Posts

पागडीमुक्त मुंबई आंदोलनाची १५ ऑगस्टपासून सुरुवात

Image
मुंबई / रमेश औताडे मुंबईतील ब्रिटिशकालीन पागडी व्यवस्थेचा संपूर्ण अंत करून पागडी रहिवाशांना त्यांच्या घरांवर मालकी हक्क द्यावा, तसेच बेदखल झालेल्या रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करावे, या प्रमुख मागण्यांसाठी ‘पागडीमुक्त मुंबई’ अभियानाची सुरुवात १५ ऑगस्ट २०२६ पासून करण्यात येणार आहे. कुलाब्यापासून बोरिवलीपर्यंत आणि सायनपासून डोंबिवलीपर्यंत सुमारे ३० हजार पागडी इमारती असून, त्यामध्ये अंदाजे २५ लाख नागरिक राहत असल्याचा दावा अभियानाच्या आयोजकांनी केला आहे. अनेक कुटुंबे अत्यंत कमी क्षेत्रफळाच्या घरांमध्ये राहत असून काही ठिकाणी सामायिक स्वच्छतागृहांचा वापर करावा लागत आहे. वृद्ध, आजारी नागरिकांसह महिला आणि लहान मुलांना असुरक्षित परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचेही सांगण्यात आले. अनेक जुन्या पागडी इमारतींमध्ये स्वच्छता, अग्निसुरक्षा, संरचनात्मक सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे हा केवळ पुनर्विकासाचा प्रश्न नसून नागरिकांच्या सुरक्षिततेचा, मानवी प्रतिष्ठेचा आणि सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचा प्रश्न असल्याचे अभियानाच्या वतीने स्पष्ट करण्यात...

बेरोजगार सेवा संस्थांना नवसंजीवनीची गरज

Image
पारंपरिक कामांपलीकडे बहुउद्देशीय उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याचे आवाहन मुंबई / रमेश औताडे मुंबईतील बेरोजगार सहकारी संस्थांसमोरील प्रश्न गंभीर असून, केवळ पारंपरिक कामांवर अवलंबून न राहता संस्थांनी बहुउद्देशीय उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून काळानुसार स्वतःला अपडेट करणे गरजेचे आहे, असा सूर मुंबईत झालेल्या सहकार भूषण पुरस्कार सोहळ्यात उमटला. बेरोजगार संस्थांना लाखो रुपयांची कामे उपलब्ध होण्याची शक्यता असतानाही अनेक ठिकाणी योग्य अंमलबजावणी होत नसल्याने संस्थांचा अपेक्षित विकास होत नाही. काही संस्थांना आर्थिक, प्रशासकीय तसेच कामगारांच्या पीएफ आणि ईएसआयसीशी संबंधित अडचणींचाही सामना करावा लागत असल्याचे  नमूद करण्यात आले. विजय केदारे यांनी काम वाटप समितीच्या माध्यमातून बेरोजगार संस्थांना कामे मिळवून देण्याची गरज व्यक्त केली. संस्थांनी केवळ पारंपरिक कामांवर अवलंबून न राहता नवीन व्यवसायाच्या संधी शोधाव्यात, असे आवाहन करण्यात आले. प्रमोद तायडे यांनी पालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध होत असली तरी खासगी क्षेत्रातही संधी निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले. पीएफ, ई...

डॉ. संजय कांबळे-बापेरकर याची महत्त्वपूर्ण माहिती

Image
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  संपादक रमेश औताडे  मा.न्‍यायालयाच्या निर्णयाअनुषंगाने, केंद्र शासन तसेच महाराष्‍ट्र शासन यांनी त्‍यांच्‍या कर्मचा-यांना, “जुनी ​ ​पेन्‍शन” योजना लागु करणेसाठी  निर्गमित केलेले शासन निर्णय आणि बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने​ ​यापूर्वी संमत केलेले ठराव व निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार, पालिका  कर्मचा-यांना ​ “जुनी पेन्‍शन”योजना लागू करण्यास पालिका प्रशासन दिरंगाई करीत असल्याने स्थायी समिति अध्यक्ष श्री प्रभाकर शिंदे यांना “म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने” ने पत्र दिले आहे. अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी स्थायी समिती अध्यक्षांकडे संयुक्त बैठकीची मागणी केली आहे. केंद्र शासनामध्‍ये दिनांक ३१.१२.२००३ नंतर व महाराष्‍ट्र शासनामध्‍ये दिनांक ०१.११.२००५ नंतर नियुक्‍ती झालेल्या कर्मचार्यांना “जुनी पेन्‍शन”योजना बंद करण्‍यात आलेली आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेमध्‍ये दिनांक ०५.०५.२००८ नंतर नियुक्‍त झालेल्‍या  कर्मचा-यांनाही केंद्र शासन व महाराष्‍ट्र शासन यांच्‍या धर्तीवर जुनी पेन्‍शन योजना बंद करुन, नवीन परिभाष...

बेरोजगार सेवा सहकारी संस्थांचे सर्व प्रश्न मार्गी लागणार

Image
मुंबई / रमेश औताडे  बृहन्मुंबई बेरोजगार व सेवा सहकारी संस्थांचे सर्व प्रश्न समस्या लवकरच एक बैठक लाऊन मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन सहकार राज्य मंत्री पंकज भोयर यांनी दिले. बृहन्मुंबई बेरोजगार व सेवा सहकारी संस्थांचे फेडरेशन लि. आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने 'सहकार भूषण पुरस्कार – २०२६' आणि विशेष सहकार मेळावा नुकताच उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. फोर्ट येथील मुंबई बँकेच्या वसंतदादा पाटील सभागृहात ११ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाला बेरोजगार व सेवा सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठा प्रतिसाद दिला. बेरोजगार संस्थांचे मार्गदर्शक  नंदकुमार काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध संस्थांचा भव्य गौरव करण्यात आला. प्रमुख उपस्थिती आमदार प्रवीण दरेकर , सहनिबंधक शहाजी पाटील, शिवाजीराव नलावडे,  या सहकार मेळाव्यात प्रतिनिधींना व्यवसायाच्या विविध नव-नवीन संधी आणि व्यक्तिमत्व विकासावर सखोल मार्गदर्शन करण्यात...

बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी सागर तायडे आक्रमक

Image
मुंबई / रमेश औताडे इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी शासनाकडून जमा होणाऱ्या निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कामगारांच्या हक्काचा निधी त्यांच्या कल्याणकारी योजनांसाठीच खर्च होणे अपेक्षित असताना, त्याच्या वितरणात अनियमितता होत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समिती चे राज्य प्रमुख सागर तायडे यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली दिली. यावेळी काशिनाथ नखाते पुणे,प्रशांत मेश्राम अकोला, सुरेश पाटील पालघर,नितीन यादव सातारा,त्रिंबक मुंडे संभाजी नगर,नितीन वाकोडे बुलढाणा, भिमराव बागुल पालघर, पांडुरंग नरवाडे हिंगोली, अशोक वाघमारे परभणी, रविकांत सोनवणे रायगड, राज्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. राज्यात इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात मोठ्या संख्येने असंघटित कामगार कार्यरत आहेत. या कामगारांना सामाजिक सुरक्षा, आर्थिक मदत, आरोग्य, शिक्षण, घरकुल तसेच विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, नोंदणीकृत कामग...

रखडलेल्या प्रमुख रस्ते महामार्गांना आता गती मिळणार

Image
मुंबई / रमेश औताडे वाढती वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता रखडलेल्या प्रमुख महामार्ग प्रकल्पांना आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पुणे-शिरूर, हडपसर-यवत आणि तळेगाव-शिक्रापूर या मार्गांचे भूमिपूजन झाल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून, नाशिकफाटा-राजगुरुनगर मार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेलाही गती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते व लेखक अशोकराव टाव्हरे यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पुणे जिल्ह्यातील रस्ते प्रकल्पांबाबत लेखी पत्राद्वारे आभार व्यक्त केले. टाव्हरे यांची गडकरी यांच्या कार्यावर आधारित मराठीत विकासाचा राजमार्ग व इंग्रजीत हायवे ऑफ डेव्हलपमेंट ही पुस्तके प्रकाशित आहेत. पुणे-शिरूर, हडपसर-यवत, तळेगाव-शिक्रापूर महामार्गांचे झालेले भूमीपूजन व नाशिकफाटा ते राजगुरुनगर भूसंपादन प्रक्रीया पूर्णत्वास येत आहे. भुसंपादन प्रक्रीया पूर्णत्वास येत असून लवकरच नाशिकफाटा- राजगुरुनगर या इलेव्हेटेड मार्गाचे भूमीपूजन संपन्न होणार आहे. नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी...

रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरूच ; समाजसेविका वैशाली गावडे यांचा आंदोलनाचा इशारा

Image
मुंबई / रमेश औताडे मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील नावाजलेल्या महानगरपालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. मात्र, याच मुंबई महापालिकेच्या टी.बी. रुग्णालयात झुरळांचा सुळसुळाट झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्याऐवजी त्यांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्याचा आरोप महलत महिला मंडळ अध्यक्षा समाजसेविका वैशाली गावडे यांनी केला आहे. वैशाली गावडे यांनी रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. रुग्णालय परिसरात झुरळ, अस्वच्छता आणि स्वच्छतेच्या व्यवस्थेबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात त्यांनी संबंधित प्रशासनाकडे निवेदनही सादर केले आहे. टी.बी.सारख्या गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळणे अपेक्षित असताना रुग्णालयातच झुरळांचा उपद्रव वाढणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे गावडे यांनी म्हटले आहे. रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्थेवर नियमित देखरेख ठेवली जाते की नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. निवेदन देऊनही सुधारणा झाल...