Posts

Showing posts from January, 2026

सरकारी बाबूंच्या हप्त्यांमुळे रस्त्यावरील अतिक्रमण कायम

Image
      प्रशासन लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे अपघाताचा धोका मुंबई / रमेश औताडे  राज्यातील प्रमुख शहरे आणि उपनगरांमध्ये रस्ते, फुटपाथ आणि सार्वजनिक मोकळ्या जागांवरील अतिक्रमणांनी अक्षरशः विळखा घातला असून लोकप्रतिनिधी सोबतच सरकारी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासन मात्र केवळ तात्पुरत्या कारवायांपुरतेच मर्यादित राहत असल्याचा आरोप पादचारी करत आहेत. अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाल्याने आपत्कालीन सेवा अडथळ्यात सापडण्याचा धोका वाढला आहे. रुग्णवाहिका किंवा अग्निशमन वाहन वेळेत पोहोचू शकणार नाही, अशी स्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. फुटपाथवर अतिक्रमण झाल्याने पादचाऱ्यांना थेट वाहनांच्या मार्गातून चालावे लागत आहे. परिणामी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गर्दीच्या भागात वाहतुकीचा वेग मंदावत असून अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती व...

स्वीकृत नगरसेवक यांचा अर्थपुर्ण व्यवहार

Image
ज्यांनी प्रामाणिकपणे निवडणूक लढवली, पक्ष टिकवला, त्यांनाच संधी मिळायला हवी. अन्यथा, पक्षाची अवस्था 'असून अडचण आणि नसून खोळंबा' अशी होईल. - रमेश गुडेकर (ज्येष्ठ नेते, शिवसेना) मुंबई / रमेश औताडे  पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धुराळा खाली बसतो न बसतो, तोच आता राजकीय वर्तुळात 'खोक्यांच्या' चर्चेने वादळ उठवले आहे. १५ जानेवारीला पार पडलेल्या निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवले असले, तरी विजयाच्या या गुलालानंतर आता 'स्वीकृत नगरसेवक' पदावरून शिवसेना ज्येष्ठ नेते रमेश गुडेकर यांनी  खळबळ उडवून दिली आहे. निवडणुकीत उमेदवारांनी रक्ताचे पाणी केले, पदरचे पैसे खर्च केले आणि काहींनी तर निवडणुकीसाठी चक्क कर्जाचा डोंगर अंगावर ओढून घेतला. मात्र, आता फळ मिळण्याची वेळ आली असताना "एक जागा-एक कोटी" असा व्यवहार सुरू असल्याचा गंभीर आरोप गुडेकर यांनी केला आहे. ज्यांचा पक्षाशी किंवा निवडणुकीशी दुरान्वयेही संबंध नाही, असे धनदांडगे केवळ पैशाच्या जोरावर 'नगरसेवक' होण्याचे स्वप्न पाहत असल्याचे चित्र आता समोर येत आहे. रमेश गुडेकर यांनी अत्यंत आक्रमक शब्द...

ग्राहकांची ऑनलाईन तक्रार प्रक्रिया ठप्प

Image
मुंबई / रमेश औताडे  कंज्युमर गाइडन्स सोसायटी ऑफ इंडिया या नामांकित स्वयंसेवी संस्थेची ग्राहकांसाठीची हेल्पलाईन सेवा सध्या खंडित झाल्याने नागरिकांना ऑनलाईन तक्रार नोंदवता येत नाही. या तांत्रिक अडचणीमुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या संस्थे मार्फत मार्फत ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेणे, त्यावर मार्गदर्शन करणे तसेच योग्य ती कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याचे काम केले जाते. मात्र हेल्पलाईन व ऑनलाईन तक्रार प्रणाली बंद असल्याने अनेक ग्राहकांचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. यासंदर्भात संस्थेचे कर्मचारी तुकाराम पवार यांनी सरकारकडे  मागणी केली असून, ग्राहक हित लक्षात घेता ही हेल्पलाईन सेवा तातडीने सुरू करण्यात यावी असे त्यांनी सांगितले.  ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीने ही सेवा अत्यंत महत्त्वाची असून, ती दीर्घकाळ बंद राहणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. सरकारने याची दखल घेऊन तांत्रिक अडचणी दूर करून संस्थेची हेल्पलाईन व ऑनलाईन तक्रार सेवा लवकरात लवकर कार्यान्वित करावी अशी मागणी होत आहे.

आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांचा रेल्वे स्थानकात अनपेक्षित सत्कार

Image
मुंबई / रमेश औताडे  कसारा रेल्वे स्थानकावर केवळ चहा घेण्यासाठी थांबले असताना आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष नारायण बागडे यांचा कार्यकर्त्यांनी अनपेक्षित व उत्स्फूर्त सत्कार केल्याचा प्रसंग घडला. विशेष म्हणजे, कोणतीही पूर्वसूचना नसताना स्थानिक कार्यकर्त्यांना त्यांच्या उपस्थितीची माहिती कशी मिळाली, याचेच सर्वांना आश्चर्य वाटले. बागडे स्थानकावर उभे असल्याची खबर लागताच कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली. काही क्षणांतच हार, तुरे आणि शाल घेऊन कार्यकर्ते स्थानकावर दाखल झाले. सत्काराची घाई असल्याने एका कार्यकर्त्याने गाडी सुटू नये म्हणून साखळी ओढून ठेवली. त्यानंतर  यांच्या गळ्यात पुष्पहार घालून व शाल देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. अचानक घडलेल्या या प्रसंगाने स्थानकावरील प्रवासीही क्षणभर थबकले. कार्यकर्त्यांचे प्रेम, आपुलकी आणि संघटनेप्रती असलेली निष्ठा या क्षणातून स्पष्टपणे दिसून आली, असे बागडे यांनी यावेळी भावना व्यक्त करताना सांगितले. हा संपूर्ण प्रसंग उपस्थितांनी पाहिलेला एक अविस्मरणीय क्षण ठरला.

चार किलोमीटर लांब अनंत साडीतून लैंगिक हिंसाचाराकडे लक्ष

Image
मुंबई / रमेश औताडे  रेड डॉट फाउंडेशन या संयुक्त राष्ट्रसंघ मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थेतर्फे महिलांचा सन्मान आणि न्याय यांचे प्रभावी प्रतीक म्हणून साकारलेल्या अनंत साडी चे अनावरण करण्यात आले. भारतीय दंड संहितेतून वैवाहिक बलात्काराला दिलेली कायदेशीर सूट रद्द करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नामवंत फॅशन डिझायनर निवेदिता साबू यांनी या अनंत साडीची रचना केली असून, ही साडी म्हणजे न्यायाची मागणी करणाऱ्या शेकडो स्वाक्षऱ्या असलेली, भरतकाम आणि खास प्रिंट असलेली ही प्रतीकात्मक याचिका आहे. साडी वरील प्रत्येक स्वाक्षरी ही धैर्याचा एक धागा आहे आणि या साडीच्या पदराची प्रत्येक नीरी म्हणजे महिलेला निवड करण्याचा आणि मौन बाळगण्यास नकार देण्याचा अधिकार आहे. असे रेड डॉट फाउंडेशनच्या सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुप्रीत के. सिंग म्हणाल्या. डिझायनर निवेदिता साबू म्हणाल्या, “संस्कृतीच्या माध्यमातूनच संस्कृतीला आव्हान देत परिवर्तन घडवण्याचे काम हि साडी करते. सध्याच्या कायद्यानुसार १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पत्नीशी संमतीशिवाय केलेले लैंगिक संबंध बलात्कार म्हणून ओळ...

यूजीसी चा सुधारित कायद्याविरोधात आंदोलनाचा इशारा

Image
मुंबई  - पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  विद्यापीठ अनुदान आयोगाने  यूजीसी लागू केलेले नवीन नियम म्हणजे शिक्षण व्यवस्थेवर लादलेला कायदा योग्य नसून तो तात्काळ मागे घ्यावा, अशी ठाम मागणी ब्राह्मण सेवा फाउंडेशनने केली आहे. शिक्षण क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे प्रयोग थांबवावेत, असेही संघटनेने स्पष्ट केले. या संदर्भात संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता अ‍ॅड. राहुल उपाध्याय आणि राष्ट्रीय अध्यक्ष राजनजी यांनी संयुक्त निवेदन जारी करून सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा, अन्यथा देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.  भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच लागू करण्यात आलेल्या नव्या विद्यापीठ अनुदान आयोग यूजीसी नियमांना जे माध्यमांमध्ये यूजीसी समानता / भेदभाव विरोधी नियम म्हणून ओळखले जात आहेत) तात्पुरती स्थगिती दिली आहे. याचा अर्थ असा की हे नवे नियम सध्या अंमलात आणता येणार नाहीत आणि पुढील आदेश येईपर्यंत ते लागू राहणार नाहीत. विद्यार्थी व शिक्षक यांच्याशी संवाद न साधता घेतलेले निर्णय अस्वीकार्य असून त्यामुळे उच्च शिक्षण व्यवस्थेचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप संघटनेने केला. सं...

अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावात शांत

Image
         कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांची शोकसंवेदना मुंबई / रमेश औताडे  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आदरणीय अजितदादा पवार यांचे विमान अपघातात झालेले निधन ही वार्ता मन सुन्न करणारी आहे. नियतीने  आपल्या सर्वांवर हा अत्यंत क्रूर आघात केला आहे. अजितदादांचे जाणे ही केवळ एका पक्षाची किंवा कुटुंबाची हानी नसून, संपूर्ण महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे मोठे नुकसान आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावात शांत झाला आहे, अशा शब्दात कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहे.   शोक संदेशात कामगार मंत्री म्हणाले,  अजितदादा म्हणजे कामाचा प्रचंड उरक आणि प्रशासनावर दरारा असलेले व्यक्तिमत्त्व. 'शब्दाला पक्का नेता' ही त्यांची ओळख संपूर्ण राज्याला होती. पहाटेपासून कामाला सुरुवात करणारा आणि रात्री उशिरापर्यंत जनसामान्यांची कामे मार्गी लावणारा लोकनेता आपण गमविला आहे.  राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मैलाचा ...

कामगार मंत्र्यांकडून सत्कार करीत कामाचे कौतुक

Image
मुंबई / रमेश औताडे  राज्य शासनाने 150 दिवसांचा ई गर्व्हनन्स व सेवाकर्मी पुरस्कार कार्यक्रम शासकीय विभाग, संचालक, आयुक्तालय, क्षेत्रीय कार्यालय आदींसाठी जाहीर केला. यामध्ये 3 हजारपेक्षा कमी मंजूर पदसंख्या असलेल्या विभागांच्या प्रकारात 200 गुणांपैकी 185 गुण मिळवित कामगार विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. विशेष प्रशंसनीय वर्गवारीमध्ये विभागाला स्थान मिळाले आहे.  कार्यालयीन मूल्यमापनात 150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स कार्यकम अंतर्गत राज्यातील 68 सर्वोत्तम आयुक्त, संचालक प्रकारात कामगार विभागअंतर्गत कार्यरत बाष्पके संचालनालयाने 4 था आणि कामगार आयुक्तालयाने 5 वा क्रमांक पटकाविला आहे.  विभागाच्या या  उल्लेखनिय कामगिरीबद्दल कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दालनात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा सत्कार करीत त्यांच्या कामाचे कौतुक केले.  यावेळी अधिकाऱ्यांनीही विभागप्रमुख म्हणून कामगार मंत्री यांचा सत्कार केला. याप्रसंगी कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच.पी तुम्मोड, उपसचिव दिपक पोकळे, उपसचिव स्वप्नील कापडणीस, उपसचिव रोशनी कदम, बाष्...

महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘ अनंत साडी ' चे अनावरण

Image
मुंबई  रमेश औताडे  महिलांविरोधातील लैंगिक हिंसाचाराला कायदेशीर संरक्षण देणारा वैवाहिक बलात्कार अपवाद भारतीय दंड विधानातून हटवावा, या ठाम मागणीसाठी रेड डॉट फाउंडेशनच्या वतीने बुधवारी मुंबईतील ऐतिहासिक रॉयल ऑपेरा हाऊस येथे जगातील सर्वात लांब साडी असलेल्या ‘द इन्फिनिट साडी’ या वैश्विक जनजागृती उपक्रमाचे भव्य अनावरण करण्यात आले. प्रसिद्ध फॅशन डिझायनर निवेदिता साबू यांनी डिझाइन केलेली ही साडी केवळ वस्त्र नसून, ती महिलांच्या वेदना, संघर्ष आणि न्यायाच्या मागणीचे प्रभावी प्रतीक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. भारतासह जगभरातून आलेल्या हजारो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या या साडीवर गोवण्यात आल्या असून, प्रत्येक स्वाक्षरी ही वैवाहिक बलात्काराला गुन्हा म्हणून मान्यता देण्याची सामूहिक मागणी व्यक्त करत आहे. कार्यक्रमास अभिनेता व लिंगाधारित हिंसाचार निर्मूलनासाठीचे राजदूत राहुल भट, रेड डॉट फाउंडेशनचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुप्रीत के. सिंग, तसेच डिझायनर निवेदिता साबू यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर आयोजित “The Saree Never Ends: Weaving a Call for Justice” या फायर...

प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

Image
प्रजासत्ताक दिन  मोठ्या उत्साहात साजरा मुंबई / रमेश औताडे  क्रांती सम्राट डॉ बाबासाहेब गोपले प्रवेशद्वार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर  मानखुर्द येथे जय लहुजी रिक्षा स्टँड यांच्या  वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी समाजभूषण सुदाम आवाडे यांनी  ध्वजारोहण केले. श्रावण नाटकर सर , नितीन हिवाळे , संदेश सुतार, दत्तात्रय आवाडे , गोपीनाथ पांजगे , भिमा गायकवाड , अँड दिलीप दुनघव , सुरेश उफाडे , दत्ता दुनघव , देविदास उफाडे , सोमनाथ शिंदे   , दादाराव पारवे आधी मान्यवर व जय लहुजी रिक्षा युनियनचे सर्व सदस्य व नगरातील समाज बांधव उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मूळ जागीच

Image
आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या प्रयत्नाला यश अंबाझरी येथील प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन हे इतरत्र न हलवता त्याच ठिकाणीच उभारण्यात यावे, असे स्पष्ट आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे आंबेडकरी चळवळीला मोठा दिलासा मिळाला असून, आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा यांनी राज्यभरात केलेल्या तीव्र आंदोलनाची शासनाने अखेर दखल घेतली आहे. आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारले जाणारे सांस्कृतिक भवन ही केवळ इमारत नसून, सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांचे प्रतीक आहे. हे भवन अंबाझरीतच उभारण्याचा निर्णय हा जनभावनेचा सन्मान आहे. या प्रश्नावर माजी मंत्री नितीन राऊत आणि आमदार विकास  ठाकरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. शासनदरबारी वेळोवेळी निवेदन, बैठका आणि चर्चा करून त्यांनी या महत्त्वाच्या विषयाला प्राधान्य मिळवून दिले. त्यांच्या ठाम भूमिकेमुळेच सांस्कृतिक भवनाच्या जागेबाबतचा संभ्रम दूर होऊन स्...

Motorola Signature भारतात लाँच;

Image
DXOMARK गोल्ड कॅमेरा, प्रीमियम डिझाइन आणि 24x7 Signature Club सेवा मुंबई, 23 जानेवारी 2026:  मोटोरोला यांनी भारतात आपला अल्ट्रा-प्रीमियम स्मार्टफोन Motorola Signature लाँच केला आहे. या फोनमध्ये DXOMARK गोल्ड लेबल मान्यतेसह जगातील सर्वोत्तम कॅमेरापैकी एक देण्यात आला असून, भारतातील पहिली 24x7 Signature Club प्रीव्हिलेज सेवा उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 50MP ट्रिपल Sony LYTIA प्रो-ग्रेड कॅमेरा सिस्टम, 8K Dolby Vision व्हिडिओ, Snapdragon® 8 Gen 5 प्रोसेसर, 6.8-इंच 1.5K AMOLED डिस्प्ले आणि Moto AI 2.0 देण्यात आले आहे. एअरक्राफ्ट-ग्रेड अॅल्युमिनियम फ्रेम आणि फॅब्रिक-प्रेरित प्रीमियम फिनिशसह हा फोन लक्झरी डिझाइनमध्ये येतो. Motorola Signature 12GB+256GB, 16GB+512GB आणि 16GB+1TB या व्हेरिएंटमध्ये Pantone Martini Olive व Pantone Carbon रंगांत उपलब्ध होईल. प्रभावी लाँच किंमत Rs. 54,999 पासून असून विक्री 30 जानेवारी 2026 पासून Flipkart, Motorola.in आणि निवडक रिटेल स्टोअर्समध्ये सुरू होणार आहे. यासोबतच मोटोरोला यांनी Polar-सपोर्टेड Moto Watch देखील सादर केला असून, प्रगत वेलनेस ट्र...

*महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘बीग्सी' अभिनव, खर्चमुक्त उपक्रम*- परिवहन आयुक्त विवेक भिमनवार

Image
- परिवहन आयुक्त विवेक भिमनवार   मुंबई, दि. २३ : रमेश औताडे  महिला प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत गृह विभाग तसेच परिवहन विभागाच्या सहकार्याने बीग्सी हा अभिनव आणि खर्चमुक्त उपक्रम सुरू करण्यात येत असल्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सांगितले. एका सामाजिक जाणिवेतून सुरू झालेला हा प्रकल्प भविष्यात महिला सुरक्षेचा नवा अध्याय लिहील, असा विश्वासही परिवहन आयुक्त भिमनवार यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र पोलीस, मोटार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस आणि इटीएस ३६० टेक्नोलॉजी सोल्युशन यांच्या सहकाऱ्याने मुंबई तसेच राज्यभरातील काळी पिवळी टॅक्सी आणि ऑटोरिक्षाकरिता बीग्सी (बीवायजीएसवाय) या सेवेचा आरंभ परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या हस्ते झाला. यावेळी सह परिवहन आयुक्त शैलेश कामत, वाहतूकचे उपआयुक्त अजित बोगार्डे, मुख्य प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील तसेच बीग्सीचे संस्थापक प्रोफ.निरंजन भट आदी उपस्थित होते. परिवहन आयुक्त भिमनवार म्हणाले की, शहरीकरणाच्या प्रक्रियेत महिलांचा कामासाठीचा प्रवास वाढला असून त्यांच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबीयांमध्ये कायम चिंता असते. द...

*महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे*

Image
 *अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी* मुंबई / रमेश औताडे  • *कृषि विभाग- एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन* *आयोजित चर्चासत्रात महिला शेतकरी केंद्रस्थानी* मुंबई,दि.२३:  “महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे, महिला शेतक-यांसाठी शासन विविध योजना व उपक्रम राबवत असून शाश्वत शेतीसाठी कृषि विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन कृषि विभागासोबत शेतकरी महिलांच्या विकासासाठी काम करत आहे, असे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी सांगितले.   महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने आणि एमएस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (एमएसएसआरएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री अतिथीगृह येथे महिला शेतक-यांच्या विविध विषयाच्या अनुषंगाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी बोलत होते.  या कार्यक्रमात एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामिनाथन, शेतकरी महिला प्रतिनिधी, विविध भागातून महिलांविषयक काम करणा-या स्वयंसेवी संस्था, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय...

मेघमल्हार सोसायटीत उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Image
रमेश औताडे / 23 जानेवारी 2026 मेघमल्हार सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष श्री. तुषार नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, 24 जानेवारी 2026 रोजी सोसायटीत भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोसायटीतील सर्व सभासद व रहिवाशांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरात सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब, साखर आदी प्राथमिक तपासण्या करण्यात येणार असून, ज्येष्ठ नागरिकांसह महिलांसाठीही ही तपासणी उपयुक्त ठरणार आहे. शिबिराची सुरुवात सकाळी १० वाजता होणार असून, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे हे शिबिर पार पडणार आहे. अध्यक्ष तुषार नाईक हे नेहमीच सोसायटीच्या सामाजिक उपक्रमांसाठी पुढाकार घेत असतात. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्याशी संबंधित उपक्रम राबवण्यात येत असल्याने रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या निमित्ताने सोसायटीतील सदस्य एकत्र येऊन अध्यक्षांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार असून, त्यांच्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देणार आहेत. मेघमल्हार सोसायटीच्या व्यवस्थापन समितीने सर्व रहिवाशांनी वेळ...

आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्यांसाठी राजाराम जोशींचा आधार

Image
मुंबई / रमेश औताडे वाशी खाडी परिसरात आत्महत्येच्या विचारांनी ग्रासलेल्या अनेक व्यक्तींना नवसंजीवनी देण्याचे कार्य एका सामान्य नागरिकाने आपल्या धैर्याने आणि माणुसकीने केले आहे. नवी मुंबई वाशी गावातील रहिवासी राजाराम जोशी हे गेल्या काही वर्षांपासून जीव धोक्यात घालून संकटात सापडलेल्या व्यक्तींना वाचवत आहेत. वाशी खाडी ही अनेकांसाठी आत्महत्येचे ठिकाण ठरत असताना, तिथे उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या व्यक्तींशी संवाद साधून, त्यांचे समुपदेशन करून त्यांना त्या टोकाच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचे काम जोशी करत आहेत. आर्थिक अडचणी, कौटुंबिक तणाव, व्यसनाधीनता, मानसिक अस्वस्थता यामुळे अनेक जण हतबल होतात. अशा वेळी जोशी हे त्यांच्यासाठी आशेचा किरण ठरतात. आजवर त्यांनी ५० हून अधिक व्यक्तींचे प्राण वाचवले असून, अनेक वेळा पोलिस व अग्निशमन दलाच्या मदतीनेही ही कामगिरी पार पाडली आहे. मात्र, ही जबाबदारी त्यांनी कोणत्याही मोबदल्याच्या अपेक्षेशिवाय स्वीकारली आहे. “समोरचा माणूस वाचला, हेच माझे बक्षीस आहे,” असे ते सांगतात. कठीण प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा जीव वाचवणाऱ्या राजाराम जोशी...

आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्यांसाठी राजाराम जोशींचा आधार

Image
आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्यांसाठी राजाराम जोशींचा आधार मुंबई / रमेश औताडे  वाशी खाडी परिसरात आत्महत्येच्या विचारांनी ग्रासलेल्या अनेक व्यक्तींना नवसंजीवनी देण्याचे कार्य एका सामान्य नागरिकाने आपल्या धैर्याने आणि माणुसकीने केले आहे. नवी मुंबई वाशी गावातील रहिवासी राजाराम जोशी हे गेल्या काही वर्षांपासून जीव धोक्यात घालून संकटात सापडलेल्या व्यक्तींना वाचवत आहेत. वाशी खाडी ही अनेकांसाठी आत्महत्येचे ठिकाण ठरत असताना, तिथे उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या व्यक्तींशी संवाद साधून, त्यांचे समुपदेशन करून त्यांना त्या टोकाच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचे काम जोशी करत आहेत. आर्थिक अडचणी, कौटुंबिक तणाव, व्यसनाधीनता, मानसिक अस्वस्थता यामुळे अनेक जण हतबल होतात. अशा वेळी जोशी हे त्यांच्यासाठी आशेचा किरण ठरतात. आजवर त्यांनी ५० हून अधिक व्यक्तींचे प्राण वाचवले असून, अनेक वेळा पोलिस व अग्निशमन दलाच्या मदतीनेही ही कामगिरी पार पाडली आहे. मात्र, ही जबाबदारी त्यांनी कोणत्याही मोबदल्याच्या अपेक्षेशिवाय स्वीकारली आहे. “समोरचा माणूस वाचला, हेच माझे बक्षीस आहे,” असे ते सांगतात. कठीण प्रसंग...

देशी झाडांची लागवडच पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक

Image
            परदेशी वृक्षांमुळे जैवविविधतेवर गंभीर परिणाम  मुंबई / रमेश औताडे  राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या वृक्षलागवड मोहिमांमध्ये परदेशी प्रजातींच्या झाडांचा वाढता वापर पर्यावरणासाठी घातक ठरत असल्याचा गंभीर इशारा पर्यावरण अभ्यासक आणि जैवविविधता तज्ज्ञांनी दिला आहे. केवळ झाडांची संख्या वाढवण्याच्या नावाखाली विदेशी वृक्षांची लागवड केली जात असून, त्यामुळे स्थानिक परिसंस्थेचे संतुलन धोक्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते, देशी झाडे ही त्या-त्या परिसरातील हवामान, माती, पाणी आणि जैवसाखळीशी सुसंगत असतात. मात्र, विदेशी झाडे वेगाने वाढतात, अधिक पाणी शोषून घेतात आणि आसपासच्या देशी वनस्पतींच्या वाढीवर मर्यादा आणतात. परिणामी, स्थानिक पक्षी, कीटक आणि प्राणी यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होण्याची भीती वाढली आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात ‘ग्रीन बेल्ट’ किंवा वृक्षलागवड प्रकल्पांत ग्लिरीसिडिया, विलायती बाभूळ, युकॅलिप्टस यांसारख्या झाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. मात्र, ही झाडे मातीतील ओलावा कमी करतात, भूजल पातळीवर ...

सामान्य गुंतवणूकदारांसाठी नवे ट्रेडिंग तंत्रज्ञान

Image
मुंबई / रमेश औताडे  शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्या सामान्य गुंतवणूकदारांसाठी उपयोगी ठरणारे नवे ट्रेडिंग तंत्रज्ञान डिफाइनएज सिक्युरिटीज ब्रोकिंग प्रा. लि. यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत सादर केले. या नव्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेअर बाजारातील व्यवहार अधिक सोपे, शिस्तबद्ध आणि नियमांवर आधारित करता येणार आहेत.  आतापर्यंत अनेक गुंतवणूकदार अंदाजांवर किंवा भावनांवर आधारित ट्रेडिंग करत होते. मात्र, या नव्या तंत्रज्ञानामुळे ठराविक नियमांनुसार आणि ठरवलेल्या रणनीतीनुसार व्यवहार करता येणार असल्याचे कंपनीने सांगितले. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक प्रशांत शाह यांनी या प्लॅटफॉर्मची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या प्रणालीमुळे इंट्राडे तसेच दीर्घकालीन (पोजिशनल) ट्रेडिंग, शेअर्स, फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये एकाच ठिकाणी करता येणार आहे. विविध चार्ट, किंमत चढ-उतार आणि ऑप्शन चेनच्या आधारे व्यवहार आखता येतील. या तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुंतवणूकदार आपली ट्रेडिंग रणनीती स्वयंचलित करू शकतात. त्यामुळे मानवी चुका कमी होतील आणि व्यवहारात शि...

राज्यात कुपोषित बालकांचे मृत्यू रोखण्यात शासन अपयशी

Image
मुंबई  / रमेश औताडे  महाराष्ट्रात कुपोषणामुळे बालक, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांचे मृत्यू अद्याप थांबले नसल्याने राज्यातील परिस्थिती गंभीर असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. कुपोषण रोखण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये सातत्य आणि प्रभावी अंमलबजावणीचा अभाव दिसून येत असल्याबद्दल न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले. राज्यातील आदिवासी, दुर्गम आणि ग्रामीण भागांमध्ये आरोग्य व पोषण सुविधा पुरेशा प्रमाणात पोहोचत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. केवळ कागदोपत्री योजना जाहीर करून प्रश्न सुटणार नसून, प्रत्यक्ष जमिनीवर परिणाम दिसला पाहिजे, असे स्पष्ट मत न्यायालयाने व्यक्त केले. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत राज्यात सुमारे १९५ बालकांचा मृत्यू कुपोषणाशी संबंधित कारणांमुळे झाला आहे. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये माता व बाल आरोग्याची अचूक आकडेवारी उपलब्ध नसल्याने नियोजनावर परिणाम होत असल्याची बाबही समोर आली. राज्य स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, अजूनही मोठ्या लोकसंख्येला मूलभूत पोषण, स्वच्छ पाणी ...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या पत्राने लेखकाचे कौतुक

Image
मुंबई / रमेश औताडे  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कवी-लेखक अशोकराव टाव्हरे यांना ५० व्या वाढदिवसानिमित्त विशेष शुभेच्छा पत्र पाठविले आहे. गडकरी यांच्या कार्यावर आधारित विकासाचा राजमार्ग व इंग्रजीत हायवे ऑफ डेव्हलपमेंट ही टाव्हरे यांची पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच वलय,कोरोनाच्या आठवणी हे कवितासंग्रह, स्वातंत्र्योत्तर भारत हा लेखसंग्रह ही प्रकाशित आहे. तसेच अनेक स्मरणिकांचे टाव्हरे यांनी संपादन केले आहे.  वर्तमानपत्रांतून विविध विषयांवर त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहे. मुंबई येथे संपन्न झालेल्या पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलनाचे  टाव्हरे स्वागताध्यक्ष होते. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी समाजाच्या प्रश्नी साहित्याच्या माध्यमातून सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे काम कवी-लेखक करीत असून टाव्हरे यांना लेखणीचे बळ अधिक लाभो व सामाजिक कार्य व्यापक व्हावे अशी सदिच्छा पत्राद्वारे व्यक्त केली आहे. राष्ट्रीय स्तरावरील गडकरींसारख्या मोठ्या नेत्याने अशोकराव टाव्हरेंना वाढदिवसानिमित्त आवर्जून पाठविलेल्या शुभेच्छांबद्दल विविध स्तरांवर कौतुक होत आहे.

राजकारणासाठी पेन कंपनीची बदनामी ?

Image
मार्कर पेन खरेदीवेळी बोठावरील शाई पुसते की नाही, याची तपासणीच झाली नाही का ? मुंबई / रमेश औताडे  राजकीय आरोप–प्रत्यारोपांच्या गदारोळात आता थेट एका खासगी पेन कंपनीला लक्ष्य केले जात असल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. मतदान प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या मार्कर पेनबाबत संशय व्यक्त करत संबंधित कंपनीवर थेट आरोप केले जात आहेत. मात्र या प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्याआधी काही मूलभूत प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, मार्कर पेन खरेदी करताना किंवा वापरापूर्वी त्याची गुणवत्ता तपासली गेली होती का? शाई पुसली जाते की नाही, ती किती वेळ टिकते, याची चाचणी घेणे ही संबंधित यंत्रणेची प्राथमिक जबाबदारी होती. ती पार न पाडता थेट कंपनीवर आरोप करणे हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे. तज्ज्ञांच्या मते, बाजारात उपलब्ध असलेल्या विविध मार्कर पेनमध्ये शाईच्या गुणवत्तेत फरक असतो. त्यामुळे निविदा प्रक्रियेत स्पष्ट निकष, प्रयोगशाळा चाचण्या आणि प्रत्यक्ष वापराची चाचणी आवश्यक असते. या प्रक्रिया पारदर्शकपणे राबवल्या असत्या, तर आज निर्माण झालेला व...

धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आजार वाढले

Image
मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये मानसिक आजारांचे प्रमाण वाढत असतानाही उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मात्र चिंताजनकरीत्या कमी असल्याचे वास्तव समोर आले आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षणानुसार मानसिक आरोग्य सेवांपर्यंत पोहोचण्यात राज्यनिहाय मोठी तफावत दिसून येत आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थान या मोठ्या राज्यांमध्ये मानसिक आजारग्रस्तांची संख्या लक्षणीय असली तरी उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. महाराष्ट्रात शहरी भागात काही प्रमाणात मानसोपचार सुविधा उपलब्ध असल्या तरी ग्रामीण आणि आदिवासी भागात उपचार यंत्रणा अपुरी ठरत आहे. दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जनजागृतीचे प्रमाण तुलनेने जास्त असून उपचार घेणाऱ्यांची टक्केवारी इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. मात्र उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये अजूनही मानसिक आजार म्हणजे सामाजिक कलंक अशी धारणा कायम आहे. तज्ज्ञांच्या मते, राज्य पातळीवर मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक आणि मानसिक आरोग्य केंद्रांची संख्या अपुरी आहे. अनेक जिल्ह्य...

ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर यांना न्याय कधी मिळणार

Image
    नागपूर अधिवेशनात आमदार समाधान आवताडे यांचा प्रश्न  मुंबई / प्रतिनिधी राज्यातील ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेल्या डाटा ऑपरेटरांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने आंदोलनांचा मार्ग अवलंबला आहे. नियमित वेतन, सेवा सुरक्षा आणि मानधन वाढ यांसह विविध मागण्यांसाठी त्यांनी जिल्हास्तरापासून मंत्रालयापर्यंत अनेक वेळा निदर्शने केली. मात्र शासनाकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्याने डाटा ऑपरेटरांमध्ये तीव्र नाराजी आहे. या प्रश्नावर आमदार समाधान आवताडे यांनी नुकत्याच पार पडलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधानसभेत आवाज उठवला. ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा कणा असलेल्या डाटा ऑपरेटरांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. अल्प मानधनावर काम करूनही त्यांना कोणतीही सेवा हमी, भविष्य निर्वाह निधी किंवा शासकीय कर्मचाऱ्यांसारखे मूलभूत अधिकार मिळत नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. आमदार आवताडे यांनी सरकारकडे तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली असली, तरी अधिवेशन संपूनही डाटा ऑपरेटरांच्या पदरी निराशाच ...

संविधान मानणाऱ्यांच्या बाजूने आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा

Image
मुंबई / रमेश औताडे  काँग्रेस पक्ष संविधानाच्या बाजूने भक्कम पणे उभा राहिला आहे. इतकेच नव्हे तर या राज्यात त्यांच्या मदतीने खासदार, आमदार, मंत्री पदे मिळाली आहेत. आजपर्यंत त्या पक्षाने पुरोगामी विचारसरणीची कास सोडली नाही. मग अशा उतरत्या काळात त्या पक्षाला साथ देणे आवश्यक आहे. असे मत आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी व्यक्त केले. काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर रायगड येथे आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा ने  पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी समर्थन जाहीर केले.  या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे, नागपूर विभागिय अध्यक्ष प्रवीण आवळे, प्रदेश प्रवक्ते धर्माजी बागडे, जयदेव चिंवडे, हंसराज उरकुडे शालिक बांगर, गौतम बागडे प्रामुख्याने उपस्थित होते.

रुग्णालयातील पेशंटच्या ताटातील भात वादाच्या भोवऱ्यात

Image
  मुंबई / रमेश औताडे राज्यातील विविध रुग्णालयात पेशंटसाठी जी अन्नाची सोय केली जाते त्यामध्ये भात हा मुख्य घटक असतो. या भातासाठी लागणारा तांदूळ खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाते. मात्र या तांदूळ पुरवठा योजनांच्या निविदा प्रक्रियेत वाद निर्माण झाला असून लेखापरीक्षण अहवाल आता कोणाला अडकवणार यावर प्रशासनाचे लक्ष लागले आहे. निविदा प्रक्रिया, अटी-शर्ती, दरनिश्चिती व पुरवठा व्यवस्थापन या बाबी जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या पद्धतीने राबविल्या जात असल्याने एकसमानता व स्पष्टतेचा मुद्दा उपस्थित होत आहे. नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना निविदा प्रक्रियेचे अधिकार असले, तरी निविदा कागदपत्रांतील तांत्रिक बाबी, पात्रतेचे निकष आणि कालमर्यादा याबाबत काही जिल्ह्यांमध्ये अधिक स्पष्टीकरणाची गरज असल्याचे चित्र आहे. परिणामी प्रक्रिया समजून घेण्यासाठी अतिरिक्त वेळ लागत असल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे. तांदूळ हा सार्वजनिक वितरण व कल्याणकारी योजनांसाठी अत्यावश्यक घटक असल्याने, गुणवत्तेपासून ते वितरणापर्यंत प्रत्येक टप्प्यावर नियोजनबद्ध अंमलबजावणी अपेक्षित आहे. मात्र जिल्हानिहाय अंमल...

राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा ९ वर्षांनंतरही शासन निर्णय नाही

Image
मुंबई  / रमेश औताडे  महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय अधिकारी गट ‘ब’ यांच्या सेवाखंड नियमित संबंधीचा महत्त्वाचा प्रश्न तब्बल नऊ वर्षांनंतरही प्रलंबित असल्याने असंतोष वाढला आहे. मुंबई व संभाजीनगर येथील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी अद्याप न झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघाने केला आहे. महासंघाचे अध्यक्ष डॉ. अरुण कोळी यांनी मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांना निवेदन देत तातडीने शासन आदेश काढण्याची मागणी केली आहे. आदेश निघाले नाहीत तर वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. न्यायाधिकरणाने स्पष्ट दिलेल्या आदेशांनुसार वैद्यकीय अधिकारी गट ‘ब’ यांची सेवासमावेशनपूर्व अस्थायी सेवा कालावधीतील तांत्रिक सेवा खंड माफ करून सेवा नियमित करणे, वेतनसंरक्षण, वेतनवाढीचा लाभ, अर्जित रजा तसेच प्रथम नियुक्तीपासून वेतननिश्चिती करून कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले होते. या संदर्भात यापूर्वी २००९...

दहा मिनिटांच्या स्पर्धेत अनेकांचे जीव धोक्यात

Image
          डिलिव्हरी कंपन्यांकडून वाहतूक नियमांना हरताळ मुंबई  / रमेश औताडे  अवघ्या काही मिनिटांत वस्तू पोहोचवण्याच्या स्पर्धेत उतरलेल्या ऑनलाईन डिलिव्हरी कंपन्यांकडून वाहतूक नियमांना सर्रास हरताळ फासला जात असून, याचा थेट फटका डिलिव्हरी कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला बसत असल्याचे चित्र समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. झेप्टो, इन्स्टामार्ट, ब्लिंकिट यांसारख्या कंपन्यांकडून डिलिव्हरीसाठी ठरवून दिलेले वेळेचे बंधन पाळण्यासाठी कर्मचारी वेगमर्यादा, सिग्नल आणि इतर वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून अनेक वेळा निष्पाप नागरिकांना त्याची किंमत मोजावी लागत आहे. वाहतूक पोलिस आणि आरटीओ कार्यालयांकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांत डिलिव्हरी वाहनांशी संबंधित अपघातांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक डिलिव्हरी कर्मचारी विमा, सुरक्षा साहित्य किंवा योग्य प्रशिक्षणाशिवाय रस्त्यावर उतरवले जात असल्याचेही नि...

कासवगतीने धावणाऱ्या आयुष्मान कार्डने गती घ्यावी

Image
          राज्यातील ६३ टक्के लाभार्थ्यांना अद्याप कार्ड नाही मुंबई / रमेश औताडे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. मात्र या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीत आरोग्य विभागाची गती अत्यंत संथ असल्याचे चित्र समोर आले आहे.  राज्यातील तब्बल ६३ टक्के पात्र लाभार्थ्यांना अद्याप आयुष्मान कार्ड मिळालेले नाही, ही बाब चिंतेची ठरत आहे. योजनेअंतर्गत राज्यात ९ कोटी ३० लाख आयुष्मान कार्ड वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मात्र आजघडीला केवळ ३ कोटी ४४ लाख कार्डचीच निर्मिती पूर्ण झाली असून उर्वरित नागरिक कार्ड पासून वंचित आहेत. कार्ड नसल्यामुळे अनेक गरजू रुग्णांना मोफत उपचारांचा लाभ मिळताना अडचण येत आहे. विशेषतः ग्रामीण भाग, शहरी झोपडपट्ट्या, स्थलांतरित कामगार, असंघटित क्षेत्रातील मजूर यांच्यापर्यंत आयुष्मान कार्ड पोहोचण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. कागदोपत्री योजना प्रभावी असली तरी प...