Posts

" प्रतिबिंबित करा, प्रतिध्वनित व्हा, आनंदित व्हा " या थीमवर यंदाचा कशीश प्राईड फिल्म फेस्टिव्हल

Image
" प्रतिबिंबित करा, प्रतिध्वनित व्हा, आनंदित व्हा " या थीमवर  यंदाचा कशीश प्राईड फिल्म फेस्टिव्हल मुंबई / रमेश औताडे  मुंबईत ३ ते ७ जून २०२६ दरम्यान होणाऱ्या १७ व्या कशीश प्राईड फिल्म फेस्टिव्हलची अधिकृत घोषणा करण्यात आली असून यंदा  " प्रतिबिंबित करा, प्रतिध्वनित व्हा, आनंदित व्हा "  ही थीम जाहीर करण्यात आली आहे. लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्विअर आणि इतर लैंगिक ओळख असलेल्या समुदायाच्या भावना, संघर्ष, ओळख आणि सामाजिक वास्तव अधोरेखित करणाऱ्या चित्रपटांचा या महोत्सवात समावेश करण्यात आला आहे.  मुंबईतील लिबर्टी सिनेमा, अलायन्स फ्राँसेज द बॉम्बे आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे हा महोत्सव रंगणार असून यंदा ४३ देशांतील तब्बल १५३ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांमध्ये फीचर फिल्म्स, माहितीपट, लघुपट आणि विविध सामाजिक विषयांवर आधारित कलाकृतींचा समावेश आहे.  फेस्टिव्हलमध्ये भारतासह नेदरलँड्स, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, इराण, लेबनॉन, नामिबिया, निकाराग्वा, ट्युनिशिया आणि इतर अनेक देशांतील एल जी बी टी क्यू प्लस विषयांवरील चित्रपट प्रेक्षका...

इंडियन ऑईलकडून इंधनाचा पुरवठा सुरळीत

Image
मुंबई / रमेश औताडे  जगभरातील सप्लाय चेनमधील अडचणींनंतर महाराष्ट्रात मे २०२६ मध्ये इंधनाची मोठ्या प्रमाणात अधिक मागणी होऊनही इंडियन ऑईलने इंधन पुरवठा सुरळीत राखला आहे. इंडियन ऑईलने महाराष्ट्रातील सर्व आऊटलेटवर नियोजनबद्ध कार्यप्रणाली आणि प्रभावी लॉजिस्टिकचा समन्वय राखत प्रत्येक ग्राहकाला दररोज पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा सुरळीत व अखंड पुरवठा सुनिश्चित केला आहे. ग्राहकांना दररोज २४ तास इंधनाचा पुरवठा करण्यासाठी इंडियन ऑईलने विशेष कार्यप्रणाली विकसित केली असल्यामुळे मागणीत वाढ होऊनही त्याचा पुरवठ्यावर परिणाम झालेला नाही. मे २०२६ मध्ये महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किरकोळ विक्रीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत २२ टक्के वाढ झाली असून, डिझेलच्या किरकोळ विक्रीत ३३ टक्क्यांची भक्कम वाढ नोंदविण्यात आली आहे. या वाढीमागे इतर पुरवठादारांच्या तुलनेत किंमतीतील फरकामुळे संस्थात्मक आणि व्यावसायिक ग्राहकांचा इंडियनऑईलच्या रिटेल आऊटलेट्सकडे वाढता कल तसेच हंगामी शेतीसंबंधित उपक्रमांमुळे निर्माण झालेली वाढती मागणी हे प्रमुख घटक आहेत. असे असले तरी मागणीत वाढ होऊनही इंधन पुरवठ्यात कोणता...

नवी मुंबई महानगरपालिकेकडून जनतेच्या जीवाशी खेळ

Image
      कंत्राटदारांच्या भल्यासाठीच मोबाईल टॉवर उभारणीचा घाट? मुंबई / रमेश औताडे  नवी मुंबई महानगरपालिकेकडून शहरात मोठ्या प्रमाणावर मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू असून, स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असतानाही प्रशासन मात्र कंत्राटदारांच्या हितासाठीच काम करत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. रहिवासी भाग, शाळा, रुग्णालये आणि गर्दीच्या परिसरात मोबाईल टॉवर उभारले जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र जनतेच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करत पालिका अधिकाऱ्यांनी “डोळेझाक” केल्याचा आरोप होत आहे. पालिकेच्या लोकेशन कराराप्रमाणे संबंधित मोबाईल टॉवर हा सेक्टर ११ टी-जंक्शन परिसरात उभारणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात हा टॉवर सेक्टर १० मधील संत निरंकारी चौक परिसरातील मेघमल्हार सोसायटीजवळ उभारण्यात आला. या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आयुक्त कैलास शिंदे यांना व संबंधित अधिकाऱ्यांना रितसर पत्रव्यवहार करण्यात आला असून अद्याप कार्यवाही नाही. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, अनेक ठिकाणी मोबा...

प्रार्थनास्थळांवरील हल्ल्यांविरोधात ५ जूनला आझाद मैदानात विराट आंदोलन

Image
मुंबई  / रमेश औताडे  राज्यातील विविध भागांमध्ये ख्रिस्ती समाजाच्या प्रार्थनास्थळांवर वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आणि संबंधितांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी ‘रॅपिड अॅक्शन टीम’च्या वतीने येत्या ५ जून रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे विराट आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनात राज्यभरातील ख्रिस्ती बांधवांसह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख महेंद्र उर्फ बबन कोळवे यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कोळवे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. “राज्यात काही विशिष्ट प्रवृत्तींकडून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून, ख्रिस्ती समाजाच्या प्रार्थनास्थळांना लक्ष्य केले जात आहे. मात्र अशा घटनांमध्ये सहभागी असलेल्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई होत नसल्याने त्यांचे मनोबल वाढत आहे,” असा आरोप त्यांनी केला. गेल्या तीन महिन्यांत मुंबईसह राज्यातील अनेक भागांत प्रार्थनास्थळांवर धाड टाकणे, तोडफोड करणे, श्रद्धाळूंना धमकावणे अशा घटना घडल्याचा दावा यावेळी करण्यात आला. काही संघटनांकडून प्रार्थनास्थळांम...

खाजगी ठेकेदारांसाठी कामगार मंत्री आहेत का ?

Image
मुंबई / रमेश औताडे  रायगड जिल्ह्यातील स्थानिक तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावर राज्य सरकार आणि विशेषतः कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर गंभीर नसल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे. उद्योगांच्या नावाखाली रायगडमधील जमीन, संसाधने आणि पर्यावरण वापरले जात असताना स्थानिक युवकांना मात्र रोजगारापासून दूर ठेवले जात असल्याने संतापाची लाट निर्माण झाली आहे. रायगडमध्ये मोठमोठे उद्योग उभे राहिले, कंपन्यांना कोट्यवधींच्या सवलती देण्यात आल्या, मात्र रोजगाराच्या बाबतीत स्थानिक तरुणांना फक्त आश्वासनांचे गाजर दाखवण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे रायगड जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांच्या नोकऱ्यांमध्येही मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील तब्बल २५० हून अधिक बाहेरील लोक कार्यरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे “रायगडच्या मुलांना रोजगार नाकारून बाहेरच्यांना संधी का?” असा सवाल आता उपस्थित होत आहे. रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या प्रतीक्षा यादीवर तब्बल २ हजार ५३२ स्थानिक तरुण रोजगाराच्या प्रतीक्षेत असताना सरकार आणि कामगार खात्याची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक तरुणांना रोजगार देण्याऐ...

अशोक टाव्हरेंच्या प्रेरणादायी कामाचे नेहमीच कौतुक राहील - नितीन गडकरी

Image
मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  गेली अनेक वर्षे साहित्य, समाजकार्य आणि पक्षनिष्ठेच्या माध्यमातून अशोकराव टाव्हरे करीत असलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे अस केंद्रीय रस्तेविकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. नितीन गडकरी यांच्या सार्वजनिक कार्यावर आधारित विकासाचा राजमार्ग व हायवे ऑफ डेव्हलपमेंट या पुस्तकांचे लेखन टाव्हरे यांनी केले असून गेली सात वर्षामध्ये शासकीय कार्यालये, ग्रंथालये, शाळा,पदाधिकारी, अधिकारी यांना पुस्तकांचे वितरण केले आहे.गडकरी यांचा २७ मे रोजी वाढदिवस असून त्यानिमित्त टाव्हरे मोफत पुस्तके  वाटपाचा उपक्रम राबवित आहेत,त्याबद्दल गडकरी यांनी टाव्हरे यांना लेखी पत्र पाठवून सदर उपक्रम निश्चितच महत्वपुर्ण ठरेल असा विश्वास असल्याचे नमुद आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री,भाजपचे राज्याचे अध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष, विधानपरिषद सदस्य,विधानपरिषद विरोधी पक्षनेते ते केंद्रीय मंत्री हा प्रवास अशोकराव टाव्हरे यांनी पुस्तकांतून उलगडला आहे.मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये पुस्तके असून गडकरींसारख्य...

सुवर्णकार समाजाच्या प्रश्नांवर शासनाने ठोस भूमिका घ्यावी – संयुक्त ज्ञातीबंधव सुवर्णकार समाजाची मागणी

Image
मुंबई / रमेश औताडे  पिढीजात सुवर्णकार समाजाच्या उद्योग, रोजगार आणि सामाजिक सुरक्षेशी संबंधित विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी संयुक्त ज्ञातीबंधव सुवर्णकार समाजाच्या वतीने करण्यात आली. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत समाजाच्या समस्या आणि भविष्यातील रचनात्मक वाटचालीबाबत भूमिका मांडण्यात आली. यावेळी अध्यक्ष सुधीर गंगाराम सागवेकर यांनी सांगितले की, १९५५ ते २०२६ या कालावधीत सुवर्णकार समाजाने अनेक आर्थिक आणि सामाजिक संकटांचा सामना केला आहे. बदलत्या परिस्थितीत पारंपरिक व्यवसाय टिकवण्यासाठी शासनाकडून विशेष सहाय्याची गरज आहे. पत्रकार परिषदेत उद्योगवाढीसाठी सुलभ कर्जपुरवठा, PM विश्वकर्मा योजना आणि संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुवर्णकार कारागिरांना अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच असंघटित क्षेत्रातील सुवर्णकार कारागिरांना EPF, ESIC आणि पेन्शन योजनांचा लाभ मिळावा, यासाठी सामाजिक सुरक्षा कवच देण्याची मागणी करण्यात आली. असंघटित सुवर्णकार कारागीर व वेल्डर्ससाठी विशेष विमा ...