माजी पोलीस उपनिरीक्षक बबन जाधव यांचा आंदोलनाचा इशारा
पोलीस महासंचालकांना पाठवले पत्
मुंबई / रमेश औताडे
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त जे.एफ. रिबेरो, एम.एन. सिंग आणि अरुणी रॉय यांच्या कार्यकाळात कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याचा खळबळजनक आरोप निवृत्त पोलीस उपनिरीक्षक बबन गणपत जाधव यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना सविस्तर पत्र लिहून आपल्या मागण्या मांडल्या आहेत.
मुख्य आरोप आणि मागण्या:
* अनमानास्पद वागणूक: तत्कालीन आयुक्तांनी पोलीस संघटना बनवण्यास विरोध केला आणि कर्मचाऱ्यांचे हक्क हिरावून घेतल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे.
* भ्रष्टाचाराचे आरोप: काही माजी आयुक्तांनी बदली प्रक्रियेत आणि प्रशासकीय कामात भ्रष्टाचार केल्याचा दावा जाधव यांनी पुराव्यासह केला आहे.
* सुरक्षेचा प्रश्न: कर्तव्यावर असताना पोलीस कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले आणि त्यांच्या वाढत्या आत्महत्या यावर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
* न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी: उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी त्यांच्या हक्काचे व्यासपीठ (संघटना) मिळावे, जेणेकरून त्यांचे मनोधैर्य वाढेल, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आंदोलनाचा इशारा:
बबन जाधव यांनी पत्राद्वारे इशारा दिला आहे की, जर त्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही, तर गुढीपाडवा ते १५ ऑगस्ट २०२६ या काळात ते तीव्र आंदोलन करतील. या आंदोलनात राज्यातील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय देखील सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Comments
Post a Comment