Posts

मुंबईतील सफाई कामगारांना मिळणार हक्कांची घरे.

Image
मुंबईतील सफाई कामगारांना मिळणार हक्कांची घरे. उपाध्यक्षांच्या पुढाकारानंतर मुख्यमंत्र्यांचे ठोस आश्वासन.. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना’ अधिवेशनात जाहीर होणार. मुंबई, २३ मार्च / रमेश औताडे  मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांसाठी मोठा दिलासा देणारी घडामोड घडली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना अंतर्गत त्यांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने म्युन्सिपल मजदूर युनियनच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने शासन निर्णय २००८ व २०१५ ची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत, मुंबई महापालिकेने नव्याने उभारलेल्या घरांपैकी ५० टक्के घरे सफाई कामगारांना मालकी हक्काने देण्याचे ठोस आश्वासन दिले. तसेच या योजनेची अंमलबजावणी येत्या अधिवेशनात जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या मागणीसाठी म्युन्सिपल मजदूर युनियन, मुंबईच्या वतीने २३ मार्च रोजी आझाद मैदान येथे आ...

किरण कोळी यांचा आझाद मैदानातून सवाल

Image
सरकार नेमके कुणासाठी काम करत आहे !  किरण कोळी यांचा आझाद मैदानातून सवाल मुंबई / रमेश औताडे  आमची जमीन, आमचा समुद्र, आमचा निसर्ग आणि आमचे अस्तित्व वाचविण्यासाठी व विनाशकारी प्रकल्पांच्या विरोधात आझाद मैदानात महामोर्चा काढत, " सरकार नेमके कुणासाठी काम करत आहे " असा सवाल करण्यात आला. आदिवासी, मच्छीमार व इतर वंचित घटकांनी या मोर्च्यात मोठ्या संख्येने भर उन्हात सहभाग नोंदवला. मच्छीमार नेते व आयोजक कमिटीचे सर्व सदस्य, नारायण पाटील संघर्ष समिती चे वैभव वजे, लिओ कोलासो, रामकृष्ण तांडेल, किरण कोळी, ज्योती मेहेर, उज्वला पाटील असे अनेक समाज प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. समुद्रात होणारे विमानतळ आणि पर्यावरणास घातक 'चौथी मुंबई' योजना तात्काळ थांबवा. मुंबईतील कोळीवाड्यांचे, बाजारांचे पुनर्विकास धोरण मच्छिमारांच्या हिताचे करा. ससून डॉक, मुंबई येथे बंद केलेली गोदामे त्वरित ताब्यात द्यावी. कफ-परेड, मुंबई येथील प्रस्तावित 'मरीना पार्क' प्रकल्प रद्द करावा. छत्रपती शिवाजी महाराज बाजार (क्रॉफर्ड मार्केट) कोणत्याही परिस्थितीत स्थलांतरित करू नये. मुंबई येथील सर्व बाजार...

Sanitation Workers Celebrate at Azad Maidan Following Government Assurances

Image
Mumbai / Ramesh Autade The protest organized by the Municipal Mazdoor Union—staged at 'Varsha,' the Chief Minister's official residence, to press for the demand for ownership housing for sanitation workers of the Mumbai Municipal Corporation—has proven successful. Following assurances provided by the government, scenes of jubilation among the sanitation workers were witnessed at Azad Maidan. Under the leadership of Ashok Jadhav, President of the Municipal Mazdoor Union, thousands of sanitation workers, accompanied by their families, had marched to the Chief Minister's residence. During the discussions held on this occasion, the government gave an assurance that a concrete decision regarding the housing issue of the sanitation workers would be taken very soon. Indications were given that justice would be delivered to the workers through the effective implementation of the Government Resolution (GR). Ashok Jadhav clarified, "Placing our trust in the gover...

तरच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल

Image
मुंबई /रमेश औताडे  डॉ.आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळे सर्वांसाठी खुले करून समानतेचा ऐतिहासिक लढा उभारला होता. मात्र आजही सामान्य नागरिकांना पाण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणी हा मूलभूत हक्क आहे त्यामुळे शासनाने पाणी सर्वांसाठी मोफत केले तरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली शासनाकडून वाहिली गेली असे सिद्ध होईल. असे आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी सांगितले. प्रदेश प्रवक्ते धर्माजी बागडे, भोजराज वैद्य, प्रमुख पाहुणे धर्माजी बागडे, जयदेव चिंवडे, प्रकाश कांबळे, प्रविण आवळे सूत्रसंचालन प्रा.रमेश दुपारे यांनी केले.पुण्यशील बोदिले.अभिषेक मिश्रा, रोहित पांडे, राहूल द्विवेदी सतिश शुक्ला ,पवन वर्मा,शिबू पांडे, सुरेंद्र तिवारी अतुल गंगापूरकर उपस्थित होते. नारायण बागडे यांनी असे अनेक उपक्रम राबवत शासनाला वेळोवेळी सूचना केल्या आहेत. मात्र सरकार या सूचना अंमलात आणत नाही. याचे मोठे दुःख आहे असे धर्माजी बागडे यांनी सांगितले.

संयम, करुणा आणि आध्यात्मिक उन्नतीचा संदेश

Image
    मुंबई / रमेश औताडे  सर्व धर्मीयांमध्ये एकात्मता आणि सामाजिक सौहार्द वाढवण्यासाठी तसेच संयम, करुणा आणि आध्यात्मिक उन्नतीचा संदेश देण्याच्या उद्देशाने मुंबईत मरीन लाइन्स येथील बहाई केंद्रात सर्वधर्मीय इफ्तार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध धर्मांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सोहळ्यात उपवासाच्या माध्यमातून आत्मशुद्धी, संयम, करुणा आणि आध्यात्मिक उन्नती साधण्याचा संदेश देण्यात आला. या प्रसंगी बहाई केंद्राच्या सचिव नर्गिस गौर, शेख नासिर, फादर एम एम मायकल,स्वामी ब्रज मोहन दास,सलीम खान, शत्रुघ्न जीवनाणी या व इतर धर्मगुरु व विचारवंतानी उपवास व एकता यांचे महत्व काय आहे याबाबत सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकत्र येऊन इफ्तारचा आस्वाद घेतला. या सोहळ्यामुळे विविध धर्मीयांमध्ये संवाद, सलोखा आणि परस्पर सन्मान अधिक दृढ होण्यास मदत झाली. या उपक्रमाचे आयोजन आंतरधर्मीय एकता परिषदेतर्फे करण्यात आले असून, भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबवण्...

माजी पोलीस उपनिरीक्षक बबन जाधव यांचा आंदोलनाचा इशारा

Image
            पोलीस महासंचालकांना पाठवले पत् मुंबई / रमेश औताडे  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त जे.एफ. रिबेरो, एम.एन. सिंग आणि अरुणी रॉय यांच्या कार्यकाळात कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याचा खळबळजनक आरोप निवृत्त पोलीस उपनिरीक्षक बबन गणपत जाधव यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना सविस्तर पत्र लिहून आपल्या मागण्या मांडल्या आहेत. मुख्य आरोप आणि मागण्या:  * अनमानास्पद वागणूक: तत्कालीन आयुक्तांनी पोलीस संघटना बनवण्यास विरोध केला आणि कर्मचाऱ्यांचे हक्क हिरावून घेतल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे.  * भ्रष्टाचाराचे आरोप: काही माजी आयुक्तांनी बदली प्रक्रियेत आणि प्रशासकीय कामात भ्रष्टाचार केल्याचा दावा जाधव यांनी पुराव्यासह केला आहे.  * सुरक्षेचा प्रश्न: कर्तव्यावर असताना पोलीस कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले आणि त्यांच्या वाढत्या आत्महत्या यावर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.  * न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी: उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी त्यांच्या हक्काचे व्यासप...

निसर्ग एस आर गृहनिर्माण संस्था यांची पत्रकार परिषद

Image
मुंबई / रमेश औताडे  मुंबई मराठी पत्रकार संघ या ठिकाणी निसर्ग सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित तर्फे जोसेफ शांतीमानू तसेच इतर मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होते.जोसेफ शांतीमानू तसेच इतर मान्यवरांनी पत्रकार आणि मी यांच्याशी आज दिनांक 18/3/2026 रोजी संवाद साधला. बिल्डर (विकासक) हलकारा बिल्डर ,भागीदार कॉसमॉस लँडमार्क  यांनी आमचे  थकीत भाडे ११.२५ कोटी थकीत ठेवले आहेत तसेच मालमत्ता कर ५.७५ कोटी भरले नाही ,कॉर्पस फंड (निधी) सुमारे २ कोटी दिले नाही ,दरमहा १२,०००/- रुपये भाडे दिले जात आहे. परंतु विक्रीसाठी उपलब्ध असलेले सर्व ७७ सदनिका (फ्लॅट्स) विकून टाकले आहेत. तसेच सर्व F.S.I. (मजला क्षेत्र निर्देशांक) आणि T.D.R. (हस्तांतरणीय विकास हक्क) देखील वापरून टाकले आहेत.  यामुळे या विक्री सदनिकांचे खरेदीदारही अडचणीत आले आहेत. 'कलम १३/२' (Section 13/2) अंतर्गत विकासक बदलण्याबाबत वारंवार पत्रे पाठवूनही, आजपर्यंत सहाय्यक निबंधक श्री. चंद्रकांत पवार यांनी यावर कोणतीही सुनावणी घेतलेली नाही. इमारतीचे रंगकाम (पेंटिंग) योग्य प्रकारे करण्यात आलेले नाही; तसेच गच्चीवरील (टेरेसवरील...