Posts

घणसोलीत मोबाईल टॉवरवरून वाद; रहिवाशांचा आक्रमक पवित्रा

Image
नवी मुंबई / रमेश औताडे  घनसोली सेक्टर १० परिसरातील मेघ मल्हार सिडको सोसायटीजवळ उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवरवरून रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित टॉवर मनमानी पद्धतीने व चुकीच्या ठिकाणी बसवण्यात आल्याचा आरोप करत रहिवाशांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, एअरटेल कंपनीकडून हा टॉवर उभारण्यात आला असून यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य घेतले गेले आहे. “नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी एअरटेल कंपनीचे काम करत आहेत का?” असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच, हा टॉवर रहिवासी भागाच्या अत्यंत जवळ उभारण्यात आल्याने भविष्यात आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. चुकीचे सर्वेक्षण करून हा टॉवर बसवण्यात आल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रकरणात तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. “लवकरात लवकर हा टॉवर हटवण्यात आला नाही, तर कायदेशीर मार्गाने पुढील पावले उचलू,” असा इशाराही रहिवाशांनी दिला आहे. दरम्या...

जोगेश्वरीत भव्य भीम जयंती महोत्सव उत्साहात

Image
मुंबई / रमेश औताडे  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत त्रिपुरा फाउंडेशनच्या वतीने आयोजित १३५ वी भीम जयंती महोत्सव जोगेश्वरी येथे मोठ्या उत्साहात पार पडली. माजी मंत्री व ज्येष्ठ नेते जयंतरावजी पाटील,  जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अजितदादा रावराणे, माजी नगरसेविका रूपालीताई रावराणे, त्रिपुरा फाउंडेशनच्या अध्यक्षा करिश्माताई सुरती, तसेच विकासक राजेश सुरती आदी मान्यवर उपस्थित होते. शिवनाथ खलसे, भगवान ढालवाले, प्रशांत नेब, उल्हास कसबे, सचिन म्हात्रे, सुरेखा लोंढे, स्वप्नील पाटील, रोहित कांबळे, सुरज मिश्रा, राजेश सकट, विजय कसबे, निलेश लोंढे, रोहित लोंढे, दिनेश राखपसरे आदी उपस्थित होते. या जयंतीचे आयोजन व संकल्पना सचिनभाऊ लोंढे जिल्हा अध्यक्ष युवक आणि निलेश लोंढे वॉर्ड अध्यक्ष युवक यांनी केले.  “माता रमाई जीवन संग्राम पुरस्कार २०२६” प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार अमरजी कसबे, सुरेशजी सकट, राजू बोरसे, माणिकराव कसबे, उत्तम सकट, गणेश लोंढे, रमेश कसबे, दीपक लोंढे, किसन कसबे, शाम खनपटे, रामू सकट आदींना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

....तर आमचे राजवाड़े परत दया :- अजय सिंह सेंगर

Image
....तर आमचे राजवाड़े परत दया :- अजय सिंह सेंगर मुंबई दि.22 SC/ST Act , Ugc Act, आरक्षण सारखे कायदे देशात जातीवाद व विषमता निर्माण करत आहे जर देशातील ही विषमता दूर झाली नाही तर आमचे राजवाड़े परत दया असे "महाराष्ट्र करणी सेना" प्रमुख अजय सिंह सेंगर यानी भाषणात मत व्यक्त केले, पुढे ते म्हणाले की देशात सामिल होताना  जे 400/450 राजवाड्याच्या राजासोबत भारत सरकारने केलेले एग्रीमेंट पाळल्या गेले नाही. एससी एसटी Act, यूजीसी Act, आरक्षण सारख्या कायद्याने क्षत्रियांची मुस्कट दाबी झालेली आहे, या कायद्यामुळे देशात विषमता निर्माण झालेली आहे या संविधानाने समानतेचे अधिकार दिलेले असताना  समानता या मूलभूत अधिकाराचे अर्थात संविधानातिल आर्टिकल 14,15 चे हनन करण्यात आले. ज्या क्षत्रियांनी या देशाकरता या धर्माकरिता प्रार्णाचे बलिदान इतिहासामध्ये दिलेले आहे, हिंदूच्या सर्वश्रेष्ठ गीता या धर्मग्रंथेमध्ये क्षत्रियांनी राज्यकारभार करावे असे नमूद केलेले असताना क्षत्रियांना बाजूला सत्तेतून बाहेर केलेले आहे.  राजकारणाच व्यापारीकरण झालेले आहे. व्यापारी सत्तेत जाऊन बसल्यामुळे पैसा हाच ...

एआय-आधारित होम इंटीरियर ब्रँड शुभारंभ

Image
एआय-आधारित होम इंटीरियर ब्रँड शुभारंभ  मुंबई / रमेश औताडे  होमलेन या भारतातील आघाडीच्‍या तंत्रज्ञान व एआय-आधारित होम इंटीरियर ब्रँडने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे आपला पहिला स्टुडिओ लाँच केला आहे. प्रबळ पायाभूत सुविधा आणि मुंबई महानगर क्षेत्राशी असलेल्या उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे बेलापूर हे महत्त्वाचे व्यापारी आणि निवासी केंद्र म्हणून ओळखले जाते.  हा स्टुडिओ संतोष कुमार जे आणि  पार्थिबन सुधमन यांच्या भागीदारीत सुरू करण्यात आला आहे . होमलेनचे सह-संस्थापक आणि सीओओ तनुज चौधरी म्हणाले, नवी मुंबई आमच्यासाठी नेहमी महत्त्वाची बाजारपेठ राहिली आहे, विशेषतः सीबीडी बेलापूरसारखी ठिकाणे, जिथे प्रबळ पायाभूत सुविधांमुळे निवासी क्षेत्रात शाश्वत वाढ होत आहे.  या सहयोगाबाबत मत व्‍यक्त करत  संतोष कुमार जे म्हणाले, नवी मुंबईसारख्या बाजारपेठांमध्ये आता संघटित इंटीरियर सोल्यूशन्सला अधिक पसंती दिली जात आहे.  या लाँचसह, होमलेनने शहरी बाजारपेठांमध्ये आपला विस्तार सुरूच ठेवला आहे, तसेच सुलभ उपलब्धता, स्थानिक भागीदारी आणि तंत्रज्ञानावर आधारित सुव्यवस्थित इंटीरियर अ...

प्रकाश खंडागळे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह रामदास आठवले यांच्या पार्टीत प्रवेश

Image
मुंबई / रमेश औताडे  पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत, रिपब्लिकन सेनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रकाश खंडागळे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह औपचारिकपणे पक्षात प्रवेश केला. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पक्षाला वाढता पाठिंबा मिळत असून, याचे स्पष्ट उदाहरण काल ​​दिसून आले.  मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत रिपब्लिकन सेनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रकाश खंडगळे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह औपचारिकपणे पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील गटबाजी संपवून एकसंध रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक गट असले तरी देशातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकच रिपब्लिकन पक्ष आहे. त्यामुळे नवीन गट तयार करण्याऐवजी सर्वांनी एकत्र यावे. त्यांच्या या आवाहनाला समाजात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रकाश खंडगळे यांनीही आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आणि वेग...

निदा खानवरील आरोप एकतर्फी व तथ्यहीन असल्याचा दावा

Image
मुंबई / रमेश औताडे  नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस  प्रकरणातील आरोपी निदा खान हिच्या समर्थनार्थ गुरुवारी मुंबई प्रेस क्लब येथे  ए पी सी आर संस्थेने पत्रकार परिषद घेतली.  निदा खानवर लावण्यात आलेले आरोप तपासाअंती खरे खोटे बाहेर येईल, त्यामुळे माध्यमांनी व सरकारने दोन्ही बाजू पाहून बोलावे व छापावे अशी मागणी केली. या प्रकरणाला जाणीवपूर्वक धार्मिक रंग देण्यात येत असल्याची टीका करत, ए पी सी आर संस्थेचे महासचिव शाकीर भाई शेख म्हणाले, “हे प्रकरण तपासाआधीच ‘कॉर्पोरेट जिहाद’ किंवा ‘धर्मांतर’ अशा स्वरूपात सादर केले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. वक्त्यांनी सांगितले की, सध्या प्रकरणाची चौकशी सुरू असून अनेक बाबी अद्याप सिद्ध झालेल्या नाहीत. काही सामाजिक संस्थांच्या अहवालांचा दाखला देत, “पुरावे आणि सार्वजनिक चर्चेत मोठा फरक आहे,” असेही ते म्हणाले.  यावेळी पत्रकार निरंजन टकले, तिस्ता सटेलवाड, संध्या गोखले, ॲड, नदीम खान, डॉल्फी डिसुझा, शाकीर भाई शेख उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांवरही टीका करत, “काही मीडिया ट्रायलमुळे आरोपींच्या बाजूने असलेले मुद्दे...

ब्रँड ॲम्बेस्टर बदलले… पण ‘लाल परी’ अजूनही रुग्णालयातच!

Image
मुंबई / रमेश औताडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (ST) पुन्हा एकदा आकर्षक चेहरा पुढे करत अभिनेता रितेश देशमुख यांची ब्रँड ॲम्बेस्टर म्हणून नियुक्ती केली. मात्र, प्रत्यक्षात ‘ लाल परी ’ची अवस्था सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच खालावत चालली असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ब्रँड ॲम्बेस्टर बदलून प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न होत असताना, जमिनीवरची परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळी आहे. बसस्थानकांवर स्वच्छतेचा अभाव, पिण्याच्या पाण्याची सुविधा बंद, डेपो मधील पंखे बंद अवस्थेत, तसेच इंडिकेटरनुसार बस न लागल्याने प्रवाशांना बॅगा घेऊन धावपळ करावी लागत आहे. परिणामी प्रवाशांचा त्रास वाढत असून, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी हा प्रवास अधिकच कष्टदायक ठरत आहे. याशिवाय, वाढलेले अपघात, कंत्राटी पद्धतीने भरती केलेले वाहक चालक आणि कर्मचाऱ्यांवरील ताण यामुळे एस टी सेवेच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे सरकार विविध सवलतींचा गाजावाजा करत असताना, दुसरीकडे मूलभूत सुविधा पुरवण्यातच प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, याआधीही अनेक ...