Posts

पर्यावरण संरक्षण देशाच्या भविष्यासाठी अत्यावश्यक ---सरश्री अशोक एन. जे.

Image
मुंबई / रमेश औताडे  पर्यावरण संरक्षण ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून देशाच्या भविष्यासाठीची अत्यावश्यक गरज आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘पर्यावरण बचाओ, भारत बचाओ महाअभियान’ अंतर्गत ठाण्यात ‘युवा अभिनंदन पर्यावरण प्रभात फेरी’चे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ठाणेकरांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ​नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला महाविद्यालय, विश्व गुरुकुल विधी महाविद्यालय आणि बांदोडकर महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांनी या प्रभात फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होत पर्यावरण संवर्धनाचा ठाम संदेश दिला. ​उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि शाश्वत विकासाची जाणीव करून देणारे फलक हातात घेतले होते.  ​यावेळी सरश्री अशोक एन. जे. यांनी युवकांचे कौतुक करताना सांगितले की, "आजच्या युवकांनी पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली, तरच येणाऱ्या पिढ्यांसाठी अधिक सुरक्षित आणि सक्षम भारत घडविता येईल." प्रभात फेरीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या हातातील आकर्षक आणि आशयपूर्ण फ...

आरक्षणाच्या क्रांती मशालीची दहा वर्ष

Image
मुंबई / रमेश औताडे  गावकुसाबाहेर राहणारा मातंग समाज दुःखात हलाकीचे जीवन जगत असताना त्याला जग दाखविणारे दिवंगत डॉ बाबासाहेब गोपले यांनी क्रांतीची मशाल पेटवत आठ टक्के आरक्षण मागणी करत दिल्लीपर्यंत आंदोलन केले. आज त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती कुसुमताई गोपले यांनी तीच क्रांतीची मशाल तेवत ठेवत समाजाचे प्रश्न मार्गी लावत आहेत. बाबासाहेबांच्या १० व्या पुण्यतिथी निमित्त गोपले भवन साठे नगर मानखुर्द येथे पुण्यतिथी साजरी करून मशाल पेटवत लढा सुरू ठेवला आहे. यावेळी रवींद्र थोरात, सुदाम आवाडे, नंदाबाई शिखरे, जनाबाई वैरागड, हरिभाऊ कांबळे, दिनेश पांजगे, बी जी गायकवाड, गायक रामलिंग जाधव, गायक सुनील साठे, देडे महाराज पंढरपूर इतर समाज बांधव उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून क्रांतीज्योती कुसुमताई गोपले उपस्थित होत्या. बाबासाहेब गोपले यांच्या विचारांचा आणि सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी समाजाने एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

आरक्षणाच्या क्रांती मशालीची दहा वर्ष

Image
मुंबई / रमेश औताडे  गावकुसाबाहेर राहणारा मातंग समाज दुःखात हलाकीचे जीवन जगत असताना त्याला जग दाखविणारे दिवंगत डॉ बाबासाहेब गोपले यांनी क्रांतीची मशाल पेटवत आठ टक्के आरक्षण मागणी करत दिल्लीपर्यंत आंदोलन केले. आज त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती कुसुमताई गोपले यांनी तीच क्रांतीची मशाल तेवत ठेवत समाजाचे प्रश्न मार्गी लावत आहेत. बाबासाहेबांच्या १० व्या पुण्यतिथी निमित्त गोपले भवन साठे नगर मानखुर्द येथे पुण्यतिथी साजरी करून मशाल पेटवत लढा सुरू ठेवला आहे. यावेळी रवींद्र थोरात, सुदाम आवाडे, नंदाबाई शिखरे, जनाबाई वैरागड, हरिभाऊ कांबळे, दिनेश पांजगे, बी जी गायकवाड, गायक रामलिंग जाधव, गायक सुनील साठे, देडे महाराज पंढरपूर इतर समाज बांधव उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून क्रांतीज्योती कुसुमताई गोपले उपस्थित होत्या. बाबासाहेब गोपले यांच्या विचारांचा आणि सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी समाजाने एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

आरक्षणाच्या क्रांती मशालीची दहा वर्ष

Image
मुंबई / रमेश औताडे  गावकुसाबाहेर राहणारा मातंग समाज दुःखात हलाकीचे जीवन जगत असताना त्याला जग दाखविणारे दिवंगत डॉ बाबासाहेब गोपले यांनी क्रांतीची मशाल पेटवत आठ टक्के आरक्षण मागणी करत दिल्लीपर्यंत आंदोलन केले. आज त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती कुसुमताई गोपले यांनी तीच क्रांतीची मशाल तेवत ठेवत समाजाचे प्रश्न मार्गी लावत आहेत. बाबासाहेबांच्या १० व्या पुण्यतिथी निमित्त गोपले भवन साठे नगर मानखुर्द येथे पुण्यतिथी साजरी करून मशाल पेटवत लढा सुरू ठेवला आहे. यावेळी रवींद्र थोरात, सुदाम आवाडे, नंदाबाई शिखरे, जनाबाई वैरागड, हरिभाऊ कांबळे, दिनेश पांजगे, बी जी गायकवाड, गायक रामलिंग जाधव, गायक सुनील साठे, देडे महाराज पंढरपूर इतर समाज बांधव उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून क्रांतीज्योती कुसुमताई गोपले उपस्थित होत्या. बाबासाहेब गोपले यांच्या विचारांचा आणि सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी समाजाने एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

आठवण क्रांतीसम्राट डॉ.बाबासाहेब गोपले संघर्ष नायकाची --

Image
मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  मंत्रालय प्रतिनिधी रमेश औताडे  क्रांतीसम्राट डॉ.बाबासाहेब गोपले यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त  त्यांच्या कार्यावर छोटासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे.मातंग समाजात चिखली गांव, तालुका अमदपूर, जिल्हा - लातूर या खेडेगावांत ७ मे १९५३ साली बाबासाहेब गोपले यांचा जन्म माता समिंद्रा व पिता सिताराम गोपले यांच्या पोटी झाला.  त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावाशेजारी केंद्रेवाडी येथे झाले. नंतर ते आंबेजोगाई येथे काही दिवस शिकले. नंतर परभणी येथे काही दिवस राहिले आणि कॉलेज अमदपूर येथे झाले. त्यानंतर ते मुंबईला आले व मुंबईत राहत असतांना समाजाचे दारिद पाहवेना असे झाले आणि बाबासाहेब गोपले यांनी अखिल भारतीय मातंग संघाची स्थापना केली, लहुजी नगर, महुने, ता. कल्याण, जिल्हा- ठाणे येथे पहिली शाखा उघडली. १७ जानेवारी १९८२ साली तेथेच 'जगेन तर समाजासाठी व मरेन तर समाजासाठी' अशी घोर प्रतिज्ञा करून आपल्या संघर्षमय चळवळीला सुरुवात केली. मोर्चे, धरणे, आंदोलन चालू झालेत. २८ मार्च १९८३ साली हुतात्मा चौक, मुंबई येथे बाबासाहेब गोपले यांनी आमरण...

कळमोडी पाणलोट विकास संस्थेच्या पाठपुराव्याला यश

Image
मुंबई / रमेश औताडे  अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुणे जिल्ह्यातील कळमोडी उपसा जलसिंचन योजनेचा फेर जलनियोजन प्रस्ताव महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांचेकडे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने मान्यतेसाठी सादर केला आहे. जलसंपदा विभागाने कळमोडी पाणलोट विकास संस्थेचे अध्यक्ष अशोकराव टाव्हरे यांना लेखी पत्राद्वारे याबाबत माहिती दिली आहे.  कळमोडी उपसा जलसिंचन योजनेमध्ये खेड तालुक्याच्या पुर्व भागातील कनेरसर, पुर, वाफगाव, वरूडे या गावातील १२५२ हेक्टर व पश्चिम भागातील कुडे बुद्रुक,एकलहरे येथील ३०५ हेक्टर असे एकुण १५५७ हेक्टर वाढीव क्षेत्र प्रस्तावित केले आहे. आठ महिने पिक रचनेनुसार फेर जलनियोजन करण्यात आले आहे. कळमोडी धरणाचे १.०७ टीएमसी पाणी चासकमान धरणासाठी व ०. ८७ टीएमसी पाणी उपसा योजनेसाठी राखीव आहे. शासनाने  वाढीव गावांसह सुप्रमा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत परिगणके अंतिम करण्यात आली असून अंदाजपत्रक मान्यतेसाठी राज्य तांत्रिक  सल्लागार समिती -२ यांना सादर केल्याचे भामा आसखेड धरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नि.सं.लगड ...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुनील भालेराव

Image
मुंबई / रमेश औताडे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी युवा सामाजिक कार्यकर्ते सुनील भालेराव यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे ठाण्यातील मातंग समाजासह सर्व समाजामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाणे महानगरपालिकेमार्फत दरवर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन केले जाते. या उत्सवाचे नियोजन जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून करण्यात येते. यंदा प्रथमच एका सामान्य कार्यकर्त्याला सर्वानुमते अध्यक्षपदाची संधी देण्यात आल्याने या नियुक्तीचे स्वागत होत आहे. सुनील भालेराव हे सर्वसमावेशक, मितभाषी आणि ठाण्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. मातंग समाजाच्या सामाजिक चळवळीत त्यांनी सक्रिय योगदान दिले असून, विविध मोर्चे, जयंती उत्सव तसेच सामाजिक शिबिरांचे आयोजन त्यांनी केले आहे. तरुण चेहऱ्याला नेतृत्वाची संधी मिळाल्याने समाजातील तरुणांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. यंदाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव ३० ऑगस्ट २०२६ रोजी गडकरी...