Posts

भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर मनोज म्हात्रे

Image
मुंबई / रमेश औताडे  भाजप ओबीसी मोर्चाच्या संघटन विस्तारात मनोज म्हात्रे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजप ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी म्हात्रे यांची 'महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य' तसेच 'मुंबई संपर्क प्रमुख' या पदांवर नियुक्ती केली आहे. आपल्या निवडीबद्दल बोलताना मनोज म्हात्रे यांनी सांगितले की, ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते सदैव कार्यरत राहतील. प्रामुख्याने ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि इतर सोयी-सुविधा पोहोचवणे, 'महाज्योती'च्या विविध उपक्रमांचा तळागाळातील घटकांना लाभ मिळवून देणे, मोफत MPSC व UPSC प्रशिक्षणाचा लाभ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे तसेच परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती आणि फेलोशिप योजनांचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना मदत करणे या विषयांवर ते भर देणार आहेत. या महत्त्वपूर्ण नियुक्तीबद्दल भाजप नेते महेश शेट्ये यांनी मनोज म्हात्रे यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. ...

राष्ट्रवादी पत्रकार, निर्भीड संपादक आणि नाट्याचार्य --- कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

Image
                          - प्रा. हेमंत सुधाकर सामंत - ‘कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर’ हे आधुनिक मराठी साहित्य, पत्रकारिता, नाटक आणि राष्ट्रवादी विचार विश्व यावर दीर्घकाळ प्रभाव टाकणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. नाटककार, पत्रकार, संपादक, राजकीय विचारवंत आणि समाजप्रबोधक म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांच्या लेखणीमध्ये राष्ट्र प्रेम, स्वराज्याची आकांक्षा, सामाजिक जागृती आणि अन्याया विरूद्धचा संघर्ष यांचा संगम दिसतो. विशेषतः लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या सहवासातून त्यांच्या पत्रकारितेला राष्ट्रवादी धार प्राप्त झाली. वृत्तपत्र आणि रंगभूमी या दोन्ही माध्यमांचा उपयोग जनजागृतीसाठी करता येतो, हा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळेच खाडिलकरांचे जीवन केवळ साहित्यिकाचे जीवन न राहता ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या वैचारिक इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग बनले. उपलब्ध अधिकृत मराठी विश्वकोशातील नोंदीनुसार त्यांचा जन्म २३ नोव्हेंबर १८७२ रोजी ‘सांगली’ येथे झाला आणि २६ ऑगस्ट १९४८ रोजी त्यांचे निधन झाले.  खाडिलकरां...

राष्ट्रीय शेअर बाजारात कृषी फलोत्पादन , सिंचन प्रक्रिया परिषद आणि प्रदर्शन संपन्न

Image
मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या (एमएसएमजीए) वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आणि आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त मुंबई येथील राष्ट्रीय शेअर बाजारात (NSE) कृषी, फलोत्पादन, सिंचन, प्रक्रिया, मार्केटिंग, कोल्डचेन व वेअर हाऊसिंग परिषद आणि सिद्धेश्वर ॲग्रोटेक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना एमएसएमजीए अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी सांगितले की, शेतकरी हवामान बदलाचा सामना करत आणि मोठा खर्च करून उत्पादन घेतो, परंतु सक्षम विपणन (मार्केटिंग) व्यवस्थेअभावी तो निष्प्रभ ठरतो. शेतकऱ्यांना सक्षम मार्केटिंग मिळवून देण्यासाठी एनएससी सारख्या राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठावर या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंबा उत्पादकांचे नुकसान व ईसीजीसीचे सहकार्य: यावर्षी आंब्याचे उत्पादन केवळ १५ ते २० टक्केच आले. एकूण उत्पादनापैकी १५ टक्के आंबा निर्यात होतो, ज्यातील ५० टक्के निर्यात मध्यपूर्व (मिडल ईस्ट) देशांत होते. मात्र अमेरिका-इझरायल विरुद्ध इराण युद्धामुळे ही निर्यात ठप...

पर्यावरण संरक्षण देशाच्या भविष्यासाठी अत्यावश्यक ---सरश्री अशोक एन. जे.

Image
मुंबई / रमेश औताडे  पर्यावरण संरक्षण ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून देशाच्या भविष्यासाठीची अत्यावश्यक गरज आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘पर्यावरण बचाओ, भारत बचाओ महाअभियान’ अंतर्गत ठाण्यात ‘युवा अभिनंदन पर्यावरण प्रभात फेरी’चे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ठाणेकरांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ​नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला महाविद्यालय, विश्व गुरुकुल विधी महाविद्यालय आणि बांदोडकर महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांनी या प्रभात फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होत पर्यावरण संवर्धनाचा ठाम संदेश दिला. ​उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि शाश्वत विकासाची जाणीव करून देणारे फलक हातात घेतले होते.  ​यावेळी सरश्री अशोक एन. जे. यांनी युवकांचे कौतुक करताना सांगितले की, "आजच्या युवकांनी पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली, तरच येणाऱ्या पिढ्यांसाठी अधिक सुरक्षित आणि सक्षम भारत घडविता येईल." प्रभात फेरीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या हातातील आकर्षक आणि आशयपूर्ण फ...

आरक्षणाच्या क्रांती मशालीची दहा वर्ष

Image
मुंबई / रमेश औताडे  गावकुसाबाहेर राहणारा मातंग समाज दुःखात हलाकीचे जीवन जगत असताना त्याला जग दाखविणारे दिवंगत डॉ बाबासाहेब गोपले यांनी क्रांतीची मशाल पेटवत आठ टक्के आरक्षण मागणी करत दिल्लीपर्यंत आंदोलन केले. आज त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती कुसुमताई गोपले यांनी तीच क्रांतीची मशाल तेवत ठेवत समाजाचे प्रश्न मार्गी लावत आहेत. बाबासाहेबांच्या १० व्या पुण्यतिथी निमित्त गोपले भवन साठे नगर मानखुर्द येथे पुण्यतिथी साजरी करून मशाल पेटवत लढा सुरू ठेवला आहे. यावेळी रवींद्र थोरात, सुदाम आवाडे, नंदाबाई शिखरे, जनाबाई वैरागड, हरिभाऊ कांबळे, दिनेश पांजगे, बी जी गायकवाड, गायक रामलिंग जाधव, गायक सुनील साठे, देडे महाराज पंढरपूर इतर समाज बांधव उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून क्रांतीज्योती कुसुमताई गोपले उपस्थित होत्या. बाबासाहेब गोपले यांच्या विचारांचा आणि सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी समाजाने एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

आरक्षणाच्या क्रांती मशालीची दहा वर्ष

Image
मुंबई / रमेश औताडे  गावकुसाबाहेर राहणारा मातंग समाज दुःखात हलाकीचे जीवन जगत असताना त्याला जग दाखविणारे दिवंगत डॉ बाबासाहेब गोपले यांनी क्रांतीची मशाल पेटवत आठ टक्के आरक्षण मागणी करत दिल्लीपर्यंत आंदोलन केले. आज त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती कुसुमताई गोपले यांनी तीच क्रांतीची मशाल तेवत ठेवत समाजाचे प्रश्न मार्गी लावत आहेत. बाबासाहेबांच्या १० व्या पुण्यतिथी निमित्त गोपले भवन साठे नगर मानखुर्द येथे पुण्यतिथी साजरी करून मशाल पेटवत लढा सुरू ठेवला आहे. यावेळी रवींद्र थोरात, सुदाम आवाडे, नंदाबाई शिखरे, जनाबाई वैरागड, हरिभाऊ कांबळे, दिनेश पांजगे, बी जी गायकवाड, गायक रामलिंग जाधव, गायक सुनील साठे, देडे महाराज पंढरपूर इतर समाज बांधव उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून क्रांतीज्योती कुसुमताई गोपले उपस्थित होत्या. बाबासाहेब गोपले यांच्या विचारांचा आणि सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी समाजाने एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

आरक्षणाच्या क्रांती मशालीची दहा वर्ष

Image
मुंबई / रमेश औताडे  गावकुसाबाहेर राहणारा मातंग समाज दुःखात हलाकीचे जीवन जगत असताना त्याला जग दाखविणारे दिवंगत डॉ बाबासाहेब गोपले यांनी क्रांतीची मशाल पेटवत आठ टक्के आरक्षण मागणी करत दिल्लीपर्यंत आंदोलन केले. आज त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती कुसुमताई गोपले यांनी तीच क्रांतीची मशाल तेवत ठेवत समाजाचे प्रश्न मार्गी लावत आहेत. बाबासाहेबांच्या १० व्या पुण्यतिथी निमित्त गोपले भवन साठे नगर मानखुर्द येथे पुण्यतिथी साजरी करून मशाल पेटवत लढा सुरू ठेवला आहे. यावेळी रवींद्र थोरात, सुदाम आवाडे, नंदाबाई शिखरे, जनाबाई वैरागड, हरिभाऊ कांबळे, दिनेश पांजगे, बी जी गायकवाड, गायक रामलिंग जाधव, गायक सुनील साठे, देडे महाराज पंढरपूर इतर समाज बांधव उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून क्रांतीज्योती कुसुमताई गोपले उपस्थित होत्या. बाबासाहेब गोपले यांच्या विचारांचा आणि सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी समाजाने एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.