Posts

साहित्य क्षेत्रातील अशोकराव टाव्हरे यांचे योगदान उल्लेखनीय – डॉ. श्रीपाल सबनीस

Image
मुंबई / रमेश औताडे  पद्मश्री नामदेवराव ढसाळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सतत तीन वर्षे कनेरसर, मुंबई , राजगुरुनगर येथे साहित्य संमेलन आयोजित करून विविध क्षेत्रात कार्यरत राहून साहित्यासाठी कवी-लेखक अशोकराव टाव्हरे हे उल्लेखनीय योगदान देत आहेत असे मत ज्येष्ठ साहित्यिक व ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी तिसऱ्या पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. दोन कवितासंग्रह, लेखसंग्रह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यावर मराठी व इंग्रजीत पुस्तकांचे लेखन, अनेक स्मरणिका व विशेषांकाचे संपादन करून अशोकराव टाव्हरे हे प्रतिभावंत साहित्यिक म्हणून नावारूपास येत आहेत. समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत राहण्याचे टाव्हरे यांचे कसब व त्यांची पत्नी सुरेखा टाव्हरे यांची त्यांना असलेली साथ गेली तीन वर्षे साहित्य संमेलनात अनुभवत आहे असे डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी नमुद केले. पुर- कनेरसर चे सुपुत्र व विश्वसाहित्यिक नामदेवराव ढसाळ यांचा वारसा जतन करण्यासाठी व वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी टाव्हरे गेली तीन वर्षे साहित्य स...

धगधगती मुंबईचा भव्य वर्धापनदिन सोहळा उत्साहात

Image
मुंबई / रमेश औताडे  ‘धगधगती मुंबई’ या वृत्तपत्राच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या सोहळ्याला राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली.  या वेळी माजी खासदार व माजी महापौर डॉ. संजीव नाईक तसेच नवी मुंबईच्या विद्यमान महापौर सुजाता पाटील या दोघांची एकाच व्यासपीठावर उपस्थिती हा विशेष योगायोग ठरला. आपल्या भाषणात वनमंत्री गणेश नाईक यांनी ‘धगधगती मुंबई’चे संपादक भीमराव धुळप यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठविण्याचे धाडस त्यांनी दाखवले आहे, असे सांगत त्यांनी शुभेच्छा दिल्या.  आपल्या मनोगतात धुळप यांनी मुंबईत मोठा जनसमुदाय गोळा करण्यास यश मिळाल्याचे सांगत, आता नवी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ‘धगधगती मुंबई’चा विस्तार करण्याचा निर्धार व्यक्त केला.  सिने अभिनेते विजय पाटकर, जेष्ठ पत्रकार अजित जगताप, हनुमंतराव रांजणे, मुंबई बँकेचे संचालक नंदकुमार काटकर, पत्रकार संघटनेच्या स्मिता चिपळूणकर, वसंत जाधव, रमेश कदम, राजन ...

मुंबईत ७-८ मार्च रोजी होणार दुसरी आंतरराष्ट्रीय वृक्ष संवर्धन परिषद

Image
"Growing Cities – Greener Canopies" या थीमवर जागतिक तज्ञ एकत्र येणार मुंबई / रमेश औताडे  जलद शहरीकरणाच्या या काळात वृक्ष हे केवळ सजावटीचे घटक नसून हवामान बदलाशी लढण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी आणि शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे सहयोगी आहेत. या संदेशासह मुंबईत दुसरी आंतरराष्ट्रीय वृक्ष संवर्धन परिषद (ATCA 2026) आयोजित करण्यात येत आहे. अमेनिटी ट्री केअर असोसिएशन (ATCA) आणि नानाजी देशमुख प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणारी ही परिषद ७ आणि ८ मार्च, २०२६ रोजी हॉटेल सहारा स्टार, विले पार्ले (पूर्व), मुंबई येथे होणार आहे. दुसऱ्या आंतरराष्ट्रीय अरबोरिकल्चर परिषदेची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर्यन पांडे, अध्यक्ष संजय पांडे, ATCA चे संचालक वैभव राजे आणि नुकुल सवानी उपस्थित होते. परिषदेचे उद्दिष्ट ATCA चे संचालक वैभव राजे यांनी सांगितले, "जलद शहरीकरणामुळे वृक्ष संरक्षण आणि काळजीकडे दुर्लक्ष झाले आहे. राज्य सरकार, महानगरपालिका आणि स्थानिक संस्थांनी वृक्...

कर्मवीर अजित दादा पवार यांचे कृषी क्षेत्राचे स्वप्न लोक विद्यापीठ, शेतकरी संचालक विस्तार व कृषी विज्ञान केंद्र स्थापनेतून साकार करणार.... डॉ मंगेश देशमुख

Image
मुंबई / रमेश औताडे भारत सरकार, कृषिमंत्रालय, नवी दिल्ली द्वारा देशात Agriculture Technology Management Agency, Atma हा सामाजिक उपक्रम, जिल्ह्याचे जिहकाधिकारी तथा अध्यक्ष आत्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उपाध्यक्ष आत्मा, सचिव प्रकल्प संचालक आत्मा, जिल्हा स्तरावर उत्तम असे कृषी व ग्रामीण विकासाचे सन २०१२ पासून प्रभावीपणे कार्य सुरू आहे. *Artificial Intelligence for Agriculture क्षेत्रात प्रभावी यशस्वीता प्राप्त करण्यासाठी लोक विद्यापीठाने आत्मा या सामाजिक संस्था चे मदतीला Farmers Power of Thinking and Motivational Training चे माध्यमातून, मानसिक परिवर्तना चे प्रशिक्षणातून अनेक संचालक विस्तार यांना सक्षम केले आहे, आणि त्यातील उत्सुक शेतकरी यांना इच्छा नुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आत्मा सोबत आजीवन कृषि व ग्रामीण क्षेत्रात सामाजिक काम करणे साठी, संचालक विस्तार Director Extension अशी पदोन्नती नियुक्ती देऊन छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ अमरावती यांनी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आत्मा या सामाजिक संस्था याला समन्वय करून दिले आहे. *आज राज्यात ५५० संचालक विस्तार ह...

यादव जी की लव्ह स्टोरी चित्रपटाविरोधात मोर्चाचा इशारा

Image
मुंबई / रमेश औताडे महाराष्ट्र करणी सेनाचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी ‘यादव जी की लव्ह स्टोरी’ या हिंदी चित्रपटाविरोधात २७ फेब्रुवारी रोजी सेन्सॉर बोर्डावर मोर्चा काढण्याचा इशारा मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. या वेळी राज्य प्रवक्ते शैलेश पन्नालाल यादव, सुभाष चंद्र यादव, किरण सोनवणे, अंबिका प्रसाद यादव आदी उपस्थित होते. चित्रपटात यादव समाजाचे व भगवान श्रीकृष्ण यांचे चुकीचे चित्रण करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी या चित्रपटामुळे हिंदू धर्म व यादव समाजाच्या भावना दुखावल्याचे सांगितले. संबंधित चित्रपटाच्या निर्माता संदीप तोमर, दिग्दर्शक अंकित भडना, अभिनेत्री प्रगती तिवारी व अभिनेता विशाल मोहन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.  २७ फेब्रुवारी रोजी विविध हिंदू संघटनांच्या सहभागातून सेन्सॉर बोर्डावर मोर्चा काढण्यात येणार असून राज्यात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा देण्यात आला. सरकारने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून चित्रपटावर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली.

स्वच्छ भारत मिशन व जलजीवन मिशन च्या आंदोलनास यश

Image
मुंबई / रमेश औताडे  आझाद मैदानावर पाणी व स्वच्छता कर्मचारी यांनी आदोलन केले नंतर  पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांने स्वच्छ भारत मिशन( ग्रामीण) व जल जीवन मिशन या योजनेमध्ये काम करणारे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कंत्राटी कर्मचारी यांचे वेतनासाठी ५ कोटी रूपसे निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती राज्य कृती समितीचे कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी दिली.  पाणी पुरवठा व स्वच्छता शासकीय कर्मचारी राज्य कृती समितीने आझाद मैदानावर आंदोलन केले होते. शासन सेवेत कायम करणे बरोबर थकीत वेतन व इतर  विविध मागण्या करणेत आले होते.  मुख्य सचिव राजेश आग्रवाल यांचे अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस ग्रामविकास विभागाचे सचिव, पाणी पुरवठा विभागाचे सचिव , अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग, प्रधान सचिव नियोजन विभाग,  अभियान संचालक  जलजीवन मिशन, अभियान संचालक स्वच्छ भारत मिशन ग्रामीण उपस्थित होते. या बैठकीत मुख्य सचिव यांचे बैठकीत न्यायप्रविष्ठ असलेले व न्यायालयाने निवाडे दिलेले कंत्राटी कर्मचारी यांचे बाबत शासन सेवेत कायम करणे साठी समिती गठित करणेचा शासन निर्णय का...

बीकेटीने ऑन-हायवे टायर पोर्टफोलिओसह भारतातील ग्राहक टायर बाजारपेठेत प्रवेश

Image
मुंबई / रमेश औताडे  बाळकृष्‍ण इंडस्‍ट्रीयल लिमिटेड (बीकेटी) या ऑफ-हायवे टायर (ओएचटी) विभागातील जागतिक अग्रणी कंपनीने आज आपला ऑन-हायवे पोर्टफोलिओ लाँच करत भारतातील ग्राहक टायर बाजारपेठेत प्रवेशाची घोषणा केली. आपल्‍या ओएचटी नेतृत्‍वापलीकडे धोरणात्‍मक विस्‍तारीकरण करत बीकेटीने दुचाकी (स्‍कूटर्स व मोटरसायकल्‍स) आणि मीडियम अँड हेवी कमर्शियल वेईकल्‍स (एमअँडएचसीव्‍ही)साठी उद्देशासह डिझाइन करण्‍यात आलेली उत्‍पादने सादर केली, ज्‍यामधून भारतातील झपाट्याने वाढत असलेल्‍या ग्राहक व रिप्‍लेसमेंट टायर विभागांप्रती त्‍यांची दीर्घकालीन कटिबद्धता दिसून येते. यासोबत कंपनीने आपली राष्‍ट्रीय ब्रँड मोहिम *'एलीव्‍हेट युअर ड्राइव्‍ह* ' देखील लाँच केली, ज्‍यामध्‍ये ब्रँड अॅम्‍बेसेडर *रणवीर सिंग* आहेत. या मोहिमेसह कंपनीने आपला ग्राहक ब्रँड प्रवास सुरू केला आहे, जेथे स्‍वदेशी विकसित जागतिक टायर उत्‍पादकासाठी नवीन अध्‍याय दिसून येतो *नवीन ब्रँड चॅप्‍टर: बीकेटी टायर्स आणि बीकेटी कार्बन :* आपली एकात्मिक ब्रँड ओळख *'बीकेटी - ग्रोईंग टूगेदर'* अंतर्गत कंपनीने दोन विशिष्‍ट ओळखीसह नवीन ब्रँड ...