शेतकऱ्याला न्याय ; भोगवटा बदलाचा आदेश रद्द
सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांच्या प्रयत्नांचे कौतुक मुंबई / रमेश औताडे : मंत्रालय प्रतिनिधी , पी आर न्यूज शासनाकडून चूक झाली तर कायदेशीर व सातत्य ठेऊन कागदोपत्री पाठपुरावा केला तर न्याय मिळतोच. असा अनुभव अहिल्यानगर जिल्यातील संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव खंडेराय वाडी येथील आदेश चाचण यांना आला आहे. या पाठपुराव्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावल्याने त्यांचे शासकीय अधिकारी व शेतकरी वर्गातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आदेश चाचण यांनी दोन वर्षापुर्वी अशोकराव टाव्हरे यांची भेट घेऊन २४ एकर जमिनीबाबत सरकारी पातळीवर चुकीचे आदेश पारित झाल्याची माहिती दिली होती. त्या पार्श्वभूमीवर टाव्हरे यांनी शासनाला पाठपुरावा करत निवेदने दिली असावमहसुल विभागाने जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना चौकशीचे आदेश देऊन स्वयंस्पष्ट अहवाल मागविले होते. त्यानुसार शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांना पत्र दिले. त्यांनी वस्तुनिष्ठ अहवाल पाठविला. अप्पर जिल्हा...