....तर आमचे राजवाड़े परत दया :- अजय सिंह सेंगर
....तर आमचे राजवाड़े परत दया :- अजय सिंह सेंगर
मुंबई दि.22
SC/ST Act , Ugc Act, आरक्षण सारखे कायदे देशात जातीवाद व विषमता निर्माण करत आहे जर देशातील ही विषमता दूर झाली नाही तर आमचे राजवाड़े परत दया असे "महाराष्ट्र करणी सेना" प्रमुख अजय सिंह सेंगर यानी भाषणात मत व्यक्त केले,
पुढे ते म्हणाले की देशात सामिल होताना जे 400/450 राजवाड्याच्या राजासोबत भारत सरकारने केलेले एग्रीमेंट पाळल्या गेले नाही. एससी एसटी Act, यूजीसी Act, आरक्षण सारख्या कायद्याने क्षत्रियांची मुस्कट दाबी झालेली आहे, या कायद्यामुळे देशात विषमता निर्माण झालेली आहे या संविधानाने समानतेचे अधिकार दिलेले असताना समानता या मूलभूत अधिकाराचे अर्थात संविधानातिल आर्टिकल 14,15 चे हनन करण्यात आले. ज्या क्षत्रियांनी या देशाकरता या धर्माकरिता प्रार्णाचे बलिदान इतिहासामध्ये दिलेले आहे, हिंदूच्या सर्वश्रेष्ठ गीता या धर्मग्रंथेमध्ये क्षत्रियांनी राज्यकारभार करावे असे नमूद केलेले असताना क्षत्रियांना बाजूला सत्तेतून बाहेर केलेले आहे.
राजकारणाच व्यापारीकरण झालेले आहे. व्यापारी सत्तेत जाऊन बसल्यामुळे पैसा हाच त्यांचा मूळ धर्म झालेला आहे राजपूत करनी सेने च्या मुंबई पत्रकार संघात आयोजीत चितन शिबिर मध्ये प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महिपाल सिंह मकराना तर अतिथी म्हणून प्रल्हाद सिंह खींची, बलदेव सिंह, अजय सिंह सेंगर, अमिता चौहान, ईश्वर सिंह, गुलाब सिंह ठाकुर, दिलीप हज़री होते, आयोजन राजपूत करणे सेना प्रदेशाध्यक्ष श्याम सिंह ठाकुर यांनी केले होते.
सदर कार्यक्रम मुंबई पत्रकार संघाच्या सभागृह संपन्न झाला
Comments
Post a Comment