Posts

Showing posts from December, 2025

आरोग्य हा मूलभूत हक्क मान्य न केल्यास महाराष्ट्रात जनआंदोलन – अशोक जाधव

Image
मुंबई  / रमेश औताडे राज्यात आरोग्य सेवा कोलमडली असून खासगीकरणामुळे सामान्य नागरिकांना उपचारांसाठी प्रचंड आर्थिक भार सहन करावा लागत आहे. गरीब, कष्टकरी, कामगार वर्गाला वेळेवर व परवडणारी आरोग्यसेवा मिळत नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य हा मूलभूत हक्क म्हणून सरकारने मान्य करावा, या मागणीसाठी महाराष्ट्रभर जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा म्युनिसिपल मजूर युनियन, मुंबईचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिला आहे. २०२०–२१ या काळात आरोग्य सेवेसाठी सरकारने हजारो कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात आजही शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेशा सुविधा, मनुष्यबळ आणि औषधांचा अभाव आहे. खासगी रुग्णालयांमधील अवाजवी दरांमुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरशः उध्वस्त होत आहेत. त्यामुळे आरोग्य सेवा ही केवळ बाजारपेठेच्या हाती न देता सरकारने जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आरोग्य सेवा सर्वसामान्यांसाठी मोफत व सर्वसमावेशक असावी, शासकीय रुग्णालये बळकट करावीत, कंत्राटी व तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, तसेच आरोग्य क्षेत्रातील भ्रष्टाचार थांबवावा, या प्रम...

महाविद्यालयीन महर्षी स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी

Image
मुंबई / रमेश औताडे  महर्षी दयानंद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आयोजित मिस्टर अँड मिस महर्षी स्पर्धेत स्वरूप धुरी याने मिस्टर महर्षी, तर संतोषी गवळी हिने मिस महर्षी चा किताब पटकावला. १६० मुलांमधून अंतिम फेरीसाठी १२ स्पर्धक पात्र ठरले होते. केवळ बाह्य सौंदर्यावर नव्हे तर मुलांच्या सर्वांगीण कौशल्यांची चाचणी घेण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 'कम्युनिकेशन स्किल', 'लॉजिकल रिझनिंग', 'प्रेझेंटेशन' तसेच 'अॅकॅडेमिक' आणि 'नॉन-अॅकॅडेमिक' अशा विविध कठीण पातळ्यांवर मुलांची निवड करण्यात आली होती. १६० मुलांमधून निवडले गेलेले शेवटचे १२ स्पर्धक अंतिम फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण आणि  मराठी टेलिव्हिजन मधल्या प्रसिद्ध वृत्तनिवेदिका मनाली पवार उपस्थित होते.  संदीप चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात स्वतःला कसे सिद्ध करावे, याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. प्रिया राजेश पारकर यांनी विद्यार्थ्यांच्या क...

गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण

Image
मुंबई / रमेश औताडे  गरीब वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे, सर्वांगीण आणि पूर्णतः मोफत शिक्षण देण्याच्या उद्देशाने क्रिस्टेल हाऊस इंडिया या सामाजिक संस्थेने अत्याधुनिक क्रिस्टेल हाऊस स्कूल सुरू करत देशाची भावी पिढी सुसंस्कृत करण्याचा विडा उचलला आहे. या उपक्रमांतर्गत ठाणे खारघर–कळवा परिसरात आधुनिक पायाभूत सुविधांनी सुसज्ज शाळा उभारण्यात येणार असून सीबीएसई अभ्यासक्रम राबविण्यात येईल. ठाणे महानगर पालिकेला सोबत घेत ही शाळा सुरू होणार आहे. शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच मोफत गणवेश, पुस्तके, वहातूक, भोजन आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात बालवाडी ते इयत्ता २ पर्यंत २१० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून पुढील वर्षांत ही शाळा टप्प्याटप्प्याने इयत्ता १२ पर्यंत वाढवण्यात येईल. विद्यार्थ्यांची निवड गरिबी-आधारित व पारदर्शक प्रक्रियेतून केली जाणार असून समाजातील सर्वात वंचित कुटुंबांतील मुलांना प्राधान्य दिले जाईल.  शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर, कौशल्यविकासावर आणि सामाजिक जाणीव वाढविण्यावर ...

‘ स्वयंसेवक ’ शिक्क्यामुळे सफाई कामगारांचे आयुष्य उद्ध्वस्त

Image
       समान काम, समान वेतनाचे न्यायालय आदेश धाब्यावर  ‘ स्वयंसेवक ’  शिक्क्यामुळे सफाई कामगारांचे आयुष्य उद्ध्वस्त मुंबई / रमेश औताडे  “समान काम समान वेतन” असा सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतानाही मुंबई महानगरपालिकेकडून दत्तक वस्ती योजना व स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानअंतर्गत काम करणाऱ्या कामगारांवर अन्यायाची परिसीमा ओलांडली जात आहे. दुर्गंधीयुक्त कचरा उचलणे, गटार-नाले साफ करणे, घनकचरा व्यवस्थापन अशी अत्यंत धोकादायक व आरोग्याला घातक कामे करून घेत असतानाही या कामगारांना आजही ‘स्वयंसेवक’ म्हणूनच संबोधले जाते. परिणामी त्यांना किमान वेतन, आरोग्य सुविधा, विमा, भविष्य निर्वाह निधी अशा मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. या अमानुष व्यवस्थेमुळे अनेक कामगार क्षयरोग (टीबी), दमा यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त झाले. काहींनी उपचाराअभावी प्राण गमावले. त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असून अनेक घरे उध्वस्त झाली आहेत. या गंभीर प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदने देऊनही...

कृतघ्नांच्या भाऊगर्दीत हरविणार कां प्रज्ञा सातव ?

Image
कृतघ्नांच्या भाऊगर्दीत हरविणार कां प्रज्ञा सातव ?       योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१      अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विजयाराजे शिंदे यांनी ६ एप्रिल १९८० रोजी मुंबईत महाअधिवेशन भरवून भारतीय जनता पक्ष स्थापन केला. १९७७ साली लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेने स्थापन केलेल्या जनता पक्षातून फुटून निघत आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जनता पक्षाची 'पुण्याई' पदरात पाडून घेण्यासाठी 'भारतीय' हा शब्द पुढे लावीत भारतीय जनता पक्ष स्थापन करण्यात आला.   अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी हे दिग्गज नेते होतेच परंतु आज हा पक्ष नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ताब्यात घेतला असून २०१४ पासून या पक्षाची भूक इतकी वाढलीय की जणू काही 'भस्म्या' झालाय की काय असा प्रश्न पडावा. सगळ्या प्रादेशिक पक्षांबरोबरच इतर पक्षांतील नेते कार्यकर्ते यांना गिळंकृत करण्याचेच काम हा 'बकासूर' जनता पक्ष करीत सुटलाय. बरं, आरोपांच्या फैरी झाडायच्या आणि त्यांनाच आपल्या धुलाई यंत्रातून स्वच्छ करीत भाजप (भारत) स्वच्छता अभियानचा ट...

ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर

Image
मुंबई / रमेश औताडे  फेस्कॉन प्रादेशिक विभागाच्या  ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने डी. वाय. पाटील हॉस्पिटलतर्फे काल संघाच्या कार्यालयात  ज्येष्ठ नागरिकांसाठी  मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉ.  निखिल यांच्या हस्ते झाले. सुरुवातीला सर्व डॉक्टर व सहकारी कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.  संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव यांनी प्रास्ताविक केले. या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये मधुमेह,  रक्तदाब,  डोळे तपासणे,  त्वचारोग,  कान नाक घसा तपासणी,  ईसीजी,  हाडाची तपासणी, इत्यादी  आजारांच्या तपासण्या  करून मोफत औषधे देण्यात आली.  शिबिरामध्ये डॉ. यश, डॉ. मुदिता, डॉ.  पलख,  डॉ. प्रज्ञेश,  डॉ. आदिती, डॉ.  शिवानी व हॉस्पिटलचे इतर कर्मचाऱ्यांचा  महत्त्वाचा सहभाग होता. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे  मेडिकल सोशल वर्कर समाधान माळी यांनी यासाठी उत्तम सहकार्य केले. या शिबिरामध्ये सुमारे १००...

मुक्या जीवांसाठी एक अनोखा उपक्रम

Image
मुंबई / रमेश औताडे शहरातील मुक्या प्राण्यांना मदतीचा आधार मिळावा, या उद्देशाने प्राणीप्रेम आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम साधत “महजॉंग पॉज विथ अ पर्पज” या सामाजिक संस्थेच्या वतीने एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. भटकी कुत्रे व मांजरे यांच्यासाठी अन्नपुरवठा, बचावकार्य, वैद्यकीय उपचार, पुनर्वसन तसेच नसबंदी यांसारख्या महत्त्वाच्या उपक्रमांद्वारे या कार्यक्रमातून मुक्या जीवांच्या संरक्षणाचा संदेश देण्यात आला. मुंबईतील बांद्रा येथे आयोजित या उपक्रमाचे आयोजन शीतल झुबीन आणि तनिका ठक्कर यांनी केले होते. या उपक्रमातून जमा होणारा संपूर्ण निधी मुक्या प्राण्यांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या फरिदा बजाज यांच्या “फर-रिडाज अ‍ॅनिमल अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन ट्रस्ट” या संस्थेला देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे समाजातील प्रत्येक घटकाने मुक्या जीवांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढे यावे, असा सकारात्मक संदेश देण्यात आला असून प्राणीमित्रांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  संपादक 7021777291

लेझीमच्या माध्यमातून महाराष्ट्राची शान थेट लाल किल्ल्यावर

Image
मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्राची पारंपारिक कला असलेली लेझीम ही दिवसेंदिवस लोप पावत असताना, ती जतन व संवर्धन करण्याचा निर्धार दहा वर्षांपूर्वी आठ–दहा मैत्रिणींनी केला. या निर्धारातूनच एक स्वतंत्र लेझीम पथक उभे राहिले. मिरवणुका, रॅली तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत सातत्याने लेझीम नृत्य सादर करत या कलाकारांनी आपल्या कलेची ओळख निर्माण केली. परंतु गल्लीतून सुरू झालेला हा प्रवास थेट देशाच्या राजधानीतील लाल किल्ल्यावर पोहोचेल, अशी कल्पनाही कधी केली नव्हती. ही ऐतिहासिक संधी पांडुरंग गुरव यांनी उपलब्ध करून दिली. त्यांच्या या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल पथकातील सर्व कलाकारांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात महाराष्ट्राची पारंपारिक लेझीम सादर करताना महाराष्ट्राची शान मिरवण्याचा मान मिळाल्याने कलाकारांना विशेष अभिमान वाटत आहे. गल्लीतील लेझीम दिल्लीत पोहोचवण्याचा हा प्रवास अविस्मरणीय ठरला, असे कलाकारांनी सांगितले. या पथकात महाराष्ट्रातील मुंबई घाटकोपर येथील सुनीता जगदाळे, दिपाली पवार, अंजू सोनवणे, ज्योती पाटील, ममता तईपरमबिल...

मानवी हक्क दिनानिमित्त शांतता व ऐक्याचा संदेश

Image
मानवी हक्क दिनानिमित्त शांतता व ऐक्याचा संदेश मुंबई / रमेश औताडे  मानवी हक्क दिनानिमित्त स्पीड ऑफ पिस इंडिया आणि मुंबई बहाई समाज यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष समुदाय संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात स्पीड ऑफ पिस चे माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक, विद्यार्थी तसेच बहाई समाजातील सदस्य असे जवळपास १०० जण सहभागी झाले होते. शांतता, न्याय आणि मानवतेच्या ऐक्याबद्दलची समान बांधिलकी व्यक्त करत उपस्थितांनी एकात्मतेच्या भावनेत सहभाग घेतला. दोन्ही समुदायांच्या समान मूल्यांवर आधारित या संमेलनात शांतता, समता, बंधुता आणि न्याय या मानवी हक्कांच्या जिवंत अभिव्यक्तींवर चिंतन करण्यात आले. सागर गांगुर्डे, प्रोग्राम्स मॅनेजर उर्मी चंदा आणि मुंबई बहाई समाजाच्या नर्गिस गौर यांच्या संयुक्त आयोजनातून हा कार्यक्रम साकारला गेला. मानवी हक्क कार्यकर्ते ॲड. विनोद शेट्टी यांनी सत्तेचा गैरवापर आणि मानवी हक्कांचे होत असलेले उल्लंघन यावर प्रकाश टाकला.  बहाई दृष्टिकोन मांडताना ॲड. जेना़ सुनावाला यांनी शांतता ही केवळ स्वप्न नसून अटळ आहे, असा विश्वास व्यक्त केला. समाजपरिवर्तनात युवक आणि कनिष...

Free distribution food seva

Image
     P R News / Ramesh Autade  Adnyan.Org Free distribution food seva for various part of India silent devotees came there to visit tribute to Bharat Ratna Shri Babasaheb Ambedkar ji @Chaitanya Bhoomi, Shivaji park, Dadar West, Mumbai Maharashtra, India by 🌴Shetty Vijay S, Mr.Sanjay Dhaware, Prashant Shirgoankar, Sanjay kudalkar & Adnyan .Org Team on 06/12/2025.

सफाई कामगारांच्या घराचे आंदोलन निवडणुकीच्या तोंडावर तीव्र होणार - अशोक जाधव यांचा सरकारला इशारा

Image
नागपूर / रमेश औताडे  शहराची स्वच्छता करत असताना आपल्या मालकी हक्काचे घर कधी होणार. अशी स्वप्न अनेक वर्ष पाहत असणारा सफाई कामगार आता नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करून हक्काचे घर मागत आहे. सरकारने आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार केला नाही तर आंदोलन निवडणुकीच्या तोंडावर तीव्र होईल असा इशारा म्युनिसिपल मजदुर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिला आहे. मुंबईतील २१ हजार ८६८ सफाई कामगारांपैकी केवळ पाच हजार ८०० कामगारांना सरकारने मालकी हक्काची घरे दिली असून उर्वरित हजारो कामगारांचे प्रश्न प्रलंबितच आहेत. या अन्यायाविरोधात म्युनिसिपल मजूर युनियनने नागपूर विधानसभेसमोर लक्षवेधी उपोषण सुरू केले. अनेक वर्षांपासून शासन व महापालिकेकडे मालकी हक्काच्या घराची मागणी केली. मात्र अद्यापही १६ हजार  हून अधिक कामगारांना घर मिळालेले नाही. विधानसभेच्या समित्यांमध्येही कामगारांच्या घरकुल निर्णयाला संमती देण्याची चर्चा झाली होती. परंतु अंतिम निर्णय लांबत चालल्याने कामगारांच्या सहनशक्तीचा अंत होत असल्याचे युनियनचे सरचिटणीस वामन झरेकर, कार्याध्यक्ष रामचंद्र बिराजदार यांनी सांगितल...

देशात आम्हाला जगण्याचा अधिकार नाही का

Image
मुंबई / रमेश औताडे  हलकीचे जीवन जगत असताना आमच्या झोपड्या तोडल्या जातात. आमची मुले संसार रस्त्यावर येत आहे. या देशात आम्हाला जगण्याचा अधिकार नाही का ? असा सवाल मानवाधिकार दिनाच्या पार्श्वभूमीवर या जनतेच्या वतीने मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन लोंढे यांनी केला आहे.  बोरिवली पश्चिम येथील पैनगर झोपडपट्टी परिसरातील रहिवाशांचे कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावे, या मागणीसाठी सहाय्यक आयुक्त प्रफुल तांबे यांची भेट घेण्यात आली. पै नगर परिसरातील नागरिकांना वारंवार बेघर केले जात असल्याने सर्वसामान्यांवर अन्याय होत आहे. पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही झोपडीवर कारवाई करू नये, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. गरिबाना त्यांच्या हक्काचे घर मिळालेच पाहिजे. पुनर्वसनाशिवाय कारवाई करणे म्हणजे दुर्बल घटकांवर अन्याय करणे होय असे सचिन लोंढे यांनी सांगितले.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील राखीव वनात आर्थिक गैरव्यवहार?

Image
निसर्गप्रेमींचा गंभीर आरोप;  मुंबई / प्रतिनिधी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तथा आरे वनपरिमंडळातील राखीव वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता व पॅराग्रास गवताच्या अनधिकृत कापणी-विक्रीचे व्यवहार सुरू असल्याचा आरोप निसर्गप्रेमी व विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी केला आहे. हे आरोप प्रशासनाच्या लक्षात जावेत आणि वस्तुस्थितीची तपासणी व्हावी, इतक्याच उद्देशाने त्यांनी ही माहिती सार्वजनिक केल्याचे सांगितले. महसूल व वनविभागाच्या संयुक्त अधिसूचनेनुसार दि. १२ ऑक्टोबर २०२० रोजी आरे दुग्धवसाहत परिसरातील २८६.१३२ हेक्टर क्षेत्र राखीव वन घोषित करण्यात आले. दि. ०७ जून २०२१ रोजी हे क्षेत्र अधिकृतपणे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे हस्तांतरित करण्यात आले. त्यानंतर वनहद्दी स्पष्ट करण्यासाठी सिमेंट खांब व सूचना फलक बसवले गेले. डॉ. माकणीकर यांच्या मते, युनिट क्र. २, ३, ४ व १३ या विभागांमध्ये अंदाजे ५० ते ८० एकर राखीव वनक्षेत्रात रात्रीच्या सुमारास पॅराग्रास गवत कापणी होऊन मुंबईतील तबेल्यांमध्ये पुरवठा केल्याचे निदर्शनास आले. या प्रक्रियेत काही पातळ्यांवर आर्थिक अनियमितता होत असल...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत अनुयायांना पाणी वाटप

Image
मुंबई / रमेश औताडे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर देशभरातून लाखो अनुयायी दर्शनासाठी येतात. या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया एम्पॉवरमेंट परिषद आणि सिद्धिविनायक सेवा संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवत दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व संस्थेच्या अध्यक्ष सुनिता तूपसौंदर्य यांनी केले. वाढती गर्दी आणि सततची वाहतूक यामुळे भाविकांना पिण्याच्या पाण्याची विशेष गरज भासते. हे लक्षात घेऊन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर चैत्यभूमी परिसरात फिरून भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. पाणी वाटपाच्या या सेवेत महिलांसह युवकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन दरवर्षी विविध सेवाकार्ये राबवण्याचा संस्थेचा संकल्प असून, यंदाही त्यांनी शिस्तबद्धपणे सेवा दिली. ‘‘बाबासाहेबांच्या तत्त्वांना मानणाऱ्यांची सेवा करण्याचा आम्हाला अभिमान आहे,’’ असे अध्यक्ष सुनिता तूपसौंदर्य यांनी यावेळी सांगितले. भाविकांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून, गर्दीच्या वातावरणात थंड पिण...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त सेवाकुंडतर्फे अल्पोपहार वाटप

Image
मुंबई / रमेश औताडे  डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड ट्रस्ट या सामाजिक संस्थेच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चहा बिस्कीट असा अल्पोपहार वाटप करण्यात आला. ट्रस्ट चे अध्यक्ष अश्वजीत भैया गायकवाड, सल्लागार जयश्रीताई गायकवाड, सरचिटणीस अभिजीत गायकवाड, विश्वस्त चित्राताई गायकवाड, ट्रस्टी संजय कर्णिक, नंदकुमार शहाडे आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सेवा दिली. यावेळी  बुद्धगया येथील भंतेजींनी बुद्ध वंदना सादर करून गायकवाड परिवाराला शुभाशीर्वाद दिले. 

सावरकर साहित्य अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय कीर्तनकार क्रांतीगीता महाबळ आणि कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार स्वप्नील सावरकर यांची निवड

Image
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  मुंबई दि . ५ डिसेंबर २०२५ / प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवर आधारीत कार्य करण्यासाठी स्थापन झालेली पहिली संस्था हा मान असणाऱ्या सावरकर साहित्य अभ्यास मंडळाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सभेत राष्ट्रीय कीर्तनकार क्रांतीगीता महाबळ यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. तसेच, कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार स्वप्नील सावरकर, प्रमुख कार्यवाह म्हणून विनायक काळे, सहकार्यवाहपदी सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने आणि कोषाध्यक्षपदी अरुण नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १९६७ साली स्थापन झालेल्या या संस्थेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनासह सावरकर साहित्य प्रचार यात्रा, वक्तृत्त्व-निबंध-काव्य स्पर्धा, संस्कार शिबिरे, व्याख्याने, पुस्तक प्रकाशन, प्रश्नावली स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघात झालेल्या वार्षिक सभेत नव्या कार्यकारिणीची आणि पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली.  मावळते अध्यक्ष ज्येष्ठ सीए चंद्रशेखर वझे यांनी नव्या कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या असून भविष्यातही संस्थ...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना संगीतमय आदरांजली

Image
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना संगीतमय आदरांजली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा डिसेंबर रोजी असलेल्या महा परिनिर्वाण दिनानिमित्त दोस्त कला मंच तर्फे  दरवर्षीप्रमाणे हर सवाल का जवाब...बाबासाहब ! हा लक्षवेधी संगीतमय आदरांजली कार्यक्रम बुधवार ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी  दादर माटुंगा कल्चरल सेंटर मध्ये संपन्न झाला.कार्यक्रमाची संकल्पना संयोजन रवि भिलाणे यांचे असून संजय शिंदे,भानुदास धुरी,ज्योती बडेकर,अशोक विठ्ठल जाधव,राजू शिरधनकर,संदेश गायकवाड,प्रशांत राणे आदींनी या कार्यक्रमाचे संयोजन केलं. आहे.             जेष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांच्या शब्दात माईसाहेब आंबेडकर यांचे मनोगत,महात्मा फुले,शाहू महाराज यांचे व्यक्तिमत्व सादरीकरण,बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाचे चित्रीकरण करणाऱ्या दिवंगत नामदेव व्हटकर यांच्या कुटुंबियांचा मान्यवरांचा कृतज्ञता सन्मान हे यंदाच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. त्याच बरोबर विठ्ठल लाड आणि सहकाऱ्यांचे आदिवासी अस्मिता नृत्य,सुनंदा नेवसे पाटील,चित्रपट दिग्दर्शक महेश बनसोडे,अभिन...

कै. प्रा.थोरात स्मृती व्याख्यानमालेत 13 वे पुष्प महाराष्ट्र भूषण पद्मश्री मा.डॉ.अभय बंग गुंफणार

Image
                         पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  नवी मुंबईमध्ये एकमेव असणाऱ्या या व्याख्यानमालेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा यज्ञ अखंड सुरू आहे. यामध्ये 2025 यावर्षी महाराष्ट्र भूषण पद्मश्री मा.डॉ.अभय बंग यांचे व्याख्यान विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी नवी मुंबई येथे रविवार दि 7  डिसेंबर 2025  सकाळी 10 वा संपन्न होणार आहे. प्रभात ट्रस्ट हा सन 2011 पासून नवी मुंबईमध्ये कार्यरत असणाऱ्या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून गत 12 वर्षांपासून रयत शिक्षण संस्थेचे अजीव सदस्य कै. प्रा. बी.आर. थोरात स्मृतीव्याख्यान आयोजित करण्यात येते या श्रृंखलेमध्ये प्रा. प्रवीण दवणे, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, विडंबन कवी रामदास फुटाणे, हॉटेल व उद्योग मार्गदर्शक डॉ. विठ्ठल कामत, रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त डॉ.भरत वाटवानी, पद्मश्री डॉ. रविंद्र व डॉ. स्मिता कोल्हे, स्नेहालयाचे डॉ. गिरीश कुलकर्णी, दीपस्तंभ चे यजुवेंद्र महाजन, डॉ नरेंद्र जाधव इत्यादी मान्यवरांनी या व्यासप...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यावर पीएचडी

Image
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  रमेश औताडे / मुंबई केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे २०१४ ते २०२४ या कालावधीतील रस्ते वाहतूक विकास या विषयावर प्रबंध लिहून नागपुर येथील प्रशांत हातबुडे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  विद्यापीठातून पीएचडी करीत आहेत. त्यासाठी लेखक अशोकराव टाव्हरे लिखित " विकासाचा राजमार्ग " हे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी ठरले आहे. नागपुर येथे टाव्हरे व हातबुडे यांनी नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना ही माहिती दिली. गडकरी यांनी दोघांचेही कौतुक केले. विकासाचा राजमार्ग या पुस्तकाच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाची विकासकामे जनतेसमोर गेली ही बाब अभिनंदनीय आहे, तसेच प्रशांत हातबुडे यांनी दहा वर्षातील कार्यावर प्रबंध लिहून पीएचडी करीत आहे याचे विशेष कौतुक गडकरी यांनी यावेळी केले. प्रशांत हातबुडे यांना पीएचडी प्रबंधासाठी गडकरींच्या कार्याची माहिती आवश्यक होती. त्यासाठी त्यांना गडकरी यांच्या नागपुर येथील जनसंपर्क कार्यालयाने विकासाचा राजमार्ग हे पुस्तक दिले होते असे टाव्हरे यांनी सांगितले. विकासाचा राजमार्ग य...