Posts
अन्यायाविरोधात दिव्यांग नागरिकाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
- Get link
- X
- Other Apps
हक्कासाठी लढतोय , पण ऐकणार कोण ! मुंबई / रमेश औताडे अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशाची खेडचे तहसीलदार यांनी अंमलबजावणी करून आदेश पारित केल्यानंतर खेडच्या उपविभागीय अधिकाऱ्याने तातडीने स्थगिती दिली. यामुळे खेड तालुक्यातील सायगाव येथील जमीनप्रकरणी अन्यायग्रस्त दिव्यांग नागरिक सुदाम शंकर बोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे उपोषण सुरू केले आहे. उपविभागीय अधिकारी,खेड यांचा आदेश १२ एप्रिल २०१६ रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांनी रद्द केला होता. तहसीलदार खेड यांना फेरचौकशी आदेश दिले होते. त्यानंतर अप्पर विभागीय आयुक्त पुणे यांचेकडे स्थगिती नसतानाही नऊ वर्षे अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. तहसीलदार खेड यांनी २५ मार्च २०२६ रोजी अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांचा आदेश कायम ठेवल्याने प्रतिवादींनी खेडचे उपविभागीय अधिकारी, प्रांत यांचेकडे अपिल दाखल केले. स्थगिती दिली नाही तर जमीनीची विक्री सुदाम बोरकर व इतर करतील हा मुद्दा ग्राह्य धरून खेडचे उपविभागीय अधिकारी, प्रांत ...
सुसंवादाने जगण्यासाठी आंतर-धार्मिक एकता परिषद
- Get link
- X
- Other Apps
मुंबई / रमेश औताडे सर्व धर्मांमधील वाईट विचारधारेला नाकारणे आणि निसर्गाशी सुसंवादाने जगणे या दोन मुद्यावर आंतर-धार्मिक एकता परिषद होत आहे. मॅगसेसे पुरस्कार विजेते टी. एम. कृष्णा हे या परिषदेत प्रमुख भाषण देणार आहेत. आंतर-धार्मिक एकता परिषदेचे संयोजक आणि इस्कॉनचे पदाधिकारी केशव चंद्र दास , आयआरएससीचे सह-संयोजक आणि सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझमचे संचालक इरफान इंजिनिअर, दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग, रामकृष्ण मिशन, मुंबई धर्मप्रांत आणि अजमेर शरीफ दर्गा यांसारख्या संस्थांचे प्रतिनिधी, धार्मिक नेते परिषदेत सहभागी होणार आहेत. जेसुइट धर्मगुरू आणि शिक्षणतज्ज्ञ फादर फ्रेझर मास्कारेन्हास, डॉ. सुरिंदर कौर, अभिनेते जॉय सेनगुप्ता, टी. एम. कृष्णा आणि त्यांच्या चमूच्या कर्नाटकी संगीताच्या सायंकाळच्या कार्यक्रमाने याची सांगता होईल. सत्य बोला आणि आपल्यातील प्रामाणिकपणाचा स्वीकार करा. असा संदेश देण्यात येणार आहे. आपण एकमेकांच्या श्रद्धा समजून घ्यायला आणि स्वीकारायला शिकले पाहिजे. जेव्हा धर्मामागे दुष्ट हेतू असतो, तेव्हा तो अतिरेकी बनतो. आम्ही टप्प...
दर्पण, आरसा, मिरर आणि आता आईना ....
- Get link
- X
- Other Apps
मुंबई / रमेश औताडे दर्पण आरसा आईना आणि आता मिरर....सर्वसामान्य माणसाच्या जीवनात रोज शंभर वेळा येणारी वस्तू एका नाटकाच्या माध्यमातून मुंबई मराठी पत्रकार संघ येथे प्रेक्षकांना अनुभवण्यास मिळाली. पुण्यातील जागर नाट्यसंस्थेने निर्मित ‘आईना’ हा मराठी-अहिराणी भाषेतील दीर्घांक नुकताच मुंबई मराठी पत्रकार साहित्य संघात यशस्वीरीत्या सादर केला. ‘जागर’ या संस्थेची स्थापना वासुदेव पाळंदे यांच्यासह माधव वझे, श्याम भुतकर, गजानन परांजपे, सुधीर भडकमकर आणि आनंद घाणेकर या रंगकर्मीनी केली होती. संस्थेचे सध्या अविरत ४८ वे वर्ष सुरू आहे. ‘आईना’ हा दीर्घांक एका जपानी लोककथेवर आधारित आहे. जंगलात साधे, स्वयंपूर्ण जीवन जगणाऱ्या एका चौकोनी कुटुंबाच्या आयुष्यात अचानक आलेला एक साधा आरसा त्यांच्या भावविश्वात कुतूहल, भीती, आनंद आणि गंमत निर्माण करतो. स्वतःचे प्रतिबिंब पहिल्यांदाच अनुभवताना उलगडणारी ही कथा निरागसता, विनोद आणि भावनिक खोली यांचा सुंदर मिलाफ घडवते. मूळ जपानी लोकथेवरील हे नाटक चिओमी हारा ह्यांनी लिहिले आहे. या नाटकाचे हिंदी भाषांतर अशोक चतुर्वेदी ह्यांनी केल...
" राजा शिवाजी " चित्रपटाच्या नावात " छत्रपती " उल्लेख असावा
- Get link
- X
- Other Apps
मुंबई / रमेश औताडे "राजा शिवाजी" हा चित्रपट १ मे २०२६ रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या शीर्षकाबाबत श्री छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनने आक्षेप घेतला आहे. चित्रपटाच्या नावातून "छत्रपती" हा मानाचा किताब वगळणे अजिबात मान्य नाही. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा, प्रतिष्ठेचा व वारशाचा अवमान होत आहे असे फाउंडेशनचे अध्यक्ष सी. एस. चव्हाण यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. चित्रपटाचे निर्माते रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख आहेत. त्यांना आम्ही लेखी पत्र दिले आहे. चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांचे सन्मानपूर्वक व ऐतिहासिकदृष्ट्या अचूक चित्रण करण्यात यावे, जर निर्माते व संबंधित प्राधिकरणांनी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी. आम्ही कायदेशीर पावले उचलण्याची आम्ही तयारी केली आहे. आवश्यक असल्यास देशभरात आंदोलन व निषेध करण्यात येईल असा इशारा दिला. या चित्रपटाचे निर्माते म्हणून रितेश व जेनेलिया देशमुख यांनी जबाबदारीने वागून हा विषय तात्काळ मार्गी लावावा असे चव्हाण यांनी सांगितले.
घणसोलीत मोबाईल टॉवरवरून वाद; रहिवाशांचा आक्रमक पवित्रा
- Get link
- X
- Other Apps
नवी मुंबई / रमेश औताडे घनसोली सेक्टर १० परिसरातील मेघ मल्हार सिडको सोसायटीजवळ उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवरवरून रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित टॉवर मनमानी पद्धतीने व चुकीच्या ठिकाणी बसवण्यात आल्याचा आरोप करत रहिवाशांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, एअरटेल कंपनीकडून हा टॉवर उभारण्यात आला असून यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य घेतले गेले आहे. “नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी एअरटेल कंपनीचे काम करत आहेत का?” असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच, हा टॉवर रहिवासी भागाच्या अत्यंत जवळ उभारण्यात आल्याने भविष्यात आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. चुकीचे सर्वेक्षण करून हा टॉवर बसवण्यात आल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रकरणात तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. “लवकरात लवकर हा टॉवर हटवण्यात आला नाही, तर कायदेशीर मार्गाने पुढील पावले उचलू,” असा इशाराही रहिवाशांनी दिला आहे. दरम्या...
जोगेश्वरीत भव्य भीम जयंती महोत्सव उत्साहात
- Get link
- X
- Other Apps
मुंबई / रमेश औताडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत त्रिपुरा फाउंडेशनच्या वतीने आयोजित १३५ वी भीम जयंती महोत्सव जोगेश्वरी येथे मोठ्या उत्साहात पार पडली. माजी मंत्री व ज्येष्ठ नेते जयंतरावजी पाटील, जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अजितदादा रावराणे, माजी नगरसेविका रूपालीताई रावराणे, त्रिपुरा फाउंडेशनच्या अध्यक्षा करिश्माताई सुरती, तसेच विकासक राजेश सुरती आदी मान्यवर उपस्थित होते. शिवनाथ खलसे, भगवान ढालवाले, प्रशांत नेब, उल्हास कसबे, सचिन म्हात्रे, सुरेखा लोंढे, स्वप्नील पाटील, रोहित कांबळे, सुरज मिश्रा, राजेश सकट, विजय कसबे, निलेश लोंढे, रोहित लोंढे, दिनेश राखपसरे आदी उपस्थित होते. या जयंतीचे आयोजन व संकल्पना सचिनभाऊ लोंढे जिल्हा अध्यक्ष युवक आणि निलेश लोंढे वॉर्ड अध्यक्ष युवक यांनी केले. “माता रमाई जीवन संग्राम पुरस्कार २०२६” प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार अमरजी कसबे, सुरेशजी सकट, राजू बोरसे, माणिकराव कसबे, उत्तम सकट, गणेश लोंढे, रमेश कसबे, दीपक लोंढे, किसन कसबे, शाम खनपटे, रामू सकट आदींना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.