नव्या पिढीच्या शैक्षणिक पर्वाचा उदय....
नव्या पिढीच्या शैक्षणिक पर्वाचा उदय....
मुंबई / रमेश औताडे
शाळेत पहिले पाऊल टाकतानाची चिमुकल्यांनी जिज्ञासा,आणि हे क्षण डोळ्यात साठवण्याची पालकांची उत्सुकता ! सारेकाही अवीट अविस्मरणीय !
सगळाच नावीन्यपूर्ण अनोखा थाट!आज शिवाजी विद्यालयाच्या नित्यानंद बालमंदिर च्या चिमुकल्यांनी आणि पालकांनी एकच वेळी अनुभवला. पावसाच्या रिमझिम सरींच्या तालावर निसर्गानेही या बालकांचा प्रवेशोत्सवात बहार आणली.
स्वराज्य फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष युवा उद्योजक उदय पवार आणि त्यांचे सहकारी यांनी चिमुकल्यांचे स्वागत करताना छोटीशी भेटवस्तू देऊन मनापासून त्यांना आणि शिक्षकवर्गाला भरभरून शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment