Posts

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या दहा वर्षांच्या मंत्रीपदपूर्तीनिमित्त बाळासाहेब मिरजे यांच्याकडून स्वागत

Image
मुंबई / रमेश औताडे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रीपदाला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित सत्कार सोहळ्यात आर पी आय महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब मिरजे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीदरम्यान मिरजे यांनी आठवले यांना मंत्रीपदाच्या दहा वर्षांच्या यशस्वी कार्यकाळाबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक, राजकीय तसेच विविध जनहिताच्या विषयांवरही चर्चा झाली. रामदास आठवले यांच्या दीर्घ राजकीय वाटचालीचा आणि केंद्रीय मंत्री म्हणून केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आठवले यांचे अभिनंदन केले.

भारतीय अस्मिता पार्टी मुळे 5 ऑगस्ट 2026 शासन निर्णय मधील अनेक नियम रद्द

Image
मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  *विद्यार्थांच्या आंदोलनास भारतीय अस्मिता पार्टी ची साथ..* राज्यात शासन निर्णय क्र. आवगृ -1325/प्र. क्र.154/का.12 दिनांक : 5 ऑगस्ट 2026 रोजी च्या शासन निर्णय ने राज्यात विद्यार्थांच्या हक्कावर गदा आली होती अनेक बंधने मुलावर लादली गेली होती.  त्यावर राज्यात विद्यार्थी वर्गाने तो निर्णय रद्द व्हावा म्हणून अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनि आंदोलने सुरू केली होती, परंतु शासन निर्णय रद्द करणे शक्य नाही ही बाब लक्षात येताच भारतीय अस्मिता पार्टी ने दिनांक :13 ऑगस्ट 2026 रोजी सुधारित निर्णय काढणे बाबत शासनाला पुरावे समवेत प्रस्ताव सादर केला  त्यावर शासनाने देखील तात्काळ दखल घेत शासन निर्णय क्रमांक : आवगृ -1325/प्र. क्र.154 का.12 दिनांक : 14 ऑगस्ट 2026 रोजी शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थांना देण्यात येणाऱ्या सोई सुविधांमध्ये सुसूत्रता आंननेबाबत एकत्रित सुधारित नियमावली जाहीर केली आहे दिनांक : 14 ऑगस्ट 2026 च्या शासन निर्णय मध्ये पुढील सुधारणा झाल्या. *परिशिष्ट अ. मध्ये* 1) वसतिगृहातील विद्यार्थांचे वय 26 वर्ष वरून 30 वर्ष केले.2)मुलीं...

मुंबईच्या रस्त्यावरची आपली हक्काची 'बेस्ट बस' आज व्हेंटिलेटरवर आहे.

Image
मुंबई / रमेश औताडे  मुंबईच्या रस्त्यावरची आपली हक्काची 'बेस्ट बस' आज व्हेंटिलेटरवर आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमाने २०२६-२७ या वर्षात ३,००० कोटी रुपयांच्या संभाव्य तुटवड्याचा जो इशारा दिला आहे, तो केवळ आकडा नाही तर याला जबाबदार मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या ठेकेदार धार्जिणा अट्टाहास. गेल्या आठ वर्षांत साचलेला एकूण ९,२८६ कोटींचा तोटा हा नैसर्गिक नसून, तो 'वेट लीज' खासगीकरण मॉडेलमुळे पद्धतशीरपणे खणलेला खड्डा आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका आपल्याच बससेवेला संपवण्याचा डाव आखतेय, ही ३१ लाख मुंबईकर प्रवाशांसाठी अत्यंत संतापजनक बाब आहे. २०१८ मध्ये बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या ३,२०० बस ताफ्यात होत्या, आज ती संख्या २४९ वर कशी आली? ३१ लाख मुंबईकरांना रोज वेठीस धरणारे आणि नफेखोरी करणारे खासगी कंत्राटदार प्रशासनाचे इतके लाडके का? स्वतःच्या बस खरेदी करायला पालिकेकडे पैसे नाहीत, पण 'ब्युटीफिकेशन'च्या नावाखाली हजारो कोटींची उधळण करायला पैसे कुठून येतात? कंत्राटदारांच्या बस रोज रस्त्यात बंद पडतायत, अपघात होतायत, कर्मचाऱ्यांचे शोषण होतं...

पथविक्रेता योजना अंमलबजावणीला गती द्यावी - महापौर रितू तावडे

Image
मुंबई / रमेश औताडे  शासनाकडून पथविक्रेता योजनेची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर, त्याची तत्काळ अंमलबजावणी सुरु करता यावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभाग स्तरांवरील प्राथमिक तयारी पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यादिशेने कार्यवाहीला गती द्यावी, असे निर्देश मुंबईच्या महापौर  रितू तावडे यांनी दिले आहेत. तसेच, पथविक्रेता योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात महापौरांनी विविध सूचना देखील केल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पथविक्रेता (फेरीवाले) धोरण तसेच कामकाज संदर्भात मुंबईच्या महापौर  रितू तावडे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात आज (दिनांक १४ ऑगस्ट २०२६) आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, उपआयुक्त (विशेष) विनायक विसपुते, उपआयुक्त  चंदा जाधव, उपआयुक्त सर्वश्री विश्वास मोटे, संतोषकुमार धोंडे, मनीष वळंजू, अनुज्ञापन अधीक्षक  अनिल काटे यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. पथविक्रेता (फेरीवाले) धोरण तसेच कामकाज विषयक अद्ययावत माहिती महानगरप...

ठाण्यात स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘युवा अभिनंदन प्रभात फेरी’

Image
ठाणे : रमेश औताडे  पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  देशाच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इको फ्रेंडली लाइफ (EFL) संस्थेच्या वतीने शनिवार, १५ ऑगस्ट रोजी ठाण्यात ‘युवा अभिनंदन प्रभात फेरी’ आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि शाश्वत जीवनशैलीचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पर्यावरण बचाओ, भारत बचाओ अभियान’ या व्यापक संकल्पनेशी जोडलेल्या या उपक्रमात ‘एक कुटुंब – एक शक्तिस्थळ’ हा संदेश देण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबाने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी आणि स्थानिक पातळीवर वृक्षसंवर्धनाचे केंद्र उभारावे, या विचाराला अभियानातून प्रोत्साहन दिले जात आहे. देशभरात वृक्षलागवड व पर्यावरण संवर्धनाची व्यापक चळवळ उभारण्याच्या उद्देशाने ७०० कोटी वृक्षांचे अभियानात्मक उद्दिष्ट मांडण्यात आले आहे. संस्थेचे प्रेरणास्थान सर श्री अशोक एन. जे. यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रभात फेरीला शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत तलाव पाळी, जांभळी नाका, ठाणे येथून सुरुवात होणार आहे. युवकांस...

सफाई कामगारांना ‘स्वयंसेवक’ म्हणता येणार नाही

Image
           औद्योगिक लेबर कोर्टाचा पालिकेला सवाल मुंबई / रमेश औताडे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून दुर्गंधीयुक्त कचरा, घाण आणि अस्वच्छता दूर करून शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करणाऱ्या सफाई कामगारांना केवळ ‘स्वयंसेवक’ म्हणून संबोधता येणार नाही, त्यांना कामगार दर्जा मिळावा असे निरीक्षण औद्योगिक लेबर कोर्टाने नोंदविल्याची माहिती समोर आली आहे. हे कामगार प्रत्यक्षात कायमस्वरूपी कामगारांप्रमाणेच नियमित स्वरूपाचे काम करीत आहेत. मुंबई शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज दुर्गंधीयुक्त कचरा उचलण्यापासून ते विविध स्वच्छता कामांपर्यंतची जबाबदारी ते पार पाडतात. या कामावरच त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे त्यांना ‘स्वयंसेवक’ म्हणणे योग्य आहे का, असा प्रश्न न्यायालयाने पालिकेसमोर उपस्थित केला आहे. सफाई कामगार नेते अखिल भारतीय श्रमिक एकता युनियन चे अध्यक्ष मोहन पी आर देवेंद्र यांनी न्यायालयात धाव घेतली असताना न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निर्णय दिला आहे. कामगारांच्या कष्टाचे चीज झाले असून आता हे कामगार कायम कामगार होणार आहेत. त्यामुळे ...

बेस्टच्या आर्थिक संकटावर राहुल गांधींना निवेदन देणार

Image
मुंबई  / रमेश औताडे मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या आर्थिक संकटाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निवेदन देण्यात येणार आहे. बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने विशेष आर्थिक पॅकेज द्यावे, तसेच वाढत्या खासगी कंत्राटी बससेवेऐवजी बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या बसचा ताफा वाढवावा, अशी मागणी नितीन भाऊराव पाटील यांनी केली आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षात बेस्ट उपक्रमाला सुमारे ३,००० कोटी रुपयांचा संभाव्य तुटवडा निर्माण होण्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या आठ वर्षांत बेस्टचा संचित तोटा सुमारे ९,२८६ कोटी रुपये झाल्याचे सांगितले जात आहे. ही परिस्थिती केवळ आर्थिक बाब नसून लाखो मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाशी संबंधित असल्याचे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे. २०१८ मध्ये बेस्टच्या मालकीच्या बसचा ताफा सुमारे ३,२०० होता. आज स्वतःच्या मालकीच्या बसची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, बेस्टची वाहतूक व्यवस्था खासगी कंत्राटदारांवर अधिकाधिक अवलंबून होत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. खासगी कंत्राटी बसची देखभ...