Posts

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा धगधगती मुंबई तर्फे सन्मान

Image
 शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा धगधगती मुंबई तर्फे सन्मान मुंबई / रमेश औताडे  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घोगाव येथील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादन करून राज्य पातळीवर आपल्या गावाचे आणि शाळेचे नाव उंचावल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. ‘धगधगती मुंबई’ वृत्तपत्र परिवार आणि संत रोहिदास मित्र मंडळ, घोगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचविण्यासाठी विशेष मार्गदर्शन करणाऱ्या सौ. सविता सचिन राजमाने मॅडम यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. माजी प्राचार्य वसंत धुळपसर आणि ‘धगधगती मुंबई’चे संपादक भीमराव धुळप यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अनंत भंडारे, शिक्षक बाजीराव शेटे, दत्तात्रय कुंभार, राहुल पावले, तसेच घोगावचे प्रतिष्ठित नागरिक शंकर पाटील आबा, उपसरपंच निवास शेवाळे, बाजीराव तांबेकर, पोलीस पाटील शिवाजी भावके, जगताप सर, संत रोहिदास मित्र मंडळाचे अध्यक्ष सुभाष गोविंद धुळप, विकास साळुंखे, नारायण साळुंखे, ग...

अचूक विम्यासाठी आता एआय चा वापर

Image
मुंबई / रमेश औताडे  इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्सने व्यवसायातील विविध प्रक्रियांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ए आय वापर वाढविण्यासाठी सेल्सफोर्सच्या एजंटफोर्सची निवड केली आहे. या तंत्रज्ञानामुळे विक्री प्रक्रिया अधिक वेगवान, कामकाज सुलभ आणि ग्राहकांना अधिक चांगली सेवा मिळण्यास मदत होणार आहे. एजंटफोर्सच्या माध्यमातून ग्राहकांशी संवाद, विमा प्रस्तावांचे मूल्यांकन, ग्राहक सेवा आणि क्लेम प्रक्रियेत एआयचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या गरजांवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल. इंडियाफर्स्ट लाइफचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ रुशभ गांधी यांनी सांगितले की, डिजिटल परिवर्तनामुळे विक्री प्रक्रियेत सुधारणा झाली असून ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला झाला आहे. सेल्सफोर्स साऊथ एशियाचे अध्यक्ष व सीईओ अंशुमती भट्टाचार्य यांनीही एआयच्या मदतीने विमा व्यवसाय अधिक सक्षम आणि प्रभावी होण्याचा विश्वास व्यक्त केला.

दिव्यांग शाळांच्या अनुदानासाठी डॉ. जितेंद्र ओव्हाळ आक्रमक

Image
मुंबई / रमेश औताडे  ( मंत्रालय प्रतिनिधी )  दिव्यांग शाळांना अनुदान देण्यासाठी शासनाने धोरण जाहीर करून पात्र शाळांकडून प्रस्ताव स्वीकारले. मात्र आता अनुदानास पात्र असलेल्या शाळांची संपूर्ण यादी जाहीर न करता एक-एक प्रस्ताव मंत्र्यांच्या सहीसाठी पाठविण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे संस्थापक डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी दिली असून, वेळप्रसंगी छत्रपती संभाजी नगर येथे मंत्री अतुल सावे यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशाराही दिला आहे. शासनाने अनुदानाचे धोरण जाहीर केले असेल, तर त्या धोरणानुसार पात्र ठरलेल्या सर्व दिव्यांग शाळांची अंतिम यादी पारदर्शकपणे जाहीर करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत कोणाला अधिकार देण्यात आला आहे ? कोणत्या नियमाच्या आधारे प्रस्ताव निवडक पद्धतीने मंत्र्यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविले जात आहेत, याचा खुलासा दिव्यांग  कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केला नाही. अनुदान हा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि संस्थांच्या हक्काचा विषय आहे तो कोणाच्या कृपेवर किंवा निवडक प्रस्तावांच्या प्रक्रियेवर अवलंबून र...

खाजगी हितसंबंधात स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर

Image
            तीव्र आंदोलनाचा बाळासाहेब मिरजे यांचा इशारा मुंबई / रमेश औताडे  नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नेरूळ सेक्टर १४ येथील विकास आराखड्यात स्मशानभूमीसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर अद्यापही पालिकेकडून कोणताही अधिकृत माहिती फलक न लावल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले यांच्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब मिरजे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या मोकळ्या भूखंडासमोर रिजसी नावाचा मोठा  टॉवर आहे. या टॉवरमधील घरांची विक्री सुरळीत व्हावी आणि ग्राहकांचा विरोध होऊ नये, यासाठीच प्रशासन जाणूनबुजून स्मशानभूमीचा अधिकृत बोर्ड लावण्यास व बांधकामास टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाच्या या भूमिकेमुळे परिसरातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी इतरत्र पायपीट करावी लागत आहे. स्मशानभूमीचे आरक्षण स्पष्ट असतानाही पालिकेकडून होत असलेल्या या दिरंगाईविरोधात आरपीआयच्या वतीने महापालिका आयुक्त व संबंधित विभाग अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करून १५ दिवसांचा अंतिम इशारा देण्यात आला आहे. विकास आराखड्यानुसार ...

Nodwin Gaming Announces ‘SpaceFest’

Image
Nodwin Gaming Announces ‘SpaceFest’ A unique festival dedicated to space, science, and science fiction—organized for the first time in collaboration with the Government of Maharashtra Mumbai / PR News Media Network Ramesh Autade Nodwin Gaming, a global leader in new-age entertainment, gaming, and e-sports, announced the launch of ‘SpaceFest’ at a press conference held at the Trident Hotel in Mumbai. Organized in collaboration with the Government of Maharashtra, this event marks one of India’s first large-scale festivals dedicated to space, science, innovation, and space-themed pop culture. The festival aims to bring knowledge and entertainment together on a single platform. Several dignitaries attended the press conference, including Dr. Uday Samant, Hon. Minister of Industries, Investment, and Services; Dr. P. Anbalagan (IAS), Principal Secretary, Industries, Investment, and Services Department, Government of Maharashtra; Mr. Deependra Singh Kushwah (IAS), CEO of MIDC Mumb...

भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर मनोज म्हात्रे

Image
मुंबई / रमेश औताडे  भाजप ओबीसी मोर्चाच्या संघटन विस्तारात मनोज म्हात्रे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजप ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी म्हात्रे यांची 'महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य' तसेच 'मुंबई संपर्क प्रमुख' या पदांवर नियुक्ती केली आहे. आपल्या निवडीबद्दल बोलताना मनोज म्हात्रे यांनी सांगितले की, ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते सदैव कार्यरत राहतील. प्रामुख्याने ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि इतर सोयी-सुविधा पोहोचवणे, 'महाज्योती'च्या विविध उपक्रमांचा तळागाळातील घटकांना लाभ मिळवून देणे, मोफत MPSC व UPSC प्रशिक्षणाचा लाभ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे तसेच परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती आणि फेलोशिप योजनांचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना मदत करणे या विषयांवर ते भर देणार आहेत. या महत्त्वपूर्ण नियुक्तीबद्दल भाजप नेते महेश शेट्ये यांनी मनोज म्हात्रे यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. ...

राष्ट्रवादी पत्रकार, निर्भीड संपादक आणि नाट्याचार्य --- कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

Image
                          - प्रा. हेमंत सुधाकर सामंत - ‘कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर’ हे आधुनिक मराठी साहित्य, पत्रकारिता, नाटक आणि राष्ट्रवादी विचार विश्व यावर दीर्घकाळ प्रभाव टाकणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. नाटककार, पत्रकार, संपादक, राजकीय विचारवंत आणि समाजप्रबोधक म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांच्या लेखणीमध्ये राष्ट्र प्रेम, स्वराज्याची आकांक्षा, सामाजिक जागृती आणि अन्याया विरूद्धचा संघर्ष यांचा संगम दिसतो. विशेषतः लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या सहवासातून त्यांच्या पत्रकारितेला राष्ट्रवादी धार प्राप्त झाली. वृत्तपत्र आणि रंगभूमी या दोन्ही माध्यमांचा उपयोग जनजागृतीसाठी करता येतो, हा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळेच खाडिलकरांचे जीवन केवळ साहित्यिकाचे जीवन न राहता ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या वैचारिक इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग बनले. उपलब्ध अधिकृत मराठी विश्वकोशातील नोंदीनुसार त्यांचा जन्म २३ नोव्हेंबर १८७२ रोजी ‘सांगली’ येथे झाला आणि २६ ऑगस्ट १९४८ रोजी त्यांचे निधन झाले.  खाडिलकरां...