Posts

१९ वर्षाच्या अन्यायाविरोधात रहिवाशांचा म्हाडा कार्यालयावर मोर्चा

Image
मुंबई / रमेश औताडे  म्हाडा न्यू पीएमजीपी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, मुलुंड (पूर्व) येथील १,३९९ सभासदांचा पुनर्विकास प्रकल्प सन २००७ पासून सुरू असून, तब्बल १९ वर्षे उलटूनही हा प्रकल्प अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. आजही ६०६सदनिका व ४७ दुकाने म्हाडा प्रशासनाकडून बांधून पूर्ण करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या प्रकल्पातील रहिवासी व सभासद गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या हालअपेष्टा सहन करीत आहेत. गेल्या वर्षभरापासून बाधित रहिवासी सभासदांनी म्हाडा मुख्यालय, बांद्रा येथे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) व उपाध्यक्ष (VP) यांची वारंवार भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना वेळ देण्यात येत नव्हती. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत जनकल्याण रहिवासी विकास समितीच्या वतीने दिनांक ९ जून २०२६ रोजी म्हाडा मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सुमारे २५० हून अधिक बाधित रहिवासी सभासद सहभागी झाले होते. तसेच छत्रपती शासन पक्षाचे संस्थापक मा. नामदेवराव जाधव साहेब व समितीचे कायदेशीर सल्लागार यांनी या आंदोलनास मोलाचे सहकार्य केले. मोठ्या संख्येने नागरिक म्हाडा कार्यालयात दाखल झा...

रेहान मेमन यांच्याकडून अनधिकृत कृत्याचे पालिकेला निवेदन

Image
मुंबई  / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  मुंबई महानगरपालिका हद्दीतील काही भागांमध्ये सुरू असलेल्या कथित अनधिकृत बांधकामे आणि परवानगीविना चालणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांबाबत संबंधित यंत्रणांनी चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी भाजप अल्पसंख्याक आघाडीचे राज्य सचिव रेहान मेमन यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या पूर्व विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिल्याचे सांगितले आहे. मेमन यांनी आपल्या निवेदनात काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप केला असून, संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच, महानगरपालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामे अथवा परवानगीविना सुरू असलेल्या व्यवसायांबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी, असेही त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, या आरोपांबाबत महानगरपालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. संबंधित विभागाकडून याबाबत प्रतिक्रिया मिळाल्यानंतर ती प्रसिद्ध करण्यात येईल.

जुनी पेन्शनसाठी शरद पवारांना निवेदन;

Image
जुनी पेन्शनसाठी शरद पवारांना निवेदन;  मुंबईत सविस्तर चर्चेसाठी भेटीचे आश्वासन मुंबई / रमेश औताडे  शिरदवाड येथे राज्याध्यक्ष विजय शिरोळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची भेट; १९८२ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मांडल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरदवाड येथे माजी आमदार कै. दत्ताजीराव कदम यांच्या शतकपूर्ती कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते Sharad Pawar यांची जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन १९८२ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत निवेदन सादर केले. यावेळी मुंबई येथे स्वतंत्र भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा करण्याची विनंती करण्यात आली असून पवार यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. शिरदवाड येथे आयोजित कै. दत्ताजीराव कदम यांच्या शतकपूर्ती कार्यक्रमासाठी शरद पवार उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष विजयजी शिरोळकर, राज्य सहसचिव सुनील कांबळे, बनसोडे सर, अदुरे सर तसेच किरणकुमार कोळी यांनी पवार यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने जुनी पेन्शन योजना ल...

बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे यांची मागणी

Image
मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित प्रकरणाबाबत ठोस भूमिका घेण्याची मागणी केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात इंगळे यांनी दावा केला की, अजित पवार यांच्या कथित विमान अपघात प्रकरणाबाबत विविध शासकीय यंत्रणांकडे पाठपुरावा करण्यात आला असून अद्याप समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. त्यांनी असेही म्हटले की, या विषयावर संसद आणि विधानसभेत प्रश्न उपस्थित झाल्याचे सांगितले जात असले तरी पुढील कार्यवाहीबाबत स्पष्टता दिसून येत नाही. इंगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी  अजित पवार यांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिकृत ठराव मंजूर करावा, अशी मागणी केली. "जर पक्षाच्या नेत्यांना या विषयावर ठोस भूमिका घेता येत नसेल, तर त्यांनी अजित पवार यांच्या नावाचा राजकीय वापर टाळावा," असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, संबंधित प्रकरणात शासन आणि प्रशासनाकडून लेखी उत्तर मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली. या विषयावर समाधानकारक प्...

भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय मंत्री बाबूभाई पटेल यांचा महाराष्ट्र दौरा

Image
भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय मंत्री  बाबूभाई पटेल यांचा महाराष्ट्र दौरा शेतकरी प्रश्नांवर राज्यव्यापी आढावा मुंबई / रमेश औताडे  पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय मंत्री तथा महाराष्ट्र प्रांत संपर्क अधिकारी बाबूभाई पटेल , सुभाष महाजन तसेच इतर मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होते,बाबूभाई पटेल यांनी पत्रकार आणि मीडिया यांच्याशी संवाद साधताना, सध्या मी  महाराष्ट्र दौऱ्यावर असून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक बैठका, शेतकरी संवाद आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. महाराष्ट्र प्रांतातील २५ जिल्ह्यांची जबाबदारी त्यांच्याकडे असून सध्या दौऱ्याचा अंतिम टप्पा सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील कार्यकारिणी बैठकीपासून या टप्प्याची सुरुवात झाली असून मुंबईनंतर पालघर, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांचा दौरा केला जाणार आहे.ते म्हणाले की, १३ व १४ जून रोजी पुणे येथे भारतीय किसान संघाच्या महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.  या बैठकीला संघाचे अखिल भारतीय अध्यक्ष श्री. साई रेड्डी तसेच अखिल भारतीय स...

तहसीलदार प्रशांत बेडसे यांचा मोठा कायदेशीर विजय

Image
मुंबई / पी आर न्यूज ( रमेश औताडे)  खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बडतर्फ तलाठ्यावरच आता होणार एफआयआर ! ​उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची शनिवारी सुट्टीच्या दिवशी 'तातडीची सुनावणी';  वरोरा न्यायालयाच्या एकतर्फी आदेशाला तत्काळ स्थगिती सविस्तर वृत्त.... शासकीय कर्तव्य बजावत असताना प्रामाणिक अधिकाऱ्यांना विनाकारण वेठीस धरणाऱ्या, ब्लॅकमेल करणाऱ्या 'भुरट्या' माहिती अधिकार कार्यकर्त्यांना आणि खोट्या तक्रारदारांना राजगुरुनगर (खेड) चे विद्यमान तहसीलदार श्री. प्रशांत बेडसे यांनी उच्च न्यायालयाच्या माध्यमातून एक सणसणीत कायदेशीर चपराक लगावली आहे. उच्च न्यायालयाच्या मुंबई-नागपूर खंडपीठाने सुट्टीच्या दिवशी (शनिवारी) या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विशेष तातडीची सुनावणी घेत, बेडसे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांवर एफआयआर (FIR) दाखल करण्याच्या वरोरा न्यायालयाच्या  आदेशाला तत्काळ स्थगिती  दिली आहे. ​या निर्णयामुळे प्रशासनात काम करणाऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, विनाकारण त्रास देणाऱ्या प्रवृत्तींना एक भक्कम जरब बसली आहे. ​प्रकरणाची पार्श्वभूमी आण...

अतिक्रमण हटविण्यासाठी सनय चे आंदोलन

Image
मुंबई / रमेश औताडे कळवा परिसरातील कथित अतिक्रमणांवर कारवाई करण्यात प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईविरोधात सनय छत्रपती शासन पक्षाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. पक्षाचे मुंबई अध्यक्ष सर्जेराव निकम यांच्या नेतृत्वाखाली ३ जून २०२६ रोजी कळवा प्रभाग समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी होणार असून, संबंधित अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. अतिक्रमण होत असताना त्याकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कळवा परिसरातील संबंधित प्रकरणात कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त ललिता जाधव यांनी केलेल्या प्रशासकीय नोंदींमध्ये अतिक्रमण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच अतिक्रमण हटविण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. मात्र, प्रक्रिया पूर्ण होऊन सुमारे चार महिने उलटून गेल्यानंतरही प्रत्यक्ष...