Posts

पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन संपन्न

Image
पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन संपन्न मुंबई / रमेश औताडे  राजगुरुनगर येथे कुलस्वामिनी साहित्य परिषद आयोजित तिसरे विश्वसाहित्यिक, पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. ढसाळांच्या जयंतीदिनी आयोजन केले होते. ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डाॅ.श्रीपाल सबनीस यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरूवात झाली. दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे, संमेलनाध्यक्ष कांताराम सोनवणे, संमेलनाचे निमंत्रक अशोकराव टाव्हरे, स्वागताध्यक्ष प्रकाश शितोळे, ज्येष्ठ साहित्यिक म.भा.चव्हाण, बाजार समिती सभापती व जि.प.सदस्य ॲड.विजयसिंह शिंदे, काव्यसंमेलनाध्यक्ष अनंत धनसरे, राजगुरुनगर सह बँकेचे मा.अध्यक्ष दिनेश ओसवाल, राजेंद्र सांडभोर, खेड तालुका पत्रकार संघाचे मा.अध्यक्ष सुनील थिगळे , कवयित्री ललिता सबनीस, दिलीपराव माशेरे, संतोष ताम्हाणे, बबनराव काटकर, कनेरसरच्या सरपंच सुनीताताई केदारी,प्रा.डाॅ.बाळासाहेब माशेरे, सुरेश क्षीरसागर, बाळासाहेब खरपुडे, कल्याणी पवार, संदीप म्हसुडगे तसेच साहित्यिक, विविध क्षेत...

नेत्रहीन तरुण-तरुणींसाठी 'स्वयंपाक प्रशिक्षण कार्यशाळा'

Image
नेत्रहीन तरुण-तरुणींसाठी  'स्वयंपाक प्रशिक्षण कार्यशाळा' मुंबई / रमेश औताडे गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील नेत्रहीन तरुण-तरुणींकडून स्वयंपाकाचे प्रशिक्षण मिळावे अशी मागणी होत होती. त्यांची ही मागणी आता लवकरच पूर्ण होणार आहे. नुतन गुळगुळे फाउंडेशन आणि टीम व्हिजन या संस्था रोटरी क्लब ऑफ विरारच्या सहकार्याने स्वागत थोरात यांच्या संकल्पनेनुसार त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अर्नाळा येथील 'स्वानंद सेवा सदन' प्रभात कॉलनी, अर्नाळा, विरार - पश्चिम, जिल्हा- पालघर येथे नेत्रहीनांसाठी "स्वयंपाक प्रशिक्षण कार्यशाळा" सुरू करत आहेत. अशी माहिती प्राध्यापक हेमंत सामंत यांनी दिली.         अर्नाळ्यातील पहिली प्रशिक्षण कार्यशाळा दि.१४ व १५ फेब्रुवारी २०२६ अशी दोन‌ दिवसांची निवासी असेल. या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण कार्यशाळेत पोहे, उपमा, गोडाचा शिरा, साबुदाण्याची खिचडी, भेळ आणि सॅन्डविच असे सोपे न्याहारीचे (ब्रेकफास्ट) पदार्थ शिकवले जातील. त्याचबरोबर वरण-भातासाठी कुकर कसा लावावा हे ही शिकवले जाणार आहे. या कार्यशाळेत काही कार्यकर्त्यांनाही हे प्रशि...

नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटल आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिनासाठी वचनबद्ध 'ग्रो ग्रीन' उपक्रमाच्या शुभारंभासह आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन साजरा

Image
नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटल आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिनासाठी वचनबद्ध 'ग्रो ग्रीन' उपक्रमाच्या शुभारंभासह आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन साजरा मुंबई / रमेश औताडे  आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिनानिमित्त, नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटल, मुंबईने एक विशेष जागरूकता आणि सहभाग कार्यक्रम आयोजित केला. कर्करोगाशी झुंजणाऱ्या मुलांच्या अदम्य धैर्य आणि दृढनिश्चयाचे साजरे करणे आणि लवकर निदान, वेळेवर उपचार आणि समग्र काळजीचे महत्त्व अधोरेखित करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. "पॉवर चॅम्प्स कॅन्सर: फ्रॉम चॅलेंज टू चेंज" या थीम असलेल्या या कार्यक्रमात रोगापेक्षा शक्ती मोठी आहे हा संदेश देण्यात आला आणि तरुण योद्ध्यांच्या प्रेरणादायी प्रवासावर प्रकाश टाकण्यात आला. एकता आणि उत्सवाच्या भावनेने भरलेल्या या कार्यक्रमाने रुग्णालयाच्या लॉबीमध्ये एक उबदार आणि समावेशक वातावरण निर्माण केले, जिथे कर्करोगाशी झुंजणारी मुले, त्यांचे कुटुंब, डॉक्टर, काळजीवाहक, देणगीदार आणि भागीदार संस्था आशा आणि एकतेने एकत्र आल्या. या कार्यक्रमाबद्दल बोलताना, बालरोग ऑन्कोलॉजी, हेमेटो-ऑ...

सक्षम २०२५-२६ संरक्षण क्षमता महोत्सवा ’ चा समारोप सोहळा १६ फेब्रुवारीला

Image
‘ सक्षम २०२५-२६ संरक्षण क्षमता महोत्सवा ’ चा समारोप सोहळा १६ फेब्रुवारीला मुंबई  / रमेश औताडे ‘सक्षम २०२५-२६ संरक्षण क्षमता महोत्सव’ या उपक्रमाचा समारोप सोहळा सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे. मंत्रालयासमोरील या सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी व सहभागी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ऊर्जा संरक्षण, कार्यक्षमता आणि जनजागृती या उद्देशाने राबविण्यात आलेल्या ‘सक्षम २०२५-२६ ’ उपक्रमांतर्गत विविध स्पर्धा, जनजागृती मोहीमा आणि मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांचा आढावा घेत यशस्वी सहभागी, संस्था व समन्वयकांचा गौरव समारोप सोहळ्यात केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवरांना तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य समन्वय (मार्केटिंग सर्व्हिसेस) विभागाचे मुख्य व्यवस्थापक दीपक जी. वाघ यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

जमिनीतच आमचा श्वास आहे; ती गेली तर आम्ही मारणार !

Image
जमिनीतच आमचा श्वास आहे; ती गेली तर आम्ही मारणार ! शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे विकासाचे फुलपाखरू मुंबई / रमेश औताडे  तिसरी मुंबई उभारणीच्या नावाखाली दाखवले जाणारे विकासाचे फुलपाखरू आज सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी भीतीचे आणि असुरक्षिततेचे प्रतीक बनले आहे. हा विकास आमचा नाही, तर आम्हाला आमच्या जमिनीतून, पाण्यातून आणि मुळातून उपटून टाकणारा आहे, अशी वेदना उरण तालुक्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत. पिढ्यान्‌पिढ्या जोपासलेली सुपीक शेती, भातखाचरं, फळबागा आणि गावाची ओळख असलेली जमीन आता कागदावरच्या रेषांमध्ये अडकली आहे. “आम्ही शेती करून जगतो, जमिनीत आमचा श्वास आहे. तीच जमीन गेली तर आम्ही कुठे जायचं?” असा सवाल एका ज्येष्ठ शेतकऱ्याने डोळ्यात पाणी आणून केला.  विकासाच्या नावाखाली जमिनी अधिग्रहित केल्या जात आहेत, पण त्याबदल्यात मिळणारी भरपाई अपुरी असून पर्यायी रोजगाराचे आश्वासन केवळ कागदावरच असल्याचे शेतकरी सांगतात. शेती गेली तर केवळ उत्पन्नच नाही, तर घर, कुटुंबाची सुरक्षितता आणि भविष्यही हिरावून घेतले जाते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक कुटुंबांना स्थलांतराची भीती सतावत आहे. “आज ...

देशव्यापी संपाबतात म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली माहिती

Image
मुंबई / रमेश औताडे  केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ गुरुवार, दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला मुंबईसह राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध शासकीय, निमशासकीय, महापालिका तसेच इतर आस्थापनांतील कामगार, कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने संपात सहभागी झाले. म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबई (संलग्न : हिंद मजदूर सभा) यांच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन श्रम संहितांमुळे कामगारांच्या हक्कांवर गदा येत आहे. कंत्राटीकरणाला प्रोत्साहन, खासगीकरणाची गती, सार्वजनिक क्षेत्रातील कपात, तसेच सामाजिक सुरक्षेतील अनिश्चितता यामुळे कामगार वर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला असल्याचे युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी सांगितले. यावेळी विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये हिंद मजदूर सभेचे सरचिटणीस श्री. निवृत्ती झुंजार, उपाध्यक्ष श्री. अशोक गायकवाड, कोषाध्यक्ष श्री. अशोक चव्हाण, केंद्र सचिव श्री. संजय गोरे आदींचा समावेश होता. त्यांनी केंद्र सरकारने कामगारांशी सवांद न साधता घेतलेल्या न...

मुंबई पालिका मुख्यालयातील महिला रक्षकांवर कारवाई,

Image
      मात्र  सुरक्षा अधिकाऱ्याला नक्की कोणाचे अभय ?  मुंबई  / रमेश औताडे  महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर पारदर्शक कारभाराची अपेक्षा व्यक्त होत असतानाच महिला सुरक्षा रक्षकांच्या प्रकरणात मात्र जुनीच कार्यपद्धती कायम असल्याचे चित्र दिसत आहे. मुख्यालयातील वादानंतर सात महिला सुरक्षा रक्षकांची बदली करण्यात आली; परंतु चर्चेत असलेल्या संबंधित अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्यालय मधील महिला कक्षात झालेल्या वादानंतर तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर सातही महिला सुरक्षा रक्षकांना केईएम, नायर, राजावाडी व शीव रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र या प्रकरणात एका अधिकाऱ्याची भूमिका चर्चेत असतानाही त्यांची चौकशी अथवा बदली न झाल्याने “ सत्तांतर झाले तरी संरक्षणाचीच पद्धत तीच काशी ? असा सवाल उपस्थित होत आहे.  तक्रार मागे घेण्यात आली असली तरी कारवाईचा फटका केवळ महिला कर्मचाऱ्यांनाच का, याबाबत सुरक्षा विभागात नाराजी आहे. नव्या नेतृत्वाने या प्रकरणात हस्तक्षेप करून निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी पुढे येत आहे. सुरक्षा अधिका...