Posts

मानसिक मागासलेले उच्च शिक्षित लोकच बौध्दना जात नोंदवायला सांगत आहेत

Image
                सेक्युलर मूव्हमेंटच्या सभेत हल्लाबोल  मुंबई : पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  ज्यांची शिक्षणामुळे बौद्धिक प्रगती झाली परंतु मानसिक मागासलेपण अजून कायम आहे, तेच लोक बौद्ध समाजाला जनगणनेत जात लिहायला सांगत आहेत, असा हल्लाबोल सेक्युलर मुव्हमेंट व सेक्युलर आर्ट मूव्हमेंटच्या सभेत करण्यात आला. भाकरी पेक्षा इज्जत प्यारी हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश मनावर कोरून ठेवा आणि जनगणनेत फक्त बौद्ध लिहा, जात धुडकाऊन लावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. धर्मांतर बंदी कायदा, आरक्षण उपवर्गीकरण आणि जाती जनगणना या विषयांवर सेक्युलर मुव्हमेंट आणि सेक्युलर आर्ट मुव्हमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चर्चासत्रात विविध वक्त्यांनी सामाजिक, कायदेशीर आणि घटनात्मक मुद्द्यांवर आपली मते व्यक्त केली. बौद्ध समाजामध्ये आरक्षण, धर्मांतर आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत गैरसमज निर्माण होत असल्याची चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी सेक्युलर मुव्हमेंट ...

ख्रिस्ती समाज मालमत्ता विक्री विरोधात देशव्यापी मोहीम

Image
मुंबई / रमेश औताडे  मेथडिस्ट चर्च इन इंडिया या संस्थेच्या बिशप आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून देशभरातील चर्चच्या मौल्यवान जमिनी आणि स्थावर मालमत्ता कवडीमोलाने विकल्या जात असल्याचा आरोप करत ख्रिस्ती समाज बांधवांनी याविरोधात तीव्र एल्गार पुकारला आहे.  मुंबईतील आग्रीपाडा येथील मोक्याच्या जागेवरील बिशप हाऊस बेकायदेशीरपणे बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा खळबळजनक आरोप समाज बांधवांनी केला असून, याविरोधात देशभरातून मुंबई धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व अशोक नायर, अशोक मासिदास, फिलिप मकासरे, अविनाश गायकवाड, अजय गायकवाड, सतीश नायर, येशूराज बेली , प्रणिल शिंदे आणि जसपर ख्रिश्चन हे करत आहेत. त्यांनी संपूर्ण भारतातील ख्रिस्ती समाज बांधवांना या अन्यायाविरुद्ध एकत्र येण्याचे आणि पत्र मोहिमेत मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन केले आहे. आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. मेथडिस्ट चर्च इन इंडिया या नावाने कोणतीही संस्था कुठेही अधिकृत नोंदणीकृत नाही. या संस्थेचा संपूर्ण कारभार मुंबई धर्मदाय आय...

ख्रिश्चन सेल प्रदेश सरचिटणीसपदी प्रवीण तोरणे

Image
मुंबई / रमेश औताडे  सामाजिक कार्यकर्ते प्रवीण तोरणे  यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ख्रिश्चन सेल प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेश निरीक्षक सेलचे अध्यक्ष धनंजय भुजबळ यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब साळवे , खासदार निलेश लंके  जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप वर्पे, तसेच जनसेवक धामोरकर, संजय भिमाळे आदी मान्यवर उपस्थित होते.  विविध पक्षीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी प्रवीण तोरणे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रवीण तोरणे यांनी समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने काम करत जनसामान्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या वेळी खासदार निलेश लंके म्हणाले की, ख्रिस्ती समाजाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. बाळासाहेब साळवे यांनी ज्या मागण्या चे पत्र दिले आहे त्यासाठी  पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना प्रत्यक्ष भेटून पत्र देऊन पाठपुरावा करू असे त्यांनी सांगितले.

लोकसंख्या, सामाजिक समतोल आणि राष्ट्रीय धोरणांवर चर्चा आवश्यक –

Image
       महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजयसिंह सेंगर यांचे आवाहन  मुंबई  / रमेश औताडे  देशातील लोकसंख्या वाढ, संसाधनांचे नियोजन, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक समतोल या विषयांवर व्यापक राष्ट्रीय चर्चा होण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण, संस्कार, आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक जबाबदारी महत्त्वाची असते. कुटुंब व्यवस्थेबाबत निर्णय घेताना प्रत्येक नागरिकाने आपल्या परिस्थितीनुसार जबाबदारीने विचार करावा. लोकसंख्या धोरणाबाबत केंद्र सरकारने सर्व समाजांना समान निकष लागू होतील अशी स्पष्ट आणि सर्वसमावेशक भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. देशात समान नागरी संहिता, समान शिक्षण व्यवस्था, समान कायदे आणि प्रशासनातील पारदर्शकता यावर संसदेच्या माध्यमातून चर्चा व्हावी, असेही त्यांनी नमूद केले. लोकशाही मार्गाने नागरिकांनी आपल्या लोकप्रतिनिधींना निवेदन, पत्र किंवा संदेश पाठवून विविध विषयांवर भूमिका मांडावी, असे आवाहन त्यांनी केले. सेंगर यांनी सामाजिक सलोखा, स...

लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी धोरणात्मक चर्चेची गरज

Image
मुंबई / रमेश औताडे  महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या घटनांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असून, समाजात या विषयावर व्यापक आणि संवेदनशील चर्चा होणे आवश्यक असल्याचे मत महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, बलात्कारासारख्या गंभीर घटनांनंतर समाजात संतापाची लाट उसळते, मोर्चे आणि निषेध आंदोलन केले जातात तसेच सरकारवर कठोर कारवाईची मागणी होते. मात्र, अशा घटना रोखण्यासाठी दीर्घकालीन आणि व्यावहारिक उपाययोजनांवर पुरेशी चर्चा होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सेंगर यांनी सामाजिक माध्यमांवरील अश्लील सामग्री, इंटरनेटवरील अनियंत्रित प्रवेश आणि बदलती सामाजिक परिस्थिती यामुळे तरुणांवर मानसिक परिणाम होत असल्याचे सांगितले. त्यांनी असे मत मांडले की, लैंगिक आरोग्य, लैंगिक शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी या विषयांवर अधिक जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. याच संदर्भात त्यांनी देहविक्री व्यवसायात कार्यरत महिलांना कायदेशीर संरक्षण आणि “सेक्स वर्कर” म्हणून अधिकृत दर्जा देण्याबाबत सरकारने गंभीरपणे विचार करावा, अशी मागणी केली. सर्वोच्च न्यायालय...

कडक उन्हावर हिरवागार उपाय

Image
कडक उन्हावर हिरवागार उपाय ट्री आर्मी करतेय पर्यावरण संवर्धन मुंबई / रमेश औताडे  पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास  पाहता उन्हाळ्यामध्ये तापमान वाढ झाल्याने त्यावर उपाय म्हणून  हरित क्रांती उपक्रम आमदार सुहास बाबर यांनी ग्रीन आर्मी नावाने सुरू केला आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपण होत आहे.  आमदार सुहास बाबर म्हणाले की एका पिंपळाच्या झाडाच्या पुनर्वसनाच्या प्रेरणेतून आज मोठी हरित लोक चळवळ सकारात्मक बदल घडवू पाहत आहे. जनता स्वयंप्रेरणेने जागा, पाणी, झाडं, श्रमदान करण्यासाठी पुढे येत आहेत. ट्री आर्मी असं नामकरण लोकांनीच केलं असल्याचं आमदार बाबर म्हणाले. आपल्या मातोश्रींच्या श्राद्ध दिवशी ५३०० आंब्याची कलमे रुजवल्याची माहिती त्यांनी दिली. वन विभाग यांच्या माध्यमातून जपानी पद्धतीचा मियावकी जंगल तसेच गायरान जमिनीवर, रस्त्यालगत नैसर्गिकपणे उगवणारी झाडे रुजवण्याचा उपक्रम सुरु आहे.   ५ जून रोजी होणाऱ्या वसुंधरा दिनानिमित्त अधिक प्रमाणात वड, पिंपळ, बहावा, करंज, चिंच अशा डेरेदार वृक्षांची लागवड सुरु आहे. व्यक...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीराची प्रभावी अंमलबजावणी

Image
मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्राचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार राज्यात गेली दोन महिन्यापासन मंडलस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न होत आहेत. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातही उपविभागीय अधिकारी,प्रांत अनिल दौंडे ,तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या मार्गदर्शनानुसार मंडलस्तरीय शिबीरे आयोजित केली गेली.प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांच्या समस्यापूर्तीसाठी प्रशासनाने केलेली कार्यवाही याबाबत सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी मुख्यमंत्री,महसुलमंत्री,महसुल सचिव,विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन पाठवून आभार मानले आहेत. ७ मार्च रोजी कनेरसर येथील  शिबिरास टाव्हरे  उपस्थित होते.नागरिकांना विविध प्रक्रारचे दाखले त्वरित दिले जात होते,तक्रारींचे निरसन केले जात होते. खेड तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारी निवारणार्थ उपविभागीय अधिकारी,प्रांत अनिल दौंडे,तहसीलदार प्रशांत बेडसे,उप अधिक्षक भुमी-अभिलेख नितीन सुर्यवंशी,नायब तहसीलदार रवींद्र मोरे,, चेतन मोरे,राम बीजे,अभिलेख कक्ष प्रमुख निलेश घोडके,सर्व अधिकारी,कर्मचारी यांनी...