Posts

Showing posts from October, 2025

लेखण्या जमविण्याचा पत्रकार महेश उपदेव यांचा छंद

Image
         लेखण्या जमविण्याचा पत्रकार महेश उपदेव यांचा छंद                     ३९‌ वर्षात जमविल्या ९ हजार लेखण्या                                              जेष्ठ पत्रकार : योगेश वसंत त्रिवेदी पत्रकार आणि लेखणी यांचा संबंध जीवाभावाचा. पूर्वी अनेक जण शाईचे पेन वापरीत असत. अताही काही जण शाईचे पेन वापरतात. परंतु ही लेखणी जमविण्याचा छंद जोपासणारे विरळाच. नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार महेश उपदेव यांनी हा छंद जोपासला असून गेल्या ३९ वर्षांत त्यांनी तब्बल ९ हजार लेखण्या जमविल्या आहेत.  आपण त्यांच्याच शब्दांत वाचू या. ते म्हणतात, "माणसाचा मेंदू आकाराने लहान असला तरी कर्तृत्वाने तो नेहमी श्रेष्ठ ठरत असतो, माणूस सदासर्वदा काहीतरी क्लुप्त्या शोधत असतो. काही माणसं त्याहीपलीकडे असतात अशा माणसांना मस्त कलंदर हे विशेषण शोभून दिसते. छंद जोपासणारी अनेक व्यक्ती आहेत. कुणी वेगवेगळ्या टाच...

प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण १४ व्या दिवशीही सुरू

Image
प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण १४ व्या दिवशीही सुरू ​मुंबई / रमेश औताडे  सर्व प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकांना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड च्या नागोठणे प्रकल्पातील कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषण १४ व्या दिवशीही सुरू आहे. सरकारने याबाबत गांभीर्याने विचार केला नाही तर आंदोलन तीव्र करू असा इशारा भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थांचे अध्यक्ष गंगाराम मिनमिने यांनी दिला. ​'भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था-नागोठणे' आणि 'वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन' यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण म ७ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झाले आहे. कंपनीने ३२४ प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी, अन्यथा त्यांच्या जमिनी परत कराव्या, अशी आक्रमक मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. ​सर्व प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकांना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, नागोठणे कंपनीत कायमस्वरूपी नोकरी मिळावी. ​नोकरी मिळेपर्यंत किंवा 'कॉल लेटर' (नोकरीची नेमणूक पत्र) मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्...

सर्व स्तरातील शिक्षक शिक्षकेत्तर बांधवांच्या जिल्हा पातळीवर वेगवेगळ्या विंग्स निर्माण होणार - डाॅ. संजयराव तायडे पाटील

Image
सर्व स्तरातील शिक्षक शिक्षकेत्तर बांधवांच्या जिल्हा पातळीवर वेगवेगळ्या विंग्स निर्माण होणार - डाॅ. संजयराव तायडे पाटील            शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन मुंबई  मुंबई / रमेश औताडे ( मंत्रालय प्रतिनिधी) सर्व स्तरातील शिक्षक शिक्षकेत्तर बांधवांना सोबत घेऊन काम करण्याच्या दृष्टीने जिल्हा पातळीवर वेगवेगळ्या विंग्स निर्माण करण्यात येणार असल्याचे ठरले तसेच पुढील बैठकी पुर्वी पक्षाने ठरवुन दिलेल्या धोरणानुसार व संघटनेच्या घटनेप्रमाणे  विभागीय कार्यकारिणी व जिल्हा कार्यकारिणी ठरवून घोषीत करण्यात येईल त्याअनुषंगाने सर्वांनी काम करावे असे निर्देश देण्यात आले. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन मुंबई येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर सेनेची बैठक पार पडली. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष मा. आमदार किशोरजी दराडे शिवसेना पक्ष सरचिटणीस मा. संजयजी मोरे , पक्ष कार्यालय प्रमुख प्रशांतजी पालांडे साहेब यांनी मार्गदर्शन केले यावेळी काही महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली.  राज्यात होऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना ताक...

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिक्षक-शिक्षकेत्तर सेनेची महत्वपूर्ण बैठक संपन्न;

Image
 शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिक्षक-शिक्षकेत्तर सेनेची महत्वपूर्ण बैठक संपन्न;  विधानपरिषद निवडणुकीवर लक्ष! मुंबई / रमेश औताडे ( मंत्रालय प्रतिनिधी )  शिवसेना मध्यवर्ती कार्यालय 'बाळासाहेब भवन' येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर सेनेची एक महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध विषयांवर चर्चा झाली, तसेच आगामी राजकीय रणनितीवरही विचारमंथन झाले. प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन बैठकीला संघटनेचे राज्याध्यक्ष मा. आमदार किशोरजी दराडे, शिवसेना पक्ष सरचिटणीस मा. संजयजी मोरे, आणि पक्ष कार्यालय प्रमुख प्रशांतजी पालांडे साहेब यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला आणि भविष्यातील दिशा स्पष्ट केली. महत्वाचे ठळक निर्णय व चर्चा  * विधानपरिषद निवडणूक: राज्यात लवकरच होऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीने उतरेल.  * रणनीती बैठक:  शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबत लवकरच एक बैठक घेऊन पुढील निवडणुकीची रणनिती निश्चित...

शरद पवार यांच्या भेटीने राष्ट्रवादीत 'नवी ऊर्जा' संचारली

Image
शरद पवार यांच्या भेटीने राष्ट्रवादीत 'नवी ऊर्जा' संचारली   आगामी मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले ​मुंबई / रमेश औताडे ​राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण सदिच्छा भेटीमुळे मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये मोठी ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सचिन लोंढे यांनी 'मिशन मुंबई महानगरपालिका' या पक्षाच्या उपक्रमाला अधिक गती देण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतली, ज्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ​मिशन मुंबई मनपाला 'पवार पॉवर'ची जोड ​मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली ताकद वाढवण्यासाठी 'मिशन मुंबई' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. याच मिशनला धार देण्यासाठी सचिन लोंढे यांनी थेट पक्षप्रमुख शरद पवार यांचे मार्गदर्शन घेतले. ​आशीर्वाद व मार्गदर्शन:  या भेटीत पक्षाचे सर्वेसर्वा असलेल्या पवार साहेबांकडून लों...

मिशन मुंबई महानगरपालिका – राष्ट्रवादी युवकांचे बळकट पाऊल

Image
मिशन मुंबई महानगरपालिका – राष्ट्रवादी युवकांचे बळकट पाऊल मुंबई / रमेश औताडे  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मिशन मुंबई महानगरपालिका उपक्रमाला गती देण्यासाठी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सचिन आदिनाथ लोंढे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत पवार साहेबांकडून लोंढे यांना आशीर्वाद व मार्गदर्शन लाभले. या भेटीला शक्य करून देणाऱ्या मुंबई अध्यक्षा श्रीमती राखीताई जाधव, माननीय अजितदादा रावराणे साहेब व मुंबई युवक अध्यक्ष श्री अमोलजी मातेले साहेब यांचे सचिन लोंढे यांनी मनःपूर्वक आभार मानले. “आपल्यासारखे मार्गदर्शक आणि जीवाभावाचे नेते आमच्यासोबत असल्यामुळे आम्हाला लढण्यासाठी नवी उर्जा आणि आत्मविश्वास मिळतो. आपण वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य करत आहात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद,” असे लोंढे यांनी या भेटीनंतर सांगितले. या भेटीनंतर राष्ट्रवादी युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

कबुतरखान्यांबाबत जैन समाजाच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त गगराणी यांची घेतली भेट

Image
कबुतरखान्यांबाबत जैन समाजाच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त गगराणी यांची घेतली भेट दिनांक २८ ऑक्टोबर २०२५  रमेश औताडे  मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला  त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा शोध घेवून बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्या उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचेकडे केली. दरम्यान, अशा पर्यायी जागांचा शोध घेवून त्याबाबतची माहिती माननीय न्यायालयाकडे सादर करण्यात येईल, असे  गगराणी यांनी या शिष्टमंडळाला सांगितले. मुंबई महानगरात ठिकठिकाणी असणारे कबुतरखाने माननीय न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. तसेच, कबुतरखान्यांच्या ठिकाणी नियंत्रित पद्धतीने व ठराविक वेळेतच कबुतरांना खाद्य पुरवावे (Control Feeding) किंवा कसे, तसेच यातील अन्य मुद्द्यांबाबत माननीय न्यायालयाच्या आदेशान्वये हरकती / सूचना मागविण्याची कार्यवाही देखील महानगरपालिका प्रशासनाने केली.  या सर्व पार्श्वभूमीवर  मुंबई जैन संघ संगठनचे नितीन व्होरा,  मुकेश जैन,  अतुल शहा,  विजय जैन, अध्यात्...

मोहन पी. आर. देवेंद्र यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

Image
         मोहन पी. आर. देवेंद्र यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव मुंबई / रमेश औताडे  दलित, ओबीसी, मायनॉरिटी, आदिवासी संघटनांच्या अखिल भारतीय परिषदेतर्फे चालवल्या जाणाऱ्या  (डोमा परिसंघ) मुंबईच्या अध्यक्षपदी कामगार नेते मा. मोहन पी. आर. देवेंद्र यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या महत्वपूर्ण नियुक्तीबद्दल मुंबईच्या विविध पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष (माजी खासदार) डॉ. उदित राज, राष्ट्रीय सचिव डॉ. संजय कांबळे बापेरकर तसेच इतर अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोहन पी. आर. देवेंद्र यांच्या पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.   (SC/ST/OBC/VJNT ORGANIZATIONS DOMA PARISANGH) ही संघटना दलित, ओबीसी, मायनॉरिटी, आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि कल्याणासाठी कार्यरत आहे. मुंबई अध्यक्षपदावर कामगार नेते मोहन पी. आर. देवेंद्र यांच्या नियुक्तीमुळे संघटनेच्या कार्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बाजीराव देशमुखांनी उजळवली, निराधार बालकांची दिवाळी !

Image
      बाजीराव देशमुखांनी उजळवली, निराधार बालकांची दिवाळी ! ३२ निराधार बालकांना दिले कपडे भेट   ! मुंबई / रमेश औताडे ( मंत्रालय प्रतिनिधी ) 7021777291 घरचे अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या, गोरगरीब आणि रांजले गांजलेल्या कुटुंबातील, आणि ज्यांच्या डोक्यावरील आई-वडिलांच्या मायेचे छत्र हरपलेले आहे, अशा अनाथ आणि निराधार बालकांना दिवाळी सणाच्या निमित्ताने रंगीबेरंगी नवीन कपडे देऊन त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्याचे उल्लेखनीय काम करत आहेत, शिराळा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख ! खऱ्या अर्थाने निराधार  बालकांना आधार देण्याचे लाखमोलाचे काम त्याच्या हातून घडत आहे.  दिवाळी हा दिव्यांचा सण ! हा सण प्रत्येकाच्या जीवनात रोषनाई घेऊन येतो. नवचैतन्य घेऊन येतो. गरिबातल्या गरीब कुटुंबातही आई वडील मुलांसाठी नवीन कपडे, फटाके आणि  फराळाच्या विविध पदार्थांचे नियोजन केले जाते. यामुळे मुलांचा आनंद द्विगुणित होतो. परंतु ज्यांना आई नाही, वडीलही नाहीत अशा निराधार आणि अनाथ बालकांना आधार देण्याचे काम, दिवाळी सणाच्या निमित्त...

कामगार नेते अशोकराव जाधव यांची मागणी

Image
           सार्वजनिक रुग्णालयांचे खासगीकरण थांबवा              कामगार नेते अशोकराव जाधव यांची मागणी मुंबई / रमेश औताडे  मुंबईतील सार्वजनिक आरोग्यसेवा आणि रुग्णालयांचे खासगीकरण करण्याच्या मुंबई महापालिकेच्या प्रयत्नांविरोधात आरोग्य कर्मचारी संघटना, सामाजिक संस्था आणि नागरिक संघटनांनी तीव्र आवाज उठवला आहे. या संघटनांनी एकत्र येऊन सार्वजनिक रुग्णालयांचे खासगीकरण थांबवण्याची आणि रिक्त पदांवर तातडीने नियमित भरती करण्याची मागणी केली आहे. यावेळी बोलताना कामगार नेते अशोकराव जाधव म्हणाले, मुंबईतील महापालिका रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या ४६ टक्के, नर्स व पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या २६ टक्के, तर मजूर वर्गाच्या ४२ टक्के पदे रिक्त आहेत. एकूण ३६ टक्के पदे रिक्त राहिल्यामुळे रुग्णालयांची कार्यक्षमता कमी झाली आहे. परंतु, पुरेशा पात्र डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा मोठा साठा उपलब्ध असून ही पदे तत्काळ भरता येऊ शकतात. असे अभय शुक्ला यांनी सांगितले. खासगीकरण तातडीने रद्द करण्यात यावे,  प्रकल्पांचे स्वतंत्र पुनरावलोकन करण्...

उत्कृष्ट वार्तांकनाबद्दल ओमकार धुळप सन्मानित*

Image
*प्राईड ऑफ स्पंदन पुरस्कार सर्वांसाठी ऊर्जा देणारा – निलेश खरे* *उत्कृष्ट वार्तांकनाबद्दल ओमकार धुळप सन्मानित* मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कराड शहरात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा “स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट” तर्फे “प्राईड ऑफ स्पंदन” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. “प्राईड ऑफ स्पंदन पुरस्कार सर्वांसाठी ऊर्जा देणारा आहे,” असे गौरवोद्गार साम टीव्ही न्यूजचे संपादक निलेश खरे यांनी काढले. ते कराड येथील वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृहात आयोजित राज्यस्तरीय स्पंदन पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपीठावर महंत आहिल्यागिरीजी महाराज, प्रेरणादायी वक्ते डा. विनोद बाबर, सुप्रसिद्ध गायक विजय सरतापे, दिग्दर्शक अरुण कचरे, उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला, टीव्ही 9 मराठीच्या पत्रकार सेजल पुरवार, सिनेअभिनेत्री प्राजक्ता नवनाळे, सिनेअभिनेते योगेश पोवार, ॲड. धम्मराज साळवे, सावली फाउंडेशनच्या संस्थापिका सायली धनाबाई, केतकी प्रकाशनचे चंद्रकांत जाधव, तसेच ट्रस्टचे संस्थापक डा. संदीप डाक...

दुर्गंधीयुक्त कचऱ्याची विल्हेवाट बोनस शिवाय

Image
दुर्गंधीयुक्त कचऱ्याची विल्हेवाट बोनस शिवाय  मुंबई स्वच्छ ठेवताना आमची दिवाळी अंधारात  मुंबई / रमेश औताडे  आंतरराष्ट्रीय दर्जाचे मेट्रोपॉलिटन शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या  मुंबई शहरातील बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कंत्राटी सफाई कामगार दुर्गंधीयुक्त कचऱ्याची विल्हेवाट बोनस शिवाय लावत आहेत. मुंबई स्वच्छ ठेवताना आमची दिवाळी अंधारात गेली याचे सोयरसुतक ७५ हजार कोटींचे बजेट असणाऱ्या पालिकेला नाही.  आम्हाला कायम सेवेत घ्या असे आदेश न्यायालयाने दिले असताना पालिका मात्र कागदी घोडे नाचवत आहे. घनकचरा विभागाच्या अखत्यारीत "स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान" दस्तक वस्ती योजनेमध्ये काम करणारे कर्मचारी  २४ वर्षांपासून पालिकेच्या विविध वॉर्डामधील गलिच्छ वस्त्यांमध्ये दुर्गंधीयुक्त कचरा उचलत आहेत. या कामगारांच्या लढ्यासाठी न्यायालयात व मैदानात लढा देणारे मोहन पी. आर. देवेंद्र यांनी पालिकेला अनेक वेळा पत्रव्यवहार करत बैठका घेतल्या. मात्र आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही.   ठेकेदार हजेरीची नोंदपुस्तिका ठेवत नाहीत. महापालिकेचे अधिकारी ठेकेदाराचे हजेरी कार्ड तपासत नाह...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन

Image
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन मुंबई / रमेश औताडे  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा ६८ वा वर्धापन दिन सोहळा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रह क्रांतीभूमीत ३ नोव्हेंबर २०२१५ रोजी आयोजीत केला असल्याची माहिती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर होणार आहेत. या निवडणूकांच्या संदर्भात रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना  मार्गदर्शन करणार आहेत. पत्रकार परिषदेस अज्ञान रिसर्च व एज्युकेशन ट्रस्ट चे राष्ट्रीय अध्यक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष व विजय शं . शेट्टी पर्यावरण विभागाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष तसेच आर पी आय चे मुंबई पदाधिकारी संजय पवार, प्रकाश जाधव, शिरीष चिखलकर, विशाल गायकवाड, विजय शेट्टी उपस्थित होते. रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गौतम सोनवणे यांनी केले.

आरटीओ कर्मचा-यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

Image
     आरटीओ कर्मचा-यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ             सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी दिली माहिती               सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी दिली माहिती परिवहन मंत्र्यांचे आदेश परिवहन आयुक्त  प्रशासनाने धुडकावले मुंबई / मंत्रालय प्रतिनिधी  ( रमेश औताडे ) आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर पदोन्नती या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी मागील तीन वर्षे संयम राखून मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना लढा देत आहे. मात्र परिवहन मंत्र्यांचे आदेश परिवहन आयुक्त  प्रशासनाने धुडकावले असल्याने आरटीओ कर्मचा-यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ असल्याची माहिती कर्मचारी नेते  विश्वास काटकर यांनी दिली. आकृतीबंधाची अंमलबजावणी न करताच महसूल विभागीय बदल्या हा नवीनच अडथळा उभा करुन कर्मचारीवर्गात भितीदायक संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रशासनाने वर्षभरापूर्वी अयशस्वी प्रयत्न केला. परंतु संघटनात्मक ताकदीच्या बळावर दि.२४/२५/२६ आॅक्टोबर २०२४ या कालावधीत तीन दिवसीय ऐतिहा...

अखिल भारतीय श्रमिक एकता युनियन संघटनेचे मोहन पी. आर. देवेंद्र यांचा सवाल

Image
"स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान" (दत्तक वस्ती) योजनेच्या कामगारांचे वाली कोण ? अखिल भारतीय श्रमिक एकता युनियन या संघटनेमार्फत मोहन पी. आर. देवेंद्र यांचा सवाल मुंबई / प्रतिनिधी मुंबईमध्ये घनकचरा विभागाच्या अखत्यारीत "स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान" (दस्तक वस्ती) योजनेमध्ये काम करणारे कर्मचारी गेली २४ वर्षांपासून पालिकेच्या विविध वॉर्डामधील गलिच्छ वस्त्यांमध्ये निरंतर कार्यरत आहेत. त्यांनी कोरोना काळात केलेले काम उल्लेखनिय आहे. कारण ज्याठिकाणी महापालिकेचा कर्मचारी पोहचू शकत नाही अशाठिकाणी या अभियानातल्या कर्मचाऱ्यांनी आजतागायत अतोनात कष्ट केलेले आहेत. हे कामगार डबक्यातील चिखलात उतरतात, तसेच दुर्गंधीजन्य पदार्थ हटविणे ही कामे नियमित करतात. परंतू त्यांना या रोजगाराला जुंपणारे ठेकेदार त्यांचे हजेरीची नोंदपुस्तिका ठेवत नाहीत. वस्तुतः घनकचरा विभागातील जे.ई. व ए.ई. हे महापालिकेचे अधिकारी कोणत्याही ठेकेदाराचे पुस्तिका हजेरी कार्ड तपासले जात नाहीत. यामुळे स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान (दस्तक वस्ती) या योजनेमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या कामाची दखल घेतली नाही.  ठेकेदार क...

दिव्यांग क्रिकेटपटूची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Image
दिव्यांग क्रिकेटपटूची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड          दिव्यांग क्रिकेटपटू मोहम्मद शाहिल अब्दुल अर्मान हशमी  मुंबई / रमेश औताडे  दिव्यांग क्रिकेटपटू मोहम्मद शाहिल अब्दुल अर्मान हशमी यांची पॅरा क्रिकेट क्लब ऑफ इंडिया संघात निवड झाली असून, कोलंबो (श्रीलंका) येथे नोव्हेंबर २०२५ मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्लब क्रिकेट स्पर्धेत ते भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यासाठी देणगीदारांनी मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मोहम्मद शाहिल हे जन्मतः दिव्यांग नव्हते. मुंबईत २६ जुलै २००५ रोजी झालेल्या प्रलयंकारी पावसात झालेल्या एका दुर्दैवी अपघातात त्यांना अपंगत्व आले. मात्र या संकटानंतरही त्यांनी हार न मानता आपल्या चिकाटीच्या जोरावर क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोलंबो येथे होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रवास, निवास व किटसाठी त्यांना ५० हजाराची आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे सामाजिक संस्था, क्रीडाप्रेमी आणि उदार देणगीदारांनी या तरुण खेळाडूसाठी आर्थिक सहाय्य 97684 86133  क्रमांकांवर संपर्क साधून करावे...

आयुष्याची संध्याकाळ.....

Image

विकास होत असताना शेतकऱ्यांचा विचार व्हावा - चंद्रकांत मोकल

Image
विकास होत असताना शेतकऱ्यांचा विचार व्हावा - चंद्रकांत मोकल मुंबई / रमेश औताडे  पालघर जिव्ळ्यात बुलेट ट्रेन, वाढवण बंदर, विमानतळ व इतर प्रकल्प येते आहेत,  प्रकल्पांची कामे सुरु आहेत. विकासात्मक प्रकल्पांची कामे करताना इथला शेतकरी विस्थापीत व्हायला नको त्यांच्या शेतीचा व कामाचाही विचार करावा असे स्पष्ट मत महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी केले. महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ व  बांदेकर महाविद्यालय पालकर यांच्या वतीने विद्यालयात फलोत्पादन, सिंचन प्रक्रिया- पर्यटन, दुग्धविकास परिषदेचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी  ते उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. राज्य व केंद्र सरकारने त्यांना योग्य ती मदत दिली पाहीजे ही आमची मागणी आहे. असे मोकल यांनी यावेळी सांगितले. उद्‌घाटन इंडियन ऑइक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक बी. बी प्रसाद यांच्या शुभहस्ते करण्यात आले.  टाटा स्टील मार्केटिंग हेड  सचिव अनिल पाटील , किरण साने रीटेल बिझनेस प्रशांत कुमार मिश्रा वाडकर ,...
Image
Image

बाल संरक्षणावर मीडिया सेन्सिटायझेशन कार्यशाळा

Image
बाल संरक्षणावर मीडिया सेन्सिटायझेशन कार्यशाळा मुंबई / रमेश औताडे  कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट  ने जस्ट राईट फॉर चिल्ड्रन व महिला आणि बाल विकास विभागाच्या सहकार्याने मुंबई प्रेस क्लब येथे बाल संरक्षणावर मीडिया सेन्सिटायझेशन कार्यशाळेचे यशस्वीरित्या आयोजन केले. बाल संरक्षणाला प्रोत्साहन देण्यात माध्यमांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर पत्रकारांना संवादात्मक संवादात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेत सरकारी प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व्यावसायिक आणि माध्यम कर्मचाऱ्यांना एकत्र आणले. या सत्रात तज्ञांचे सादरीकरण, वास्तविक जीवनातील प्रकरणांवर चर्चा आणि मुलांशी संबंधित मुद्द्यांवर नैतिक आणि संवेदनशील अहवाल देण्याची सामायिक वचनबद्धता होती. गेल्या तीन दशकांपासून, सीसीडीटीने महाराष्ट्रातील उपेक्षित समुदायांसोबत अथकपणे काम केले आहे, मुलांच्या संरक्षण आणि हक्कांसाठी वकिली केली आहे. त्यांच्या उपक्रमांद्वारे एक लाखाहून अधिक मुलांना पाठिंबा देऊन, सीसीडीटी बाल हक्क, गैरवापर आणि शोषण यावरील मीडिया रिपोर्टिंगमध्ये नैतिक, कायदेशीर आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित...

मनसेच्या दणक्याने रुग्णाला दिलासा

Image
पैसे भरा मगच रुग्णाला दाखल करा मनसेच्या दणक्याने रुग्णाला दिलासा मुंबई / रमेश औताडे  नवी मुंबई महानगरपालिका  रुग्णालयातून अधिकृतपणे संदर्भ करून पाठवलेल्या गंभीर रुग्णाला मध्यरात्रीच्या सुमारास प्रवेश नाकारल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने  फोर्टिस हॉस्पिटल प्रशासनाला कठोर शब्दांत निषेध करत, कायदेशीर कारवाईची ठाम चेतावनी दिली आहे. या गंभीर प्रकारामुळे रुग्णाचा जीव धोक्यात आला होता, या घटनेमुळे नवी मुंबईतील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर थेट आघात झाल्याची भावना मनसेने व्यक्त केली आहे. गंभीर प्रकृतीचे रुग्ण गणेश फसे यांना ५ सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातून फोर्टिस हॉस्पिटलला अधिकृतपणे संदर्भ करण्यात आले. मात्र, ६ सप्टेंबरच्या मध्यरात्री जेव्हा रुग्णाला दाखल करण्यासाठी नेण्यात आले, तेव्हा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी अमानवी आणि बेजबाबदार भूमिका घेतली. आय सी यू बेड उपलब्ध असूनही, नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालय संदर्भ रुग्णांना रात्री प्रवेश दिला जात नाही, असे सांगत रुग्णास प्रवेश नाकारण्यात आला. याउलट, खाजगी रुग्ण म्हणून भरती करायचे झाल्यास ...

હવે કબૂતરોના કારણે મહાયુતિ સરકાર પડશે

Image
ડુંગળીના કારણે કોંગ્રેસ સરકાર પડી, મરઘાના કારણે શિવસેનાની સરકાર પડી હવે કબૂતરોના કારણે મહાયુતિ સરકાર પડશે મુંબઈ / રમેશ ઔતાડે મુંબઈના દાદરમાં કબૂતરના કોઠાના વિવાદમાં કેટલાક કબૂતરોના મૃત્યુ બાદ, તેમની શાંતિ માટે શનિવારે મુંબઈમાં જૈન ધર્મગુરુઓ દ્વારા એક ધાર્મિક સભાનું આયોજન કરવામાં આવ્યું હતું. આ ધાર્મિક સભામાં જૈન મુનિ નિલેશચંદ્ર વિજયે મોટી જાહેરાત કરી હતી અને કહ્યું હતું કે તેઓ જન કલ્યાણ પાર્ટી નામનો રાજકીય પક્ષ બનાવશે. ડુંગળીના કારણે કોંગ્રેસની સરકાર પડી, મરઘાના કારણે શિવસેનાની સરકાર પડી, હવે કબૂતરોના કારણે મહાયુતિની સરકાર પડશે. આ પ્રસંગે જૈન આંતરરાષ્ટ્રીય સેવા સંગઠનના સ્થાપક પ્રમુખ સુરેશ પુનમિયા અને વરિષ્ઠ પદાધિકારીઓ હાજર રહ્યા હતા. આ પ્રસંગે બોલતા જૈન મુનિ નિલેશચંદ્ર વિજયે કહ્યું કે અમે તમામ મ્યુનિસિપલ કોર્પોરેશનોમાં અમારા ઉમેદવારો ઉભા રાખીશું. શિવસેના પાસે વાઘનું ચિહ્ન હતું, અમે કબૂતરોની પાર્ટી ઇચ્છીએ છીએ. આ ફક્ત જૈનોની પાર્ટી નથી, ગુજરાતીઓ અને મારવાડીઓનો પણ તેમાં સમાવેશ કરવામાં આવશે. પિતા સિવાય બધાને અમારી જન કલ્યાણ પાર્ટીમાં પ્રવેશ મળશે. રાવણ પહેલા જટાયુ પક્ષી આવ્...

आता कबुतरामुळे महायुतीचे सरकार पडणार

Image
कांद्यामुळे काँग्रेसचे तर कोंबडीमुळे शिवसेनेचे सरकार पडले आता कबुतरामुळे महायुतीचे सरकार पडणार  मुंबई / रमेश औताडे  मुंबईत दादर येथील कबुतरखान्याच्या वादातून झालेल्या काही कबुतरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आत्मशांतीसाठी शनिवारी मुंबईमध्ये जैन धर्मियांकडून धर्मसभा आयोजित करण्यात आली होती. या धर्मसभेत जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी मोठी घोषणा करत जन कल्याण पार्टी नावाचा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याचे सांगितले. कांद्यामुळे काँग्रेसचे तर कोंबडीमुळे शिवसेनेचे सरकार पडले होते आता कबुतरामुळे महायुतीचे सरकार पडणार आहे. यावेळी जैन इंटरनॅशनल सेवा ऑर्गनायझेशन चे संस्थापक अध्यक्ष सुरेश पुनमिया व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी यावेळी बोलताना सांगितले की, आम्ही सर्व महापालिकेत आमचे उमेदवार उभे करू. शिवसेनेकडे वाघ चिन्ह होते, आम्हाला कबुतरांची पार्टी हवी आहे. ही फक्त जैनांची पार्टी नाही, यात गुजराती, मारवाडी यांनाही घेण्यात येईल. आमच्या जन कल्याण पार्टीत फादर सोडून सर्वांना एन्ट्री असेल. रावणापुढे जटायू पक्षी आला होता. एका पक्षासाठी श्रीराम यांनी ...

आझाद मैदानात विशाल कुणबी एल्गार मोर्चा

Image
आझाद मैदानात विशाल कुणबी एल्गार मोर्चा मुंबई / रमेश औताडे  कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई व विविध कुणबी समाजिक संघटना आयोजित विशाल कुणबी एल्गार मोर्चाचे आयोजन आझाद मैदानात गुरुवारी करण्यात आले होते. यावेळी सरकारकडे विविध मागण्या करण्यात आल्या. हैद्राबाद गॅझेटीअर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी किंवा मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबतचा जीआर म्हणजे ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा सरकारचा कट आहे. हा जीआर मागे घेण्यात यावा. तसेच मराठा समाजाचा कोणत्याही प्रकारे व कोणत्याही परिस्थितीत प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे ओबीसीमध्ये समावेश करण्यास आमचा ठाम विरोध आहे. मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास नसतानासुद्धा ५८ लाख मराठ्यांना कुणबी नोंदीद्वारे दिले गेलेले बोगस जातीचे दाखले तात्काळ रद्द करण्यात यावेत. व मराठा समाजाच्या कुणबी नोंदी तपासण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आणि मराठ्यांच्या दबावाखाली पुन्हा पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली न्या. संदिप शिंदे समिती ही घटनाबाह्य असून ती तात्काळ बरखास्त करण्यात या...

बहुजन समाजासाठी रिपाईचे आमरण उपोषण

Image
बहुजन समाजासाठी रिपाईचे आमरण उपोषण मुंबई / रमेश औताडे  सांडपाण्याची समस्या, पाणी गळती, स्वच्छतेचा अभाव या सर्व सोयी सुविधाच्या अभावी दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे सुरू आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे पंचशील एस आर ए अमर महल चेंबूर प्रकल्पातील जनता त्रस्त असून आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे, राजेश भाऊ कटार नवरे, बाळासाहेब पवार, दिलीप कदम यांनी याप्रकरणी रहिवाशांना मूलभूत सुविधा मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेण्यात येणार नाही असा इशारा दिला आहे. इमारतीमधील अग्निशामक परवाना चौकशी व्हावी. ११ पैकी फक्त ३ लिफ्ट चालू आहेत. लिफ्टची अकार्यक्षमता असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने अपघाताची शक्यता आहे. २०१६ पासून सांडपाणी, गळती, अस्वच्छता आदी प्रकरणी विकासक चैतन्य मेनता आणि ललित मेनता अरिहत रिलेट यांच्या मनमानी कारभारामुळे दुर्गंधी पसरली असून आजार निर्माण होत आहेत. गरीब समाजाला त्रास देत असल्याप्रकरणी  त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी ॲड महेंद्र भिंगा...

प्रेमाचा संदेश द्वेषात बदलणे दुर्दैवी — धार्मिक जन मोर्चा महाराष्ट्र

Image
प्रेमाचा संदेश द्वेषात बदलणे दुर्दैवी — धार्मिक जन मोर्चा महाराष्ट्र मुंबई / रमेश औताडे  धार्मिक जन मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने आज मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेण्यात आली. पैगंबर मोहम्मद  यांच्या प्रेमाच्या शांततामय अभिव्यक्तीवर करण्यात आलेल्या पोलिस कारवाया, अटक आणि एफआयआरचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला. शाकिर भाई शेख यांनी सांगितले की “आय लव्ह मोहम्मद ” ही श्रद्धा आणि आदराची शांततामय अभिव्यक्ती आहे, गुन्हा नाही. अशा भावनेला गुन्हा ठरविणे समाजातील ऐक्याला धक्का पोहोचवणारे आहे. अब्दुल हसीब भाटकर (उपाध्यक्ष, जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र) म्हणाले की सरकारचा दुहेरी निकष स्पष्ट दिसतो. पैगंबर  यांनी सर्व सजीवांच्या अधिकारांचा सन्मान करण्याचा संदेश दिला. हरविंदर सिंग (राष्ट्रीय सिख मोर्चा) म्हणाले की “आय लव्ह मोहम्मद” वर वाद निर्माण करणे हे नियोजित कटकारस्थान आहे. मोहम्मद  यांनी संपूर्ण मानवजातीला योग्य जीवनमार्ग दिला आहे, आणि सर्वांना त्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्याचा अधिकार आहे. फादर मायकेल सेबॅस्टियन यांनी म्हटले की भारताची खरी ताकद संव...

जैन समाज आणि कबुतर जिव्हाळा

http://youtube.com/post/UgkxWcrCfka9QrdWFDw6nRBck_G6IqgcfBew?si=yL3f83HENmF8MT0z

*‘मनाचे श्लोक’ नावाचा चित्रपट म्हणजे संत वाड्मयाचा अपमान !*

Image
श्री. रमेश औताडे ( प्रतिनिधी ) दिनांक : ०७.१०.२०२५ *‘मनाचे श्लोक’ नावाचा चित्रपट म्हणजे संत वाड्मयाचा अपमान !*  *चित्रपटाचे नाव न बदलल्यास हिंदू समाज चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही !* - हिंदु जनजागृती समितीचा इशारा *मुंबई* : राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी महाराज यांनी रचलेल्या ‘मनाचे श्लोक’ या पवित्र धार्मिक ग्रंथाच्या नावाचा वापर करून त्याच नावाने मराठी चित्रपटाची निर्मिती करणे, हा हिंदूंच्या श्रद्धेचा बाजार मांडण्यासारखे आहे. हा समर्थ रामदासस्वामींचा अपमानच आहे. उच्चतम नैतिक मूल्ये शिकवणाऱ्या ग्रंथाचे नाव केवळ मनोरंजन, व्यावसायिक लाभ आणि सवंग प्रसिद्धीसाठी वापरणे, हा कोट्यवधी श्रीरामभक्तांच्या आणि समर्थभक्तांच्या धार्मिक भावना पायदळी तुडवण्याचा प्रकार आहे. संतपरंपरेचा हा अपमान हिंदू समाज कदापि सहन करणार नाही. जर या चित्रपटाचे नाव तात्काळ बदलले नाही, तर हिंदू समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. शासन आणि सेन्सॉर बोर्डाने याची तातडीने गंभीर दखल घेऊन “मनाचे श्लोक” हे पवित्र नाव चित्रपटाच्या शीर्षकातून हटवण्यासाठी आवश...

मातंग संघटनेचे पहिले अधिवेशन पुण्यात

Image
मातंग संघटनेचे पहिले अधिवेशन पुण्यात मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्रातील शेकडो मातंग समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्वाभिमानी मातंग संघटनेचे पहिले अधिवेशन शनिवारी ४ ऑक्टोबर रोजी शिवाजी नगर, पुणे येथे यशस्वीरित्या पार पडले. वक्ता प्रशिक्षण आणि मातंग समाजाच्या सामाजिक अडचणी व आव्हानांवर चर्चाही झाली. शासनाच्या कर्ज प्रकरणे, हमिदार निर्णय व आरक्षण वर्गीकरणावर आमदार अमित गोरखे यांनी मार्गदर्शन केले. विधानपरिषद आमदार अमित गोरखे, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष अशोक लोखंडे, सदस्य भास्कर नेटके, नगरसेविका नेटके ताई, जेष्ठ नेते रमेश समुखराव, संघटना नेते रमेश दोडके, उपाध्यक्ष गजानन वानखेडे, उपाध्यक्ष दिलीप यादव आणि महिला पदाधिकारी सिताबाई चांदने उपस्थित होते. या वेळी शशिकला काचेकर व शोभाताई वैराळ यांना समाजकार्या बाबत जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. अधिवेशनाचे सूत्रसंचालन अध्यक्ष राजीव मानकर यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन वानखेडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल सुरडकर, विजया वानखेडे, सुनील भालेराव, सागर तायडे, स...

कायद्याची मृत्यूवर संवेदना, पण कुटुंबांवर अन्याय

Image
कायद्याची मृत्यूवर संवेदना, पण कुटुंबांवर अन्याय अनुकंपा नोकरीचा अर्ज २४ वर्षांपासून फाईलमध्येच मुंबई / रमेश औताडे  सर्वोच्च न्यायालयाच्या निवड्यानुसार सरकारी किंवा पालिकेच्या  सेवेत नोकरी करत असताना कर्मचारी मृत्यूमुखी पडला, तर त्याच्या कुटुंबाला अनुकंपा तत्वावर नोकरी देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. पण मुंबई महापालिकेच्या अधिकार्‍यांनी मात्र हा नियम फक्त फाईलमध्ये दडवून ठेवण्यासाठीच बनवला आहे काय ? असा प्रश्न अडांगळे कुटुंबाच्या २४ वर्षाच्या संघर्षातून समोर आल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार समोर आला आहे. केईएम रुग्णालयातील सेवेत असताना सयाजी भागोजी अडांगळे यांचे निधन झाले. कुटुंबाने २००० साली अनुकंपा नोकरीसाठी अर्ज केला. परंतु त्या अर्जाची २४ वर्षे पालिका प्रशासनाने दखल घेतली नाही. २००१ साली नियमावली बदलली म्हणून भोलेनाथ भागोजी अडांगळे यांचा नियमात बसणारा नोकरी अर्ज २००८ साली फेटाळण्यात  आला. त्यानंतर २०१७ रोजी जगदीश मधुकर अडांगळे यांनी नोकरी करिता अर्ज केला असता तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रमुख कामगार अधिकारी यांच्या अभिप्रायाच्या अनुषंगान...

महसुलमंत्र्यांच्या आदेशाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Image
महसुलमंत्र्यांच्या आदेशाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष  मुंबई / रमेश औताडे  धरणग्रस्तांच्या जमिनी बोगस आदेशाद्वारे अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना वाटप केल्या जात आहेत आणि महसुलमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात प्रशासन जाणीवपूर्वक दिरंगाई करत आहे. असा आरोप ॲड. शिरीष रासकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. ॲड. शिरीष रासकर यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात कोंढापुरी (गट क्र. २७१/२) येथील जमीन धरणग्रस्तांना पुनर्वसनासाठी देण्यात आली होती. मात्र शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी २४ जून २०२५ रोजी वाटप आदेशातील शर्थ कमी करून ती जमीन आपल्या जवळच्या नातेवाईक  पुष्पा जयसिंग म्हस्के यांच्या नावे विक्रीस खुली केली. १७ जुलै रोजी खरेदीखतही नोंदवले गेले. मुळ जमीनमालक म्हणून मी या प्रकरणाची तक्रार महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली असता त्यांनी जिल्हाधिकारी पुणे यांना चौकशीचे लेखी आदेश दिले. मात्र अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी आणि पुनर्वसन अधिकारी स्वप्नील मोरे यांनी कारवाई टाळल्याचा आरोप रासकर यांनी केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक...

आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मुंबई पालिकेला सशक्त सुरक्षितता हवी

Image
आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मुंबई पालिकेला सशक्त सुरक्षितता हवी मुंबई / रमेश औताडे  मुंबई महापालिका मुख्यालयासारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक इमारतीत सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे काही सुरक्षा तज्ज्ञांचे मत आहे. सध्या वापरात असलेली सुरक्षा साधनसामग्री कार्यक्षम असली तरी काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याची आवश्यकता आहे असे मत सुरक्षा अधिकारी व्यक्त करत आहेत. महापालिका सुरक्षा विभागाकडून सातत्याने सुरक्षा तपासणी आणि रक्षकांची कर्तव्यपूर्ती व्यवस्थित पार पडत असली तरी आकस्मिक परिस्थितीत अधिक वेगाने प्रतिसाद देता यावा, यासाठी अत्याधुनिक उपकरणांची जोड मिळाली तर लाभदायक ठरेल. काही पोस्ट वर खाजगी रक्षक आहेत. त्या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवत पालिकेचे रक्षक त्या पोस्टवर पाहिजेत. शासन आणि महापालिका प्रशासन यांनी गेल्या काही वर्षांत सुरक्षेसाठी केलेली तरतूद लक्षात घेता, येत्या काळात आणखी काही अद्ययावत साधनांची भर पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सुरक्षा रक्षकांचे प्रशिक्षण आणि महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याबाबतही सकारात्मक हालचाली सुरु असल्याची म...

बंधुभाव आणि विचारांच्या एकत्रीकरणाचा संदेश

Image
बंधुभाव आणि विचारांच्या एकत्रीकरणाचा संदेश मुंबई / रमेश औताडे आर.पी.आय. मुंबई प्रदेशचे सरचिटणीस विवेक गोविंदराव पवार यांनी आज गुरुवारी समाजातील बंधुभाव आणि विचारांचे एकत्रीकरण याचा संदेश देत दोन महत्त्वपूर्ण स्थळांना भेट दिली. सर्वप्रथम त्यांनी दादर येथील भगवान गौतम बुद्ध विहारात जाऊन तथागत गौतम बुद्ध आणि भारतीय घटनाद्रष्टे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. या वेळी त्यांनी बौद्ध आणि आंबेडकरी विचारसरणीने देशात समानता, बंधुता आणि करुणेचा मार्गच खरा असल्याचा संदेश दिला. यानंतर महात्मा गांधी जयंतीनिमित्त त्यांनी जुहू चौपाटी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकास अभिवादन केले. गांधी, बुद्ध आणि आंबेडकर या तीन महामानवांच्या विचारांतूनच भारताचे खरे राष्ट्रनिर्माण होऊ शकते, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमांदरम्यान त्यांच्या सोबत स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सामाजिक सलोखा आणि मानवतावादी विचारांचे पूनर्मूल्यांकन करण्याचा हा उपक्रम स्थानिक नागरिकांनीही कौतुकाने पाहिला.

धम्मचक्र परिवर्तन दिन आरक्षण मेळावा

Image
धम्मचक्र परिवर्तन दिन आरक्षण मेळावा मुंबई / रमेश औताडे  आरक्षण म्हणजे उपकार नाही, तर व्यवस्थेने केलेल्या शतकानुशतकांच्या अन्यायाची परतफेड आहे,” असे प्रतिपादन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले. धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित आरक्षण अंमलबजावणी मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मेळाव्याचे सुरदास सचिन अंभोरे यांनी उद्घाटन केले. नामदेवराव निकोसे, रवी शेंडे, डॉ. आशा पारधे आदी मान्यवर उपस्थित होते. बागडे म्हणाले, आरक्षणाचा सर्वाधिक फायदा उच्च पदावर पोहोचलेल्या घटकांनी घेतला; पण त्यांनी आपल्या समाजाची जबाबदारी पार पाडली नाही. आजही अन्न-वस्त्र-निवार्‍यासाठी शासनदरबारी हेलपाटे मारावे लागतात. आता चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. मेळाव्याचे सुरदास सचिन अंभोरे यांनी उद्घाटन केले. नामदेवराव निकोसे, रवी शेंडे, डॉ. आशा पारधे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. रमेश दुपारे यांनी सूत्रसंचालन तर धर्माजी बागडे यांनी आभार मानले. 

मध्य रेल्वेचे नवीन महाव्यवस्थापक विजय कुमार

Image
मध्य रेल्वेचे नवीन महाव्यवस्थापक विजय कुमार मुंबई / रमेश औताडे  मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून विजय कुमार यांनी १.१०.२०२५ पासून कार्यभार स्वीकारला. ते भारतीय रेल्वे यांत्रिक अभियांत्रिकी सेवा (IRSME), १९८८ बॅचचे अधिकारी आहेत. कुमार यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये महाव्यवस्थापक म्हणून ७०० लोकोमोटिव्हच्या उत्पादनाचा ऐतिहासिक उपक्रम यशस्वीरीत्या हाताळला आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक पद स्वीकारण्यापूर्वी, विजय कुमार यांनी चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स (सीएलडब्ल्यू) मध्ये महाव्यवस्थापक म्हणून कार्य केले, जिथे त्यांनी सीएलडब्ल्यू ला नव्या उंचीवर नेण्यासाठी गतिशील नेतृत्व प्रदान केले. त्यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये सीएलडब्ल्यू ने ७०० जागतिक दर्जाच्या वैशिष्ट्पूर्ण लोकॉमोटीव्हचे उत्पादन करून इतिहास रचला. सध्याच्या आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ७७७ लोकोमोटिव्हचे वाढीव आणि आव्हानात्मक लक्ष्य देण्यात आले होते, त्यापैकी पहिल्या  ६ महिन्यांतच सीएलडब्ल्यू ने ४१७ लोकोमोटिव्ह बनविले  आहेत. त्यांच्या ३५ वर्षांहून ...