Posts

देवस्थान इनाम जमिनी प्रकरणी जेलभरो आंदोलन

Image
मुंबई / रमेश औताडे  अखिल भारतीय किसान सभेच्या जिल्हा सांगली शाखेच्या वतीने देवस्थान इनाम जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात या प्रमुख मागणीसाठी सोमवार, दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. कित्येक वर्षांपासून देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्क मिळावा, त्यांच्या नावावर जमिनींची नोंद व्हावी आणि शासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी किसान सभेने केली आहे. या मागणीसाठी मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष रमेश पाटील आणि जिल्हा सचिव गुलाब मुलाणी यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे लोकशाही मार्गाने जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील देवस्थान इनाम जमिनींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता असून, शासनाची भूमिका काय असेल याकडे शेतकऱ्यांचे ल...

अंकुशराव पाटील होनाळीकर यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आश्वासन

Image
मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री व राज्य उत्पादन शुल्क मंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रीय मराठा पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले. या प्रसंगी राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव पाटील होनाळीकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष परमेश्वर देशमुख आणि राष्ट्रीय सहसचिव शुभम पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. निवेदनाद्वारे महाराष्ट्रातील संवेदनशील ५०० मीटरच्या परिसरातील सर्व दारू दुकाने बंद करण्यात यावीत, लोणावळा ते ऊरळी कांचन (पुणे) दरम्यान लोकल रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी, तसेच लातूर जिल्ह्यातील देवणी येथे बस डेपो आणि महापारेषण १३२ सबस्टेशन निर्माण करण्यात यावे अशा प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. यासोबतच मुंबईतील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक त्वरित उभारण्यात यावे आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास ८५० कोटी रुपये देऊन ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात यावे या मागण्यांकडे लक्ष ...

झाडे तोडून " हरित फुफ्फुस " मातीच्या ढिगाऱ्याखाली

Image
       पर्यावरण रक्षणासाठी झाडे लावा आंदोलनाचा इशारा मुंबई / रमेश औताडे मुंबईतील आरे परिसरातील प्लॉट क्रमांक ३०७ समोर रॉयल प्लंब उर्फ अमीर पार्क परिसरात झाडांची कत्तल करून शूटिंग झोनसाठी मोठ्या प्रमाणात भरणी करून या ठिकाणी चित्रिकरणासाठी मोठ्या आकाराचे डोम उभारण्यात येत आहेत.  बृहन्मुंबई महानगरपालिकेने गांभीर्याने कारवाई करत सखोल चौकशी केली पाहिजे. अन्यथा मंत्रालयासमोर  झाडे लावा आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार साहेब पक्ष) जोगेश्वरी तालुका अध्यक्ष सचिनभाऊ लोंढे यांनी केली आहे.  बृहन्मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी उभारण्यात आलेल्या शूटिंग डोमसाठी परवानगी देण्यात आली होती का ? तसेच पर्यावरण आणि वृक्ष प्राधिकरणाच्या नियमांचे पालन झाले आहे का ? किती, कशी, कोणत्या जागेसाठी, काय अटी शर्ती घालून पालिकेने परवानगी दिली ? याबाबत स्पष्टीकरण अस्पष्ट आहे असे लोंढे यांनी सांगितले. आरे हे मुंबईचे "हरित फुफ्फुस" म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या परिसरातील पर्यावरणाची हानी वारंवार होत आहे. बेकायदेशीर वृक्षतोड व भरणीची त...

मोतीलाल नगर पुनर्विकास तातडीने सुरू करण्याची पत्रकार परिषदेत मागणी

Image
मुंबई / रमेश औताडे  गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगर क्र. १, २ व ३ या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न आता आणखी लांबणीवर पडू नये आणि प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी ठाम व एकमुखी मागणी मोतीलाल नगर जनकल्याणकारी समिती, मोतीलाल नगर रहिवाशी विकास संघ आणि मोतीलाल नगर पुनर्विकास समन्वय समिती यांच्या वतीने बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. मोतीलाल नगरमधील हजारो कुटुंबे अनेक दशकांपासून जुन्या, जीर्ण व असुरक्षित घरांमध्ये राहत आहेत. पायाभूत सुविधांचा अभाव, अपुरी जागा, वाहतूक कोंडी, अस्वच्छ परिसर आणि सुरक्षेच्या समस्या यामुळे रहिवाशांचे जीवन अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे हा पुनर्विकास केवळ बांधकामाचा प्रकल्प नसून हजारो कुटुंबांच्या सुरक्षित, सन्माननीय आणि चांगल्या भविष्याशी निगडित आहे. मोतीलाल नगर ही झोपडपट्टी किंवा खाजगी मालकीची जमीन नसून ती म्हाडाची अधिकृत वसाहत आहे. या वसाहतीवरील सर्व हक्क म्हाडाकडे असून संपूर्ण पुनर्विकास प्रक्रिया म्हाडाच्या देखरेखीखाली सुरु आहे. अदनी समूह हा केवळ प्रकल्पाचा विकासक असून सर्व निर्णय आणि अं...

महाराष्ट्राच्या दहीहंडीला आंतरराष्ट्रीय डिजिटल व्यासपीठ

Image
मुंबई / रमेश औताडे  बहुप्रतिक्षित " प्रो गोविंदा लीग सीझन ४ " हा दहीहंडी क्रीडा महोत्सव यंदा प्रथमच जियो हॉटस्टारवर थेट प्रक्षेपित होणार असल्याने महाराष्ट्राच्या दहीहंडी परंपरेला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठे डिजिटल व्यासपीठ मिळणार आहे. जगभरातील प्रेक्षकांना या स्पर्धेचा थरार अनुभवता येणार आहे. अशी माहिती प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी दिली. श्री सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन घेऊन यंदाचा प्रो गोविंदा सीझन ४ ची घोषणा केली.  येत्या २५, २६ आणि २७ ऑगस्ट  रोजी हा थरार होणार आहे. पुर्वेश सरनाईक यांनी श्री सिद्धिविनायकाच्या साक्षीने लीगच्या अधिकृत शुभंकर (मॅस्कॉट) 'बिट्टू बॉस' ची पहिली सार्वजनिक ओळख करून त्याचे अनावरण केले.   'बिट्टू बॉस' हे केवळ लीगचे शुभंकर नसून त्यामागे एक भावनिक आठवण दडली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एका छोट्या बिबट्याला दत्तक घेतले होते, ज्याचे नाव 'बिट्टू बॉस' असे होते. काही दिवसांपूर्वीच त्याचे आकस्मिक निधन झाले असून, त्याच्याच स्मरणार्थ हा अधिकृत मॅस्कॉट साकारण्यात आला आहे.

धर्मांतर-विरोधी कायद्याने न्यायाची जपणूक करावी -- जोजो थॉमस

Image
मुंबई / रमेश औताडे  नव्याने लागू करण्यात आलेल्या धर्मांतर-विरोधी कायद्याचा गैरवापर करून अल्पसंख्याक समुदाय किंवा संस्थांना मनःस्ताप दिला जाऊ नये. असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जोजो थॉमस यांनी व्यक्त केले. या कायद्याने न्याय, समानता आणि सामाजिक सलोखा यांसारख्या घटनात्मक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जोजो थॉमस यांनी व्यक्त केले. बळजबरी, फसवणूक किंवा सक्तीने केल्या जाणाऱ्या कोणत्याही धर्मांतराला काँग्रेस पक्षाचा ठाम विरोध असल्याचे स्पष्ट करतानाच, जोजो थॉमस यांनी या नवीन कायद्याचा योग्य प्रकारे करावा. ख्रिश्चन धर्मगुरू विरोधात भाजपच्या एका आमदाराने केलेल्या अलीकडील प्रक्षोभक विधानांवर सरकार गप्प का ? असे ते म्हणाले. इतर राज्यांमधील अल्पसंख्याकांना पाठिंबा दर्शवणे आणि त्याच वेळी महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या द्वेषपूर्ण भाषणांकडे  दुर्लक्ष करणे, हा एक स्पष्ट विरोधाभास आहे असे त्यांनी सांगितले. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील महाराष्ट्राच्या विकासासाठी या संस्थांनी दिलेल्या यो...

सरकारी रिक्त पदे भरण्यासाठी धरणे आंदोलन

Image
मुंबई / रमेश औताडे राज्यातील शासकीय व निमशासकीय विभागांमधील रिक्त पदे तातडीने भरावीत तसेच वंचित समाजाच्या प्रलंबित प्रश्नांकडे  सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, या मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने ५ ऑगस्ट रोजी  आझाद मैदानात एकदिवसीय धरणे आंदोलन करणार असे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सहदेवराव तयाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. वन विभाग, सिडको, एमआयडीसी, महानगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समिती आणि इतर शासकीय कार्यालयांमध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत संबंधित प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळालेला नसल्याचा आरोप त्यांनी केला. अन्यायग्रस्त आदिवासी, भटके व विमुक्त समाजाच्या विविध प्रकरणांमध्ये तातडीने कार्यवाही करावी, संबंधितांना न्याय द्यावा आणि शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणीही आरपीआय (आठवले) पक्षाच्या  वतीने करण्यात आली.