*मुंबई उच्च न्यायालयातील उदयोन्मुख वकील मितांशु स्नेहा राजेश पुरंदरे यांचे त्यांच्या फोर्ट येथील कार्यालयात जाऊन अभीष्टचिंतन करतांना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी, सोबत ज्येष्ठ पत्रकार राजेश पुरंदरे.*
वीज (दुरुस्ती) मसुद्या वर देशभरातील संघटनांचा तीव्र आक्षेप कॉम्रेड कृष्णा भोयर (मुंबई) विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा! मुंबई / मंत्रालय प्रतिनिधी... रमेश औताडे केंद्र सरकारने आणलेल्या 'वीज (दुरुस्ती) मसुदा विधेयक २०२५' च्या माध्यमातून वीज वितरण क्षेत्राचे खासगीकरण राज्य सरकारांवर लादण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप नॅशनल को-ऑर्डिनेशन कमिटी ऑफ एम्प्लॉईज अँड इंजिनियर्स (NCCOEEE) या देशातील २७ लाख वीज कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेने आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केला. हे विधेयक ग्राहक, शेतकरी आणि वीज कर्मचाऱ्यांच्या हिताविरोधी असून, केंद्र सरकारने हा मसुदा तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसे न झाल्यास देशव्यापी संप पुकारण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. ४ नोव्हेंबर २०२५: पनवेल येथे झालेल्या राष्ट्रीय बैठकीनंतर NCCOEEE ने मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेऊन आपली ...
राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर मुंबई / रमेश औताडे राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये, मनोरुग्णालये व कामगार रुग्णालयांतील चतुर्थश्रेणी कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्या घेऊन आझाद मैदानात एक दिवसाचे आंदोलन करत आहेत. सरकारने लवकरात लवकर गंभीर होत निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन बेमुदत केले जाईल. असा इशारा आमदार सचिन अहिर यांनी आझाद मैदानात दिला. यावेळी आमदार मनोज जामसुतकर यांनीही या कामगाराच्या मागण्यांवर सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या वतीने राज्यातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करुनही शासन दखल घेत नसल्याने बुधवारी आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले आहे असे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सुरेश आहेरकर,मार्तंड राक्षे, बाबाराम कदम यांनी सांगितले. राज्यातील सर्व रुग्णालयांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी ५ ते ६ मे रोजी राज्यभर काळ्या फिती लावून निदर्शने केली. तरीद...
मेघमल्हार संकुल अन् एकोणीस सेवक ..... नवी मुंबई / रमेश औताडे नवी मुंबईतील चर्चेत असलेल्या मेघमल्हार सिडको वसाहत सोसायटी निवडणुकीत लोकनेते वनमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखालील तुषार नाईक पॅनलने १९–० असा दणदणीत विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली. या निकालामुळे नवी मुंबईत नाईक गटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी महापालिका निवडणुकीसाठी एक मजबूत पायाभूत वातावरण तयार झाले आहे. २०१८ साली सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतून तयार झालेल्या मेघमल्हार सोसायटीने सुरुवातीपासूनच आपल्या पारदर्शक आणि जनतेसाठीच्या कार्यपद्धतीने वेगळा ठसा उमटवला होता. सोसायटी नोंदणीसाठी दलालांनी लाखो रुपये मागितले असतानाही मुख्य प्रवर्तक रमेश औताडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अवघ्या १९ रुपयांच्या सरकारी शुल्कात केवळ २३ दिवसांत नोंदणी पूर्ण करत नवी मुंबईत एक आदर्श निर्माण करत एक इतिहास नोंदवला. कमी वेळेत व सर्वात कमी पैशात नोंदणी झालेली मेघमल्हार सोसायटी एकमेव सोसायटी ठरली असल्याची पावती सिडको अधिकाऱ्यांनी व निबंधक कार्यालयाने दिली. याच पार्श्वभूमीवर मत...
Comments
Post a Comment