Posts

भटक्या कुत्र्यांसाठी मुंबईत निवारा केंद्र..... विधानसभेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

Image
मुंबई / रमेश औताडे  राज्यातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने विविध स्तरांवर व्यापक उपाययोजना सुरू असून मुंबईतील भटक्या कुत्र्यांसाठी येत्या सहा महिन्यात निवारा केंद्र सुरू करण्यात येईल. अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यात एकूण १४ लाख ८० हजार भटकी कुत्री असून त्यापैकी ९४ हजार कुत्री मुंबईमध्ये आहेत. यावर्षी ६५ हजार कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले असून ९७ हजार ९६० कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.   मुलुंड आणि मालाड येथे तीन हजार स्वे.फूट तर  नाहुर येथे  आठ हजार ४११  स्वे.फूट जागेची मागणी महसूल विभागाकडे करण्यात आली आहे.  सर्वोच्च न्यायालयाने सूचित केल्यानुसार पुणे, मुंबई, कल्याण डोंबिवली, पिंपरी चिंचवड आणि नाशिक महानगर पालिकांनी प्राणी जन्म नियंत्रण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

ज्येष्ठ नागरिकांच्या 11 न्याय्य मागण्या तातडीने मान्य करा – फेस्कॉम ची राज्य व केंद्र सरकारकडे मागणी.

Image
सुरेश ईश्वर पोटे अध्यक्ष, FESCOM   मुंबई प्रादेशिक विभाग   संपर्क:- 9322401965  ईमेल:-  sureshipote@gmail.com महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (FESCOM) नाशिकच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी 11 महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. वाढती महागाई आणि आरोग्य खर्चामुळे ज्येष्ठ नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारने या मागण्यांवर तात्काळ निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी FESCOM ने केली आहे. *अधिवेशनात मंजूर झालेले 11 ठराव:* 1.  *वयोमर्यादा 65 वरून 60 करा:* सर्व शासकीय सवलती व कल्याणकारी योजना 60 वर्षे वयापासून लागू कराव्यात. 2.  *दरमहा ₹3000 मानधन:* गोवा, हरियाणा, दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही प्रत्येक ज्येष्ठाला दरमहा किमान ₹3000 मानधन नियमित द्यावे. 3.  *FESCOM ला 50% प्रतिनिधित्व:* राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक महामंडळावर FESCOM चे किमान 50% सदस्य असावेत. 4.  *FESCOM ला शासकीय मान्यता:* राज्यातील ज्येष्ठांचे व्यापक प्रतिनिधित्व करणारी संघटना म्हणून FESCOM ला अधिकृत मान्यता द्याव...

सकल मांग गारुडी समाजाच्या लढ्याला मोठे यश

Image
मुंबई / रमेश औताडे  सकल मांग गारुडी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी विधान भवन, मुंबई येथे आत्मदहन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनाची गंभीर दखल घेत मंत्री गिरीश महाजन यांनी समाजाच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. समाजाच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत मंत्री महोदयांनी येत्या १५ दिवसांच्या आत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे प्रस्तावित आत्मदहन आंदोलनास तात्पुरती स्थगिती देण्यात येत आहे.  यावेळी राष्ट्रीय नेते अमर कसबे, मुरलीधर गायकवाड, हरीश सकट, सचिन लोंढे, सुखदेव राखपसरे, अमोल राखपसरे, दिगंबर नाडे, राम सकट, पुंडलिक राखपसरे, भरत राखपसरे, भगवान ढालवाले, दादा ढाले, अनिल हातागळे, रमेश सकट, प्रकाश राक्षे, राहुल खडसे, नवनाथ राखपसरे, मधुकर सकट, राजेश सकट, उमेश कसबे, विजय कसबे, बाळू लोंढे, कुंदन सकट, भगवान लोंढे, नानू अहिर, प्रफुल सोलंकी, सुनील हातागळे तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांतील महिला, युवक, पदाधिकारी व शेकडो समाजबांधव उपस्थित होते. पी आर न्यूज मिडिया नेटवर्क...

आध्यात्मिक बहाई सभेची सामूहिक प्रार्थना

Image
मुंबई / रमेश औताडे मुंबईतील बहाई समुदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या  मुंबई बहाई आध्यात्मिक सभा या संस्थेच्या वतीने सामूहिक प्रार्थना आणि त्यासोबतच एका चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. दक्षिण मुंबईतील न्यू मरीन लाइन्स येथील कोर्ट चेंबर हॉल मध्ये बहाई समुदायाचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने एकत्र आले होते.  या कार्यक्रमात बोलताना सुश्री सोराबजी यांनी नमूद केले की, मानवता, शांतता आणि प्रेम ही या धर्माची मूळ तत्त्वे असून शतकांपूर्वी त्याची स्थापना झाली होती. बहाई धर्माचे संस्थापक बहाउल्लाह यांनी सरकारी छळ सोसूनही आपल्या अनुयायांच्या माध्यमातून अनेक देशांमध्ये या धर्माचा प्रसार केला.  मुंबई बहाई समुदायाच्या नेत्या नर्गिस गौर यांनी सांगितले की, जात आणि सामाजिक उतरंडीच्या पलीकडे जाऊन, मानवतेचा संदेश घेऊन सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे ही त्यांच्या आध्यात्मिक नेत्याची एक प्रमुख शिकवण आहे.  १८९२ मध्ये 'बहजी' (Bahji) येथे बहाउल्लाह यांचे निधन झाले, ज्याची आठवण आजही जपली जाते. आदरणीय बहाउल्लाह यांनी आपले जीवन मानवतेच्या एकतेसाठी समर्पित केले; जगाच्या कल्याणासाठी त्यांनी हद्द...

तर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची गरज पडणार नाही

Image
मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  आपला देश हा अफगाणिस्तान, इराण, इराक या देशातून औषधीकरिता कोट्यावधी रुपयाची अफू आयात करतो. अशी आयात बंद करा व आपल्या देशातील शेतकऱ्याला शेतीच्या दहा टक्के भागावर अफू लागवड करण्याची परवानगी द्या व आपणच जगाला अफू निर्यात करूया. असे केले तर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची सुद्धा गरज पडणार नाही. अशी मागणी  महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी  मुख्यमंत्र्यांना दिले आहे. हवामान बदल, अवकाळी पाऊस आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. अशा काळात महायुती सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी, पीक विमा, सिंचन प्रकल्प आणि कृषी पायाभूत सुविधांद्वारे बळीराजाला सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत तरीसुद्धा शेतकरी  आत्महत्या करीत आहेत. तसेच महाराष्ट्रातील उर्वरित भागात शेतकरी हा चिंतेच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे. खासगी कंपन्यांना अपू उत्पादन करण्याची परवानगी देण्याचा विचार सुरू आहे. त्यांना परवानगी दिली तर बजान हेल्थकेअर ही कंपनी परवानगी मिळणारी पहिली कंपनी ठरेल. सरकारने ज्या जिल्ह्यात शेतकरी आत्मह...

चार किलोमीटर लांब साडीला चौदा जागतिक पुरस्कार

Image
मुंबई / रमेश औताडे  विवाहित महिलांवरील लैंगिक अत्याचाराविरोधात जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ४ किलोमीटर लांबीच्या विशेष साडीला आणि त्यावर आधारित मोहिमेला जगभरात मोठा सन्मान मिळाला आहे. या मोहिमेने आरोग्य आणि सामाजिक जनजागृती क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील १४ प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले आहेत. तसेच महिलांच्या आरोग्य आणि हक्कांसाठी दिला जाणारा सर्वोच्च ग्रँड क्लिओ पुरस्कार देखील या मोहिमेला मिळाला आहे. मुंबईतील मिडिया मेडिक कम्युनिकेशन आणि कॅनडातील क्लिक हेल्थ यांनी रेड डॉट फाऊंडेशन  या संस्थेसाठी ही मोहीम राबवली होती. या मोहिमेत भारतीय स्त्रीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या साडीचा वापर करून महिलांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवण्यात आला. देशभरातून जमा झालेल्या हजारो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या या ४ किलोमीटर लांबीच्या साडीवर भरतकामाद्वारे नोंदवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ही साडी महिलांच्या न्यायासाठीची लोकभावना व्यक्त करणारे प्रतीक ठरली. प्रसिद्ध फॅशन डिझायनर निवेदिता सभो यांनी या साडीची रचना केली होती. मुंबईतील रॉयल ऑपेरा हाऊस येथे या विशेष साडीचे प्रदर्शन भरविण...

नाल्यात उतरून मनसेचा निषेध

Image
नवी मुंबई /  रमेश औताडे  नवी मुंबई घणसोली  विभागातील नोसिल नाका ते रिद्धी सिद्धी सोसायटी ब्रिज पर्यंत नाले साफसफाईच्या  कामाबाबत नाराजी व्यक्त करत घणसोली मनसेचे विभाग अध्यक्ष नितीन नाईक, रोहन पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नाल्यात उतरून निषेध व्यक्त केला.  घणसोली विभाग सचिव संजय कोळी म्हणाले,  नाल्यातील गाळ न काढल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने  नागरिकांना नाहक त्रास होत आहे. मनसेचे उपविभाग अध्यक्ष योगेश गायकर, शाखाध्यक्ष भरत लोंढे, दीपक साबले,केतन कोळी, संदीप डाकवे, महाराष्ट्र सैनिक भानुदास पाटील यांनी निषेध नोंदवला