Posts

वय नव्हे , नव्या सुरुवातीची तयारी महत्त्वाची : ‘ आरंभ ' चा संदेश

Image
मुंबई  / रमेश औताडे  आयुष्यात नव्याने सुरुवात करण्यासाठी वयाची मर्यादा नसते, हा प्रेरणादायी संदेश देत जागतिक व्यापार केंद्र, मुंबई येथे कला, अध्यात्म आणि आत्मचिंतनाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित या विशेष सोहळ्यात राजयोगिनी ब्रह्माकुमारी डॉ. नलिनी दीदी (दीदी माँ) यांनी रेखाटलेल्या श्रीकृष्णाच्या आकर्षक चित्रांचे प्रदर्शन लक्षवेधी ठरले. या चित्रांमधून श्रीकृष्णाच्या विविध भावविश्वाचे दर्शन घडत असतानाच, अंतर्मनातून आलेली दृष्टी आणि सकारात्मक विचार आयुष्यभर प्रेरणा देऊ शकतात, हा संदेशही अधोरेखित झाला. याच सोहळ्यात ‘Echoes Of The Soul – Reflections For A Conscious Life’ या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले. अधिक सजग, सकारात्मक आणि अर्थपूर्ण जीवनाची सुरुवात कोणत्याही क्षणी करता येते, या विचारांवर पुस्तक आधारित आहे. ‘आरंभ’—It’s Never Too Late In Life हा या कार्यक्रमाचा मध्यवर्ती विचार होता. आयुष्यात किती उशीर झाला यापेक्षा नव्याने सुरुवात करण्याची तयारी आहे का, हे अधिक महत्त्वाचे असल्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला. कला, अध्यात...

जय लहुजी दहिहंडी महोत्सव ५ सप्टेंबरला

Image
मुंबई / रमेश औताडे  अखिल भारतीय मातंग सेनेच्या वतीने जय लहुजी दहिहंडी महोत्सवाचे आयोजन शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी मानखुर्द साठे नगर येथे करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता होणाऱ्या या महोत्सवासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार असून मुख्य अतिथी म्हणून समाजसेविका सुनीता तुपसौंदर्य असणार आहेत. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून डॉ. विनोद बाबर, अभिनेते जॉनी रावत, अभिनेत्री स्वाती माने आणि प्रबोधनकार सुनील साठे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  कार्यक्रमात दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या एक हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून, समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे अधिक गांभीर्याने पाहावे, असा संदेश या माध्यमातून देण्यात येणार आहे. जय लहुजी दहिहंडी महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून, समाजातील नागरिक, विद्यार्थी, पालक आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारत...

सामाजिक व सांस्कृतिक वारशाचा समृद्ध पट: श्री. अरुण कृष्णाराव वाशिर्डे

Image
मुंबई / रमेश औताडे मंत्रालय प्रतिनिधी ३१ ऑगस्ट रोजी मुंबईतील ज्येष्ठ समाजसेवक श्री. अरुण कृष्णाराव वाशिर्डे यांचा वाढदिवस पार पडला. मूळचे कोल्हापूरचे रहिवासी असलेल्या अरुणजींनी मुंबईतील गिरगाव, कुंभारवाडा व प्रार्थना समाज परिसरात आपल्या उत्तुंग सामाजिक, व्यावसायिक आणि राजकीय कार्यातून एक स्वतंत्र व आदरयुक्त ओळख निर्माण केली आहे. शिक्षण व व्यावसायिक प्रवास * शैक्षणिक पात्रता: त्यांनी एस.एस.सी. आणि एफ.वाय. सायन्स पूर्ण केल्यानंतर तंत्रशिक्षण क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी आय.टी.आय. डिप्लोमा (डिझेल मेकॅनिक) तसेच मेकॅनिकल ड्राफ्टमन डिप्लोमा पूर्ण केला. * उद्योग व व्यवसाय: तांत्रिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. ते परवानाधारक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असून 'मे. युनिव्हर्सल पेस्ट कंट्रोल सर्व्हिस'चे प्रोप्रायटर म्हणून यशस्वी व्यावसायिक वाटचाल करत आहेत. कौटुंबिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी अरुणजींना समाजसेवा आणि कला क्षेत्राची प्रेरणा कौटुंबिक वारशातूनच मिळाली. * वडील (कै. कृष्णाराव डी. वाशिर्डे): ते चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व दिग्गज स...

'स्नेह पूकलम' (ओणमची फुलांची रांगोळी) कालबाह्य

Image
रेल्वेने परवानगी नाकारली यंदा सीएसटी (CST) वर 'स्नेह पूकलम' (ओणमची फुलांची रांगोळी) होणार नाही मुंबई / रमेश औताडे  दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) च्या गजबजलेल्या आवारात यंदा ओणमच्या फुलांचा सुगंध दरवळणार नाही. २०१५ पासून मुंबईतील ओणमच्या उत्सवाला आपल्या रंगीबेरंगी रूपाने बहर आणणाऱ्या या भव्य 'महा पूकलम'ला (फुलांची रांगोळी) रेल्वे प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव यंदा परवानगी नाकारली आहे. लाखो लोकांच्या पसंतीस उतरलेली आणि 'स्नेह पूकलम' (प्रेमाची फुलांची रांगोळी) म्हणून ओळखली जाणारी ही उत्सवकालीन कलाकृती यंदा केवळ आठवण म्हणून उरेल. ओणमची ही फुलांची रांगोळी केवळ मल्याळी समाजाचा सण साजरा करण्यापुरती मर्यादित नव्हती. २००८ मधील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात सीएसटी येथे प्राण गमावलेल्यांना ती फुलांच्या माध्यमातून वाहिलेली श्रद्धांजली होती, तसेच शांततेचा एक प्रभावी संदेशही होता. धर्म आणि भाषेच्या भिंती ओलांडून लोकांना एकत्र आणल्यामुळेच तिने 'स्नेह पूकलम' म्हणून मुंबईच्या सांस्कृतिक जी...

आरोग्य विभागातील अन्यायाविरोधात आझाद मैदानात आंदोलन

Image
मुंबई / रमेश औताडे  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत १६७५ कर्मचारी डी.एस इन्टरप्रायजेस या कंपनी मार्फत गेली दहा वर्षे झाले, डॉक्टर, नर्स, फार्मसी , लॅब टेक्निशियन, डेटा एन्ट्री ऑपरेटर, अटेडन्ट ह्या पदावर  कर्मचारी हे आरोग्य विभागात आपली सेवा बजावीत आहेत. मात्र त्यांच्या प्रलंबित मागण्या अद्याप सुटल्या नसल्याने त्यांनी आझाद मैदानात आंदोलन केले. दीपक चव्हाण, प्रतीक्षा भागवत, प्रवीण चव्हाण, गिरीश सुर्वे, रेश्मा कोचले, परेश मटकर, प्रणाली जठार, माया केदार, हिरामण बनगारे इतर महिला पुरुष यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की,  वार्षिक वेतनवाढ मिळावी, भरपगारी प्रसुती रजा मिळावी, सानुग्रह अनुदान (दिवाळी बोनस) मिळावा, कर्मचाऱ्यांना पी एफ मिळावा, कर्मचाऱ्यांना ई एस आय सी  मिळावा, वार्षिक सुट्टया मिळाव्यात, ठेकेदारी पद्धत रद्द करुन शासकीय सेवेत समावेश करणे, स्पर्श प्रणाली च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना पगार देण्यात यावा, बाह्य स्त्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हितार्थ एक नवीन विधेयक सभागृहात मांडण्यात याव...

शिक्षा बचाओ संगठन चे आझाद मैदानात आंदोलन

Image
मुंबई / रमेश औताडे  शिक्षण विभागातील कथित गैरप्रकारांची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ‘शिक्षा बचाओ संघटने’चे अध्यक्ष डी. आर. सिंह यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आदर्श भूतपूर्व सैनिक हिंदी हायस्कूलच्या मुख्याध्यापक मान्यता प्रकरणासह संस्था हस्तांतरण, बोगस जावक क्रमांक, शिक्षकांचे प्रलंबित वेतन, TET गैरप्रकार आणि २० टक्के अनुदानाच्या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा परिषद व नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचे विशेष प्रशासकीय ऑडिट करावे तसेच सर्व प्रकरणांत जबाबदारी निश्चित करून ३० दिवसांत लेखी अहवाल द्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. आझाद मैदानावर आंदोलन करून आम्हाला आनंद होत नाही उलट आमचा वेळ जातो. सरकारने कोणत्याही घटकाला आंदोलन करण्यात भाग पाडू नये. ज्या राज्यांमध्ये ज्या देशांमध्ये आंदोलन होत असे तर ते सरकारचे अपयश आहे. त्यामुळे आमच्या मागण्यांचा गंभीरपणे विचार करावा असे डी आर सिंह म्हणाले.

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा धगधगती मुंबई तर्फे सन्मान

Image
 शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा धगधगती मुंबई तर्फे सन्मान मुंबई / रमेश औताडे  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घोगाव येथील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादन करून राज्य पातळीवर आपल्या गावाचे आणि शाळेचे नाव उंचावल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. ‘धगधगती मुंबई’ वृत्तपत्र परिवार आणि संत रोहिदास मित्र मंडळ, घोगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचविण्यासाठी विशेष मार्गदर्शन करणाऱ्या सौ. सविता सचिन राजमाने मॅडम यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. माजी प्राचार्य वसंत धुळपसर आणि ‘धगधगती मुंबई’चे संपादक भीमराव धुळप यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अनंत भंडारे, शिक्षक बाजीराव शेटे, दत्तात्रय कुंभार, राहुल पावले, तसेच घोगावचे प्रतिष्ठित नागरिक शंकर पाटील आबा, उपसरपंच निवास शेवाळे, बाजीराव तांबेकर, पोलीस पाटील शिवाजी भावके, जगताप सर, संत रोहिदास मित्र मंडळाचे अध्यक्ष सुभाष गोविंद धुळप, विकास साळुंखे, नारायण साळुंखे, ग...