Posts

पद्मश्री मिलिंद कांबळेंची स्वच्छता दूत फाउंडेशन प्रशिक्षण केंद्राला भेट

Image
मुंबई / रमेश औताडे पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी स्वच्छता दूत फाउंडेशनच्या स्वच्छता कामगार प्रशिक्षण केंद्राला सदिच्छा भेट देऊन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी फाउंडेशनच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. उपस्थित स्वच्छता कामगारांशी संवाद साधताना पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी शिक्षण, कौशल्यविकास, आर्थिक स्वावलंबन आणि उद्योजकता यावर भर देत स्वच्छता कामगारांनी बदलत्या काळानुसार स्वतःला सक्षम करण्याचे आवाहन केले.  यावेळी स्वच्छता दूत फाउंडेशनच्या वतीने संस्थेच्या गेल्या २० वर्षांच्या कार्याचा आढावा सादर करण्यात आला. स्वच्छता कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम, यशोगाथा, सामाजिक परिवर्तनाचे प्रयत्न तसेच भविष्यातील विकास आराखडा पद्मश्री कांबळे आणि उपस्थितांसमोर मांडण्यात आला. सफाई कामगारांच्या सक्सेस यावेळी स्टोरी मांडण्यात आल्या व प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात आले.  मैथिली मिलिंद कांबळे, माया साबळे, रिबेका पाखरे, समाधान घुले, रत्नमाला राजगिरे, मंदाबाई आठवले, दिगंबर तुपे, प्रेम पाटोळे, हबीब खान उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस : कसलेले वकील, नवे चाणक्य !

Image
देवेंद्र फडणवीस : कसलेले वकील, नवे चाणक्य !                                     -योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१.                              भारतीय जनता पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करण्यासाठी २०१३ साली चर्चगेट येथील नरीमन पॉइंट येथे असलेल्या यशवंतराव चव्हाण केंद्रात विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. त्यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन जयराम गडकरी हे होते तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार हे कार्यरत होते. राष्ट्रीय आणि प्रदेश दोन्ही अध्यक्षांना तीन तीन वर्षे मुदतवाढ देण्यात यावी, अशी घटना दुरुस्ती करण्यात येणार होती. त्याप्रमाणे दुरुस्ती तर झाली, मात्र नितीन गडकरी यांच्या पूर्ती कारखान्याच्या नसलेल्या भ्रष्टाचाराचे प्रकरण पुढे आणण्यात आले आणि नितीन गडकरी यांच्या ऐवजी राजनाथ सिंह यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा सोपवण्यात आली. (नंतर नितीन गडकरी हे निर्दोष ठरले) प्रदेशाध्यक्ष सु...

रक्षाबंधन जवळ आले असतानाच

Image

उपवर्गीकरणाच्या मुद्यावर समाजसेविका सुनीता मोहन तूपसौंदर्य यांची मागणी

Image
आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तातडीने अंमलबजावणी करा  राजकारण नको, न्याय हवा –  पी आर न्यूज मिडिया नेटवर्क/ रमेश औताडे  अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रात तातडीने लागू करावे, अशी मागणी समाजसेविका सुनीता मोहन तूपसौंदर्य यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की, आरक्षणाच्या प्रश्नासाठी दिवंगत नेते बाबासाहेब गोपले यांनी आझाद मैदानावर उपोषण करून मातंग समाजाला स्वतंत्र आठ टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणी केली होती. मात्र, त्यावेळी सरकारने या प्रश्नावर योग्य न्याय दिला नाही. आता मातंग समाजाला आरक्षणाचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवू लागले असून, आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी समाज एकवटला आहे. सुनीता तूपसौंदर्य यांनी आरोप केला की, काही राजकारणी आणि राज्यकर्ते आरक्षणाच्या प्रश्नाचे राजकारण करून दलित समाजात जातीभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे समाजातील विविध घटकांनी परस्परांमध्ये मतभेद न करता, उपवर्गीकरणाची अंमलबजावणी लवकरात लवकर कशी होईल यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. त्या पुढे म्हणाल्या की, सर...

पर्यावरण रक्षक समिती चे अध्यक्ष किसान कदम यांचे आवाहन

Image
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  विशेष प्रतिनिधी  अध्यक्ष किसन कदम यांची माहिती ....... पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांना शुद्ध हवा, पाणी तसेच समृद्ध नैसर्गिक वारसा देण्यासाठी पर्यावरण रक्षक समितीतर्फे राज्यभर व्यापक वृक्षारोपण अभियान राबविण्यात येत आहे. समितीचे अध्यक्ष किसन कदम यांनी नागरिकांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. "एक वडाचे झाड लावा आणि ५०० वर्षांचे पुण्य कमवा" हा संदेश केवळ घोषवाक्य नसून भविष्यातील पर्यावरण संरक्षणाचा ठोस संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या वाढत्या काँक्रीटीकरणामुळे निसर्गाचे अस्तित्व धोक्यात आले असून प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वडाचे झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे मोकळी जागा नाही त्यांनी वडाची काडी प्लास्टिकच्या कुंडीत किंवा पिशवीत लावून ती ४ ते ५ फूट उंच होईपर्यंत जपावी. त्यानंतर मंदिर परिसर, गावातील मोकळी जागा किंवा वनक्षेत्रात सुरक्षितपणे तिची लागवड करावी. अशा प्रकारे लावलेले झाड पुढील अनेक शतकांपर्यंत पर्यावरणाचे संरक्षण करू शकते. लग्न, वाढदिवस, स्मृतिदिन ...

तुतारीच्या सुरातून सामाजिक ऐक्याचा संदेश

Image
मुंबई / रमेश औताडे  साहित्यभूषण लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा, मुंबई प्रदेश आणि आंबेडकरी विचार मंच यांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी काढण्यात आलेल्या अभिवादन रॅलीत कार्यकर्त्यांनी तुतारी वाजवत सामाजिक ऐक्याचा आणि परिवर्तनाचा संदेश दिला. "तुतारी आम्हीही वाजवली;  मात्र तिच्या प्रत्येक सुरात लहुजी वस्ताद साळवे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यभूषण अण्णा भाऊ साठे यांचे समतेचे, स्वाभिमानाचे आणि सामाजिक न्यायाचे विचार घुमले पाहिजेत," असे आंबेडकर विचार मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे म्हणाले. रॅलीदरम्यान बौद्ध, मातंग, चर्मकार, वाल्मिकी आणि आदिवासी समाजाच्या ऐक्यासाठी शपथ घेण्यात आली. विविध समाजघटकांनी एकत्र येत संविधानिक मूल्यांचे जतन, सामाजिक सलोखा आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. हातात बॅनर, पिवळे झेंडे आणि तुतारीच्या निनादात निघालेल्या या रॅलीने अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन करत सामाजिक ऐक्य आणि परिवर्तनाचा प्रभावी संदेश दिला.
Image