Posts

नवी मुंबईकरांच्या आरोग्याची जीवघेणा खेळ नको

Image
      घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची निविदा पुन्हा मागवा नवी मुंबई / रमेश औताडे नवी मुंबई आणि परिसरातील नागरिकांना घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे भविष्यात गंभीर आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने सदर प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पुन्हा राबवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शिवसेना नगरसेवक अनिकेत म्हात्रे यांनी या प्रकरणी निविदा प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेवर यापूर्वीच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद असताना निविदा प्रक्रियेतील अटी, पात्रता आणि कार्यपद्धतीबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा तसेच सार्वजनिक निधीच्या योग्य वापराचा विचार करून निविदा नव्याने मागविण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे. तुर्भे परिसरात घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला जात असल्याने त्याचा पर्यावरणावर आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर...

आश्रमशाळेतील सेवाविषयक वादावरून आमरण उपोषण

Image
आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी मुंबई / रमेश औताडे आदिवासी अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेतील सेवाविषयक वादाच्या पार्श्वभूमीवर संबंधित शिक्षक तथा प्रभारी मुख्याध्यापक श्री. विनोद हुप्पा थोर यांनी सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. खानेदेश्वर कन्या स्व. स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी, श्रीपूर, ता. बार्शी, जि. सोलापूर या संस्थेच्या आश्रमशाळेशी संबंधित हा वाद असल्याचे उपोषणाच्या फलकावर नमूद करण्यात आले आहे. विभागीय चौकशी समितीने केलेल्या चौकशीत वेतनासंदर्भातील प्रकरणावरून संबंधित अधिकाऱ्यांनी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संस्थेने सेवेतून कमी करण्याची कारवाई केल्याचा दावा उपोषणकर्त्यांनी केला आहे. उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, आयुक्त नाशिक तसेच प्रकल्प अधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणात आदेश दिले असतानाही संस्थेने त्या आदेशांचे उल्लंघन केले. मात्र आदिवासी विकास विभागाच्या प्रशासनाकडून संस्थेविरुद्ध अपेक्षित कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. उपोषणकर्त्यांनी संबंधित प्रकरण...

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या दहा वर्षांच्या मंत्रीपदपूर्तीनिमित्त बाळासाहेब मिरजे यांच्याकडून स्वागत

Image
मुंबई / रमेश औताडे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रीपदाला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित सत्कार सोहळ्यात आर पी आय महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब मिरजे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीदरम्यान मिरजे यांनी आठवले यांना मंत्रीपदाच्या दहा वर्षांच्या यशस्वी कार्यकाळाबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक, राजकीय तसेच विविध जनहिताच्या विषयांवरही चर्चा झाली. रामदास आठवले यांच्या दीर्घ राजकीय वाटचालीचा आणि केंद्रीय मंत्री म्हणून केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आठवले यांचे अभिनंदन केले.

भारतीय अस्मिता पार्टी मुळे 5 ऑगस्ट 2026 शासन निर्णय मधील अनेक नियम रद्द

Image
मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  *विद्यार्थांच्या आंदोलनास भारतीय अस्मिता पार्टी ची साथ..* राज्यात शासन निर्णय क्र. आवगृ -1325/प्र. क्र.154/का.12 दिनांक : 5 ऑगस्ट 2026 रोजी च्या शासन निर्णय ने राज्यात विद्यार्थांच्या हक्कावर गदा आली होती अनेक बंधने मुलावर लादली गेली होती.  त्यावर राज्यात विद्यार्थी वर्गाने तो निर्णय रद्द व्हावा म्हणून अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनि आंदोलने सुरू केली होती, परंतु शासन निर्णय रद्द करणे शक्य नाही ही बाब लक्षात येताच भारतीय अस्मिता पार्टी ने दिनांक :13 ऑगस्ट 2026 रोजी सुधारित निर्णय काढणे बाबत शासनाला पुरावे समवेत प्रस्ताव सादर केला  त्यावर शासनाने देखील तात्काळ दखल घेत शासन निर्णय क्रमांक : आवगृ -1325/प्र. क्र.154 का.12 दिनांक : 14 ऑगस्ट 2026 रोजी शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थांना देण्यात येणाऱ्या सोई सुविधांमध्ये सुसूत्रता आंननेबाबत एकत्रित सुधारित नियमावली जाहीर केली आहे दिनांक : 14 ऑगस्ट 2026 च्या शासन निर्णय मध्ये पुढील सुधारणा झाल्या. *परिशिष्ट अ. मध्ये* 1) वसतिगृहातील विद्यार्थांचे वय 26 वर्ष वरून 30 वर्ष केले.2)मुलीं...

मुंबईच्या रस्त्यावरची आपली हक्काची 'बेस्ट बस' आज व्हेंटिलेटरवर आहे.

Image
मुंबई / रमेश औताडे  मुंबईच्या रस्त्यावरची आपली हक्काची 'बेस्ट बस' आज व्हेंटिलेटरवर आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमाने २०२६-२७ या वर्षात ३,००० कोटी रुपयांच्या संभाव्य तुटवड्याचा जो इशारा दिला आहे, तो केवळ आकडा नाही तर याला जबाबदार मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या ठेकेदार धार्जिणा अट्टाहास. गेल्या आठ वर्षांत साचलेला एकूण ९,२८६ कोटींचा तोटा हा नैसर्गिक नसून, तो 'वेट लीज' खासगीकरण मॉडेलमुळे पद्धतशीरपणे खणलेला खड्डा आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका आपल्याच बससेवेला संपवण्याचा डाव आखतेय, ही ३१ लाख मुंबईकर प्रवाशांसाठी अत्यंत संतापजनक बाब आहे. २०१८ मध्ये बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या ३,२०० बस ताफ्यात होत्या, आज ती संख्या २४९ वर कशी आली? ३१ लाख मुंबईकरांना रोज वेठीस धरणारे आणि नफेखोरी करणारे खासगी कंत्राटदार प्रशासनाचे इतके लाडके का? स्वतःच्या बस खरेदी करायला पालिकेकडे पैसे नाहीत, पण 'ब्युटीफिकेशन'च्या नावाखाली हजारो कोटींची उधळण करायला पैसे कुठून येतात? कंत्राटदारांच्या बस रोज रस्त्यात बंद पडतायत, अपघात होतायत, कर्मचाऱ्यांचे शोषण होतं...

पथविक्रेता योजना अंमलबजावणीला गती द्यावी - महापौर रितू तावडे

Image
मुंबई / रमेश औताडे  शासनाकडून पथविक्रेता योजनेची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर, त्याची तत्काळ अंमलबजावणी सुरु करता यावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभाग स्तरांवरील प्राथमिक तयारी पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यादिशेने कार्यवाहीला गती द्यावी, असे निर्देश मुंबईच्या महापौर  रितू तावडे यांनी दिले आहेत. तसेच, पथविक्रेता योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात महापौरांनी विविध सूचना देखील केल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पथविक्रेता (फेरीवाले) धोरण तसेच कामकाज संदर्भात मुंबईच्या महापौर  रितू तावडे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात आज (दिनांक १४ ऑगस्ट २०२६) आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, उपआयुक्त (विशेष) विनायक विसपुते, उपआयुक्त  चंदा जाधव, उपआयुक्त सर्वश्री विश्वास मोटे, संतोषकुमार धोंडे, मनीष वळंजू, अनुज्ञापन अधीक्षक  अनिल काटे यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. पथविक्रेता (फेरीवाले) धोरण तसेच कामकाज विषयक अद्ययावत माहिती महानगरप...

ठाण्यात स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘युवा अभिनंदन प्रभात फेरी’

Image
ठाणे : रमेश औताडे  पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  देशाच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इको फ्रेंडली लाइफ (EFL) संस्थेच्या वतीने शनिवार, १५ ऑगस्ट रोजी ठाण्यात ‘युवा अभिनंदन प्रभात फेरी’ आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि शाश्वत जीवनशैलीचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पर्यावरण बचाओ, भारत बचाओ अभियान’ या व्यापक संकल्पनेशी जोडलेल्या या उपक्रमात ‘एक कुटुंब – एक शक्तिस्थळ’ हा संदेश देण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबाने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी आणि स्थानिक पातळीवर वृक्षसंवर्धनाचे केंद्र उभारावे, या विचाराला अभियानातून प्रोत्साहन दिले जात आहे. देशभरात वृक्षलागवड व पर्यावरण संवर्धनाची व्यापक चळवळ उभारण्याच्या उद्देशाने ७०० कोटी वृक्षांचे अभियानात्मक उद्दिष्ट मांडण्यात आले आहे. संस्थेचे प्रेरणास्थान सर श्री अशोक एन. जे. यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रभात फेरीला शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत तलाव पाळी, जांभळी नाका, ठाणे येथून सुरुवात होणार आहे. युवकांस...