Posts

'धगधगती मुंबई'चे संपादक ज्येष्ठ पत्रकार भीमराव धुळप यांना 'केतकी प्रकाशन'चा साहित्य गौरव पुरस्कार जाहीर*

Image
*'धगधगती मुंबई'चे संपादक ज्येष्ठ पत्रकार भीमराव धुळप यांना 'केतकी प्रकाशन'चा साहित्य गौरव पुरस्कार जाहीर* मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  'धगधगती मुंबई' साप्ताहिकाचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार, लेखक तसेच समाजाभिमुख कार्यकर्ते भीमराव धुळप यांना केतकी प्रकाशन परिवारातर्फे प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'साहित्य गौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे. पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या १६ वर्षांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. केतकी प्रकाशनाने दिलेल्या गौरवपत्रात नमूद केल्याप्रमाणे, भीमराव धुळप यांनी आपल्या निर्भीड व धारदार लेखणीच्या माध्यमातून समाजातील ज्वलंत प्रश्न, सर्वसामान्यांचे संघर्ष तसेच देशाच्या जवानांचे शौर्य प्रभावीपणे जनतेसमोर मांडले आहे. सामाजिक जाणीव जागृत करणारे त्यांचे लेखन, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक सक्षम करण्यासाठी आणि समाजाला योग्य दिशा देण्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी 'आरोग्यदूत...

कामगारांचा लढा पूर्णपणे विनामूल्य लढणार - ॲड. प्रकाश देवदास

Image
मुंबई / रमेश औताडे  मुंबई महानगरपालिकेच्या कचरा संकलन, परिवहन व निष्कासन विभागाच्या प्रस्तावित खाजगीकरणाविरोधात तीव्र भूमिका जाहीर करत अँड. प्रकाश देवदास, डॉ. एम. नवनाथ महारणवर, डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. तसेच  पालिकेतील मोटर लोडर्स आणि इतर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी न्यायालयीन लढा पूर्णपणे विनामूल्य लढविण्यात येईल असेही ॲड. प्रकाश देवदास यांनी सांगितले. कचरा संकलन, परिवहन आणि निष्कासन  या सेवांच्या खाजगीकरणाच्या निविदेला विरोध करणार नसल्याचे मान्य करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या करारावर स्वाक्षरी न केलेल्या सर्व मान्यताप्राप्त संघटनांनी एकत्र येत "मुंबई मनपा खाजगीकरण विरोधी समिती" स्थापन केली असून, खाजगीकरणाविरोधातील आंदोलनाची दिशा आणि न्यायालयीन लढ्याची घोषणा आज आम्ही करत आहोत. ॲड.. प्रकाश देवदास यांनी स्पष्ट केले की, खाजगीकरणामुळे सर्वाधिक फटका बसणाऱ्या मोटर लोडर्स आणि इतर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात प्रभावी लढा उभारण्यात येईल. या प्रकरणासाठी कोणत्याही मोटर लोडर्सकडून क...

स्वयंसेवी संस्थांना देणार अग्रक्रम ... शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे प्रतिपादन

Image
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  मुंबई / रमेश औताडे ( मंत्रालय प्रतिनिधी )  राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांच्या दुतर्फा करण्यात येणाऱ्या वृक्षारोपणामध्ये स्थानिक हवामान आणि भौगोलिक परिस्थितीशी सुसंगत असलेल्या देशी प्रजातींच्या वृक्षांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. वृक्षारोपणासोबतच वृक्षांचे संवर्धन आणि संगोपन यावर शासन विशेष भर देणार असून पर्यावरण क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थांचा या उपक्रमात सक्रिय सहभाग वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सदस्य सुरेश धस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भोसले म्हणाले की, हवामान बदल, वाढते तापमान, अनियमित पर्जन्यमान, भूजल पातळीतील घट आणि जैवविविधतेवर होणारे परिणाम ही गंभीर आव्हाने आहेत. त्यामुळे विकासकामांसोबत पर्यावरण संवर्धनालाही समान प्राधान्य देणे आवश्यक झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रत्येक रस्ते प्रकल्पात पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी वृक्ष...

शहीद भीम सैनिक स्मृती दिनानिमित्त समिक्षा परिषद

Image
मुंबई / रमेश औताडे  रमाबाई नगर पोलीस गोळीबार भीम सैनिक स्मृती दिनानिमित्त घाटकोपर येथे अभिवादन सभा तसेच त्या शहिद भीम सैनिकांचे आर्थिक पुनर्वसन, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी, भीम सैनिकांवर बेछूट गोळीबार करणारे पोलिस अधिकारी मनोहर कदम यांना राजनैतिक संरक्षण, आदी विषयावर समिक्षा परिषद होत आहे असे आंबेडकरी रिपब्लिकन मोर्च्याचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी सांगितले. शहिद भीम सैनिक भवन येथे ११ जुलै रोजी होणाऱ्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्च्याचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे, प्रमुख वक्ते दलित पँथरचे नेते भाई मुजिब पठाण, सुप्रसिद्ध विचारवंत उत्तमराव गायकवाड, मुंबई प्रदेश अध्यक्ष विकास काटे, महिला नेत्या आरती भोईर, संगिता जैस्वाल, रत्ना पाटोळे, जयदेव चिंवडे हे राहणार आहेत. असे विकास काटे यांनी सांगितले. पोलिस अधिकारी मनोहर कदम अद्याप मोकाट आहेत. शहीद भीमसैनिक आर्थिक पुनर्वसन नसल्याने त्यांच्या कुटुंबाचे हाल आहेत. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी नसल्याने अन्याय होत आहे. त्यामुळे सरकारने गं...

भटक्या कुत्र्यांसाठी मुंबईत निवारा केंद्र..... विधानसभेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

Image
मुंबई / रमेश औताडे  राज्यातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने विविध स्तरांवर व्यापक उपाययोजना सुरू असून मुंबईतील भटक्या कुत्र्यांसाठी येत्या सहा महिन्यात निवारा केंद्र सुरू करण्यात येईल. अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यात एकूण १४ लाख ८० हजार भटकी कुत्री असून त्यापैकी ९४ हजार कुत्री मुंबईमध्ये आहेत. यावर्षी ६५ हजार कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले असून ९७ हजार ९६० कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.   मुलुंड आणि मालाड येथे तीन हजार स्वे.फूट तर  नाहुर येथे  आठ हजार ४११  स्वे.फूट जागेची मागणी महसूल विभागाकडे करण्यात आली आहे.  सर्वोच्च न्यायालयाने सूचित केल्यानुसार पुणे, मुंबई, कल्याण डोंबिवली, पिंपरी चिंचवड आणि नाशिक महानगर पालिकांनी प्राणी जन्म नियंत्रण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

ज्येष्ठ नागरिकांच्या 11 न्याय्य मागण्या तातडीने मान्य करा – फेस्कॉम ची राज्य व केंद्र सरकारकडे मागणी.

Image
सुरेश ईश्वर पोटे अध्यक्ष, FESCOM   मुंबई प्रादेशिक विभाग   संपर्क:- 9322401965  ईमेल:-  sureshipote@gmail.com महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (FESCOM) नाशिकच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी 11 महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. वाढती महागाई आणि आरोग्य खर्चामुळे ज्येष्ठ नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारने या मागण्यांवर तात्काळ निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी FESCOM ने केली आहे. *अधिवेशनात मंजूर झालेले 11 ठराव:* 1.  *वयोमर्यादा 65 वरून 60 करा:* सर्व शासकीय सवलती व कल्याणकारी योजना 60 वर्षे वयापासून लागू कराव्यात. 2.  *दरमहा ₹3000 मानधन:* गोवा, हरियाणा, दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही प्रत्येक ज्येष्ठाला दरमहा किमान ₹3000 मानधन नियमित द्यावे. 3.  *FESCOM ला 50% प्रतिनिधित्व:* राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक महामंडळावर FESCOM चे किमान 50% सदस्य असावेत. 4.  *FESCOM ला शासकीय मान्यता:* राज्यातील ज्येष्ठांचे व्यापक प्रतिनिधित्व करणारी संघटना म्हणून FESCOM ला अधिकृत मान्यता द्याव...

सकल मांग गारुडी समाजाच्या लढ्याला मोठे यश

Image
मुंबई / रमेश औताडे  सकल मांग गारुडी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी विधान भवन, मुंबई येथे आत्मदहन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनाची गंभीर दखल घेत मंत्री गिरीश महाजन यांनी समाजाच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. समाजाच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत मंत्री महोदयांनी येत्या १५ दिवसांच्या आत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे प्रस्तावित आत्मदहन आंदोलनास तात्पुरती स्थगिती देण्यात येत आहे.  यावेळी राष्ट्रीय नेते अमर कसबे, मुरलीधर गायकवाड, हरीश सकट, सचिन लोंढे, सुखदेव राखपसरे, अमोल राखपसरे, दिगंबर नाडे, राम सकट, पुंडलिक राखपसरे, भरत राखपसरे, भगवान ढालवाले, दादा ढाले, अनिल हातागळे, रमेश सकट, प्रकाश राक्षे, राहुल खडसे, नवनाथ राखपसरे, मधुकर सकट, राजेश सकट, उमेश कसबे, विजय कसबे, बाळू लोंढे, कुंदन सकट, भगवान लोंढे, नानू अहिर, प्रफुल सोलंकी, सुनील हातागळे तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांतील महिला, युवक, पदाधिकारी व शेकडो समाजबांधव उपस्थित होते. पी आर न्यूज मिडिया नेटवर्क...