Posts

अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या कारभाराचा हिशोब जाहीर करा

Image
अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या कारभाराचा हिशोब जाहीर करा;  सकल मांग गारूडी समाज कृती समितीचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन मुंबई / रमेश औताडे  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन (स्थापना: १९ जुलै १९८५) द्वारे मागील ४० वर्षांत मांग गारूडी समाजासाठी राबवण्यात आलेल्या सर्व योजनांचा वर्षनिहाय व जिल्हानिहाय संपूर्ण हिशोब सार्वजनिक करावा, या मागणीसाठी सकल मांग गारूडी समाज कृती समिती (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने श्री. सचिन आदिनाथ लोंढे यांच्या नेतृत्वात मुंबईतील आझाद मैदानावर २९ ऑक्टोबर २०२१ पासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.  प्रमुख मागण्या आणि उपस्थित केलेले प्रश्न:  * कर्ज व अनुदान वितरण: महामंडळ स्थापनेपासून आजपर्यंत मांग गारूडी समाजातील किती लाभार्थ्यांना प्रत्यक्ष कर्ज मिळाले? एकूण किती रुपयांचे कर्ज व अनुदान देण्यात आले?  * योजनांचा लाभ: बीज भांडवल, थेट कर्ज, शिष्यवृत्ती, प्रशिक्षण व इतर शासकीय योजनांमध्ये समाजाला नेमका किती लाभ मिळाला?  * जिल्हानिहाय आकडेवारी: संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हानिहाय कित...

श्लोक को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

Image
मुंबई  / रमेश औताडे ( मंत्रालय प्रतिनिधी )  श्लोक को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांच्या उत्स्फूर्त सहभागात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. संस्थेच्या मागील वर्षातील कामकाजाचा आढावा, आर्थिक स्थिती, सभासदहिताचे विविध निर्णय तसेच आगामी वर्षातील विकासात्मक नियोजनाबाबत सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी संस्थेचे संस्थापक माननीय अविनाश दादा पाटील तसेच अध्यक्षा सौ. सविता अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. सभेच्या प्रारंभी उपस्थित सभासद, पदाधिकारी व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त, आर्थिक अहवाल, ताळेबंद व लेखापरीक्षण अहवाल याबाबत माहिती सभासदांसमोर मांडण्यात आली. सभेत संस्थेच्या आर्थिक प्रगतीसोबतच सभासदांना अधिक चांगल्या आणि तत्पर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. बचत, ठेवी, कर्जवितरण, सभासद सेवा आणि आर्थिक शिस्त या बाबींवर विशेष भर देण्यात आला. सहकाराच्या माध्यमातून सभासदांचा आर्थिक विकास साधण्याचा संस्थेचा प्रयत्न ...

गुणवंत कामगारांना एसटी प्रवास व टोलमाफीची सवलत द्या

Image
मुंबई  / रमेश औताडे  महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील गुणवंत कामगारांनी एकत्र येऊन “राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र” या संस्थेची नोंदणी केली आहे. सामाजिक व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शासनाकडून “गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार” मिळालेल्या कामगारांना अद्याप विशेष सुविधा मिळत नसल्याने संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. पुरस्कारप्राप्त गुणवंत कामगारांना एसटी बस प्रवासात विशेष सवलत तसेच टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी संघटनेने शासनाकडे केली आहे. इतर पुरस्कारार्थींना विविध सुविधा मिळतात, मात्र गुणवंत कामगारांना सुविधा न मिळणे अन्यायकारक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. सुरेश केसरकर यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा सुरू असून, मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. प्रभाकर तुकाराम कांबळे यांनी शासनाकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. गुणवंत कामगारांना सन्मानासोबतच आवश्यक सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

सुरेश वाडकरांच्या आवाजात ‘ करा रे नामाचा गजर ’

Image
मुंबई / रमेश औताडे  लहानपणापासून मनात जपलेले संगीतकार होण्याचे स्वप्न अखेर रविंद्र दामोदर पाबरेकर यांनी साकार केले आहे. त्यांच्या संगीतबद्ध केलेल्या ‘करा रे नामाचा गजर’ या गणेशभक्तीपर गीताला ज्येष्ठ गायक पंडित सुरेश वाडकर यांनी आवाज दिला आहे. रेड रिबन म्युझिक चॅनेलद्वारे हे गीत प्रकाशित झाले असून विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध आहे.  हे पहिलेच गीत पद्मश्री वसंत देसाई यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आले आहे. वृत्तपत्रे आणि मासिकांमधील कवितांना चाली लावण्याचा छंद पाबरेकर यांना लहानपणापासून होता. भायखळ्यातील वास्तव्यात कव्वालीचे सामने, शाहीर अमर शेख यांचे पोवाडे तसेच नेहरू सेंटरच्या माध्यमातून होणारे लोकसंगीताचे कार्यक्रम पाहण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांचे मावसभाऊ राम जामगावकर हे पद्मश्री वसंत देसाई यांच्याकडे ढोलकीवादक होते. या सांगीतिक वातावरणामुळे त्यांच्या मनात संगीताची आवड रुजली. संगीतकार होण्याची इच्छा असतानाही आईच्या विरोधामुळे त्यांनी चित्रकलेकडे वळण्याचा निर्णय घेतला. टेक्सटाइल डिझाईन, कमर्शियल आर्ट आणि फाइन आर्ट असा प्रवास करत ते गेली ३३ वर्षे या क्षेत्रा...

शासनाकडे प्रभाकर तुकाराम कांबळे यांची महत्वपूर्ण मागणी

Image
मुंबई  / रमेश औताडे  ( मंत्रालय प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने म्हाडा व सिडकोच्या गृहनिर्माण योजनांमध्ये गुणवंत कामगारांसाठी स्वतंत्र आरक्षणाची तरतूद करण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे. असोसिएशनचे मुंबई जिल्हाध्यक्ष प्रभाकर तुकाराम कांबळे यांनी ही मागणी शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. राज्याच्या सामाजिक, औद्योगिक आणि आर्थिक विकासात गुणवंत कामगारांचे योगदान मोठे आहे. विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करून समाज व राज्याच्या प्रगतीला हातभार लावणाऱ्या कामगारांना त्यांच्या कार्याची योग्य दखल घेत सन्मान आणि प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. मात्र, अनेक गुणवंत कामगारांना मुंबई व उपनगरांमध्ये परवडणारी घरे मिळविण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे असोसिएशनने नमूद केले आहे. मुंबई महानगर परिसरातील वाढती घरांच्या किमती, मर्यादित उत्पन्न आणि वाढता जीवनावश्यक खर्च लक्षात घेता गुणवंत कामगारांसाठी म्हाडा व सिडकोच्या गृहनिर्माण योजनांमध्ये स्वतंत्र कोटा किंवा आरक्षण उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी कांबळे यां...

राष्ट्रीय पोषण महिना उत्साहात संपन्न

Image
मुंबई  / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ९ व्या राष्ट्रीय पोषण महिन्याचा राज्यस्तरीय उद्घाटन सोहळा यशवंतराव चव्हाण मुख्य सभागृह, मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  या कार्यक्रमास राज्यभरातून आलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका आणि विभागाचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये  महिला व बाल विकास मंत्री मा.ना. आदिती ताई सुनील तटकरे,  विधानसभेचे अध्यक्ष मा.राहुल नार्वेकर व  एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्याच्या आयुक्त माधवी सरदेशमुख व इतर मान्यवरांच्या उपस्थित होते.  कार्यक्रमाची सुरुवात पारंपारिक दीपप्रज्वलनाने करण्यात आली.  या वर्षीच्या पोषण महिन्याचे मुख्य उद्दिष्ट हे ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके, किशोरवयीन मुली, गरोदर माता व स्तनदा माता यांना पोषक आहार, आरोग्य सेवा आणि शिक्षण याबाबत जागरूक करणे हे आहे.  "आमची अंगणवाडी - आमची जबाबदारी" आणि "पौष्टिक आहार - निरोगी जीवनाचा आधार" हा संद...

शेतकऱ्याला न्याय ; भोगवटा बदलाचा आदेश रद्द

Image
    सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांच्या प्रयत्नांचे कौतुक मुंबई / रमेश औताडे :   मंत्रालय प्रतिनिधी  ,   पी आर न्यूज  शासनाकडून चूक झाली तर कायदेशीर व सातत्य ठेऊन कागदोपत्री पाठपुरावा केला तर न्याय मिळतोच. असा अनुभव अहिल्यानगर जिल्यातील संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव खंडेराय वाडी येथील आदेश चाचण यांना आला आहे. या पाठपुराव्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावल्याने त्यांचे शासकीय अधिकारी व शेतकरी वर्गातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आदेश चाचण यांनी दोन वर्षापुर्वी अशोकराव टाव्हरे यांची भेट घेऊन २४ एकर जमिनीबाबत सरकारी पातळीवर चुकीचे आदेश पारित झाल्याची माहिती दिली होती. त्या पार्श्वभूमीवर टाव्हरे यांनी शासनाला पाठपुरावा करत निवेदने दिली असावमहसुल विभागाने जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना चौकशीचे आदेश देऊन स्वयंस्पष्ट अहवाल मागविले  होते. त्यानुसार शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांना पत्र दिले. त्यांनी वस्तुनिष्ठ अहवाल पाठविला. अप्पर जिल्हा...