Posts

उपवर्गीकरणाच्या मुद्यावर समाजसेविका सुनीता मोहन तूपसौंदर्य यांची मागणी

Image
आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तातडीने अंमलबजावणी करा  राजकारण नको, न्याय हवा –  पी आर न्यूज मिडिया नेटवर्क/ रमेश औताडे  अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रात तातडीने लागू करावे, अशी मागणी समाजसेविका सुनीता मोहन तूपसौंदर्य यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की, आरक्षणाच्या प्रश्नासाठी दिवंगत नेते बाबासाहेब गोपले यांनी आझाद मैदानावर उपोषण करून मातंग समाजाला स्वतंत्र आठ टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणी केली होती. मात्र, त्यावेळी सरकारने या प्रश्नावर योग्य न्याय दिला नाही. आता मातंग समाजाला आरक्षणाचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवू लागले असून, आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी समाज एकवटला आहे. सुनीता तूपसौंदर्य यांनी आरोप केला की, काही राजकारणी आणि राज्यकर्ते आरक्षणाच्या प्रश्नाचे राजकारण करून दलित समाजात जातीभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे समाजातील विविध घटकांनी परस्परांमध्ये मतभेद न करता, उपवर्गीकरणाची अंमलबजावणी लवकरात लवकर कशी होईल यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. त्या पुढे म्हणाल्या की, सर...

पर्यावरण रक्षक समिती चे अध्यक्ष किसान कदम यांचे आवाहन

Image
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  विशेष प्रतिनिधी  अध्यक्ष किसन कदम यांची माहिती ....... पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांना शुद्ध हवा, पाणी तसेच समृद्ध नैसर्गिक वारसा देण्यासाठी पर्यावरण रक्षक समितीतर्फे राज्यभर व्यापक वृक्षारोपण अभियान राबविण्यात येत आहे. समितीचे अध्यक्ष किसन कदम यांनी नागरिकांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. "एक वडाचे झाड लावा आणि ५०० वर्षांचे पुण्य कमवा" हा संदेश केवळ घोषवाक्य नसून भविष्यातील पर्यावरण संरक्षणाचा ठोस संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या वाढत्या काँक्रीटीकरणामुळे निसर्गाचे अस्तित्व धोक्यात आले असून प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वडाचे झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे मोकळी जागा नाही त्यांनी वडाची काडी प्लास्टिकच्या कुंडीत किंवा पिशवीत लावून ती ४ ते ५ फूट उंच होईपर्यंत जपावी. त्यानंतर मंदिर परिसर, गावातील मोकळी जागा किंवा वनक्षेत्रात सुरक्षितपणे तिची लागवड करावी. अशा प्रकारे लावलेले झाड पुढील अनेक शतकांपर्यंत पर्यावरणाचे संरक्षण करू शकते. लग्न, वाढदिवस, स्मृतिदिन ...

तुतारीच्या सुरातून सामाजिक ऐक्याचा संदेश

Image
मुंबई / रमेश औताडे  साहित्यभूषण लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा, मुंबई प्रदेश आणि आंबेडकरी विचार मंच यांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी काढण्यात आलेल्या अभिवादन रॅलीत कार्यकर्त्यांनी तुतारी वाजवत सामाजिक ऐक्याचा आणि परिवर्तनाचा संदेश दिला. "तुतारी आम्हीही वाजवली;  मात्र तिच्या प्रत्येक सुरात लहुजी वस्ताद साळवे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यभूषण अण्णा भाऊ साठे यांचे समतेचे, स्वाभिमानाचे आणि सामाजिक न्यायाचे विचार घुमले पाहिजेत," असे आंबेडकर विचार मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे म्हणाले. रॅलीदरम्यान बौद्ध, मातंग, चर्मकार, वाल्मिकी आणि आदिवासी समाजाच्या ऐक्यासाठी शपथ घेण्यात आली. विविध समाजघटकांनी एकत्र येत संविधानिक मूल्यांचे जतन, सामाजिक सलोखा आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. हातात बॅनर, पिवळे झेंडे आणि तुतारीच्या निनादात निघालेल्या या रॅलीने अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन करत सामाजिक ऐक्य आणि परिवर्तनाचा प्रभावी संदेश दिला.
Image

ज्येष्ठांच्या 11 प्रलंबित मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा करणार - आमदार मंदाताई म्हात्रे

Image
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  रमेश औताडे ( प्रतिनिधी )  बेलापूरच्या आमदार माननीय सौ. मंदाताई म्हात्रे यांना आज फेस्कॉम मुंबई विभाग आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीत ज्येष्ठ नागरिकांच्या 11 प्रलंबित मागण्यांचे निवेदन त्यांना सादर करण्यात आले. फेस्कॉम मुंबई विभागाचे अध्यक्ष श्री. सुरेश पोटे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. विकास साठे आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव श्री. अजय माढेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आमदारांची भेट घेतली. यावेळी श्री. सुरेश पोटे यांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या कामाचे कौतुक करून त्यांचा सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. निवेदन स्वीकारताना आमदार मंदाताई म्हात्रे यांनी ज्येष्ठांच्या सर्व मागण्या गांभीर्याने ऐकल्या. ज्येष्ठ हे समाजाचा आधार आहेत असे सांगून, फेस्कॉमच्या 11 मागण्या मुख्यमंत्री यांच्या स्तरावर मांडून त्या लवकर मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी दिले. आमदारांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधान व्यक्त क...

मातंग महिला हत्या प्रकरणी सखोल तपासणीची मागणी

Image
मुंबई / रमेश औताडे  सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे मातंग समाजातील महिलेची गोळ्या झाडून हत्या झाल्याच्या घटनेबाबत सखोल आणि निष्पक्ष तपास करण्यात यावा, अशी मागणी समाजसेविका सुनीता तुपसौंदर्य यांनी केली आहे. या घटनेचा त्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत, दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे म्हटले आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून अशा घटना समाजासाठी चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. हत्येमागील खरा सूत्रधार आणि कारणांचा सखोल तपास करून कोणालाही पाठीशी न घालता निष्पक्ष चौकशी करावी, तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही सुनीता तुपसौंदर्य यांनी केली आहे. शासन आणि पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  7021777291

अधिकृत पत्रकार नोंदणीचे धोरण लवकरच? बोगस पत्रकारितेला बसणार आळा

Image
मुंबई / रमेश औताडे  राज्यात पत्रकारितेची विश्वासार्हता जपण्यासाठी आणि बोगस पत्रकारांच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी अधिकृत पत्रकारांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र, पारदर्शक आणि मानक कार्यपद्धती तयार करण्याची मागणी जोर धरत आहे. पत्रकार म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींची शैक्षणिक पात्रता, पत्रकारितेचा अनुभव, संबंधित माध्यम संस्थेचे अधिकृत नियुक्तीपत्र, नियमित कार्याचा पुरावा आणि आचारसंहितेचे पालन यांसारख्या निकषांच्या आधारे नोंदणी प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तज्ज्ञ पत्रकार, संपादक, वृत्तपत्र प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमांचे प्रतिनिधी तसेच पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली स्वतंत्र समिती स्थापन करून पत्रकार नोंदणीची स्पष्ट कार्यपद्धती निश्चित करावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. या प्रक्रियेमुळे खऱ्या अर्थाने पत्रकारिता करणाऱ्या अधिकृत पत्रकारांना संस्थात्मक संरक्षण, विश्वासार्ह ओळख आणि सन्मान मिळण्यास मदत होईल. त्याचबरोबर पत्रकारितेच्या नावाखाली होणारे गैरप्रकार, खंडणी, दिशाभूल आणि बोगस ओळखपत्रांचा गैरवापर कमी होण्यास ...