Posts

इराणमध्ये बहाई समुदायाविरोधात द्वेष पसरवण्याचे आरोप

Image
      राष्ट्रीय संकटाच्या पार्श्वभूमीवर दडपशाही वाढल्याचा इशारा मुंबई / रमेश औताडे  इराणमध्ये सुरू असलेल्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर बहाई समुदायाला बकरा बनवून त्यांच्याविरोधात द्वेष पसरवला जात असल्याचा गंभीर आरोप बहाई इंटरनॅशनल कम्युनिटी ने केला आहे. राज्यनियंत्रित माध्यमांमधून खोटे आरोप, बदनामी आणि दबावाखाली घेतलेल्या तथाकथित “कबुल्या” प्रसारित केल्या जात असल्याने बहाई समुदायावरील दडपशाही धोकादायक टप्प्यावर पोहोचल्याचे बीआयसी ने म्हटले आहे. गेल्या आठवडाभरात इराणच्या सरकारी चॅनेल्सवर बहाई नागरिकांविरोधात बनावट आरोप प्रसारित करण्यात आले. यासोबतच अटक आणि नजरकैदेत वाढ झाल्याचेही अहवाल आहेत. विशेष म्हणजे १ फेब्रुवारी २०२६ रोजी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंग या संस्थेने दबाव व सक्तीखाली घेतलेल्या दोन बहाई नागरिकांच्या “कबुल्या” प्रसारित केल्या. मानवी हक्क संघटनांनी अशा प्रकारच्या सक्तीच्या कबुल्यांची पद्धत पूर्वीपासून नोंदवली असून, पुराव्याविना केलेले हे प्रसारण दशकांपासून सुरू असलेल्या छळाची गंभीर वाढ असल्याचे त्यांनी नमू...

खोट्या गुन्ह्यांच्या नोंदीविरोधात आंबेडकर सेनेचे आमरण उपोषण

Image
आझाद मैदान,  मुंबई प्रतिनिधी   रमेश औताडे  पनवेल शहरातील सामाजिक कार्यकर्ते राकेश कांबळे व मनोहर कांबळे यांच्या म्हणण्यानुसार, पनवेल पोलिस जातीय वाद उकरून काढत दारू गुटखा माफियाविरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवत आहेत. सह-पोलिस निरीक्षक राजेंद्र घेवडकर यांनी कोणताही समज न देता आपल्यावर बनावट स्वरूपाचे गुन्हे दाखल करून ‘चॅप्टर केस’ लावल्याचा दावा कांबळे बंधूंनी केला आहे. यामागे दारू-गुटखा माफियांचे हितसंबंध असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. आपण बौद्ध समाजाचे समाजसेवक असून अन्यायाविरोधात सातत्याने आवाज उठवत असल्यामुळेच आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.  पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांवर खोटे व किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांचे चारित्र्यहनन केले जात असल्याचा आरोप करत आंबेडकर सेनेच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले आहे.  आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, चॅप्टर केस, प्रतिबंधात्मक कारवाई आणि किरकोळ कारणांवर गुन्हे नोंदवून सामाजिक कार्यकर्त्यांना त्रास दि...

आपल्याच माणसाला विसरलेले शहर!*

Image
*आपल्याच माणसाला विसरलेले शहर!* लीना रमेश प्रभू, विलेपार्ले, मुंबई. +91 98216 06488 * विले पार्ले (पूर्व), मुंबई येथील छत्रपती शहाजी राजे मार्गावर उभारलेली सहा मजली भव्य इमारत पाहण्याचा योग आला. मुंबई महानगरपालिकेने दोन वर्षांपूर्वी बांधलेली ही इमारत भारताचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. श्री. मनोहर पर्रीकरजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ समर्पित करण्यात आलेली आहे. सार्वजनिक जीवनात समर्पितपणे कार्य करणाऱ्या एका व्यक्तीचा असा गौरव पाहून मनापासून समाधान वाटले. परंतु त्याच क्षणी मनात एक तीव्र आणि वेदनादायी जाणीव दाटून आली. विले पार्ले आणि मुंबई आपल्या सर्वांत कर्तृत्ववान व्यक्तींपैकी एकाला विसरली आहे. पन्नास वर्षांहून अधिक काळ विले पार्ले आणि मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारे, कोणतीही अपेक्षा न ठेवता, कोणताही थकवा न दाखवता समाजासाठी जगणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे स्व. डॉ. रमेश यशवंत प्रभू. मुंबईचे माजी महापौर, तीन वेळा नगरसेवक आणि दोन वेळा आमदार असलेल्या डॉ. प्रभू यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकसेवेस अर्पण केले. विले पार्ले (पूर्व) परिसराचा विकास ...

गणेश ठाकरे यांनी केली सरकारकडे मागणी

Image
    ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियमित कामगार म्हणून कायम करा मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनची राज्य कार्यकारिणी बैठक आज गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत लोकमान्य सभागृह, मराठी पत्रकार संघ,मुंबई येथे संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी युनियनचे राज्य अध्यक्ष बच्चुभाऊ कडू हे उपस्थित होते. यावेळी युनियन चे अभ्यासू पदाधिकारी गणेश ठाकरे , कार्याध्यक्ष अल्लाउद्दीन काझी, राज्य सरचिटणीस गिरीशभाऊ दाभाडकर, जेष्ठ राज्य उपाध्यक्ष दिलीपभाऊ डिके तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय गारगोटे यांच्यासह राज्य कार्यकारिणी सदस्य, सर्व जिल्हाध्यक्ष, सचिव व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन, सेवाशर्ती, नियमित कर्मचारी म्हणून कायमस्वरूपी समावेश, तसेच शासनाकडून करण्यात आलेल्या वसुलीबाबत निर्माण झालेल्या तणावावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बच्चुभाऊ कडू यांच्या आंदोलनातूनच शासनाने वसुलीच्या प्रश्नावर दिलासा देणारा निर्णय मंत्रिमंडळात घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. मात्र, त...

निवृत्तीनंतरही अशोकराव नगरकर यांचा अनुभव, मार्गदर्शन आणि योगदान निरंतर सुरू राहील

Image
           लेखक कवी अशोकराव टाव्हरे यांचा विश्वास मुंबई / रमेश औताडे  मुख्याध्यापक अशोकराव नगरकर यांनी आपल्या ३२ वर्षाच्या सेवाकाळात शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सामाजिक जाणीव यांना प्राधान्य दिले. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले प्रयत्न प्रेरणादायी आहेत. निवृत्तीनंतरही समाजासाठी त्यांचा अनुभव, मार्गदर्शन आणि योगदान निरंतर सुरू राहील असे मनोगत भाषणात लेखक कवी अशोकराव टाव्हरे यांनी  सांगितले.  राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोकराव नगरकर यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न झाला.जुन्नर येथील आदिवासी शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी देवराम मुंढे, सामाजिक कार्यकर्ते, कवी-लेखक अशोकराव टाव्हरे, निवृत्त शिक्षणाधिकारी अशोकराव कडलग, आदिवासी शिक्षण संस्थेचे संचालक रावते, रिपब्लिकन ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष नाना डोळस, मा.पंचायत समिती सदस्य कल्याणशील देखणे, खेड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय बोरकर,सचिव रामदास पवार, भाजपचे खेड ता.उपाध्यक्ष दिलीपराव माशेरे,उद्योजक प्रशांत म्हसुडगे...

शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे विकासाचे फुलपाखरू

Image
            जमिनीतच आमचा श्वास आहे; ती गेली तर आम्ही मारणार ! मुंबई / रमेश औताडे  तिसरी मुंबई उभारणीच्या नावाखाली दाखवले जाणारे विकासाचे फुलपाखरू आज सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी भीतीचे आणि असुरक्षिततेचे प्रतीक बनले आहे. हा विकास आमचा नाही, तर आम्हाला आमच्या जमिनीतून, पाण्यातून आणि मुळातून उपटून टाकणारा आहे, अशी वेदना उरण तालुक्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत. पिढ्यान्‌पिढ्या जोपासलेली सुपीक शेती, भातखाचरं, फळबागा आणि गावाची ओळख असलेली जमीन आता कागदावरच्या रेषांमध्ये अडकली आहे. “आम्ही शेती करून जगतो, जमिनीत आमचा श्वास आहे. तीच जमीन गेली तर आम्ही कुठे जायचं?” असा सवाल एका ज्येष्ठ शेतकऱ्याने डोळ्यात पाणी आणून केला.  विकासाच्या नावाखाली जमिनी अधिग्रहित केल्या जात आहेत, पण त्याबदल्यात मिळणारी भरपाई अपुरी असून पर्यायी रोजगाराचे आश्वासन केवळ कागदावरच असल्याचे शेतकरी सांगतात. शेती गेली तर केवळ उत्पन्नच नाही, तर घर, कुटुंबाची सुरक्षितता आणि भविष्यही हिरावून घेतले जाते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक कुटुंबांना स्थलांतराची भीती सतावत आहे. “आज जमीन ज...

उदयोन्मुख वकिलाचे अभीष्टचिंतन

Image
*मुंबई उच्च न्यायालयातील उदयोन्मुख वकील मितांशु स्नेहा राजेश पुरंदरे यांचे त्यांच्या फोर्ट येथील कार्यालयात जाऊन अभीष्टचिंतन करतांना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी, सोबत ज्येष्ठ पत्रकार राजेश पुरंदरे.*