Posts

पत्रकारांच्या सुविधासाठी केंद्र स्तरावर प्रयत्न करणार -खासदार श्रीरंग बारणे

Image
पत्रकारांसाठी कर्जत येथे पत्रकार भवन उभारणार -आमदार महेंद्र थोरवे  कर्जत येथे राज्यस्तरीय पत्रकार संघ पुरस्कार सोहळा संपन्न  मुंबई / पी आर न्यूज  पत्रकारांच्या विविध सेवा,, प्रवास योजना यासाठी दिल्लीच्या केंद्र स्तरावर आपण प्रयत्न करत असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी कर्जत येथील पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळ्या निमित्त वक्तव्य केले. तर कर्जत चे आमदार महेंद्र थोरवे यांनी तालुका कार्यक्षेत्रात  पत्रकार भवन उभारणार असल्याचे व्यक्त्यव्य  कर्जत येथे केले. पत्रकारांनी आपली शोध पत्रकारिता अखंड चालू ठेवायला हवी मात्र यात आपण कमी पडलो त्याचा फायदा पुढारी नेते घ्यायला लागतात.  पत्रकारांनी जे जे नवीन  साधन येईल ते ते शिकायला हवे. पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे योगदान भरीव आहे त्यासाठी एस एम देशमुख यांचे प्रयत्न अफाट आहेत असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हेमंत देसाई यांनी येथे सांगितले. मराठी पत्रकार परिषदेचे यापुढील अधिवेशन उदगीर तालुका येथे एप्रिल महिन्यात होणार आहे. राज्यातील सर्व तालुक्यातून आपण सातशे पेक्षा जास्त पत्रका...

एसटी'च्या स्मार्ट कार्ड सक्तीविरोधात दिव्यांगांचा एल्गार

Image
    युडीआयडी कार्ड असताना अतिरिक्त भुर्दंड कशासाठी            ज्ञानदेव भिमराव कदम (दिव्यांग नागरिक ) मंत्रालय प्रतिनिधी पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) दिव्यांग प्रवाशांसाठी जाहीर केलेल्या 'वेगवान सुरक्षित (NCMC) स्मार्ट कार्ड' सक्तीविरोधात आता राज्यातील दिव्यांग नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्र शासनाने दिलेले वैध युडीआयडी (UDID) कार्ड असतानाही एसटी महामंडळाने वेगळे स्मार्ट कार्ड काढण्याची अट लादणे, हा 'दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६' चा भंग असल्याचा आरोप सांगली येथील दिव्यांग नागरिक ज्ञानदेव कदम यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि दिव्यांग कल्याण आयुक्तांना निवेदन पाठवून सदर योजना तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. नेमका आक्षेप काय? एसटी महामंडळाने दिव्यांग प्रवाशांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी नवीन स्मार्ट कार्ड बंधनकारक केले आहे. यासाठी १९९ रुपये शुल्क आकारले जात असून, त्यात ठराविक रक्कम डिपॉझिट आणि रिचार्ज...

राज्यभरातून अरुण दळवी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

Image
     राष्ट्रीय सरपंच नेते अरुण दळवींच्या लढ्याला यश     राज्यभरातून अरुण दळवी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव मुंबई / रमेश औताडे  मंत्रालय प्रतिनिधी राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संपत आहे, त्या ठिकाणी आता बाहेरील सरकारी अधिकाऱ्यांऐवजी विद्यमान सरपंचांनाच 'प्रशासक' म्हणून नियुक्त करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे गावपातळीवरील प्रशासकीय कामात खंड पडणार नसून, स्थानिक विकासकामांना गती मिळणार आहे. काय आहे सरकारचा नवा निर्णय? यापूर्वीच्या निर्णयानुसार, मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकीय अधिकारी नेमले जाणार होते. मात्र, अधिकाऱ्यांची कमतरता आणि स्थानिक प्रश्नांची जाण नसल्याने प्रशासकीय अडथळे येण्याची शक्यता होती. आता नव्या निर्णयानुसार:  * सरपंचच प्रशासक: मुदत संपण्याच्या दिवशी जे सरपंच पदावर असतील, त्यांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती होईल.  * प्रशासकीय समिती: सरपंचांच्या मदतीसाठी विद्यमान उपसरपंच आणि सदस्यांची एक समिती स्थापन केली जाईल.  * कालावधी: ही नियुक्ती सहा महिने ...

देशाची पारंपारिक पाली भाषा संवर्धनासाठी व इतर मागण्यासाठी चेतन देढिया यांचा पुढाकार

Image
मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष चेतन देढिया यांनी मुंबई विद्यापीठात पाली भाषेच्या प्रचारासाठी गेल्या ६ महिन्यांपासून संपावर असलेले राजेश बलखंडे यांची भेट घेतली. आयोगाचे उपाध्यक्षांनी या समस्येचे निराकरण करण्यासाठी बैठक बोलावली, ज्यामध्ये मुंबई पोलिस झोन ८ चे डीसीपी मनीष कलावनिया, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य गुलाम रसूल शेख, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारंडे आणि याचिकाकर्ते राजेश बलखंडे उपस्थित होते. राजेश बलखंडे यांनी उपाध्यक्ष चेतन देध्या यांना सांगितले की, मुंबई विद्यापीठात पाली भाषेसाठी एक मजला राखीव ठेवावा अशी त्यांची इच्छा आहे कारण ती देशाची पारंपारिक भाषा आहे जेणेकरून तिचा प्रचार करता येईल असे त्यांनी सांगितले. राजेश बलखंडे यांनी उपाध्यक्ष चेतन देढिया यांना सांगितले की, मुंबई विद्यापीठात पाली भाषेसाठी एक जागा राखीव ठेवावी अशी त्यांची इच्छा आहे, कारण ती देशाची पारंपारिक भाषा आहे, जेणेकरून तिचा प्रचार करता येईल.  विद्यापीठात समाजातील लोकांसाठी वसतिगृह बांधले पाहिजे आणि पाली भाषेचा समावेश अनुदानित वर्गात करावा...

देवापूर येथे नैसर्गिक गूळ आणि गुळजन्य पदार्थांच्या विक्रीचा उद्या थाटात शुभारंभ

Image
मुंबई / रमेश औताडे  आजच्या रासायनिक युगात आरोग्याप्रति जागरूकता वाढत असताना, सेंद्रिय शेतीतील प्रयोगांना बळ देण्यासाठी देवापूर येथे एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे. कृषिभूषण उद्धवराव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली, सेंद्रिय व नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेल्या उसापासून तयार केलेल्या नैसर्गिक गूळ आणि विविध गुळजन्य पदार्थांच्या विक्रीचा शुभारंभ सोहळा उद्या, रविवार २२ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. शुभारंभाचे तपशील  * वेळ: सकाळी ठीक ९.०० वाजता.  * ठिकाण: देवापूर.  * प्रमुख उपस्थिती:  कृषिभूषण उद्धवराव बाबर (सेंद्रिय शेती, महाराष्ट्र राज्य) आरोग्यदायी उत्पादनांची मेजवानी केवळ साखरेला पर्याय म्हणून नव्हे, तर आरोग्यासाठी पोषक अशा शुद्ध सेंद्रिय उत्पादनांची मोठी श्रेणी या निमित्ताने ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील उत्पादनांचा समावेश असेल:  * नैसर्गिक गूळ आणि गुळ पावडर  * काकवी (तरल गूळ)  * गुळ क्यूब्स आणि गुळखडे  * पारंपारिक साईचा गूळ आणि गुळदाणी  "शुद्ध आणि नैसर्गिक अन्नाची गरज ओळखून आम्ही...

सायकल दान

Image
 *परिवर्तन फाउंडेशन, Adyen व ConnectFor यांच्या ‘सायकल दान – Pedals of Joy’ उपक्रमातून ५२ विद्यार्थ्यांना सायकल वितरण*  परिवर्तन फाउंडेशनतर्फे, Adyen व ConnectFor यांच्या सहकार्याने “सायकल दान – Pedals of Joy” या उपक्रमांतर्गत जनसेवा संघ ट्रस्ट संचालित नेरे हायस्कूल येथे सायकल वितरण व सायकल सुरक्षितता जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाअंतर्गत शाळेतील ५२ विद्यार्थ्यांना सायकली वितरित करण्यात आल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना होणारा त्रास कमी करून त्यांच्या शिक्षणाला गती मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. परिवर्तन फाउंडेशनने नेरे हायस्कूल ही शाळा दत्तक घेतली असून येणाऱ्या पाच वर्षांमध्ये शाळेचा सर्वांगीण कायापालट करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. जनसेवा संघ ट्रस्ट संचालित नेरे हायस्कूलची कार्यकारिणी यासाठी सदैव तत्पर राहील असेही नमूद करण्यात आले. या कार्यक्रमाचे *अध्यक्ष श्री दत्तात्रय शेठ पाटील* हे होते, तर *प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अरुण कुमार मुळे* उपस्थित होते. कार्यक्रमास डॉ. गिरीश इंगळे – ...

दक्षिण मुंबईत ७४ मजली ‘ वन मरीना’ प्रकल्पाची घोषणा

Image
दक्षिण मुंबईत ७४ मजली ‘ वन मरीना’ प्रकल्पाची घोषणा मुंबई / रमेश औताडे  दक्षिण मुंबईतील मरीन लाइन्स परिसरात ७४ मजली आलिशान निवासी टॉवर उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘वन मरीना’ या नावाचा हा प्रकल्प वायएम इन्फ्रा समूह आणि अश्विन शेठ समूह यांच्या संयुक्त सहकार्याने साकारला जाणार आहे. सुमारे १५ लाख चौरस फूट बांधकाम क्षेत्रफळ असलेल्या या प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत सुमारे २८०० कोटी रुपये आहे. या भागातील हा सर्वात उंच निवासी टॉवर ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या टॉवरमध्ये २, ३ आणि ४ बेडरूमच्या सदनिका तसेच ड्युप्लेक्स आणि पेंटहाऊस प्रकारातील घरे असतील. घरांच्या किमती सुमारे ७ कोटी रुपयांपासून ४५ कोटी रुपयांपर्यंत असतील. प्रत्येक मजल्यावर सुमारे सहा सदनिका ठेवण्यात येणार असून, गोपनीयता आणि प्रशस्त समुद्रदृश्य यावर भर देण्यात आला आहे. सुमारे ९५ टक्के घरे अरबी समुद्राकडे तोंड करून असतील. समुद्रसपाटीपासून १३१ फूट उंचीवर पहिला राहण्यायोग्य मजला असेल, अशी माहिती देण्यात आली. या टॉवरमध्ये ६९ व ७० व्या मजल्यावर विशेष सुविधा देण्यात येणार आहेत. इमारतीचा काचांचा दर्शनी भाग उ...