Posts

मुंबईच्या रस्त्यावरची आपली हक्काची 'बेस्ट बस' आज व्हेंटिलेटरवर आहे.

Image
मुंबई / रमेश औताडे  मुंबईच्या रस्त्यावरची आपली हक्काची 'बेस्ट बस' आज व्हेंटिलेटरवर आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमाने २०२६-२७ या वर्षात ३,००० कोटी रुपयांच्या संभाव्य तुटवड्याचा जो इशारा दिला आहे, तो केवळ आकडा नाही तर याला जबाबदार मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या ठेकेदार धार्जिणा अट्टाहास. गेल्या आठ वर्षांत साचलेला एकूण ९,२८६ कोटींचा तोटा हा नैसर्गिक नसून, तो 'वेट लीज' खासगीकरण मॉडेलमुळे पद्धतशीरपणे खणलेला खड्डा आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका आपल्याच बससेवेला संपवण्याचा डाव आखतेय, ही ३१ लाख मुंबईकर प्रवाशांसाठी अत्यंत संतापजनक बाब आहे. २०१८ मध्ये बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या ३,२०० बस ताफ्यात होत्या, आज ती संख्या २४९ वर कशी आली? ३१ लाख मुंबईकरांना रोज वेठीस धरणारे आणि नफेखोरी करणारे खासगी कंत्राटदार प्रशासनाचे इतके लाडके का? स्वतःच्या बस खरेदी करायला पालिकेकडे पैसे नाहीत, पण 'ब्युटीफिकेशन'च्या नावाखाली हजारो कोटींची उधळण करायला पैसे कुठून येतात? कंत्राटदारांच्या बस रोज रस्त्यात बंद पडतायत, अपघात होतायत, कर्मचाऱ्यांचे शोषण होतं...

पथविक्रेता योजना अंमलबजावणीला गती द्यावी - महापौर रितू तावडे

Image
मुंबई / रमेश औताडे  शासनाकडून पथविक्रेता योजनेची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर, त्याची तत्काळ अंमलबजावणी सुरु करता यावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभाग स्तरांवरील प्राथमिक तयारी पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यादिशेने कार्यवाहीला गती द्यावी, असे निर्देश मुंबईच्या महापौर  रितू तावडे यांनी दिले आहेत. तसेच, पथविक्रेता योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात महापौरांनी विविध सूचना देखील केल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पथविक्रेता (फेरीवाले) धोरण तसेच कामकाज संदर्भात मुंबईच्या महापौर  रितू तावडे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात आज (दिनांक १४ ऑगस्ट २०२६) आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, उपआयुक्त (विशेष) विनायक विसपुते, उपआयुक्त  चंदा जाधव, उपआयुक्त सर्वश्री विश्वास मोटे, संतोषकुमार धोंडे, मनीष वळंजू, अनुज्ञापन अधीक्षक  अनिल काटे यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. पथविक्रेता (फेरीवाले) धोरण तसेच कामकाज विषयक अद्ययावत माहिती महानगरप...

ठाण्यात स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘युवा अभिनंदन प्रभात फेरी’

Image
ठाणे : रमेश औताडे  पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  देशाच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इको फ्रेंडली लाइफ (EFL) संस्थेच्या वतीने शनिवार, १५ ऑगस्ट रोजी ठाण्यात ‘युवा अभिनंदन प्रभात फेरी’ आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि शाश्वत जीवनशैलीचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पर्यावरण बचाओ, भारत बचाओ अभियान’ या व्यापक संकल्पनेशी जोडलेल्या या उपक्रमात ‘एक कुटुंब – एक शक्तिस्थळ’ हा संदेश देण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबाने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी आणि स्थानिक पातळीवर वृक्षसंवर्धनाचे केंद्र उभारावे, या विचाराला अभियानातून प्रोत्साहन दिले जात आहे. देशभरात वृक्षलागवड व पर्यावरण संवर्धनाची व्यापक चळवळ उभारण्याच्या उद्देशाने ७०० कोटी वृक्षांचे अभियानात्मक उद्दिष्ट मांडण्यात आले आहे. संस्थेचे प्रेरणास्थान सर श्री अशोक एन. जे. यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रभात फेरीला शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत तलाव पाळी, जांभळी नाका, ठाणे येथून सुरुवात होणार आहे. युवकांस...

सफाई कामगारांना ‘स्वयंसेवक’ म्हणता येणार नाही

Image
           औद्योगिक लेबर कोर्टाचा पालिकेला सवाल मुंबई / रमेश औताडे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून दुर्गंधीयुक्त कचरा, घाण आणि अस्वच्छता दूर करून शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करणाऱ्या सफाई कामगारांना केवळ ‘स्वयंसेवक’ म्हणून संबोधता येणार नाही, त्यांना कामगार दर्जा मिळावा असे निरीक्षण औद्योगिक लेबर कोर्टाने नोंदविल्याची माहिती समोर आली आहे. हे कामगार प्रत्यक्षात कायमस्वरूपी कामगारांप्रमाणेच नियमित स्वरूपाचे काम करीत आहेत. मुंबई शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज दुर्गंधीयुक्त कचरा उचलण्यापासून ते विविध स्वच्छता कामांपर्यंतची जबाबदारी ते पार पाडतात. या कामावरच त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे त्यांना ‘स्वयंसेवक’ म्हणणे योग्य आहे का, असा प्रश्न न्यायालयाने पालिकेसमोर उपस्थित केला आहे. सफाई कामगार नेते अखिल भारतीय श्रमिक एकता युनियन चे अध्यक्ष मोहन पी आर देवेंद्र यांनी न्यायालयात धाव घेतली असताना न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निर्णय दिला आहे. कामगारांच्या कष्टाचे चीज झाले असून आता हे कामगार कायम कामगार होणार आहेत. त्यामुळे ...

बेस्टच्या आर्थिक संकटावर राहुल गांधींना निवेदन देणार

Image
मुंबई  / रमेश औताडे मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या आर्थिक संकटाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निवेदन देण्यात येणार आहे. बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने विशेष आर्थिक पॅकेज द्यावे, तसेच वाढत्या खासगी कंत्राटी बससेवेऐवजी बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या बसचा ताफा वाढवावा, अशी मागणी नितीन भाऊराव पाटील यांनी केली आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षात बेस्ट उपक्रमाला सुमारे ३,००० कोटी रुपयांचा संभाव्य तुटवडा निर्माण होण्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या आठ वर्षांत बेस्टचा संचित तोटा सुमारे ९,२८६ कोटी रुपये झाल्याचे सांगितले जात आहे. ही परिस्थिती केवळ आर्थिक बाब नसून लाखो मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाशी संबंधित असल्याचे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे. २०१८ मध्ये बेस्टच्या मालकीच्या बसचा ताफा सुमारे ३,२०० होता. आज स्वतःच्या मालकीच्या बसची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, बेस्टची वाहतूक व्यवस्था खासगी कंत्राटदारांवर अधिकाधिक अवलंबून होत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. खासगी कंत्राटी बसची देखभ...

रस्ता सुरक्षा निविदांवर प्रश्नचिन्ह

Image
                 अटी-शर्तींच्या फेरआढाव्याची मागणी मुंबई / रमेश औताडे पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  राज्यातील प्रमुख रस्त्यांवर रोड मार्किंग साहित्य आणि रस्ता सुरक्षा विषयक कामांसाठी राबविण्यात येणाऱ्या निविदा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नांदेड, अमरावती, नाशिक, पुणे, नागपूर आणि कोकण विभागातील प्रमुख रस्त्यांवरील कामांसाठी काढण्यात आलेल्या निविदेतील अटी व शर्तींबाबत आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. या निविदेच्या अटी व शर्तींविरोधात संबंधित निविदाधारकाने मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर संबंधित निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. मात्र, पूर्वीच्या निविदेतील आक्षेपार्ह ठरलेल्या अटी व शर्तींमध्ये पुरेसा बदल न करता पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सरकारी निविदांमध्ये सर्व पात्र ठेकेदारांना समान संधी मिळणे आणि कोणत्याही विशिष्ट ठे...

पागडीमुक्त मुंबई आंदोलनाची १५ ऑगस्टपासून सुरुवात

Image
मुंबई / रमेश औताडे मुंबईतील ब्रिटिशकालीन पागडी व्यवस्थेचा संपूर्ण अंत करून पागडी रहिवाशांना त्यांच्या घरांवर मालकी हक्क द्यावा, तसेच बेदखल झालेल्या रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करावे, या प्रमुख मागण्यांसाठी ‘पागडीमुक्त मुंबई’ अभियानाची सुरुवात १५ ऑगस्ट २०२६ पासून करण्यात येणार आहे. कुलाब्यापासून बोरिवलीपर्यंत आणि सायनपासून डोंबिवलीपर्यंत सुमारे ३० हजार पागडी इमारती असून, त्यामध्ये अंदाजे २५ लाख नागरिक राहत असल्याचा दावा अभियानाच्या आयोजकांनी केला आहे. अनेक कुटुंबे अत्यंत कमी क्षेत्रफळाच्या घरांमध्ये राहत असून काही ठिकाणी सामायिक स्वच्छतागृहांचा वापर करावा लागत आहे. वृद्ध, आजारी नागरिकांसह महिला आणि लहान मुलांना असुरक्षित परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचेही सांगण्यात आले. अनेक जुन्या पागडी इमारतींमध्ये स्वच्छता, अग्निसुरक्षा, संरचनात्मक सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे हा केवळ पुनर्विकासाचा प्रश्न नसून नागरिकांच्या सुरक्षिततेचा, मानवी प्रतिष्ठेचा आणि सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचा प्रश्न असल्याचे अभियानाच्या वतीने स्पष्ट करण्यात...