Posts

दृष्टी नसली तरी आनंदाची उंची गगनाएवढी

Image
मुंबई, दि. ४ सप्टेंबर : भीमराव धुळप  दहीकाला उत्सवाच्या पूर्वसंध्येला कमला मेहता अंध मुलींची शाळा, दादर पूर्व येथे शिवसेना माहीम विधानसभा आणि ‘धगधगती मुंबई’ परिवाराच्या संयुक्त विद्यमाने ‘एक हंडी दिव्यांगांसाठी’ हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. आमदार व विभागप्रमुख महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी स्वीकृत नगरसेवक साईनाथ दुर्गे, विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे, भीमराव धुळप, मुख्याध्यापिका तन्वी म्हाडदळकर, सुरेश काळे, श्याम चित्रे, विशाल चाफे, प्रकाश नवल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात मुलींना श्रीकृष्णाची ट्रॉफी, सहभागी प्रमाणपत्र आणि प्रत्येकी रोख पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. तसेच सर्व मुलींना खाऊ वाटप करण्यात आला. श्रीकृष्णाची ट्रॉफी डोक्यावर घेऊन मुलींनी आनंदाने नृत्य केले. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून उपस्थितांचे मन भरून आले. “मुलींना दृष्टी नसली तरी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्हाला या छोट्याशा मदतीचे मोठे समाधान मिळाले,” अशी भावना आयोजकांनी व्यक्त ...

गोविंदाचा मृत्यू झाल्यास आयोजकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

Image
    महाराष्ट्र करणी सेनेची मागणी; अजय सिंह सेंगर यांचा इशारा मुंबई  / रमेश औताडे  दहीहंडी उत्सव आणि सरावादरम्यान गोविंदांच्या होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी दहीहंडीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेती अथवा वाळूचा थर पसरविणे बंधनकारक करावे, अशी मागणी महाराष्ट्र करणी सेनेने केली आहे. सुरक्षेच्या उपाययोजना न करता दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आणि त्यात गोविंदाचा मृत्यू झाला, तर संबंधित आयोजकांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी केली आहे. दहीहंडीच्या वेळी मानवी मनोरे रचताना तोल जाणे, उंचीवरून खाली पडणे आणि अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे दरवर्षी अनेक गोविंदा जखमी होतात. काही दुर्घटनांमध्ये गोविंदांना जीवही गमवावा लागतो. पूर्वी दहीहंडीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेती टाकली जात असल्याने उंचीवरून पडलेल्या गोविंदाला गंभीर दुखापत होण्याचा धोका तुलनेने कमी होता. मात्र, अलीकडील काळात रस्त्यांवर रेती न टाकताच दहीहंडीचे आयोजन केले जात असल्याचा आरोप सेंगर यांनी केला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र करणी सेनेने मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह र...

मराठा समाजाच्या २६ मागण्यांसाठी राज्यभर जनजागृती

Image
मंत्रालय प्रतिनिधी / रमेश औताडे मराठा समाजाच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय मराठा पार्टीने राज्यव्यापी जनजागृती दौरा सुरू केला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील (होनाळीकर) यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा सुरू असून, समाजाच्या २६ प्रमुख मागण्यांसाठी आंदोलनाची तयारी करण्यात येत आहे. रायगड किल्ल्यापासून सुरू झालेला हा दौरा कोकणातील विविध जिल्ह्यांतून पुढे जात रत्नागिरीत दाखल झाला. ३१ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विविध घटकांशी संवाद साधत मागण्यांबाबत जनजागृती केली. येत्या ५ ऑक्टोबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. आंदोलनासाठी समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी गावागावांत संपर्क मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, अंकुशराव पाटील यांनी रत्नागिरी येथील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी जिल्हा कार्यालयाचे समन्वयक सिद्धेश सुभाषराव पांळद...

वय नव्हे , नव्या सुरुवातीची तयारी महत्त्वाची : ‘ आरंभ ' चा संदेश

Image
मुंबई  / रमेश औताडे  आयुष्यात नव्याने सुरुवात करण्यासाठी वयाची मर्यादा नसते, हा प्रेरणादायी संदेश देत जागतिक व्यापार केंद्र, मुंबई येथे कला, अध्यात्म आणि आत्मचिंतनाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित या विशेष सोहळ्यात राजयोगिनी ब्रह्माकुमारी डॉ. नलिनी दीदी (दीदी माँ) यांनी रेखाटलेल्या श्रीकृष्णाच्या आकर्षक चित्रांचे प्रदर्शन लक्षवेधी ठरले. या चित्रांमधून श्रीकृष्णाच्या विविध भावविश्वाचे दर्शन घडत असतानाच, अंतर्मनातून आलेली दृष्टी आणि सकारात्मक विचार आयुष्यभर प्रेरणा देऊ शकतात, हा संदेशही अधोरेखित झाला. याच सोहळ्यात ‘Echoes Of The Soul – Reflections For A Conscious Life’ या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले. अधिक सजग, सकारात्मक आणि अर्थपूर्ण जीवनाची सुरुवात कोणत्याही क्षणी करता येते, या विचारांवर पुस्तक आधारित आहे. ‘आरंभ’—It’s Never Too Late In Life हा या कार्यक्रमाचा मध्यवर्ती विचार होता. आयुष्यात किती उशीर झाला यापेक्षा नव्याने सुरुवात करण्याची तयारी आहे का, हे अधिक महत्त्वाचे असल्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला. कला, अध्यात...

जय लहुजी दहिहंडी महोत्सव ५ सप्टेंबरला

Image
मुंबई / रमेश औताडे  अखिल भारतीय मातंग सेनेच्या वतीने जय लहुजी दहिहंडी महोत्सवाचे आयोजन शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी मानखुर्द साठे नगर येथे करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता होणाऱ्या या महोत्सवासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार असून मुख्य अतिथी म्हणून समाजसेविका सुनीता तुपसौंदर्य असणार आहेत. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून डॉ. विनोद बाबर, अभिनेते जॉनी रावत, अभिनेत्री स्वाती माने आणि प्रबोधनकार सुनील साठे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  कार्यक्रमात दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या एक हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून, समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे अधिक गांभीर्याने पाहावे, असा संदेश या माध्यमातून देण्यात येणार आहे. जय लहुजी दहिहंडी महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून, समाजातील नागरिक, विद्यार्थी, पालक आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारत...

सामाजिक व सांस्कृतिक वारशाचा समृद्ध पट: श्री. अरुण कृष्णाराव वाशिर्डे

Image
मुंबई / रमेश औताडे मंत्रालय प्रतिनिधी ३१ ऑगस्ट रोजी मुंबईतील ज्येष्ठ समाजसेवक श्री. अरुण कृष्णाराव वाशिर्डे यांचा वाढदिवस पार पडला. मूळचे कोल्हापूरचे रहिवासी असलेल्या अरुणजींनी मुंबईतील गिरगाव, कुंभारवाडा व प्रार्थना समाज परिसरात आपल्या उत्तुंग सामाजिक, व्यावसायिक आणि राजकीय कार्यातून एक स्वतंत्र व आदरयुक्त ओळख निर्माण केली आहे. शिक्षण व व्यावसायिक प्रवास * शैक्षणिक पात्रता: त्यांनी एस.एस.सी. आणि एफ.वाय. सायन्स पूर्ण केल्यानंतर तंत्रशिक्षण क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी आय.टी.आय. डिप्लोमा (डिझेल मेकॅनिक) तसेच मेकॅनिकल ड्राफ्टमन डिप्लोमा पूर्ण केला. * उद्योग व व्यवसाय: तांत्रिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. ते परवानाधारक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असून 'मे. युनिव्हर्सल पेस्ट कंट्रोल सर्व्हिस'चे प्रोप्रायटर म्हणून यशस्वी व्यावसायिक वाटचाल करत आहेत. कौटुंबिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी अरुणजींना समाजसेवा आणि कला क्षेत्राची प्रेरणा कौटुंबिक वारशातूनच मिळाली. * वडील (कै. कृष्णाराव डी. वाशिर्डे): ते चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व दिग्गज स...

'स्नेह पूकलम' (ओणमची फुलांची रांगोळी) कालबाह्य

Image
रेल्वेने परवानगी नाकारली यंदा सीएसटी (CST) वर 'स्नेह पूकलम' (ओणमची फुलांची रांगोळी) होणार नाही मुंबई / रमेश औताडे  दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) च्या गजबजलेल्या आवारात यंदा ओणमच्या फुलांचा सुगंध दरवळणार नाही. २०१५ पासून मुंबईतील ओणमच्या उत्सवाला आपल्या रंगीबेरंगी रूपाने बहर आणणाऱ्या या भव्य 'महा पूकलम'ला (फुलांची रांगोळी) रेल्वे प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव यंदा परवानगी नाकारली आहे. लाखो लोकांच्या पसंतीस उतरलेली आणि 'स्नेह पूकलम' (प्रेमाची फुलांची रांगोळी) म्हणून ओळखली जाणारी ही उत्सवकालीन कलाकृती यंदा केवळ आठवण म्हणून उरेल. ओणमची ही फुलांची रांगोळी केवळ मल्याळी समाजाचा सण साजरा करण्यापुरती मर्यादित नव्हती. २००८ मधील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात सीएसटी येथे प्राण गमावलेल्यांना ती फुलांच्या माध्यमातून वाहिलेली श्रद्धांजली होती, तसेच शांततेचा एक प्रभावी संदेशही होता. धर्म आणि भाषेच्या भिंती ओलांडून लोकांना एकत्र आणल्यामुळेच तिने 'स्नेह पूकलम' म्हणून मुंबईच्या सांस्कृतिक जी...