमी द्या, २०१६ ते २०२६ चा वेतन करार ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे थकबाकीसह द्या, बेस्टचे परिवहन व विज विभागाचे कंत्राटीकरण रद्द करून वेटलिज कामगारांना बस सह बेस्ट मध्ये सामावून घ्या, बेस्टच्या स्वः मालकीच्या ५००० बस आणा, आवश्यक कामगार भरत...

नाचणी, शेंगदाणे आणि चणेच ठरू शकतात मुलांसाठी खरे पोषण!

Image
मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  मुलांच्या उंची, वजन, मेंदूचा विकास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या दाव्यांसह बाजारात विविध हेल्थ ड्रिंक्स, सप्लिमेंट्स आणि पौष्टिक पावडरची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. आकर्षक जाहिराती आणि सेलिब्रिटींच्या प्रचारामुळे अनेक पालक आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी महागडी उत्पादने खरेदी करतात. मात्र पोषणतज्ज्ञांच्या मते, या उत्पादनांमध्ये असलेले बहुतांश पोषक घटक घरगुती आणि स्वस्त अन्नपदार्थांमधूनही मिळू शकतात. अनेक हेल्थ ड्रिंक्समध्ये प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि इतर पोषक घटक असतात. मात्र हेच घटक नाचणी, शेंगदाणे, हरभरा, मूग, मटकी, तीळ, गूळ, दूध, अंडी आणि हंगामी फळांमधून नैसर्गिक स्वरूपात मिळू शकतात. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हे पदार्थ अधिक परवडणारे पर्याय ठरू शकतात. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, मुलांच्या शारीरिक विकासासाठी केवळ हेल्थ ड्रिंक पुरेसे नसून संतुलित आहार, नियमित व्यायाम, सूर्यप्रकाश आणि पुरेशी झोप यांचीही तितकीच गरज असते. बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक उत्पादनांमध्ये प्रति सर्व्हिंग ...

मंत्रालयातील भ्रष्टाचाराविरोधात ९० कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात आमरण उपोषण

Image
मुंबई / रमेश औताडे  ( पी आर न्यूज मिडिया नेटवर्क ) मुंबई मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागात  झालेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात आणि ६५ कर्मचाऱ्यांना हक्काच्या वेतनाची रक्कम न देता बनावट रेकॉर्ड तयार करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टी कर्मचारी कामगार संघ, महाराष्ट्र च्या वतीने ९० कर्मचाऱ्यांनी ०९ जून २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात कालेलकर आस्थापनेवर असलेले आणि ५ वर्षांनंतर रूपांतरित आस्थापनेवर शासकीय सेवेत सामावून घेतलेल्या कामगारांकडून अत्यंत कठीण परिस्थितीत काम करून घेण्यात आले. रस्त्यावरील झाडे तोडणे, झाडे लावणे, खड्डे बुजविणे आणि रस्ता मजबुतीकरण यासारख्या कामांसाठी एका मजुराला तब्बल ५ कि.मी. अंतराचा रस्ता दिला गेला होता. प्रत्यक्ष कामासाठी पाचपेक्षा जास्त कामगारांची गरज असताना, एकाच व्यक्तीकडून दिवस-रात्र काम करून घेण्यात आले. एवढेच नव्हे तर, शनिवार-रविवार किंवा सणांच्या दिवशीही त्यांना सुट्टी दिली जात नव्हती, असा गंभीर आरोप कामगार संघाने केल...

लतादेवी बोराडे यांची सरकारकडे एक " भावनिक " साद

Image
विधवा' नव्हे, 'सौभाग्यवती किंवा सक्षम' म्हणा!  मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  पतीच्या निधनानंतर पांढरं कपाळ आणि समाजाकडून मिळणारी उपेक्षेची वागणूक... हे मरणयातनांपेक्षा कमी नसतं. पण आता या अन्यायाविरुद्ध आणि अनिष्ट प्रथांविरुद्ध सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या 'विधवा महिला विकास प्रतिष्ठान'ने थेट सरकारचे दरवाजे ठोठावले आहेत. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती लतादेवी बाळकृष्ण बोराडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे अत्यंत भावनिक आणि स्वाभिमानी मागण्या केल्या आहेत. आम्हाला सहानुभूती नको, सन्मान द्या!" "विधवांचे मानसिक खच्चीकरण न होता, त्यांनी स्वाभिमानाने आणि आनंदाने जीवन जगावे," हा मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेवून हे स्मरणपत्र मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले आहे. या पत्रातील मागण्या केवळ कागदी नसून, समाजात वर्षानुवर्षे सोसत आलेल्या वेदनेला वाचा फोडणाऱ्या आहेत. पतीच्या पश्चातही महिलांना समाजात 'सुवासिनी' इतकाच आदराचा आणि मानाचा कायदेशीर हक्क मिळावा...

१९ वर्षाच्या अन्यायाविरोधात रहिवाशांचा म्हाडा कार्यालयावर मोर्चा

Image
मुंबई / रमेश औताडे  म्हाडा न्यू पीएमजीपी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, मुलुंड (पूर्व) येथील १,३९९ सभासदांचा पुनर्विकास प्रकल्प सन २००७ पासून सुरू असून, तब्बल १९ वर्षे उलटूनही हा प्रकल्प अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. आजही ६०६सदनिका व ४७ दुकाने म्हाडा प्रशासनाकडून बांधून पूर्ण करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या प्रकल्पातील रहिवासी व सभासद गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या हालअपेष्टा सहन करीत आहेत. गेल्या वर्षभरापासून बाधित रहिवासी सभासदांनी म्हाडा मुख्यालय, बांद्रा येथे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) व उपाध्यक्ष (VP) यांची वारंवार भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना वेळ देण्यात येत नव्हती. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत जनकल्याण रहिवासी विकास समितीच्या वतीने दिनांक ९ जून २०२६ रोजी म्हाडा मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सुमारे २५० हून अधिक बाधित रहिवासी सभासद सहभागी झाले होते. तसेच छत्रपती शासन पक्षाचे संस्थापक मा. नामदेवराव जाधव साहेब व समितीचे कायदेशीर सल्लागार यांनी या आंदोलनास मोलाचे सहकार्य केले. मोठ्या संख्येने नागरिक म्हाडा कार्यालयात दाखल झा...

रेहान मेमन यांच्याकडून अनधिकृत कृत्याचे पालिकेला निवेदन

Image
मुंबई  / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  मुंबई महानगरपालिका हद्दीतील काही भागांमध्ये सुरू असलेल्या कथित अनधिकृत बांधकामे आणि परवानगीविना चालणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांबाबत संबंधित यंत्रणांनी चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी भाजप अल्पसंख्याक आघाडीचे राज्य सचिव रेहान मेमन यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या पूर्व विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिल्याचे सांगितले आहे. मेमन यांनी आपल्या निवेदनात काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप केला असून, संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच, महानगरपालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामे अथवा परवानगीविना सुरू असलेल्या व्यवसायांबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी, असेही त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, या आरोपांबाबत महानगरपालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. संबंधित विभागाकडून याबाबत प्रतिक्रिया मिळाल्यानंतर ती प्रसिद्ध करण्यात येईल.