Posts

निवृत्तीनंतरही अशोकराव नगरकर यांचा अनुभव, मार्गदर्शन आणि योगदान निरंतर सुरू राहील

Image
           लेखक कवी अशोकराव टाव्हरे यांचा विश्वास मुंबई / रमेश औताडे  मुख्याध्यापक अशोकराव नगरकर यांनी आपल्या ३२ वर्षाच्या सेवाकाळात शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सामाजिक जाणीव यांना प्राधान्य दिले. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले प्रयत्न प्रेरणादायी आहेत. निवृत्तीनंतरही समाजासाठी त्यांचा अनुभव, मार्गदर्शन आणि योगदान निरंतर सुरू राहील असे मनोगत भाषणात लेखक कवी अशोकराव टाव्हरे यांनी  सांगितले.  राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोकराव नगरकर यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न झाला.जुन्नर येथील आदिवासी शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी देवराम मुंढे, सामाजिक कार्यकर्ते, कवी-लेखक अशोकराव टाव्हरे, निवृत्त शिक्षणाधिकारी अशोकराव कडलग, आदिवासी शिक्षण संस्थेचे संचालक रावते, रिपब्लिकन ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष नाना डोळस, मा.पंचायत समिती सदस्य कल्याणशील देखणे, खेड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय बोरकर,सचिव रामदास पवार, भाजपचे खेड ता.उपाध्यक्ष दिलीपराव माशेरे,उद्योजक प्रशांत म्हसुडगे...

शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे विकासाचे फुलपाखरू

Image
            जमिनीतच आमचा श्वास आहे; ती गेली तर आम्ही मारणार ! मुंबई / रमेश औताडे  तिसरी मुंबई उभारणीच्या नावाखाली दाखवले जाणारे विकासाचे फुलपाखरू आज सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी भीतीचे आणि असुरक्षिततेचे प्रतीक बनले आहे. हा विकास आमचा नाही, तर आम्हाला आमच्या जमिनीतून, पाण्यातून आणि मुळातून उपटून टाकणारा आहे, अशी वेदना उरण तालुक्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत. पिढ्यान्‌पिढ्या जोपासलेली सुपीक शेती, भातखाचरं, फळबागा आणि गावाची ओळख असलेली जमीन आता कागदावरच्या रेषांमध्ये अडकली आहे. “आम्ही शेती करून जगतो, जमिनीत आमचा श्वास आहे. तीच जमीन गेली तर आम्ही कुठे जायचं?” असा सवाल एका ज्येष्ठ शेतकऱ्याने डोळ्यात पाणी आणून केला.  विकासाच्या नावाखाली जमिनी अधिग्रहित केल्या जात आहेत, पण त्याबदल्यात मिळणारी भरपाई अपुरी असून पर्यायी रोजगाराचे आश्वासन केवळ कागदावरच असल्याचे शेतकरी सांगतात. शेती गेली तर केवळ उत्पन्नच नाही, तर घर, कुटुंबाची सुरक्षितता आणि भविष्यही हिरावून घेतले जाते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक कुटुंबांना स्थलांतराची भीती सतावत आहे. “आज जमीन ज...

उदयोन्मुख वकिलाचे अभीष्टचिंतन

Image
*मुंबई उच्च न्यायालयातील उदयोन्मुख वकील मितांशु स्नेहा राजेश पुरंदरे यांचे त्यांच्या फोर्ट येथील कार्यालयात जाऊन अभीष्टचिंतन करतांना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी, सोबत ज्येष्ठ पत्रकार राजेश पुरंदरे.*

भारत–श्रीलंका पर्यटन व व्यापार संबंध अधिक दृढ

Image
मुंबई / रमेश औताडे  श्रीलंका टुरिझम प्रमोशन ब्युरो यांच्या वतीने मुंबईत ‘श्रीलंका टुरिझम नेटवर्किंग इव्हिनिंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पर्यटन, व्यापार आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. या कार्यक्रमात श्रीलंकेच्या पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधींसह भारतातील टूर ऑपरेटर्स, ट्रॅव्हल एजंट्स, माईस  प्लॅनर्स, कॉर्पोरेट्स, एअरलाईन्स आणि माध्यम प्रतिनिधींनी सहभाग घेतला. पर्यटन, व्यापार आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी श्रीलंकेची वाढती लोकप्रियता यावेळी अधोरेखित करण्यात आली. २०२५ मध्ये श्रीलंकेला २३.६ लाख आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी भेट दिली असून ही विक्रमी संख्या आहे. यामध्ये ५.३१ लाख भारतीय पर्यटकांचा समावेश असून एकूण पर्यटकांपैकी सुमारे २७ टक्के वाटा भारताचा आहे. श्रीलंका टुरिझम प्रमोशन ब्युरो आणि श्रीलंका एअरलाईन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी श्रीलंकेतील समुद्रकिनारे, सांस्कृतिक वारसा, साहसी पर्यटन, योग आणि वेलनेस सुविधांवर प्रकाश टाकला. वाढत्या प्रवाशांच्या संख्येमुळे मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद ...

जेफ्री एपस्टीन अहवालाच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे आंदोलन

Image
मुंबई / रमेश औताडे  आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या जेफ्री एपस्टीन प्रकरणासंदर्भात अलीकडे समोर आलेल्या अहवालांमुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून या प्रकरणातील सत्य बाहेर यावे, पारदर्शकता राखली जावी आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण व्हावे, या मागणीसाठी मुंबई प्रदेश युवक काँग्रेस युवक अध्यक्ष झीनत शब्रीन यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान जवळ मुंबई प्रेस क्लब समोर निषेध आंदोलन करण्यात आले. जेफ्री एपस्टीन प्रकरणात मानवी हक्क, सत्तेचा गैरवापर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते. अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये सत्य दडपले जाऊ नये, जनतेसमोर सर्व बाबी स्पष्ट व्हाव्यात, यासाठी युवक काँग्रेसने आपली भूमिका मांडली. यावेळी पंकज चौधरी,हुसेन शेख, अमनदीप सैनी, आणि तेजस चांदुरकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलन पूर्णतः अहिंसक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. आंदोलनासाठी मुंबई पोलिसांची पूर्वपरवानगी घेण्यात आली होती. सार्वजनिक सुव्यवस्था, वाहतूक किंवा कायदा-सुव्यवस्थेला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता आयोजकां...

बारामतीतील खाजगी विमान धावपट्टीवर प्रश्नचिन्ह

Image
मुंबई / रमेश औताडे  बारामती (पुणे) येथे उभारण्यात आलेल्या विमान धावपट्टीबाबत सुरक्षितता आणि नियमपालनाच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी या धावपट्टीच्या कार्यपद्धतीवर चिंता व्यक्त करत केंद्र सरकारकडे तक्रार केल्याची माहिती दिली आहे. सेंगर यांच्या म्हणण्यानुसार, बारामती परिसरात सुरू असलेली ही विमान धावपट्टी आवश्यक मूलभूत सुविधा आणि सुरक्षा यंत्रणांशिवाय कार्यरत असल्याचा दावा करण्यात येत आहे. विमान वाहतुकीसाठी आवश्यक असलेली सिग्नल व्यवस्था, नियंत्रण प्रणाली आणि आपत्कालीन सुविधा या ठिकाणी अपुऱ्या असल्याचे ते सांगतात. या पार्श्वभूमीवर, संबंधित यंत्रणांनी या धावपट्टीची सखोल तपासणी करावी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. बारामती परिसरात यापूर्वी घडलेल्या एका दुर्दैवी विमान दुर्घटनेचा संदर्भ देत, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी नियमांचे काटेकोर पालन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्...

सरकारी बाबूंच्या हप्त्यांमुळे रस्त्यावरील अतिक्रमण कायम

Image
      प्रशासन लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे अपघाताचा धोका मुंबई / रमेश औताडे  राज्यातील प्रमुख शहरे आणि उपनगरांमध्ये रस्ते, फुटपाथ आणि सार्वजनिक मोकळ्या जागांवरील अतिक्रमणांनी अक्षरशः विळखा घातला असून लोकप्रतिनिधी सोबतच सरकारी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासन मात्र केवळ तात्पुरत्या कारवायांपुरतेच मर्यादित राहत असल्याचा आरोप पादचारी करत आहेत. अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाल्याने आपत्कालीन सेवा अडथळ्यात सापडण्याचा धोका वाढला आहे. रुग्णवाहिका किंवा अग्निशमन वाहन वेळेत पोहोचू शकणार नाही, अशी स्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. फुटपाथवर अतिक्रमण झाल्याने पादचाऱ्यांना थेट वाहनांच्या मार्गातून चालावे लागत आहे. परिणामी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गर्दीच्या भागात वाहतुकीचा वेग मंदावत असून अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती व...