Posts

आरक्षणाच्या क्रांती मशालीची दहा वर्ष

Image
मुंबई / रमेश औताडे  गावकुसाबाहेर राहणारा मातंग समाज दुःखात हलाकीचे जीवन जगत असताना त्याला जग दाखविणारे दिवंगत डॉ बाबासाहेब गोपले यांनी क्रांतीची मशाल पेटवत आठ टक्के आरक्षण मागणी करत दिल्लीपर्यंत आंदोलन केले. आज त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती कुसुमताई गोपले यांनी तीच क्रांतीची मशाल तेवत ठेवत समाजाचे प्रश्न मार्गी लावत आहेत. बाबासाहेबांच्या १० व्या पुण्यतिथी निमित्त गोपले भवन साठे नगर मानखुर्द येथे पुण्यतिथी साजरी करून मशाल पेटवत लढा सुरू ठेवला आहे. यावेळी रवींद्र थोरात, सुदाम आवाडे, नंदाबाई शिखरे, जनाबाई वैरागड, हरिभाऊ कांबळे, दिनेश पांजगे, बी जी गायकवाड, गायक रामलिंग जाधव, गायक सुनील साठे, देडे महाराज पंढरपूर इतर समाज बांधव उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून क्रांतीज्योती कुसुमताई गोपले उपस्थित होत्या. बाबासाहेब गोपले यांच्या विचारांचा आणि सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी समाजाने एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

आठवण क्रांतीसम्राट डॉ.बाबासाहेब गोपले संघर्ष नायकाची --

Image
मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  मंत्रालय प्रतिनिधी रमेश औताडे  क्रांतीसम्राट डॉ.बाबासाहेब गोपले यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त  त्यांच्या कार्यावर छोटासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे.मातंग समाजात चिखली गांव, तालुका अमदपूर, जिल्हा - लातूर या खेडेगावांत ७ मे १९५३ साली बाबासाहेब गोपले यांचा जन्म माता समिंद्रा व पिता सिताराम गोपले यांच्या पोटी झाला.  त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावाशेजारी केंद्रेवाडी येथे झाले. नंतर ते आंबेजोगाई येथे काही दिवस शिकले. नंतर परभणी येथे काही दिवस राहिले आणि कॉलेज अमदपूर येथे झाले. त्यानंतर ते मुंबईला आले व मुंबईत राहत असतांना समाजाचे दारिद पाहवेना असे झाले आणि बाबासाहेब गोपले यांनी अखिल भारतीय मातंग संघाची स्थापना केली, लहुजी नगर, महुने, ता. कल्याण, जिल्हा- ठाणे येथे पहिली शाखा उघडली. १७ जानेवारी १९८२ साली तेथेच 'जगेन तर समाजासाठी व मरेन तर समाजासाठी' अशी घोर प्रतिज्ञा करून आपल्या संघर्षमय चळवळीला सुरुवात केली. मोर्चे, धरणे, आंदोलन चालू झालेत. २८ मार्च १९८३ साली हुतात्मा चौक, मुंबई येथे बाबासाहेब गोपले यांनी आमरण...

कळमोडी पाणलोट विकास संस्थेच्या पाठपुराव्याला यश

Image
मुंबई / रमेश औताडे  अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुणे जिल्ह्यातील कळमोडी उपसा जलसिंचन योजनेचा फेर जलनियोजन प्रस्ताव महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांचेकडे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने मान्यतेसाठी सादर केला आहे. जलसंपदा विभागाने कळमोडी पाणलोट विकास संस्थेचे अध्यक्ष अशोकराव टाव्हरे यांना लेखी पत्राद्वारे याबाबत माहिती दिली आहे.  कळमोडी उपसा जलसिंचन योजनेमध्ये खेड तालुक्याच्या पुर्व भागातील कनेरसर, पुर, वाफगाव, वरूडे या गावातील १२५२ हेक्टर व पश्चिम भागातील कुडे बुद्रुक,एकलहरे येथील ३०५ हेक्टर असे एकुण १५५७ हेक्टर वाढीव क्षेत्र प्रस्तावित केले आहे. आठ महिने पिक रचनेनुसार फेर जलनियोजन करण्यात आले आहे. कळमोडी धरणाचे १.०७ टीएमसी पाणी चासकमान धरणासाठी व ०. ८७ टीएमसी पाणी उपसा योजनेसाठी राखीव आहे. शासनाने  वाढीव गावांसह सुप्रमा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत परिगणके अंतिम करण्यात आली असून अंदाजपत्रक मान्यतेसाठी राज्य तांत्रिक  सल्लागार समिती -२ यांना सादर केल्याचे भामा आसखेड धरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नि.सं.लगड ...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुनील भालेराव

Image
मुंबई / रमेश औताडे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी युवा सामाजिक कार्यकर्ते सुनील भालेराव यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे ठाण्यातील मातंग समाजासह सर्व समाजामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाणे महानगरपालिकेमार्फत दरवर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन केले जाते. या उत्सवाचे नियोजन जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून करण्यात येते. यंदा प्रथमच एका सामान्य कार्यकर्त्याला सर्वानुमते अध्यक्षपदाची संधी देण्यात आल्याने या नियुक्तीचे स्वागत होत आहे. सुनील भालेराव हे सर्वसमावेशक, मितभाषी आणि ठाण्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. मातंग समाजाच्या सामाजिक चळवळीत त्यांनी सक्रिय योगदान दिले असून, विविध मोर्चे, जयंती उत्सव तसेच सामाजिक शिबिरांचे आयोजन त्यांनी केले आहे. तरुण चेहऱ्याला नेतृत्वाची संधी मिळाल्याने समाजातील तरुणांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. यंदाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव ३० ऑगस्ट २०२६ रोजी गडकरी...

नवी मुंबईकरांच्या आरोग्याची जीवघेणा खेळ नको

Image
      घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची निविदा पुन्हा मागवा नवी मुंबई / रमेश औताडे नवी मुंबई आणि परिसरातील नागरिकांना घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे भविष्यात गंभीर आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने सदर प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पुन्हा राबवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शिवसेना नगरसेवक अनिकेत म्हात्रे यांनी या प्रकरणी निविदा प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेवर यापूर्वीच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद असताना निविदा प्रक्रियेतील अटी, पात्रता आणि कार्यपद्धतीबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा तसेच सार्वजनिक निधीच्या योग्य वापराचा विचार करून निविदा नव्याने मागविण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे. तुर्भे परिसरात घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला जात असल्याने त्याचा पर्यावरणावर आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर...

आश्रमशाळेतील सेवाविषयक वादावरून आमरण उपोषण

Image
आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी मुंबई / रमेश औताडे आदिवासी अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेतील सेवाविषयक वादाच्या पार्श्वभूमीवर संबंधित शिक्षक तथा प्रभारी मुख्याध्यापक श्री. विनोद हुप्पा थोर यांनी सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. खानेदेश्वर कन्या स्व. स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी, श्रीपूर, ता. बार्शी, जि. सोलापूर या संस्थेच्या आश्रमशाळेशी संबंधित हा वाद असल्याचे उपोषणाच्या फलकावर नमूद करण्यात आले आहे. विभागीय चौकशी समितीने केलेल्या चौकशीत वेतनासंदर्भातील प्रकरणावरून संबंधित अधिकाऱ्यांनी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संस्थेने सेवेतून कमी करण्याची कारवाई केल्याचा दावा उपोषणकर्त्यांनी केला आहे. उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, आयुक्त नाशिक तसेच प्रकल्प अधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणात आदेश दिले असतानाही संस्थेने त्या आदेशांचे उल्लंघन केले. मात्र आदिवासी विकास विभागाच्या प्रशासनाकडून संस्थेविरुद्ध अपेक्षित कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. उपोषणकर्त्यांनी संबंधित प्रकरण...

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या दहा वर्षांच्या मंत्रीपदपूर्तीनिमित्त बाळासाहेब मिरजे यांच्याकडून स्वागत

Image
मुंबई / रमेश औताडे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रीपदाला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित सत्कार सोहळ्यात आर पी आय महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब मिरजे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीदरम्यान मिरजे यांनी आठवले यांना मंत्रीपदाच्या दहा वर्षांच्या यशस्वी कार्यकाळाबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक, राजकीय तसेच विविध जनहिताच्या विषयांवरही चर्चा झाली. रामदास आठवले यांच्या दीर्घ राजकीय वाटचालीचा आणि केंद्रीय मंत्री म्हणून केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आठवले यांचे अभिनंदन केले.