आठवण क्रांतीसम्राट डॉ.बाबासाहेब गोपले संघर्ष नायकाची --
मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क मंत्रालय प्रतिनिधी रमेश औताडे क्रांतीसम्राट डॉ.बाबासाहेब गोपले यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या कार्यावर छोटासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे.मातंग समाजात चिखली गांव, तालुका अमदपूर, जिल्हा - लातूर या खेडेगावांत ७ मे १९५३ साली बाबासाहेब गोपले यांचा जन्म माता समिंद्रा व पिता सिताराम गोपले यांच्या पोटी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावाशेजारी केंद्रेवाडी येथे झाले. नंतर ते आंबेजोगाई येथे काही दिवस शिकले. नंतर परभणी येथे काही दिवस राहिले आणि कॉलेज अमदपूर येथे झाले. त्यानंतर ते मुंबईला आले व मुंबईत राहत असतांना समाजाचे दारिद पाहवेना असे झाले आणि बाबासाहेब गोपले यांनी अखिल भारतीय मातंग संघाची स्थापना केली, लहुजी नगर, महुने, ता. कल्याण, जिल्हा- ठाणे येथे पहिली शाखा उघडली. १७ जानेवारी १९८२ साली तेथेच 'जगेन तर समाजासाठी व मरेन तर समाजासाठी' अशी घोर प्रतिज्ञा करून आपल्या संघर्षमय चळवळीला सुरुवात केली. मोर्चे, धरणे, आंदोलन चालू झालेत. २८ मार्च १९८३ साली हुतात्मा चौक, मुंबई येथे बाबासाहेब गोपले यांनी आमरण...