Posts

दलित पॅंथरच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

Image
दलित पॅंथरच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन मुंबई / रमेश औताडे  दलित पॅंथर या संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन कामोठे, नवी मुंबई येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांनी भूषवले, तर स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. घनश्याम भोसले होते. आरपीआय कामोठे शहराध्यक्ष ॲड. मंगेश धीवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. समाजावरचा अन्याय थांबत नाही, त्यामुळे सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन दलित पॅंथरमध्ये सहभागी होण्याची गरज आहे.असे असे मुंबई अध्यक्ष प्रमोद निकम यांनी सांगितले. नगरसेवक हॅप्पी सिंग, उद्योजक दयानंद , प्रमोद लोखंडे, सुप्रिया बनसोडे, अरविंद मोरे, मुजीबभाई शेख, रमेश गवारी, सखाराम पाटील, अंकुश आवडे, आकाश बोंडे, तसेच मनोज गायकवाड (कोकण प्रांत अध्यक्ष) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुंबई अध्यक्षपदी प्रमोद निकम तर  रायगड जिल्हाध्यक्षपदी सुदर्शन साबळे यांची नियुक्ती केली. १९७२ साली पद्मश्री नामदेव दादा ढसाळ यांनी स्थापन केलेल्या या संघटनेने सामाजिक न्याय, समानता आणि स्वाभिमानासाठी मोठे योगदान दिले...

नागरिकांना न्यायासाठी न्यायालयातच जावे लागत असेल तर प्रशासन कशासाठी !

Image
नागरिकांना न्यायासाठी न्यायालयातच जावे लागत असेल तर प्रशासन कशासाठी !  अखेर धरणे आंदोलन सुरू  मुंबई / रमेश औताडे  पुणे जिल्ह्यातील खेड येथील तत्कालीन तहसीलदार यांनी एका प्रकरणी भोगावटा एकची कार्यवाही अनाधिकाराने करूनही कारवाई नाही. महसुल विभाग, ज ५ यांनी तीन पत्र एक वर्षापुर्वी देऊनही जिल्हाधिकारी पुणे यांचा अहवाल शासनास जात नाही या व इतर विषयांबाबत प्रशासन दिरंगाई करीत असल्याने सामाजिक कार्यकर्ते, कवी-लेखक अशोकराव टाव्हरे यांनी  जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे.  सुदाम बोरकर, शरद टाकळकर, गणेश मोरे, प्रदीप कर्पे, दत्तात्रय सावंत, किरण बाविस्कर हे बाधित नागरिक आंदोलनात सहभागी झाले आहेत. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याने अनेक नागरिक समस्या घेऊन येतात. काहींना अनेक हेलपाटे मारूनही तहसील व प्रांत कार्यालय खेड दाद देत नाही. १५५ अन्वये चुकीचे आदेश दिल्याबाबत महसुलमंत्री व जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे केलेल्या एका,तक्रारींमध्ये उपविभागीय अधिकारी, खेड यांनी जुलै २०२५ मध्ये १० दिवसात अहवाल देण्यासाठी तहसीलदार खेड यांना पत्र देऊनही अद...

आपल्याला हवी हवीशी वाटणारी " हे काय नवीन " मालिका

Image
आपल्याला हवी हवीशी वाटणारी " हे काय नवीन " मालिका मुंबई / रमेश औताडे  आपल्याशा वाटणाऱ्या कथाकथानाचे हक्काचे व्यासपीठ झी 5 वर  'हे काय नवीन?’ या नवीन ओरिजनल सिरीजचे आता स्ट्रिमिंग होणार असून या सिरीजमध्ये खऱ्या आयुष्यात एकमेकांचे जोडीदार असलेल्या उमेश कामतने आदित्य तर प्रिया बापट हिने रमाची भूमिका साकारली आहे. ही मालिका आकर्षण, आराम आणि प्रामाणिकपणाचा एक अतिरिक्त पदर उलगडते जो केवळ एक वास्तविक बंध निर्माण करणारा आहे.  वरुण नार्वेकर दिग्दर्शित, या सिरीजमध्ये आयुष्यातील मोठे टप्पे गाठल्यानंतर काय घडते यावर एक प्रेमळ, जीवनाच्या पैलूवरील भाष्य आहे. प्रिया बापट, उमेश कामत, शुभांगी गोखले, उदय टिकेकर, सुयोग गोऱ्हे, राजसी भावे, ओमकार गोवर्धन, तन्वी कुलकर्णी आणि पायल जाधव अशा उत्कृष्ट कलाकारांच्या टीमसह, ही सिरीज रमा आणि आदित्य यांचे चित्रण करते, ज्यांचे आयुष्य सुरळीत, पुरेसे नीट जगलेले आहेत.  दैनंदिन जीवनाच्या पार्श्वभूमीवर हे काय नवीन ? ही सिरीज अनेकदा दुर्लक्ष करत असलेल्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये, मूक विरामांमध्ये, बदलत्या स्वप्नांमध्ये आणि दीर्घकालीन नातेसंबं...

आम्रपाली ची काश्मीर ते कन्याकुमारी बाईक मोहीम

Image
वनरक्षक आम्रपाली पडघण ची 'कन्याकुमारी ते काश्मीर' ऐतिहासिक बाईक मोहीम संरक्षणासोबतच जनजागृतीचा नवा अध्याय ! मुंबई  / रमेश औताडे  निसर्ग संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणासाठी झोकून देणाऱ्या बोर व्याघ्र प्रकल्पातील वनरक्षक आम्रपाली देवीदास पडघण आता एका धाडसी मोहिमेसाठी सज्ज झाल्या आहेत. 'फॉरेस्ट टू फ्रंटियर' (Forest to Frontier) या संकल्पनेखाली त्या कन्याकुमारी ते काश्मीर (K2K) असा सुमारे ३,६०० किलोमीटरचा प्रवास सोलो बाईक राईडद्वारे पूर्ण करणार आहेत. आम्रपाली या गेल्या ९ वर्षांपासून महाराष्ट्र वन विभागात कार्यरत असून, सध्या त्या बोर व्याघ्र प्रकल्पातील 'नवेगाव बीट' येथे कार्यरत आहेत. केवळ कर्तव्य म्हणून नव्हे, तर एक पॅशन म्हणून त्या जंगलाची राखण करतात.  * वन्यजीव तज्ज्ञ: त्यांनी बोर अभयारण्यात ११४ हून अधिक फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद केली आहे.  * सर्पमित्र: मानवी वस्तीत शिरलेल्या शेकडो सापांना (ज्यात नाग आणि अजगरांचा समावेश आहे) त्यांनी सुरक्षितरीत्या जीवनदान दिले आहे. त्यांच्या सापांवरील संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर २०२५ मध...

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे " वृक्ष संजीवनी " अभियान

Image
    पर्यावरण रक्षक व स्माईल फाऊंडेशन यांचाही सहभाग मुंबई / रमेश औताडे    बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक ठिकाणांवरील वृक्षांच्या संवर्धनासाठी  ‘ वृक्ष संजीवनी ’ अभियान राबविण्यात येत आहे.  जागतिक वसुंधरा दिनानिमित्त  १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात पर्यावरण रक्षक व स्माईल फाऊंडेशन या संस्था सहभागी होणार आहेत.  बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सध्या एकूण २९ लाख ७५ हजार २८३ वृक्ष आहेत. त्यापैकी सुमारे १३ लाख ५४ हजार ९६६ वृक्ष रस्त्यांच्या कडेला, उद्यानांमध्ये व इतर सार्वजनिक ठिकाणी आहेत. या वृक्षांच्या आरोग्य संवर्धनासाठी ‘ वृक्ष संजीवनी ’ हे अभियान महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या अभियान अंतर्गत वृक्षांभोवती साचलेले सिमेंट- काँक्रिट काढून त्याजागी मोकळी लाल माती टाकणे, झाडांच्या खोडांवर ठोकलेले खिळे, जाहिरात फलक, दोऱ्या व केबल्स काढणे, तसेच पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या फांद्यांची छाटणी करणे अशा उपाययोजना केल्या जातात. झाडांच्या खोडांना गेरू-चुना लावून त्या...

तापमानातील असामान्य बदलामुळे अकाली मृत्यूचे संकट

Image
मुंबई / रमेश औताडे हवामान बदलाचा परिणाम आता अधिक गंभीर स्वरूपात समोर येत असून, तापमानातील असामान्य बदलामुळे  दरवर्षी सुमारे ७ लाख लोकांचा अकाली मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोग्य आणि पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय संशोधनांमधून ही बाब स्पष्ट झाली आहे. तज्ञांच्या मते, वाढत्या उष्णतेच्या लाटा, अनियमित पाऊस, दुष्काळ आणि थंडीतील तीव्र बदल यामुळे मानवी आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः वृद्ध, लहान मुले आणि गरिबी रेषेखालील नागरिक यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. जागतिक स्तरावर परिस्थिती आणखी चिंताजनक असून, २०५० पर्यंत हवामान बदलामुळे लाखो अतिरिक्त मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उष्णतेमुळे होणारे हृदयविकार, श्वसनाचे आजार, तसेच संसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, ही केवळ भविष्यातील समस्या नसून सध्या सुरू असलेले संकट आहे. तापमानवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने प्रभावी धोरणे राबविण्याची गरज आहे. हरित क्षेत्र वाढवणे, प्रदूषण नियंत्रण आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन यावर भर देणे अत्याव...

न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे फेरीवाल्यांना न्याय द्या

Image
मुंबई / रमेश औताडे  अधिकृत व अनधिकृत असे फेरीवाले कोण ? याबाबत न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाहून पालिका पोलिस प्रशासन व सरकारचे प्रतिनिधी तसेच रेल्वे हद्दीतील किंवा इतर कोणाच्याही हद्दीतील फेरीवाले यांच्याबाबत योग्य तो तोडगा काढत फेरीवाल्यांना न्याय द्यावा. अशी मागणी आझाद होकर्स युनियन चे संस्थापक अध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी खासदार संजय निरुपम, हुसेन पटेल, ललित दोशी पप्पू, जय हिंदुस्थान हॉकर्स युनियन फेरीवाला संघर्ष समिती चे अध्यक्ष मंजूर मकबूल खाँ, जय शंकर सिंह उपस्थित होते. पोलिस विभाग, पालिका यंत्रणा, सरकारी बाबू व इतर संबंधित विभाग या प्रश्नाकडे गांभीर्याने का पाहत नाही ? या थेट प्रश्नाला उत्तर देताना संजय निरुपम म्हणाले की, हप्ते बंद होतील या भीतीने फेरीवाला प्रश्न भिजत ठेवायचा. न्यायालय किंवा शासन काय म्हणत आहे , याकडे कानाडोळा करत आपले मनमानी काम करत रहायचे ही वृत्ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत फेरीवाल्यांचा प्रश्न असाच रेंगाळत राहणार.