Posts

आम्रपाली ची काश्मीर ते कन्याकुमारी बाईक मोहीम

Image
वनरक्षक आम्रपाली पडघण ची 'कन्याकुमारी ते काश्मीर' ऐतिहासिक बाईक मोहीम संरक्षणासोबतच जनजागृतीचा नवा अध्याय ! मुंबई  / रमेश औताडे  निसर्ग संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणासाठी झोकून देणाऱ्या बोर व्याघ्र प्रकल्पातील वनरक्षक आम्रपाली देवीदास पडघण आता एका धाडसी मोहिमेसाठी सज्ज झाल्या आहेत. 'फॉरेस्ट टू फ्रंटियर' (Forest to Frontier) या संकल्पनेखाली त्या कन्याकुमारी ते काश्मीर (K2K) असा सुमारे ३,६०० किलोमीटरचा प्रवास सोलो बाईक राईडद्वारे पूर्ण करणार आहेत. आम्रपाली या गेल्या ९ वर्षांपासून महाराष्ट्र वन विभागात कार्यरत असून, सध्या त्या बोर व्याघ्र प्रकल्पातील 'नवेगाव बीट' येथे कार्यरत आहेत. केवळ कर्तव्य म्हणून नव्हे, तर एक पॅशन म्हणून त्या जंगलाची राखण करतात.  * वन्यजीव तज्ज्ञ: त्यांनी बोर अभयारण्यात ११४ हून अधिक फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद केली आहे.  * सर्पमित्र: मानवी वस्तीत शिरलेल्या शेकडो सापांना (ज्यात नाग आणि अजगरांचा समावेश आहे) त्यांनी सुरक्षितरीत्या जीवनदान दिले आहे. त्यांच्या सापांवरील संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर २०२५ मध...

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे " वृक्ष संजीवनी " अभियान

Image
    पर्यावरण रक्षक व स्माईल फाऊंडेशन यांचाही सहभाग मुंबई / रमेश औताडे    बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक ठिकाणांवरील वृक्षांच्या संवर्धनासाठी  ‘ वृक्ष संजीवनी ’ अभियान राबविण्यात येत आहे.  जागतिक वसुंधरा दिनानिमित्त  १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात पर्यावरण रक्षक व स्माईल फाऊंडेशन या संस्था सहभागी होणार आहेत.  बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सध्या एकूण २९ लाख ७५ हजार २८३ वृक्ष आहेत. त्यापैकी सुमारे १३ लाख ५४ हजार ९६६ वृक्ष रस्त्यांच्या कडेला, उद्यानांमध्ये व इतर सार्वजनिक ठिकाणी आहेत. या वृक्षांच्या आरोग्य संवर्धनासाठी ‘ वृक्ष संजीवनी ’ हे अभियान महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या अभियान अंतर्गत वृक्षांभोवती साचलेले सिमेंट- काँक्रिट काढून त्याजागी मोकळी लाल माती टाकणे, झाडांच्या खोडांवर ठोकलेले खिळे, जाहिरात फलक, दोऱ्या व केबल्स काढणे, तसेच पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या फांद्यांची छाटणी करणे अशा उपाययोजना केल्या जातात. झाडांच्या खोडांना गेरू-चुना लावून त्या...

तापमानातील असामान्य बदलामुळे अकाली मृत्यूचे संकट

Image
मुंबई / रमेश औताडे हवामान बदलाचा परिणाम आता अधिक गंभीर स्वरूपात समोर येत असून, तापमानातील असामान्य बदलामुळे  दरवर्षी सुमारे ७ लाख लोकांचा अकाली मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोग्य आणि पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय संशोधनांमधून ही बाब स्पष्ट झाली आहे. तज्ञांच्या मते, वाढत्या उष्णतेच्या लाटा, अनियमित पाऊस, दुष्काळ आणि थंडीतील तीव्र बदल यामुळे मानवी आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः वृद्ध, लहान मुले आणि गरिबी रेषेखालील नागरिक यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. जागतिक स्तरावर परिस्थिती आणखी चिंताजनक असून, २०५० पर्यंत हवामान बदलामुळे लाखो अतिरिक्त मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उष्णतेमुळे होणारे हृदयविकार, श्वसनाचे आजार, तसेच संसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, ही केवळ भविष्यातील समस्या नसून सध्या सुरू असलेले संकट आहे. तापमानवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने प्रभावी धोरणे राबविण्याची गरज आहे. हरित क्षेत्र वाढवणे, प्रदूषण नियंत्रण आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन यावर भर देणे अत्याव...

न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे फेरीवाल्यांना न्याय द्या

Image
मुंबई / रमेश औताडे  अधिकृत व अनधिकृत असे फेरीवाले कोण ? याबाबत न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाहून पालिका पोलिस प्रशासन व सरकारचे प्रतिनिधी तसेच रेल्वे हद्दीतील किंवा इतर कोणाच्याही हद्दीतील फेरीवाले यांच्याबाबत योग्य तो तोडगा काढत फेरीवाल्यांना न्याय द्यावा. अशी मागणी आझाद होकर्स युनियन चे संस्थापक अध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी खासदार संजय निरुपम, हुसेन पटेल, ललित दोशी पप्पू, जय हिंदुस्थान हॉकर्स युनियन फेरीवाला संघर्ष समिती चे अध्यक्ष मंजूर मकबूल खाँ, जय शंकर सिंह उपस्थित होते. पोलिस विभाग, पालिका यंत्रणा, सरकारी बाबू व इतर संबंधित विभाग या प्रश्नाकडे गांभीर्याने का पाहत नाही ? या थेट प्रश्नाला उत्तर देताना संजय निरुपम म्हणाले की, हप्ते बंद होतील या भीतीने फेरीवाला प्रश्न भिजत ठेवायचा. न्यायालय किंवा शासन काय म्हणत आहे , याकडे कानाडोळा करत आपले मनमानी काम करत रहायचे ही वृत्ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत फेरीवाल्यांचा प्रश्न असाच रेंगाळत राहणार. 

इराणच्या आंदोलनात एका निष्पाप तरुणावर अन्याय

Image
इराणच्या आंदोलनात एका निष्पाप तरुणावर अन्याय देशातील बहाई समाजाने केली न्यायाची मागणी मुंबई /रमेश औताडे इराणमधील ८ जानेवारीच्या आंदोलनादरम्यान पैवंद नईमी या तरुणाला खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून आय आर जी सी  च्या नजरबंदी केंद्रात त्याला घेऊन दीर्घकाळ चौकशी करत अन्न  पाण्यासारख्या मूलभूत सुविधांपासून त्याला वंचित ठेवण्यात आले.  वारंवार मारहाण  आणि दोनदा बनावट फाशी देण्यासही भाग पाडले. आंतरराष्ट्रीय स्तरावर असा मानसिक छळ केलेल्या कृत्याचा निषेध करत बहाई आंतरराष्ट्रीय समुदाय जिनिव्हा च्या माध्यमातून बहाई स्थानिक आध्यात्मिक सभा च्या भारतामधील  राष्ट्रीय  सचिव नर्गिस गौर यांनी न्यायाची मागणी केली आहे. पैवंद नईमी वर गंभीर आरोप ठेवण्यात आले आणि खोटा कबुलीजबाब देण्यास भाग पाडले गेले. जो नंतर सरकारी दूरदर्शनवर प्रसारित करण्यात आला. अद्याप कोणताही खटला चाललेला नाही, कोणताही पुरावा सादर केलेला नाही, आणि तरीही तो तुरुंगातच आहे. गेल्या काही आठवड्यांत अनेक कैद्यांची सुटका झाली असली तरी, इतर बहाईंप्रमाणेच केवळ त्यांच्या श्रद्धेमुळे त्याला लक्ष्य के...

मुंबईतील सफाई कामगारांना मिळणार हक्कांची घरे.

Image
मुंबईतील सफाई कामगारांना मिळणार हक्कांची घरे. उपाध्यक्षांच्या पुढाकारानंतर मुख्यमंत्र्यांचे ठोस आश्वासन.. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना’ अधिवेशनात जाहीर होणार. मुंबई, २३ मार्च / रमेश औताडे  मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांसाठी मोठा दिलासा देणारी घडामोड घडली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना अंतर्गत त्यांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने म्युन्सिपल मजदूर युनियनच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने शासन निर्णय २००८ व २०१५ ची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत, मुंबई महापालिकेने नव्याने उभारलेल्या घरांपैकी ५० टक्के घरे सफाई कामगारांना मालकी हक्काने देण्याचे ठोस आश्वासन दिले. तसेच या योजनेची अंमलबजावणी येत्या अधिवेशनात जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या मागणीसाठी म्युन्सिपल मजदूर युनियन, मुंबईच्या वतीने २३ मार्च रोजी आझाद मैदान येथे आ...

किरण कोळी यांचा आझाद मैदानातून सवाल

Image
सरकार नेमके कुणासाठी काम करत आहे !  किरण कोळी यांचा आझाद मैदानातून सवाल मुंबई / रमेश औताडे  आमची जमीन, आमचा समुद्र, आमचा निसर्ग आणि आमचे अस्तित्व वाचविण्यासाठी व विनाशकारी प्रकल्पांच्या विरोधात आझाद मैदानात महामोर्चा काढत, " सरकार नेमके कुणासाठी काम करत आहे " असा सवाल करण्यात आला. आदिवासी, मच्छीमार व इतर वंचित घटकांनी या मोर्च्यात मोठ्या संख्येने भर उन्हात सहभाग नोंदवला. मच्छीमार नेते व आयोजक कमिटीचे सर्व सदस्य, नारायण पाटील संघर्ष समिती चे वैभव वजे, लिओ कोलासो, रामकृष्ण तांडेल, किरण कोळी, ज्योती मेहेर, उज्वला पाटील असे अनेक समाज प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. समुद्रात होणारे विमानतळ आणि पर्यावरणास घातक 'चौथी मुंबई' योजना तात्काळ थांबवा. मुंबईतील कोळीवाड्यांचे, बाजारांचे पुनर्विकास धोरण मच्छिमारांच्या हिताचे करा. ससून डॉक, मुंबई येथे बंद केलेली गोदामे त्वरित ताब्यात द्यावी. कफ-परेड, मुंबई येथील प्रस्तावित 'मरीना पार्क' प्रकल्प रद्द करावा. छत्रपती शिवाजी महाराज बाजार (क्रॉफर्ड मार्केट) कोणत्याही परिस्थितीत स्थलांतरित करू नये. मुंबई येथील सर्व बाजार...