Posts
बोगस डॉक्टर ओळखण्यासाठी शासनाचा क्यू आर कोड
- Get link
- X
- Other Apps
बोगस डॉक्टर ओळखण्यासाठी शासनाचा क्यू आर कोड मुंबई / रमेश औताडे : पी आर न्यूज मिडिया नेटवर्क बोगस डॉक्टरांच्या वाढत्या सुळसुळाटाला आळा घालण्यासाठी सरकारने आता प्रत्येक दवाखाना आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा परवाना, शिक्षण आणि नोंदणी क्रमांक असलेला क्यू आर कोड लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत करत, हीच प्रणाली इतरही क्षेत्रात लागू करावी, अशी मागणी दक्ष नागरिक मंचचे संस्थापक अध्यक्ष रमेश औताडे यांनी केली आहे. सध्या अनेक ठिकाणी बोगस डॉक्टर, बोगस पत्रकार, बोगस वकील आणि बोगस पोलीस असल्याच्या भासवून नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. सामान्य नागरिकाला समोरची व्यक्ती खरी आहे की बोगस हे ओळखणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने डॉक्टरांसाठी सुरू केलेली क्यू आर कोड प्रणाली अत्यंत स्तुत्य आहे. याच धर्तीवर पत्रकार, वकील, पोलीस कर्मचारी तसेच शासकीय अधिकारी व इतर सार्वजनिक सेवांशी संबंधित वर्गासाठीही अधिकृत ओळखपत्रासह क्यू आर कोड प्रणाली लागू करावी, जेणेकरून नागरिकांना मोबाईलवर स्कॅन करून संब...
बेस्ट बस वाचविण्यासाठी एक मोठा प्रयत्न
- Get link
- X
- Other Apps
रमेश औताडे / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क मुंबई : बुधवार - ९/९/२०२६ मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या सद्यस्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत ‘आपली बेस्ट आपल्याचसाठी’ या संस्थेने बेस्टच्या पुनरुत्थानासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बेस्टच्या स्वमालकीच्या बसगाड्यांची घटती संख्या, कंत्राटी बसगाड्यांवरील वाढते अवलंबित्व, मनुष्यबळातील कपात आणि कंत्राटीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे बेस्टच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. बेस्ट उपक्रमाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याऐवजी ती हळूहळू कंत्राटी पद्धतीवर अवलंबून होत असल्याचा आरोप संस्थेने केला आहे. बसगाड्यांपासून मनुष्यबळ आणि तिकीट प्रणालीपर्यंत वाढत असलेले कंत्राटीकरण बेस्टला भविष्यात शंभर टक्के कंत्राटीकरणाच्या दिशेने घेऊन जाणार आहे का, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसगाड्यांची गरज मान्य असली तरी इलेक्ट्रिक बसच्या नावाखाली बेस्टच्या स्वमालकीचा ताफा कमी करून कंत्राटी बसगाड्यांवरील अवलंबित्व वाढवणे योग्य आहे का, याचा फेरव...
दृष्टी नसली तरी आनंदाची उंची गगनाएवढी
- Get link
- X
- Other Apps
मुंबई, दि. ४ सप्टेंबर : भीमराव धुळप दहीकाला उत्सवाच्या पूर्वसंध्येला कमला मेहता अंध मुलींची शाळा, दादर पूर्व येथे शिवसेना माहीम विधानसभा आणि ‘धगधगती मुंबई’ परिवाराच्या संयुक्त विद्यमाने ‘एक हंडी दिव्यांगांसाठी’ हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. आमदार व विभागप्रमुख महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी स्वीकृत नगरसेवक साईनाथ दुर्गे, विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे, भीमराव धुळप, मुख्याध्यापिका तन्वी म्हाडदळकर, सुरेश काळे, श्याम चित्रे, विशाल चाफे, प्रकाश नवल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात मुलींना श्रीकृष्णाची ट्रॉफी, सहभागी प्रमाणपत्र आणि प्रत्येकी रोख पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. तसेच सर्व मुलींना खाऊ वाटप करण्यात आला. श्रीकृष्णाची ट्रॉफी डोक्यावर घेऊन मुलींनी आनंदाने नृत्य केले. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून उपस्थितांचे मन भरून आले. “मुलींना दृष्टी नसली तरी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्हाला या छोट्याशा मदतीचे मोठे समाधान मिळाले,” अशी भावना आयोजकांनी व्यक्त ...
गोविंदाचा मृत्यू झाल्यास आयोजकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
- Get link
- X
- Other Apps
महाराष्ट्र करणी सेनेची मागणी; अजय सिंह सेंगर यांचा इशारा मुंबई / रमेश औताडे दहीहंडी उत्सव आणि सरावादरम्यान गोविंदांच्या होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी दहीहंडीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेती अथवा वाळूचा थर पसरविणे बंधनकारक करावे, अशी मागणी महाराष्ट्र करणी सेनेने केली आहे. सुरक्षेच्या उपाययोजना न करता दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आणि त्यात गोविंदाचा मृत्यू झाला, तर संबंधित आयोजकांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी केली आहे. दहीहंडीच्या वेळी मानवी मनोरे रचताना तोल जाणे, उंचीवरून खाली पडणे आणि अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे दरवर्षी अनेक गोविंदा जखमी होतात. काही दुर्घटनांमध्ये गोविंदांना जीवही गमवावा लागतो. पूर्वी दहीहंडीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेती टाकली जात असल्याने उंचीवरून पडलेल्या गोविंदाला गंभीर दुखापत होण्याचा धोका तुलनेने कमी होता. मात्र, अलीकडील काळात रस्त्यांवर रेती न टाकताच दहीहंडीचे आयोजन केले जात असल्याचा आरोप सेंगर यांनी केला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र करणी सेनेने मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह र...
मराठा समाजाच्या २६ मागण्यांसाठी राज्यभर जनजागृती
- Get link
- X
- Other Apps
मंत्रालय प्रतिनिधी / रमेश औताडे मराठा समाजाच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय मराठा पार्टीने राज्यव्यापी जनजागृती दौरा सुरू केला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील (होनाळीकर) यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा सुरू असून, समाजाच्या २६ प्रमुख मागण्यांसाठी आंदोलनाची तयारी करण्यात येत आहे. रायगड किल्ल्यापासून सुरू झालेला हा दौरा कोकणातील विविध जिल्ह्यांतून पुढे जात रत्नागिरीत दाखल झाला. ३१ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विविध घटकांशी संवाद साधत मागण्यांबाबत जनजागृती केली. येत्या ५ ऑक्टोबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. आंदोलनासाठी समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी गावागावांत संपर्क मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, अंकुशराव पाटील यांनी रत्नागिरी येथील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी जिल्हा कार्यालयाचे समन्वयक सिद्धेश सुभाषराव पांळद...
वय नव्हे , नव्या सुरुवातीची तयारी महत्त्वाची : ‘ आरंभ ' चा संदेश
- Get link
- X
- Other Apps
मुंबई / रमेश औताडे आयुष्यात नव्याने सुरुवात करण्यासाठी वयाची मर्यादा नसते, हा प्रेरणादायी संदेश देत जागतिक व्यापार केंद्र, मुंबई येथे कला, अध्यात्म आणि आत्मचिंतनाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित या विशेष सोहळ्यात राजयोगिनी ब्रह्माकुमारी डॉ. नलिनी दीदी (दीदी माँ) यांनी रेखाटलेल्या श्रीकृष्णाच्या आकर्षक चित्रांचे प्रदर्शन लक्षवेधी ठरले. या चित्रांमधून श्रीकृष्णाच्या विविध भावविश्वाचे दर्शन घडत असतानाच, अंतर्मनातून आलेली दृष्टी आणि सकारात्मक विचार आयुष्यभर प्रेरणा देऊ शकतात, हा संदेशही अधोरेखित झाला. याच सोहळ्यात ‘Echoes Of The Soul – Reflections For A Conscious Life’ या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले. अधिक सजग, सकारात्मक आणि अर्थपूर्ण जीवनाची सुरुवात कोणत्याही क्षणी करता येते, या विचारांवर पुस्तक आधारित आहे. ‘आरंभ’—It’s Never Too Late In Life हा या कार्यक्रमाचा मध्यवर्ती विचार होता. आयुष्यात किती उशीर झाला यापेक्षा नव्याने सुरुवात करण्याची तयारी आहे का, हे अधिक महत्त्वाचे असल्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला. कला, अध्यात...