Posts

Showing posts from June, 2025

वक्फ दुरुस्ती कायदा २०२५ पुस्तक प्रकाशन

Image
             वक्फ दुरुस्ती कायदा २०२५ पुस्तक प्रकाशन मुंबई / रमेश औताडे  द नॉलेज अँड स्किल्स फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने मुफ्ती मंजूर झियाई लिखित टाइम्स ऑफ शारिता अँड रेफॉर्म्स या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजरत अताफ, मेहबूब जिलानी,निजाम उद्दीन शाह, किशोर, मो. मुफ्ती जाहिद, हजरत मुफ्ती, निजाम उद्दीन राई, किशोर, मो.मुफ्ती गिलानी उपस्थित होते. मुफ्ती मंजूर झिया म्हणाले, वक्फ ही एक धार्मिक, सामाजिक आणि ऐतिहासिक रचना आहे. वक्फची संकल्पना इस्लाममध्ये अल्लाहसाठी स्थायी पुण्यकर्म करण्यासाठी निर्माण झाली आहे. परंतु आज, सरकार वक्फ संस्थांवर नियंत्रण आणण्याच्या प्रयत्नात आहे. वक्फ सुधारणा कायदा २०२५ हे त्याचे उदाहरण आहे. अ‍ॅड. युसुफ खान म्हणाले, वक्फ बोर्ड हे स्वतंत्र संस्थान असले पाहिजे. वक्फ कायदा १९९५ मध्ये आले, पण अंमलबजावणी आजही अपुरी आहे. शाहीना सय्यद म्हणाल्या,  वक्फ संस्थांत महिला फारशा प्रतिनिधीत्वात नाहीत. ही एक शोकांतिका आहे. डॉ. फहिम अन्सारी म्हणाले, इतिहासात वक्फच्या योगदाना...

सामाजिक न्याय दो अभियानाचा दुसरा टप्पा पूर्ण

Image
            सामाजिक न्याय दो अभियानाचा दुसरा टप्पा पूर्ण मुंबई / रमेश औताडे  समाजातील तळागाळातील लोकांचे प्रश्न, समस्या सरकारदरबारी मांडण्यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करत पहिल्या टप्प्यानंतर आता मराठवाड्यातील दुसरा टप्पा पूर्ण झाला असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुरू झालेला या राज्यव्यापी अभियानास उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. रमाबाई घरकुल योजना जलदगतीने राबवा, दादासाहेब गायकवाड स्वाभिमान स्वावलंबी योजने अंतर्गत शेत जमिनी देण्यात याव्यात, बेरोजगार युवकांना थेट आर्थिक महामंडळाच्या वतीने कर्ज वाटप करावे, अनुसूचित जाती जमातीच्या अधिकाऱ्यांवर बिनबुडाचे आरोप करणारे निलंबित समाजकल्याण अधिकारी बाबासाहेब देशमुख आणि त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना अटक करावी या व इतर मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी मराठवाड्यातील परभणी, अहमदनगर, नांदेड, उस्मानाबाद, नाशिक जिल...

कल्याण ज्वेलर्स चे अभिनेत्री तब्बू यांच्या हस्ते उद्घाटन

Image
                   कल्याण ज्वेलर्स चे अभिनेत्री तब्बू यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई / रमेश औताडे  भारतातील अग्रगण्य दागिन्यांचा ब्रँड कल्याण ज्वेलर्स यांनी आपल्या नव्या दालनाचे भव्य उद्घाटन रविवारी सिवूड्स ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये केले. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तब्बू यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी तब्बू यांनी  सांगितले की, कल्याण ज्वेलर्स हा ब्रँड केवळ दागिन्यांपुरता मर्यादित नाही, तर तो भारतीय स्त्रीच्या भावविश्वाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. या दालनाचा भाग होणं माझ्यासाठी विशेष आहे. उद्घाटनाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी खास सवलतींची घोषणाही करण्यात आली. नवीन दालनात पारंपरिक तसेच आधुनिक डिझाइन्समध्ये सोनं, चांदी आणि हिऱ्यांचे विविध प्रकारचे दागिने उपलब्ध आहेत. या ठिकाणी आकर्षक अंगठ्या, हार, मंगळसूत्रे, बांगड्या व नथींची विशेष शृंखला उपलब्ध आहे. कल्याण ज्वेलर्सचे वरिष्ठ अधिकारी श्री. टी. एस. किरण यांनी सांगितले की, नवी मुंबईमधील वाढत्या ग्राहकसंख्येला लक्षात घेऊन हे नवीन शोरूम उघड...

कल्याण ज्वेलर्स चे अभिनेत्री तब्बू यांच्या हस्ते उद्घाटन

Image
        कल्याण ज्वेलर्स चे अभिनेत्री तब्बू यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई / रमेश औताडे  भारतातील अग्रगण्य दागिन्यांचा ब्रँड कल्याण ज्वेलर्स यांनी आपल्या नव्या दालनाचे भव्य उद्घाटन रविवारी सिवूड्स ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये केले. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तब्बू यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी तब्बू यांनी  सांगितले की, कल्याण ज्वेलर्स हा ब्रँड केवळ दागिन्यांपुरता मर्यादित नाही, तर तो भारतीय स्त्रीच्या भावविश्वाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. या दालनाचा भाग होणं माझ्यासाठी विशेष आहे. उद्घाटनाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी खास सवलतींची घोषणाही करण्यात आली. नवीन दालनात पारंपरिक तसेच आधुनिक डिझाइन्समध्ये सोनं, चांदी आणि हिऱ्यांचे विविध प्रकारचे दागिने उपलब्ध आहेत. या ठिकाणी आकर्षक अंगठ्या, हार, मंगळसूत्रे, बांगड्या व नथींची विशेष शृंखला उपलब्ध आहे. कल्याण ज्वेलर्सचे वरिष्ठ अधिकारी श्री. टी. एस. किरण यांनी सांगितले की, नवी मुंबईमधील वाढत्या ग्राहकसंख्येला लक्षात घेऊन हे नवीन शोरूम उघडण्यात आले असून, दर्जा, पारदर्शक व्यवहार आ...

देशातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी

Image
              देशातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी         ३०० रुपयात करा एक एकर नांगरणी ९०० रुपये नफा मुंबई / रमेश औताडे  पर्यावरण पूरक व पैशाची बचत करणारा इ- ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणेल असे प्रतिपादन परिवहन मंत्री  प्रताप सरनाईक यांनी केले. १ एकर नांगरणी साठी केवळ ३०० रुपये खर्च आहे. डिझेल ट्रॅक्टर ला हाच खर्च १२०० ते १५०० रुपयांपर्यंत जातो. त्यामुळे दुरुस्तीने देखभाल खर्चातील बचती  बरोबरच दैनंदिन वापरामध्ये देखील इ-ट्रॅक्टर शेतकऱ्यांची पैशाची मोठी बचत करू शकतो. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात देशातील पहिल्या इ-ट्रॅक्टरची नोंदणी करताना ते बोलत होते. यावेळी ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिंणी पाटील,  इ-ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या ॲटोनेक्स कंपनी चे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धोंडे व सेल्स मॅनेजर अभिषेक शिंदे हे उपस्थित होते.  मंत्री सरनाईक म्हणाले की, सन.२०३० पर्यंत रस्त्यावरील एकूण वाहनांच्या संख्येमध्ये २० ते ३० टक्के वाहने ही विजेवर चालणारी असावीत, असे शासनाचे धोरण आ...

कॅन्सर रुग्ण व नातेवाईकांसाठी आता कॅनविन चे व्यासपीठ

Image
      कॅन्सर रुग्ण व नातेवाईकांसाठी आता कॅनविन चे व्यासपीठ  मुंबई / रमेश औताडे  एखाद्याला कॅन्सर झाला आहे हे वाक्य ऐकूनच मन सुन्न होते. या कॅन्सर सोबत झुंज देण्यासाठी व कॅन्सर पेशंटची व त्यांच्या नातेवाईकांसाठी अपोलो हॉस्पिटल ने कॅनविन चे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अशी माहिती हॉस्पिटल चे अध्यक्ष दिनेश माधवन यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी दिली. कॅनविन म्हणजे , कॅन्सर झाल्यानंतर रुग्ण व त्यांचे कुटुंबीय, कॅन्सर आजाराने वाचलेले रुग्ण, डॉक्टर आणि स्वयंसेवक, समुपदेशक अशा सगळ्यांना एकत्र आणून आधार देण्याचे व्यासपीठ असून कॅन्सर आजारात आता मी एकटा नाही यासाठी कॅनविन चे व्यासपीठ माझ्यासोबत आहे असा आत्मविश्वास त्या पेशंटला व त्यांच्या नातेवाईकाला मिळतो असे डॉ ज्योती वाजपेयी व डॉ नीता नायर यांनी सांगितले. राष्ट्रीय कॅन्सर अभियान सुरूच आहे. त्याच पार्श्वभूमीवर आम्ही हि मोहीम सुरू केली आहे. यावेळी कॅन्सर बरोबर झुंज देऊन त्याला घायाळ केले व विजय मिळवला. यासाठी या व्यासपीठाची खूप मदत झाल्याने जगण्याची शक्ती मिळाली. असे यावेळी डॉ अनिल डिक्रुझ व डॉ विप...

जगाने कितीही प्रगती केली तरी योगाला पर्याय नाही --- डॉ. आर. गोविंद रेड्डी यांचे मत

Image
         जगाने कितीही प्रगती केली तरी योगाला पर्याय नाही --                         डॉ. आर. गोविंद रेड्डी यांचे मत मुंबई / रमेश औताडे  योगाचे महत्व ऋषी मुनींनी सांगितले आहे. आज जग कितीही प्रगती करत असेल. मात्र योगाला पर्याय नाही. असे मत सीएआरआय मुंबईचे सहाय्यक संचालक डॉ. आर. गोविंद रेड्डी यांनी व्यक्त केले. योगाच्या आधारे आरोग्य सुधारण्यासाठी गुरुवारी १९ जून २०१५ रोजी नवी मुंबईतील जेएनपीए कॅम्पसमध्ये जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि आरआरएपी-केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था, वरळी, मुंबई, सीसीआरएएस, आयुष मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने योगा पार्कचे उद्घाटन करण्यात आले. या योग पार्कचे उद्घाटन नवी मुंबईतील जेएनपीएच्या अध्यक्ष श्री. उन्मेष वाघ (आयआरएस) यांच्या हस्ते झाले. या वेळी जेएनपीएच्या सचिव आणि प्रशासन प्रमुख श्रीमती मनीषा जाधव आणि त्यांच्या अधिकाऱ्यांसह सीएआरआय मुंबईचे सहाय्यक संचालक डॉ. आर. गोविंद रेड्डी उपस्थित होते.

योग दिनानिमित्त “योग संगम” कार्यक्रमाचे भव्य आयोजन

Image
       योग दिनानिमित्त “योग संगम” कार्यक्रमाचे भव्य आयोजन                  दहा हजार नागरिकांचा सहभाग अपेक्षित मुंबई / रमेश औताडे  आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ निमित्त आयुष मंत्रालयाच्या वतीने महाराष्ट्रासाठी नोडल समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या आरआरएपी – केंद्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान, वरळी, मुंबई यांच्या तर्फे “योग संगम” या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन २१ जून २०२५ रोजी सकाळी ५:३० वाजता, जेएनपीए टाऊनशिप, सीआयएसएफ कॅम्पस, उरण, नवी मुंबई येथे होणार आहे, अशी माहिती पोदार केंद्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थेचे प्रभारी सहायक संचालक डॉ. आर .गोविंद रेड्डी यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA) तसेच भारत सरकारच्या बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या सहकार्याने याचे आयोजन करण्यात येत आहे. या भव्य कार्यक्रमात सुमारे दहा हजार योगप्रेमी सहभागी होण्याची शक्यता असून, आयुष मंत्रालयाचे महासंचालक प्रो. रवीनारायण आचार्य यांची उपस्थिती राहणार आहेत. योग दिनानिमित्त आयो...

४ वर्षांची आरंभी UPSC भवनात!

Image
               ४ वर्षांची आरंभी UPSC भवनात!            देशसेवेच्या स्वप्नासाठी सुरुवात लहानपणापासूनच मुंबई / रमेश औताडे  अवघ्या ४ वर्षांची असलेली कुमारी आरंभी अमित साळुंखे हिने दिल्लीतील संघ लोक सेवा आयोग (UPSC) मुख्यालयासमोर उभी राहून देशसेवेचे स्वप्न जपत खास फोटो काढला आहे. वडील अमित दिपक साळुंखे (संपर्क: 9664199997) यांच्यासोबत दिल्लीला गेलेल्या आरंभीने या भेटीच्या वेळी UPSC समोरील विजयी 'V' चिन्ह दाखवत तिची इच्छाशक्ती दर्शवली. आरंभी SR. KG Holy Cross High School, कुर्ला – मुंबई येथे शिक्षण घेत असून तिच्या वयात UPSC ची ओळख करून देण्याचे श्रेय तिच्या पालकांना जाते. वडील अमित साळुंखे म्हणाले, "तिला सुरुवातीपासूनच भारताच्या प्रमुख घटकांविषयी माहिती असावी, म्हणून आम्ही तिला विविध स्थळांना घेऊन जात आहोत. UPSC मुख्यालयाचा हा दौरा तिच्या मनात देशसेवेची प्रेरणा निर्माण करेल, ही आमची भावना आहे." लहान वयात अशा प्रकारे राष्ट्रीय संस्थांच्या भेटी आणि मार्गदर्शनामुळे आरंभीसारख्या बालवयीन...

१०२ दिवसांनी पत्रकार तुषार खरात यांची जामिनावर मुक्तता

Image
    १०२ दिवसांनी पत्रकार तुषार खरात यांची जामिनावर मुक्तता मुंबई / रमेश औताडे  एका मागोमाग एक अशा एकूण चार केसम्‌ध्ये कारागृहात बंदी असलेले ‘लय भारी न्यूज'चे संपादक तुषार खरात यांची मंगळवारी कारागृहातून मुक्तता झाली आहे.  ते तब्बल १०२ दिवस कारावासात होते. न्यायालयाने त्यांचा जामिन मंजूर करताना मंत्री ज‌यकुमार गोरे तसेच पोलिसांवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. अॅट्रॉसिटी, खंडणी, विनयभंग अशा केसेस टाकून तुषार खरात यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. पोलिसांच्या या अटक प्रक्रियेचा मुंबई मराठी पत्रकार संघाने त्यावेळी तीव्र शब्दांत निषेध केला होता.   जामीन दिल्याबद्दल पत्रकार तुषार खरात यांनी न्यायालयाचे आभार मानले. न्यायालय सत्याचीच बाजू उचलून धरते, हे माझ्या प्रकरणातून स्पष्ट झाल्याची भावना तुषार खरात यांनी व्यक्त केली.   माझ्या या संघर्षात एका रुपयाच्या मानधनाची अपेक्षा न ठेवता तब्बल ३६ वकिलांनी माझ्या वकीलपत्रावर सह्या केल्या.  तसेच राज्यभरातील विविध पत्रकार संघटना आणि सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी यांनी या संघर्षात मला व माझ्या कुटुंबाला भक्कम आधार द...

कायम व कंत्राटी कामगारांचा आझाद मैदानात एल्गार मोर्चा

Image
      कायम व कंत्राटी कामगारांचा आझाद मैदानात एल्गार मोर्चा            मुंबई महानगरपालिका कर्मचारी मागण्यासाठी आक्रमक मुंबई / रमेश औताडे  मुंबई महानगरपालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात महानगरपालिका कामगार संघटना संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी आझाद मैदानात एल्गार मोर्चा  काढण्यात आला. घन कचरा व्यवस्थापन खात्यांतर्गत कचऱ्याचे संकलन, परिवहन आणि विल्हेवाट या अनुषंगाने  १४ मे २०२५ रोजी काढलेले टेंडर रद्द करण्यात यावे. पालिकेने उपनगरीय रुग्णालये सार्वजनिक खाजगी तत्वावर देण्याचा पालिकेने प्रशासनाने घेतलेला निर्णय कायस्वरूपी रद्द करावा. सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्यात यावे.  सर्व संवर्गातील रिक्त पदे भरती प्रक्रियेने तसेच पदोन्नतीची पदे तातडीने भरण्यात यावीत. मुंबई महानगरपालिकेमध्ये होणाऱ्या भरतीमध्ये कामगारांच्या मुलांना प्राधान्य देण्यात यावे. २३ फेब्रुवारी २०२४ चा लाड पागे समितीच्या शिफारशी विषयक महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात यावी. रा...

सुवर्ण महोत्सवी मढ-मुंबई ते पंढरपूर पायी वारी निघाली

Image
       सुवर्ण महोत्सवी मढ-मुंबई ते पंढरपूर पायी वारी निघाली मुंबई / रमेश औताडे  *सालाबाद प्रमाणे मढ कोळीवाड्यातील किल्लेश्वर भजन मंडळ यांची मढ-मुंबई ते पंढरपूर पायी दिंडी यात्रा आज श्री किल्लेश्वर मंदीर येथून सुरु झाली. या वेळी गांव परंपरेनुसार श्री हरबादेवी (ग्रामदेवी) मंदीर ट्रस्ट वतिने शुभेच्छा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी वारी संस्थापक भजन मंडळ सदस्यांनचा सत्कार करण्यात आला. तर मनोत्तर वारक-यांच्या नातेवाईकांचा सत्कार केला. यावेळी दिवंगत संस्थापक नारायन बावकर बुवा व संस्थापक सदस्य देवनाथ कोळंबी बुवा यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली दिली.*  *महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती सरचिटणीस किरण कोळी यांनी वरिष्ठ वारका-यांच्या मार्गदर्शनाखाली पायी ग्रुप मध्ये चालत चला व पांडुरंगाला पुढच्या हंगामात कोळी बांधवांना चांगली मासळी मिळण्यासाठी तथा विघ्दवंस्क LED पर्ससीन नौकांवर शासन कारवाई करण्यासाठी सरकारी अधिका-यांना/बाबूंना सदबुध्दी   देण्यासाठी साकडे घाला. विभागातील जनता आपल्या बरोबर आहेत. अशा शुभेच्छा दिल्या. तर ...

प्राइमा आर्टच्या शुद्ध सोन्याच्या कलाकृती संग्रहाचे अनावरण

Image
मुंबईमध्ये प्राइमा आर्टच्या  २४ कॅरेट शुद्ध सोन्याच्या कलाकृती संग्रहाचे अनावरण  मुंबई / रमेश औताडे  थायलंडमधील प्राणदा ग्रुपचा भाग असलेल्या प्राइमा आर्टने मुंबईतील विविध दागिन्यांच्या शोरूममध्ये २४ कॅरेट शुद्ध सोन्याच्या शीटमध्ये बनविलेल्या कलाकृतींच्या संग्रहाची मालिका ग्राहकांसाठी सादर केली आहे. आकर्षक डिझाईन्ससह प्राइमा आर्टने भक्ती व अध्यात्माचा सुरेख संगम साधत विविध देवतांच्या व अन्य कलाकृती २४ कॅरेट शुद्ध सोन्यामध्ये साकारल्या आहेत.   मुंबईमध्ये प्राइमा आर्ट संग्रह 'रिच्युअल' मालिकेत उपलब्ध आहेत, जी घरे, पूजा कक्ष आणि वैयक्तिक वेदींसाठी उपयुक्त असलेली मालिका आहे. शुद्ध सोन्याच्या शीट्सवर चितारलेली पवित्र चिन्हे, देवतांच्या मूर्ती या स्वरूपात सदर कलाकृती उपलब्ध आहेत. 'एम सिरीज' नावाचा कलाकृतींचा आणखी एक संच, उत्सव आणि औपचारिक भेटवस्तूंसाठी आदर्श असा प्रीमियम व विविध स्तरांत साकारलेला संग्रह आहे. 'गोल्डन मोमेंट्स' या मालिकेअंतर्गत कस्टमाइज्ड केलेल्या भक्तीपूर्ण व वैयक्तिक संग्रहात ठेवता येईल अशा कलाकृतींची एक खास ऑफर सादर...

पावसाळा आला ; शिवसेनेच्या छत्र्याही आल्या

Image
              पावसाळा आला ; शिवसेनेच्या छत्र्याही आल्या                     बोरीवली पूर्व येथे समारंभपूर्वक वितरण    मुंबई / रमेश औताडे  शाळा सुरू झाल्या, पावसाळा आला की विविध संस्था, राजकीय पक्ष वह्या पुस्तके आणि छत्र्यांचे वाटपाचे कार्यक्रम जोमाने हाती घेतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचे वाढदिवस योगायोगाने पावसाळ्यात येतात.  मग काय. दे धम्माल ! १३ जून आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आणि १९ जून शिवसेनेचा वर्धापन दिन. या दिवसांचे औचित्य साधून  शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मागाठाणे शाखा क्र.१२ तर्फे ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप व ज्येष्ठ नागरिक कार्डचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना उपनेते, माजी आमदार विनोद घोसाळकर, उपनेते विश्वनाथ नेरुरकर, माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, महिला विभागसंघटक सौ. शुभदा शिंदे  विधानसभा प्रमुख अशोक म्हामूणकर, विधानसभाप्रमुख...

देहदान हे सर्वश्रेष्ठ दान :

Image
                        देहदान हे सर्वश्रेष्ठ दान :  सामाजिक कार्यकर्ते भाई देऊलकरांसह अनेकांनी केले देहदानाचे संकल्प मुंबई / रमेश औताडे  एखादा विचारवंत माणूसच देहदानासारखा संकल्प करु शकतो. 'देहदान' हे मोठे पुण्यकर्म असून आपले संपूर्ण जीवन समाजकार्यासाठी व्यतीत केलेल्या भाई देऊलकरांसारख्या मान्यवराने वयाच्या 76 व्या वर्षी देहदानाचा संकल्प करून समाजासमोर आदर्श ठेवला आहे, असं प्रतिपादन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजय परब यांनी केले. शिवसेनेचे माजी सहसंपर्कप्रमुख व सामाजिक कार्यकर्ते भाई देऊलकर यांनी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून देहदानाचा संकल्प जाहीर करून आपला जन्मदिवस अभिनव पद्धतीने साजरा केला. त्यावेळी संजय परब बोलत होते. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, तालुका अध्यक्ष सुनील राऊळ, ज्येष्ठ पत्रकार उत्तम वाडकर, अभिमन्यू लोंढे, दीपक गावकर, दीनानाथ बांदेकर, सुधीर पराडकर, बाबुराव कविटकर, प्रल्हाद ताव...

पावसातही आंदोलनाचा पवित्र संकल्प अबाधित!

Image
         पावसातही आंदोलनाचा पवित्र संकल्प अबाधित! आझाद मैदान, मुंबई / रमेश औताडे  मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असतानाही, आझाद मैदानात काही सामाजिक कार्यकर्ते आपल्या आंदोलनाचा निर्धार अखंड ठेवून उभे आहेत. ओलेचिंब कपडे, चिखलाने भरलेले मैदान, हातात छत्र्या आणि तरीही चेहऱ्यावर निर्णयाचा ठामपणा! "आमच्या मागण्या पावसामुळे थांबणार नाहीत. आम्ही या सरकारच्या कानावर आवाज पोहोचवणारच," असे एका आंदोलकांनी सांगितले. त्यांच्या चेहऱ्यावरचा दृढ निश्चय पावसाला न जुमानणारा आहे. पावसामुळे आंदोलनाची गती थोडी मंदावली असली, तरी भावना अधिक तीव्र झाल्या आहेत. कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, "आमचं आंदोलन केवळ राजकीय नाही, ते अस्तित्वासाठी आहे!" या परिस्थितीत सुरक्षा व्यवस्थाही कमी पडलेली दिसते. काही ठिकाणी कार्यकर्ते झाडांच्या आडोशाला उभे राहून घोषणाबाजी करत आहेत. आंदोलन पावसातही सुरू असल्याने लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. या पावसात ओलेचिंब झालेले आंदोलनकर्ते शासनाच्या मनात पाझर पाडतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नव्या पिढीच्या शैक्षणिक पर्वाचा उदय....

Image
             नव्या पिढीच्या शैक्षणिक पर्वाचा उदय.... मुंबई / रमेश औताडे  शाळेत पहिले पाऊल टाकतानाची चिमुकल्यांनी जिज्ञासा,आणि हे क्षण डोळ्यात साठवण्याची पालकांची उत्सुकता ! सारेकाही अवीट अविस्मरणीय ! सगळाच नावीन्यपूर्ण अनोखा थाट!आज शिवाजी विद्यालयाच्या नित्यानंद बालमंदिर च्या  चिमुकल्यांनी आणि पालकांनी एकच वेळी अनुभवला.  पावसाच्या रिमझिम सरींच्या तालावर निसर्गानेही या बालकांचा प्रवेशोत्सवात बहार आणली. स्वराज्य फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष युवा उद्योजक उदय पवार आणि त्यांचे सहकारी यांनी चिमुकल्यांचे स्वागत करताना छोटीशी भेटवस्तू देऊन मनापासून त्यांना आणि शिक्षकवर्गाला भरभरून शुभेच्छा दिल्या.