पागडीमुक्त मुंबई आंदोलनाची १५ ऑगस्टपासून सुरुवात
मुंबई / रमेश औताडे मुंबईतील ब्रिटिशकालीन पागडी व्यवस्थेचा संपूर्ण अंत करून पागडी रहिवाशांना त्यांच्या घरांवर मालकी हक्क द्यावा, तसेच बेदखल झालेल्या रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करावे, या प्रमुख मागण्यांसाठी ‘पागडीमुक्त मुंबई’ अभियानाची सुरुवात १५ ऑगस्ट २०२६ पासून करण्यात येणार आहे. कुलाब्यापासून बोरिवलीपर्यंत आणि सायनपासून डोंबिवलीपर्यंत सुमारे ३० हजार पागडी इमारती असून, त्यामध्ये अंदाजे २५ लाख नागरिक राहत असल्याचा दावा अभियानाच्या आयोजकांनी केला आहे. अनेक कुटुंबे अत्यंत कमी क्षेत्रफळाच्या घरांमध्ये राहत असून काही ठिकाणी सामायिक स्वच्छतागृहांचा वापर करावा लागत आहे. वृद्ध, आजारी नागरिकांसह महिला आणि लहान मुलांना असुरक्षित परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचेही सांगण्यात आले. अनेक जुन्या पागडी इमारतींमध्ये स्वच्छता, अग्निसुरक्षा, संरचनात्मक सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे हा केवळ पुनर्विकासाचा प्रश्न नसून नागरिकांच्या सुरक्षिततेचा, मानवी प्रतिष्ठेचा आणि सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचा प्रश्न असल्याचे अभियानाच्या वतीने स्पष्ट करण्यात...