- Get link
- X
- Other Apps
Posts
ज्येष्ठांच्या 11 प्रलंबित मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा करणार - आमदार मंदाताई म्हात्रे
- Get link
- X
- Other Apps
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क रमेश औताडे ( प्रतिनिधी ) बेलापूरच्या आमदार माननीय सौ. मंदाताई म्हात्रे यांना आज फेस्कॉम मुंबई विभाग आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीत ज्येष्ठ नागरिकांच्या 11 प्रलंबित मागण्यांचे निवेदन त्यांना सादर करण्यात आले. फेस्कॉम मुंबई विभागाचे अध्यक्ष श्री. सुरेश पोटे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. विकास साठे आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव श्री. अजय माढेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आमदारांची भेट घेतली. यावेळी श्री. सुरेश पोटे यांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या कामाचे कौतुक करून त्यांचा सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. निवेदन स्वीकारताना आमदार मंदाताई म्हात्रे यांनी ज्येष्ठांच्या सर्व मागण्या गांभीर्याने ऐकल्या. ज्येष्ठ हे समाजाचा आधार आहेत असे सांगून, फेस्कॉमच्या 11 मागण्या मुख्यमंत्री यांच्या स्तरावर मांडून त्या लवकर मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी दिले. आमदारांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधान व्यक्त क...
मातंग महिला हत्या प्रकरणी सखोल तपासणीची मागणी
- Get link
- X
- Other Apps
मुंबई / रमेश औताडे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे मातंग समाजातील महिलेची गोळ्या झाडून हत्या झाल्याच्या घटनेबाबत सखोल आणि निष्पक्ष तपास करण्यात यावा, अशी मागणी समाजसेविका सुनीता तुपसौंदर्य यांनी केली आहे. या घटनेचा त्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत, दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे म्हटले आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून अशा घटना समाजासाठी चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. हत्येमागील खरा सूत्रधार आणि कारणांचा सखोल तपास करून कोणालाही पाठीशी न घालता निष्पक्ष चौकशी करावी, तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही सुनीता तुपसौंदर्य यांनी केली आहे. शासन आणि पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पी आर न्यूज मिडिया नेटवर्क 7021777291
अधिकृत पत्रकार नोंदणीचे धोरण लवकरच? बोगस पत्रकारितेला बसणार आळा
- Get link
- X
- Other Apps
मुंबई / रमेश औताडे राज्यात पत्रकारितेची विश्वासार्हता जपण्यासाठी आणि बोगस पत्रकारांच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी अधिकृत पत्रकारांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र, पारदर्शक आणि मानक कार्यपद्धती तयार करण्याची मागणी जोर धरत आहे. पत्रकार म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींची शैक्षणिक पात्रता, पत्रकारितेचा अनुभव, संबंधित माध्यम संस्थेचे अधिकृत नियुक्तीपत्र, नियमित कार्याचा पुरावा आणि आचारसंहितेचे पालन यांसारख्या निकषांच्या आधारे नोंदणी प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तज्ज्ञ पत्रकार, संपादक, वृत्तपत्र प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमांचे प्रतिनिधी तसेच पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली स्वतंत्र समिती स्थापन करून पत्रकार नोंदणीची स्पष्ट कार्यपद्धती निश्चित करावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. या प्रक्रियेमुळे खऱ्या अर्थाने पत्रकारिता करणाऱ्या अधिकृत पत्रकारांना संस्थात्मक संरक्षण, विश्वासार्ह ओळख आणि सन्मान मिळण्यास मदत होईल. त्याचबरोबर पत्रकारितेच्या नावाखाली होणारे गैरप्रकार, खंडणी, दिशाभूल आणि बोगस ओळखपत्रांचा गैरवापर कमी होण्यास ...
कुरारमध्ये भरदिवसा तरुणीवर जीवघेणा हल्ला
- Get link
- X
- Other Apps
मुंबई / रमेश औताडे मुंबईतील कुरार परिसरात भरदिवसा एका २५ वर्षीय तरुणीवर वायर आणि चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीवर अचानक हल्ला करण्यात आला. आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर संतप्त महिलांनी आणि स्थानिक नागरिकांनी कुरार पोलीस ठाण्यासमोर निदर्शने करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. तसेच परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गांधीनगर परिसरात गुंडगिरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. संबंधित आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्...
मुंबईत २२ जुलै रोजी अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा
- Get link
- X
- Other Apps
मुंबई / रमेश औताडे अखिल भारतीय किसान सभा (AIKS) यांच्या वतीने विविध प्रलंबित शेतकरी प्रश्नांसाठी २२ जुलै रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मोर्चाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे विविध मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली जाणार आहे. राज्य सरचिटणीस डाॅ. अजित नवले, राज्याध्यक्ष उमेश देशमुख, उपाध्यक्ष डाॅ. उदय नारकर, अजय बुरांडे, उद्धव पौळ, कार्याध्यक्ष चंद्रकांत गोरखाना, सुभाष चौधरी यांनी व इतर पदाधिकारी, शेतकरी यांनी वारंवार आंदोलने केली. मोर्चे काढले. बैठका घेतल्या. शेवटी काय मिळाले ? सरकारला जाग का येत नाही ? असा सवाल शेतकरी करत आहेत. मोर्चामध्ये देवस्थान इनाम जमिनी खालसा करणे, गायरान अतिक्रमणे नियमित करणे, पिकविमा तातडीने देणे आणि घराच्या तळाच्या जमिनी नावावर करणे या प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहेत. किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरातील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांना मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी हा म...
कलीमात (वचने) महिन्याच्या प्रारंभानिमित्त बहाई केंद्रात १२ जुलै रोजी कार्यक्रम
- Get link
- X
- Other Apps
मुंबई / रमेश औताडे बहाई धर्माच्या पंचांगानुसार 'कलीमात' (Words/वचने) या महिन्याच्या प्रारंभानिमित्त 'एकोणीस दिवसांचा मेळावा' (Nineteen Day Feast) रविवार, १२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता बहाई केंद्रात आयोजित करण्यात आला आहे. बहाई धर्मातील हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि नियमित धार्मिक-सामुदायिक कार्यक्रम असून, जगभरातील बहाई समुदाय प्रत्येक १९ दिवसांनी अशा मेळाव्याचे आयोजन करतो. बहाई पंचांगात वर्षाचे १९ महिने असून प्रत्येक महिना १९ दिवसांचा असतो. प्रत्येक नव्या महिन्याच्या प्रारंभी श्रद्धाळू एकत्र येऊन प्रार्थना, पवित्र ग्रंथांचे वाचन, आध्यात्मिक चिंतन आणि समाजहिताच्या विषयांवर चर्चा करतात. या मेळाव्याचा उद्देश श्रद्धा दृढ करणे, समुदायात ऐक्य वाढविणे आणि समाजसेवेची भावना बळकट करणे हा आहे. मेळाव्याचे तीन प्रमुख भाग असतात. पहिल्या भागात बहाई धर्मग्रंथ आणि इतर धर्मग्रंथांतील निवडक प्रार्थना वाचन आणि भक्तिगीते सादर केली जातात. दुसऱ्या भागात स्थानिक बहाई समुदायाच्या विविध उपक्रमांवर, समाजहिताच्या योजनांवर, शैक्षणिक आणि सेवा कार्यांवर विचारविनिमय केला जातो. त...