Posts

'स्नेह पूकलम' (ओणमची फुलांची रांगोळी) कालबाह्य

Image
रेल्वेने परवानगी नाकारली यंदा सीएसटी (CST) वर 'स्नेह पूकलम' (ओणमची फुलांची रांगोळी) होणार नाही मुंबई / रमेश औताडे  दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) च्या गजबजलेल्या आवारात यंदा ओणमच्या फुलांचा सुगंध दरवळणार नाही. २०१५ पासून मुंबईतील ओणमच्या उत्सवाला आपल्या रंगीबेरंगी रूपाने बहर आणणाऱ्या या भव्य 'महा पूकलम'ला (फुलांची रांगोळी) रेल्वे प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव यंदा परवानगी नाकारली आहे. लाखो लोकांच्या पसंतीस उतरलेली आणि 'स्नेह पूकलम' (प्रेमाची फुलांची रांगोळी) म्हणून ओळखली जाणारी ही उत्सवकालीन कलाकृती यंदा केवळ आठवण म्हणून उरेल. ओणमची ही फुलांची रांगोळी केवळ मल्याळी समाजाचा सण साजरा करण्यापुरती मर्यादित नव्हती. २००८ मधील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात सीएसटी येथे प्राण गमावलेल्यांना ती फुलांच्या माध्यमातून वाहिलेली श्रद्धांजली होती, तसेच शांततेचा एक प्रभावी संदेशही होता. धर्म आणि भाषेच्या भिंती ओलांडून लोकांना एकत्र आणल्यामुळेच तिने 'स्नेह पूकलम' म्हणून मुंबईच्या सांस्कृतिक जी...

आरोग्य विभागातील अन्यायाविरोधात आझाद मैदानात आंदोलन

Image
मुंबई / रमेश औताडे  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत १६७५ कर्मचारी डी.एस इन्टरप्रायजेस या कंपनी मार्फत गेली दहा वर्षे झाले, डॉक्टर, नर्स, फार्मसी , लॅब टेक्निशियन, डेटा एन्ट्री ऑपरेटर, अटेडन्ट ह्या पदावर  कर्मचारी हे आरोग्य विभागात आपली सेवा बजावीत आहेत. मात्र त्यांच्या प्रलंबित मागण्या अद्याप सुटल्या नसल्याने त्यांनी आझाद मैदानात आंदोलन केले. दीपक चव्हाण, प्रतीक्षा भागवत, प्रवीण चव्हाण, गिरीश सुर्वे, रेश्मा कोचले, परेश मटकर, प्रणाली जठार, माया केदार, हिरामण बनगारे इतर महिला पुरुष यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की,  वार्षिक वेतनवाढ मिळावी, भरपगारी प्रसुती रजा मिळावी, सानुग्रह अनुदान (दिवाळी बोनस) मिळावा, कर्मचाऱ्यांना पी एफ मिळावा, कर्मचाऱ्यांना ई एस आय सी  मिळावा, वार्षिक सुट्टया मिळाव्यात, ठेकेदारी पद्धत रद्द करुन शासकीय सेवेत समावेश करणे, स्पर्श प्रणाली च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना पगार देण्यात यावा, बाह्य स्त्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हितार्थ एक नवीन विधेयक सभागृहात मांडण्यात याव...

शिक्षा बचाओ संगठन चे आझाद मैदानात आंदोलन

Image
मुंबई / रमेश औताडे  शिक्षण विभागातील कथित गैरप्रकारांची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ‘शिक्षा बचाओ संघटने’चे अध्यक्ष डी. आर. सिंह यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आदर्श भूतपूर्व सैनिक हिंदी हायस्कूलच्या मुख्याध्यापक मान्यता प्रकरणासह संस्था हस्तांतरण, बोगस जावक क्रमांक, शिक्षकांचे प्रलंबित वेतन, TET गैरप्रकार आणि २० टक्के अनुदानाच्या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा परिषद व नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचे विशेष प्रशासकीय ऑडिट करावे तसेच सर्व प्रकरणांत जबाबदारी निश्चित करून ३० दिवसांत लेखी अहवाल द्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. आझाद मैदानावर आंदोलन करून आम्हाला आनंद होत नाही उलट आमचा वेळ जातो. सरकारने कोणत्याही घटकाला आंदोलन करण्यात भाग पाडू नये. ज्या राज्यांमध्ये ज्या देशांमध्ये आंदोलन होत असे तर ते सरकारचे अपयश आहे. त्यामुळे आमच्या मागण्यांचा गंभीरपणे विचार करावा असे डी आर सिंह म्हणाले.

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा धगधगती मुंबई तर्फे सन्मान

Image
 शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा धगधगती मुंबई तर्फे सन्मान मुंबई / रमेश औताडे  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घोगाव येथील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादन करून राज्य पातळीवर आपल्या गावाचे आणि शाळेचे नाव उंचावल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. ‘धगधगती मुंबई’ वृत्तपत्र परिवार आणि संत रोहिदास मित्र मंडळ, घोगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचविण्यासाठी विशेष मार्गदर्शन करणाऱ्या सौ. सविता सचिन राजमाने मॅडम यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. माजी प्राचार्य वसंत धुळपसर आणि ‘धगधगती मुंबई’चे संपादक भीमराव धुळप यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अनंत भंडारे, शिक्षक बाजीराव शेटे, दत्तात्रय कुंभार, राहुल पावले, तसेच घोगावचे प्रतिष्ठित नागरिक शंकर पाटील आबा, उपसरपंच निवास शेवाळे, बाजीराव तांबेकर, पोलीस पाटील शिवाजी भावके, जगताप सर, संत रोहिदास मित्र मंडळाचे अध्यक्ष सुभाष गोविंद धुळप, विकास साळुंखे, नारायण साळुंखे, ग...

अचूक विम्यासाठी आता एआय चा वापर

Image
मुंबई / रमेश औताडे  इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्सने व्यवसायातील विविध प्रक्रियांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ए आय वापर वाढविण्यासाठी सेल्सफोर्सच्या एजंटफोर्सची निवड केली आहे. या तंत्रज्ञानामुळे विक्री प्रक्रिया अधिक वेगवान, कामकाज सुलभ आणि ग्राहकांना अधिक चांगली सेवा मिळण्यास मदत होणार आहे. एजंटफोर्सच्या माध्यमातून ग्राहकांशी संवाद, विमा प्रस्तावांचे मूल्यांकन, ग्राहक सेवा आणि क्लेम प्रक्रियेत एआयचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या गरजांवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल. इंडियाफर्स्ट लाइफचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ रुशभ गांधी यांनी सांगितले की, डिजिटल परिवर्तनामुळे विक्री प्रक्रियेत सुधारणा झाली असून ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला झाला आहे. सेल्सफोर्स साऊथ एशियाचे अध्यक्ष व सीईओ अंशुमती भट्टाचार्य यांनीही एआयच्या मदतीने विमा व्यवसाय अधिक सक्षम आणि प्रभावी होण्याचा विश्वास व्यक्त केला.

दिव्यांग शाळांच्या अनुदानासाठी डॉ. जितेंद्र ओव्हाळ आक्रमक

Image
मुंबई / रमेश औताडे  ( मंत्रालय प्रतिनिधी )  दिव्यांग शाळांना अनुदान देण्यासाठी शासनाने धोरण जाहीर करून पात्र शाळांकडून प्रस्ताव स्वीकारले. मात्र आता अनुदानास पात्र असलेल्या शाळांची संपूर्ण यादी जाहीर न करता एक-एक प्रस्ताव मंत्र्यांच्या सहीसाठी पाठविण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे संस्थापक डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी दिली असून, वेळप्रसंगी छत्रपती संभाजी नगर येथे मंत्री अतुल सावे यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशाराही दिला आहे. शासनाने अनुदानाचे धोरण जाहीर केले असेल, तर त्या धोरणानुसार पात्र ठरलेल्या सर्व दिव्यांग शाळांची अंतिम यादी पारदर्शकपणे जाहीर करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत कोणाला अधिकार देण्यात आला आहे ? कोणत्या नियमाच्या आधारे प्रस्ताव निवडक पद्धतीने मंत्र्यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविले जात आहेत, याचा खुलासा दिव्यांग  कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केला नाही. अनुदान हा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि संस्थांच्या हक्काचा विषय आहे तो कोणाच्या कृपेवर किंवा निवडक प्रस्तावांच्या प्रक्रियेवर अवलंबून र...

खाजगी हितसंबंधात स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर

Image
            तीव्र आंदोलनाचा बाळासाहेब मिरजे यांचा इशारा मुंबई / रमेश औताडे  नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नेरूळ सेक्टर १४ येथील विकास आराखड्यात स्मशानभूमीसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर अद्यापही पालिकेकडून कोणताही अधिकृत माहिती फलक न लावल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले यांच्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब मिरजे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या मोकळ्या भूखंडासमोर रिजसी नावाचा मोठा  टॉवर आहे. या टॉवरमधील घरांची विक्री सुरळीत व्हावी आणि ग्राहकांचा विरोध होऊ नये, यासाठीच प्रशासन जाणूनबुजून स्मशानभूमीचा अधिकृत बोर्ड लावण्यास व बांधकामास टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाच्या या भूमिकेमुळे परिसरातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी इतरत्र पायपीट करावी लागत आहे. स्मशानभूमीचे आरक्षण स्पष्ट असतानाही पालिकेकडून होत असलेल्या या दिरंगाईविरोधात आरपीआयच्या वतीने महापालिका आयुक्त व संबंधित विभाग अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करून १५ दिवसांचा अंतिम इशारा देण्यात आला आहे. विकास आराखड्यानुसार ...