Posts

महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस मा. खाजाभाई शेख यांच्या हस्ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष मा. रामदास आठवले साहेबांचा सत्कार

Image
मुंबई – संविधान बंगला पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  आज ३१ जुलै २०२६ रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रामदास आठवले साहेब यांची मुंबई येथील संविधान बंगला येथे अल्पसंख्याक आघाडी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने पुष्पहार अर्पण करून सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. हा सत्कार अल्पसंख्याक आघाडी, महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस मा. खाजाभाई शेख यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर राज्यातील अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न, सामाजिक न्याय, संघटन मजबुती, पक्षविस्तार तसेच जनहिताशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी हाजी वकार खान, मौलाना रशीद अन्सारी, इरफान शेख, कलाम भाई, असलम शेख, मुबीन अलालखान तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. समाजातील सर्व घटकांच्या न्याय, समानता आणि सर्वांगीण विकासासाठी संविधानाच्या मूल्यांनुसार कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. जय भीम! जय संविधान! जय रिपाइं (आठवले)!

आरटीआय कार्यकर्ते मनोरंजन राय आणि भारत अनमोल पार्टीचे शिवप्रकाश तिवारी यांची मागणी

Image
मुंबई / रमेश औताडे  नोटाबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात रक्कम कोणत्या खात्यांमध्ये जमा झाली, किती नवीन बँक खाती उघडण्यात आली, संशयास्पद व्यवहारांवर काय कारवाई झाली आणि जुन्या नोटांची नेमकी कशी विल्हेवाट लावण्यात आली, याची सविस्तर माहिती केंद्र सरकारने जाहीर करावी, अशी मागणी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत आरटीआय कार्यकर्ते मनोरंजन राय आणि भारत अनमोल पार्टीचे शिवप्रकाश तिवारी यांनी केली.  या मागणीसाठी १५ ऑगस्टनंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. नोटाबंदीनंतर अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत अवघ्या पाच दिवसांत जुन्या ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटांद्वारे सुमारे ७४५.५८ कोटी रुपये जमा झाल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली होती. या व्यवहारांची अंतिम चौकशी, निष्कर्ष आणि त्यानंतर झालेल्या कारवाईचा तपशील सार्वजनिक करण्याची मागणीही करण्यात आली आहे. २०१६ ते २०२६ या कालावधीतील नोटांची वर्षनिहाय व मूल्यवर्गनिहाय छपाई, वितरण, परतावा आणि नष्ट केलेल्या नोटांचा संपूर्ण हिशेब भारतीय रिझर्व्ह बँक  आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ज...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त लेखन प्रेरणा दिन

Image
               नरसिंग सोपान सूर्यवंशी  यांची माहिती मुंबई / P R NEWS  भारतीय लहुजी सेना यांच्या वतीने लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट रोजी "लेखन प्रेरणा दिन" विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने डॉ. साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि लोकजागृतीच्या कार्याला अभिवादन करण्यात येणार असून, त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. कार्यक्रमात साहित्य, सामाजिक कार्य आणि परिवर्तनवादी विचारांशी संबंधित मान्यवरांची उपस्थिती राहणार असून, डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. भारतीय लहुजी सेनेचे मुंबई विभागीय प्रमुख नरसिंग सोपान सूर्यवंशी यांनी कार्यकर्ते, साहित्यप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लेखन प्रेरणा दिन यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे.  विविध पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवरांनीही डॉ. अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन केले आहे. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी आंदोलनाचा इशारा

Image
मुंबई / रमेश औताडे  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने नवी मुंबई महानगरपालिकेकडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा नवी मुंबईत उभारण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. याबाबत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी १५ दिवसांत ठोस निर्णय न घेतल्यास पालिका मुख्यालयासमोर पदयात्रा व मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब मिरजे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वीही अनेक वेळा या विषयावर पत्रव्यवहार करण्यात आला असून  अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. असे चंदू पाटील,  दत्तात्रय निंबाळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. नवी मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा नसल्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे महानगरपालिकेने तातडीने योग्य जागा निश्चित करून पुतळा उभारणीची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

विठुरंग.......

Image
मुंबई / P R NEWS  *२६ जुलै २०२६ रोजी आषाढी एकादशी* निमित्त *प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन आणि नृतनाट्य प्रोडक्शन्स* आयोजित *“विठुरंग”* अत्यंत दिव्य, भक्तिरसपूर्ण आणि आध्यात्मिक कार्यक्रम अटळ स्मृती उद्यान, बोरिवली येथे मोठ्या दिमाखात पार पडला.  *प्रज्ञावर्धिनी फाउंडेशनचे सर्व विश्वस्त एड. रुपाली ठाकूर, सौ वैशाली भिडे बर्वे, श्री महादेव गोविंद रानडे आणि नृतनाट्य प्रोडक्शन्सच्या संचालिका वैष्णवी बर्वे*, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि या कार्यक्रमास सहकार्य करणारे सर्व *प्रायोजक (गिरगाव कट्टा, एलिट्स कॅपिटल, लोकमान्य मल्टीपर्पज कॉ-ऑप सोसायटी, ग्रंथ तुमच्या दारी, पीएमसी, सौ रिद्धी खुरसंगे, सौ सोनाली पाटील)* यांनी अत्यंत निस्वार्थ, प्रामाणिक आणि समर्पित भावनेने सहकार्य केले.  कार्यक्रमात गायन करणारे सौ. वैशाली भिडे बर्वे, कु. सिद्धांत पाटकर आणि कु. स्वरा डबीर या कलाकारांनी आपल्या अप्रतिम गायनाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमातील प्रत्येक भक्तिगीत हे मनाला स्पर्शून जाणारे होते. प्रत्येक गायक-गायिकेने केवळ संगीत सादर केले नाही, तर आपल्या भक्तिभावातून श्री प...

रीगल इयर साठी रोटेरियन नर्गिस गौर यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती

Image
मुंबई / रमेश औताडे  रोटरी क्लब ऑफ मुंबई साउथ कफ परेड या विभागात  २०२६-२७ या रीगल इयर साठी रोटेरियन नर्गिस गौर यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती (इन्स्टॉलेशन) मोठ्या अभिमानाने बहाई सेंटर, न्यू मरीन लाइन्स, मुंबई येथे साजरी केली. हा कार्यक्रम डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन राजन दुआ, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर्स, जिल्ह्यातील मान्यवर, रोटरी नेते, प्रतिष्ठित पाहुणे, कुटुंबीय, मित्रपरिवार आणि क्लबच्या सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला.  ८० हून अधिक पाहुण्यांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा म्हणजे स्नेहभाव, मैत्री आणि सेवाभावाचा एक उत्साही उत्सव होता. या संध्याकाळचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ११ नवीन सदस्यांचा क्लबमध्ये झालेला समावेश; यामुळे 'स्वतःपेक्षा सेवा' (Service Above Self) या क्लबच्या ब्रीदवाक्याप्रती असलेली कटिबद्धता अधिक दृढ झाली. आपल्या अध्यक्षीय भाषणात रोटेरियन नर्गिस गौर यांनी "दीर्घकालीन प्रभाव निर्माण करणे" (Creating a Lasting Impact) या आपल्या ध्येयाचा पुनरुच्चार केला. त्यांनी सांगितले की, शिक्षण, आरोग्यसेवा, नेत्रसेवा, समाजकल्याण...

सार्वजनिक मोकळ्या जागा जतन करण्याची वेळ

Image
मुंबई / रमेश औताडे  मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात सार्वजनिक मोकळ्या जागा या नागरिकांच्या आरोग्य, पर्यावरण, सामाजिक संवाद आणि जीवनमानासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे भविष्यातील नागरी विकासात या जागांचे संरक्षण, प्रभावी व्यवस्थापन आणि सर्वांसाठी समान उपलब्धता सुनिश्चित करणे ही अत्यावश्यक बाब आहे. अशी माहिती " अर्बन डिझाइन रिसर्च इन्स्टिट्यूट " आणि  " नगर "  या सामाजिक संस्थेने मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मुंबईतील प्रत्येक नागरिकासाठी सध्या केवळ १.२८ चौरस मीटर सार्वजनिक मोकळी जागा उपलब्ध असून, राष्ट्रीय नियोजन निकषानुसार ही उपलब्धता १० ते १२ चौरस मीटर प्रति व्यक्ती असणे अपेक्षित आहे. मुंबईची समस्या केवळ मोकळ्या जागांच्या कमतरतेपुरती मर्यादित नसून त्या जागांचे नियोजन, व्यवस्थापन आणि देखभाल यांच्याशीही संबंधित असल्याचे अर्बन डिझाइन रिसर्च इन्स्टिट्यूट  आणि  नगर या सामाजिक संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालात नमूद करण्यात आले आहे की, मुंबई विकास आराखडा २०३४ नुसार प्रत्येक नागरिकासाठी ६.१३ चौर...