Posts

शेतकऱ्याला न्याय ; भोगवटा बदलाचा आदेश रद्द

Image
    सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांच्या प्रयत्नांचे कौतुक मुंबई / रमेश औताडे :   मंत्रालय प्रतिनिधी  ,   पी आर न्यूज  शासनाकडून चूक झाली तर कायदेशीर व सातत्य ठेऊन कागदोपत्री पाठपुरावा केला तर न्याय मिळतोच. असा अनुभव अहिल्यानगर जिल्यातील संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव खंडेराय वाडी येथील आदेश चाचण यांना आला आहे. या पाठपुराव्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावल्याने त्यांचे शासकीय अधिकारी व शेतकरी वर्गातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आदेश चाचण यांनी दोन वर्षापुर्वी अशोकराव टाव्हरे यांची भेट घेऊन २४ एकर जमिनीबाबत सरकारी पातळीवर चुकीचे आदेश पारित झाल्याची माहिती दिली होती. त्या पार्श्वभूमीवर टाव्हरे यांनी शासनाला पाठपुरावा करत निवेदने दिली असावमहसुल विभागाने जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना चौकशीचे आदेश देऊन स्वयंस्पष्ट अहवाल मागविले  होते. त्यानुसार शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांना पत्र दिले. त्यांनी वस्तुनिष्ठ अहवाल पाठविला. अप्पर जिल्हा...

दिव्यांग शाळा अनुदानासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंच चा इशारा

Image
मुंबई / रमेश औताडे  पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  दिव्यांग शाळांच्या अनुदानासह दिव्यांग कल्याण विभागातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासनाकडून अपेक्षित पारदर्शक व गतिमान कार्यवाही होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयाशी संबंधित चेतन गिरसे व मनीष पाटील यांच्या भूमिकेबाबत स्वतंत्र चौकशी करावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी दिला आहे. दिव्यांग शाळांच्या अनुदानाचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. अनुदानास पात्र शाळांची एकत्रित व अंतिम यादी निश्चित करून, आवश्यक शासनमान्यता घेऊन सर्व पात्र शाळांच्या अनुदानाचा एकत्रित निर्णय घेणे अपेक्षित असताना मंत्री  अतुल सावे सकारात्मक असताना त्याच्या कार्यालयाशी संबंधित चेतन गिरासे व मनिष पाटील यांच्या हस्तक्षेपामुळे यात पेच निर्माण होत असल्याचा आरोप डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी केला आहे. पात्र सर्व शाळांच्या अनुदानाचा एकत्रित निर्णय घेऊन अनुदान तातडीने वितरित करावे. तसेच सचिव माणिक गुरसाळ यांना य...

विकासकांच्या कार्याला नवराष्ट्र चा मानाचा तुरा

Image

बोगस डॉक्टर ओळखण्यासाठी शासनाचा क्यू आर कोड

Image
       बोगस डॉक्टर ओळखण्यासाठी शासनाचा क्यू आर कोड मुंबई / रमेश औताडे  :   पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  बोगस डॉक्टरांच्या वाढत्या सुळसुळाटाला आळा घालण्यासाठी सरकारने आता प्रत्येक दवाखाना आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा परवाना, शिक्षण आणि नोंदणी क्रमांक असलेला क्यू आर कोड लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत करत, हीच प्रणाली इतरही क्षेत्रात लागू करावी, अशी मागणी दक्ष नागरिक मंचचे संस्थापक अध्यक्ष रमेश औताडे यांनी केली आहे. सध्या अनेक ठिकाणी बोगस डॉक्टर, बोगस पत्रकार, बोगस वकील आणि बोगस पोलीस असल्याच्या भासवून नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. सामान्य नागरिकाला समोरची व्यक्ती खरी आहे की बोगस हे ओळखणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने डॉक्टरांसाठी सुरू केलेली क्यू आर कोड प्रणाली अत्यंत स्तुत्य आहे. याच धर्तीवर पत्रकार, वकील, पोलीस कर्मचारी तसेच शासकीय अधिकारी व इतर सार्वजनिक सेवांशी संबंधित वर्गासाठीही अधिकृत ओळखपत्रासह क्यू आर कोड प्रणाली लागू करावी, जेणेकरून नागरिकांना मोबाईलवर स्कॅन करून संब...

बेस्ट बस वाचविण्यासाठी एक मोठा प्रयत्न

Image
रमेश औताडे / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  मुंबई : बुधवार - ९/९/२०२६ मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या सद्यस्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत ‘आपली बेस्ट आपल्याचसाठी’ या संस्थेने बेस्टच्या पुनरुत्थानासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बेस्टच्या स्वमालकीच्या बसगाड्यांची घटती संख्या, कंत्राटी बसगाड्यांवरील वाढते अवलंबित्व, मनुष्यबळातील कपात आणि कंत्राटीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे बेस्टच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. बेस्ट उपक्रमाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याऐवजी ती हळूहळू कंत्राटी पद्धतीवर अवलंबून होत असल्याचा आरोप संस्थेने केला आहे. बसगाड्यांपासून मनुष्यबळ आणि तिकीट प्रणालीपर्यंत वाढत असलेले कंत्राटीकरण बेस्टला भविष्यात शंभर टक्के कंत्राटीकरणाच्या दिशेने घेऊन जाणार आहे का, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसगाड्यांची गरज मान्य असली तरी इलेक्ट्रिक बसच्या नावाखाली बेस्टच्या स्वमालकीचा ताफा कमी करून कंत्राटी बसगाड्यांवरील अवलंबित्व वाढवणे योग्य आहे का, याचा फेरव...

दृष्टी नसली तरी आनंदाची उंची गगनाएवढी

Image
मुंबई, दि. ४ सप्टेंबर : भीमराव धुळप  दहीकाला उत्सवाच्या पूर्वसंध्येला कमला मेहता अंध मुलींची शाळा, दादर पूर्व येथे शिवसेना माहीम विधानसभा आणि ‘धगधगती मुंबई’ परिवाराच्या संयुक्त विद्यमाने ‘एक हंडी दिव्यांगांसाठी’ हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. आमदार व विभागप्रमुख महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी स्वीकृत नगरसेवक साईनाथ दुर्गे, विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे, भीमराव धुळप, मुख्याध्यापिका तन्वी म्हाडदळकर, सुरेश काळे, श्याम चित्रे, विशाल चाफे, प्रकाश नवल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात मुलींना श्रीकृष्णाची ट्रॉफी, सहभागी प्रमाणपत्र आणि प्रत्येकी रोख पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. तसेच सर्व मुलींना खाऊ वाटप करण्यात आला. श्रीकृष्णाची ट्रॉफी डोक्यावर घेऊन मुलींनी आनंदाने नृत्य केले. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून उपस्थितांचे मन भरून आले. “मुलींना दृष्टी नसली तरी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्हाला या छोट्याशा मदतीचे मोठे समाधान मिळाले,” अशी भावना आयोजकांनी व्यक्त ...

गोविंदाचा मृत्यू झाल्यास आयोजकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

Image
    महाराष्ट्र करणी सेनेची मागणी; अजय सिंह सेंगर यांचा इशारा मुंबई  / रमेश औताडे  दहीहंडी उत्सव आणि सरावादरम्यान गोविंदांच्या होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी दहीहंडीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेती अथवा वाळूचा थर पसरविणे बंधनकारक करावे, अशी मागणी महाराष्ट्र करणी सेनेने केली आहे. सुरक्षेच्या उपाययोजना न करता दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आणि त्यात गोविंदाचा मृत्यू झाला, तर संबंधित आयोजकांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी केली आहे. दहीहंडीच्या वेळी मानवी मनोरे रचताना तोल जाणे, उंचीवरून खाली पडणे आणि अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे दरवर्षी अनेक गोविंदा जखमी होतात. काही दुर्घटनांमध्ये गोविंदांना जीवही गमवावा लागतो. पूर्वी दहीहंडीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेती टाकली जात असल्याने उंचीवरून पडलेल्या गोविंदाला गंभीर दुखापत होण्याचा धोका तुलनेने कमी होता. मात्र, अलीकडील काळात रस्त्यांवर रेती न टाकताच दहीहंडीचे आयोजन केले जात असल्याचा आरोप सेंगर यांनी केला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र करणी सेनेने मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह र...