Posts

Showing posts from August, 2025

मनोज जरांगे पाटील यांचा इशारा – दोन दिवसांत आरक्षणावर निर्णय नाही तर पाणी पिणार नाही

Image
मनोज जरांगे पाटील यांचा इशारा –  दोन दिवसांत आरक्षणावर निर्णय नाही तर पाणी पिणार नाही मुंबई  / रमेश औताडे  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला सरकारने जर दोन दिवसात मनावर घेत आरक्षण दिले नाही तर पाणी पिण्याचे सोडणार असे सांगत सरकारला दोन दिवसाची मुदत दिली. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे की, दोन दिवसांत सरकारने मराठा समाजाला आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा. आडमुठेपणाची भूमिका सरकारने घेऊ नये. हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव आझाद मैदानावर ठिय्या मांडून आहेत. आज सकाळपासूनच आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर दिसून आला. पिण्याचे पाणी, निवारा आणि इतर मूलभूत सुविधा न मिळाल्याने संतापलेले कार्यकर्ते सरकारवर रोष व्यक्त करत होते. याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी जाहीरपणे सांगितले की – “आम्ही शांतीपूर्ण आंदोलन करत आहोत. पण सरकार जर कानाडोळा करत असेल, तर आम्हालाही कठोर भूमिका घ्यावी लागेल. दोन दिवसांत आरक्षणाचा निर्णय झाला नाही, त्यानंतर काय होईल, याची जबाबदारी सरकारवर असेल.” जरांगे यांच्या या वक्...

दि. म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक निवडणुकीतील अनियमिततेचा आरोप; फेरमतमोजणीची मागणी

Image
दि. म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक निवडणुकीतील अनियमिततेचा आरोप; फेरमतमोजणीची मागणी मुंबई / रमेश औताडे दि. म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक संचालक निवडणूक (२०२५-३० ) मतमोजणीत अनियमितता झाल्याचा आरोप जय सहकार पॅनलचे विष्णू घुमरे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. मतमोजणीदरम्यान टेबल क्रमांक ५८ वर हेराफेरी झाल्याचा दावा करण्यात आला असून, त्याचे पुरावे निवडणूक अधिकारी, राज्यपाल, मुख्यमंत्री व सहकार मंत्र्यांकडे सादर केल्याचे घुमरे यांनी सांगितले. उमेदवार दिपक मदने आणि कविता विशे यांनी पारदर्शकतेसाठी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली फेरमतमोजणीची मागणी केली आहे. “अनियमिततेमुळे लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, त्यामुळे सर्व पॅनेल एकत्र येऊन पारदर्शकतेची लढाई लढणार आहोत,” असे उमेदवारांनी स्पष्ट केले.

आपल्या घराच्या बाप्पाची आरास...सर्वांना आमंत्रण. सत्यनारायण पूजा पण आहे.

Image
आपल्या घराच्या बाप्पाची आरास...सर्वांना आमंत्रण. सत्यनारायण पूजा पण आहे.

महाराष्ट्रील सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय ..... कामगार मंत्री

Image
महाराष्ट्रील सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय ..... कामगार मंत्री मुंबई / रमेश औताडे  राज्यातील सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर व कल्याणकारी योजनेवर योग्य तो निर्णय घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी मंत्रालयात एका बैठकीदरम्यान दिले. महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले व आमदार किसान कथोरे यांच्या पुढाकाराने या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. पोलिसासारखे आर्टिकल ब्राऊन कलर शूज ब्राऊन कलर बेल्ट आणि स्टार कॅप हे पोलिसांसारखे नसावं असे चर्चा झाली, २७ मार्च २०२५ रोजीचा जो शासन निर्णय आहे तो नव्याने बदल करून लवकरच सादर करणे, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरी नियमन व कल्याण अधिनियमन १९८१ व योजना २००२ याची प्रभावी अंमलबजावणी संदर्भात निर्णय घेणे, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरी नेमणूक कल्याण योजना सुधारित २००२ मधील खंड १४ व १५ यामध्ये सुधारणा रद्द करून पूर्वीची तरतूद लागू करणे, राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कर्मचारी व अधिकारी यांची तातडीने नियुक्ती...

रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी अनोखे आंदोलन

Image
रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी अनोखे आंदोलन मुंबई / रमेश औताडे  मुंबईतील सर्व उड्डाणपूल व प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करावी. अपघात टाळण्यासाठी त्वरित दुरुस्तीची उपाययोजना करावी. खड्डे दुरुस्तीसाठी आतापर्यंत किती निधी खर्च झाला याची संपूर्ण आकडेवारी जाहीर करावी. भविष्यात उड्डाणपुलांची गुणवत्ता व देखभाल सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. या मागण्या करत बांद्रा येथील एम.एस.आर.डी.सी. कार्यालयात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ॲम्बुलन्स घेऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. रराज्य सरकार व एम.एस.आर.डी.सी. प्रशासनाला मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले, उपाध्यक्ष ओमकार शिर्के, जिल्हाध्यक्ष कैलास कुशेर, सचिन लोंढे आणि इमरान तडवी, सेलवेन देवेंद्र, हनीफ पटेल, वैभव पांचाळ, कमलेश दांडेकर, लक्ष्मण बाजी, स्वप्निल पाटील यांनी इशारा दिला आहे की या आंदोलनाची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करू. 

इलेक्ट्रोपॅथीला राष्ट्रीय मान्यता देण्याचे आवाहन

Image
इलेक्ट्रोपॅथीला राष्ट्रीय मान्यता देण्याचे आवाहन मुंबई / रमेश औताडे  देशभरात परवडणाऱ्या आणि पर्यायी आरोग्य सेवेला चालना देण्यासाठी इलेक्ट्रोपॅथी उपचार पद्धतीला राष्ट्रीय पातळीवर कायदेशीर मान्यता द्यावी, असे आवाहन ई-बायो केअर्सचे संस्थापक डॉ. जसविंदर सिंग यांनी केंद्र सरकारला केले. मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, राजस्थान सरकारने १ मे २०२५ पासून राज्य इलेक्ट्रोपॅथी मंडळ स्थापन करून या उपचार पद्धतीला कायदेशीर मान्यता दिली आहे. उत्तर प्रदेश व हिमाचल प्रदेशातही अशा प्रयत्नांना गती मिळत आहे. ऑटिझम, स्पीच डिसऑर्डर आणि सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांवर हर्बल व फ्लॉवर थेरपीद्वारे उपचार करून डॉ. सिंग यांनी जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. अ‍ॅलोपॅथीत असाध्य ठरणाऱ्या आजारांसाठी इलेक्ट्रोपॅथी आशेचा किरण ठरू शकते. त्यामुळे केंद्रानेही राजस्थान मॉडेल स्वीकारून ही व्यवस्था देशभरात लागू करावी, असे त्यांनी सांगितले.

सरकारने सकारात्मक विचार करत सहकार्य करावे ........अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाची मागणी

Image
सरकारने सकारात्मक विचार करत सहकार्य करावे ........ अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाची मागणी मुंबई / रमेश औताडे  न्यायालयाच्या आदेशामुळे बंदी घातलेल्या पीओपी मूर्तींच्या विसर्जनास सरकारच्या प्रयत्नांमुळे यंदा परवानगी मिळाली. मात्र मोठ्या मूर्तींचा प्रश्न अजून कायम आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने अजून सकारात्मक विचार करत सहकार्य करावे अशी मागणी अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे कार्यवाह सुरेश सरनोबत यांनी  मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी काकोडकर समितीचा अहवाल सादर करून तो न्यायालयात मांडला. त्यानंतर पीओपी मूर्तीला परवानगी मिळाली. महाराष्ट्रात सुमारे ४५ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून, त्यापैकी १२ हजार मंडळे मुंबईत आहेत. या उत्सवात १० ते १५ हजार कोटी रुपयांची उलाढाल होते.असे प्रमुख कार्यवाह प्रवीण आवारी यांनी सांगितले. महापालिकेकडून ‘वन विंडो योजना’ अंतर्गत सर्व परवानग्या ऑनलाइन-ऑफलाइन उपलब्ध कराव्यात, विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची सुरक्षित व सक्षम व्यवस्था करावी, गिरगाव चौपाटी व पवईसह प्रमुख ठिक...

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे ......सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे यांची पावसाळा रेल्वे प्रवासी सुरक्षा व नियोजन

Image
मुंबई / रमेश औताडे  काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी (दि. 19 ऑगस्ट 2025) सकाळी 11.10 वाजल्यापासून सायन व कुर्ला स्थानकांदरम्यान पाणी साचले. त्यामुळे मध्य रेल्वेची लोकल व मेल गाड्यांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. स्थानकांवर वाढलेल्या गर्दीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लोहमार्ग पोलिसांनी आजूबाजूच्या शहर पोलिस ठाण्यांशी संपर्क साधून योग्य तो बंदोबस्त उभा केला. एमआरए, डोंगरी, पायधुनी, आग्रीपाडा, भायखळा शहर पोलिस ठाण्यांसह आझाद मैदान वाहतूक विभागाचे अधिकारी रेल्वे स्टेशन परिसरात तैनात करण्यात आले. त्याचप्रमाणे कुलाबा येथील बेस्ट प्रशासनाशी समन्वय साधून सीएसएमटीजवळून अतिरिक्त बसेसची सोय करण्यात आली. फलाटांवर गर्दी वाढल्याने वारंवार उद्घोषणा करून प्रवाशांना मार्गदर्शन करण्यात आले. पोलिस अधिकारी व कर्मचारी मेगाफोनद्वारे प्रवाशांना सूचना देत होते. दरम्यान, मुंबईचे लोहमार्ग पोलिस आयुक्त तसेच मध्य परिमंडळाचे पोलिस उपायुक्त यांनी सीएसएमटी स्थानकाची पाहणी करून बंदोबस्ताची माहिती घेतली व प्रवाशांशी संवाद साधला. सायंकाळी सुमारे 7.18 वाजता सीएसएमटीहून कल्...

रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडे लावून पालिकेचा निषेध

Image
रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडे लावून पालिकेचा निषेध मुंबई  / रमेश औताडे  शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. पावसाळा सुरू होताच रस्ते खचले, खड्ड्यांनी प्रवाशांना धोक्याचा सामना करावा लागत आहे. मात्र तरीही पालिकेचे अधिकारी व कंत्राटदार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. या बेजबाबदार कारभाराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार पक्ष)  जिल्हा अध्यक्ष सचिनभाऊ लोंढे यांनी अनोखा मार्ग अवलंबला आहे. लोंढे यांनी खड्ड्यांमध्ये झाडे लावण्याचा उपक्रम सुरू केला असून, “खड्डे बुजवले नाहीत, तर आम्ही थेट अधिकाऱ्यांच्या खुर्च्यांवर डांबर टाकून तिथे झाडे लावू” असा इशारा दिला आहे. लोंढे  म्हणाले, “प्रत्येक पावसाळ्यात रस्त्यांची दुर्दशा होते. नागरिकांच्या जीवाशी खेळ होत आहे, अपघात वाढत आहेत. पण कंत्राटदारांना दंड न करता उलट त्यांनाच पुन्हा कामे दिली जातात. त्यामुळे जनतेचा संताप वाढत आहे. आम्ही या विरोधात रस्त्यावर उतरून खड्ड्यांत झाडे लावण्यास सुरुवात केली आहे.” स्थानिक नागरिकांनी या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला असून, “झाडे लाव...

आयु विवेक पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण

Image
आयु विवेक पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण  मुंबई / रमेश औताडे  भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७८व्या वर्धापन दिनानिमित्त सांताक्रूज (पश्चिम) येथील भीमवाडा परिसरात बौद्धजन पंचायत समिती शाखा १५३ आणि ४३३ यांच्या संयुक्त विद्यमाने ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.   रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट मुंबई प्रदेश  महासाचीब विवेक पवार, सरस्वती शिक्षण संस्था संचालित माता रमाई आंबेडकर ज्युनिअर कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या बौद्धजन पंचायत समिती, मुंबई या संस्थेचे गेली ३५ वर्ष विश्वस्त अशा मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. लहान मुलांना खाऊ वाटप व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

सफाई कामगार महिलेला ध्वजारोहणाचा मान........कामगारांना मोफत प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप

Image
सफाई कामगार महिलेला ध्वजारोहणाचा मान कामगारांना मोफत प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप मुंबई / रमेश औताडे  स्वच्छता दूत फाउंडेशनच्या वतीने मानखुर्द येथील स्वच्छता कामगार प्रशिक्षण केंद्रात भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण करण्याचा मान सफाई कामगार महिला सुनीता चौधरी यांना देण्यात आला. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मुकेश पाखरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे समाजभूषण सुदाम आवाडे, श्रावण नाटकर यांची उपस्थिती होती. फाउंडेशनच्या १५ वर्षांपासून सुरू असलेल्या विविध उपक्रमांबाबत माहिती देत सफाई कामगारांना मोफत प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आली. फाउंडेशनचे समन्वयक जितेंद्र साळी, अंद्रेस गायकवाड, ॲड .प्रिया नाटकर,  परमेश्वर कांबळे, सुमनबाई आलाट, ताईबाई पाखरे,  रिबेका पाखरे, कलीम भाई, दिगंबर तुपे, अरुण गायकवाड,  गंगाराम साठे, नितीन हिवाळे, कळनाजी लोंढे, पल्लवी पाखरे, माया साबळे, ताईबाई पाखरे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन फाउंडेशनचे समन्वयक जितेंद्र साळी यांनी केले.

‘ हिरोगिरी ’ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ करा

Image
 ‘ हिरोगिरी ’ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ करा मुंबई / रमेश औताडे  संविधानाने दिलेल्या लोकशाहीच्या माध्यमातून  एका परिवाराने न्याय मिळावा म्हणून  तब्बल एक महिना उपोषण केले. मात्र, प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने त्या उपोषणकर्त्याने केंद्रीय नेत्या पंकजा मुंडे यांच्या लक्षात आणून देण्यासाठी त्यांच्या ताफ्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला. त्याला लाथ मारून " हिरोगिरी " करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ करा अशी मागणी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा ने केली आहे. हिरोगिरी करणारा पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी सिनेस्टाईल हिरोगिरी दाखवत एका निरपराध व्यक्तीच्या कमरेवर लाथ मारून मर्दानगी दाखवली, या प्रकाराने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या हिरो गिरी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला तातडीने बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा आंदोलन छेडणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा अध्यक्ष प्रकाश खरात यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.

" शासन आपल्या दारी " मोहिमेला गती कधी मिळणार !समाजसेवक अमित साळुंखे यांचा सवाल

Image
" शासन आपल्या दारी " मोहिमेला गती कधी मिळणार ! समाजसेवक अमित साळुंखे यांचा सवाल मुंबई / रमेश औताडे  शासन घोषणा करून जनतेला खुश करत असताना त्या योजनाची अंमलबजावणी करण्यात कमी पडत आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाबाबत अशीच अवस्था आहे. या मोहिमेला शासन गती कधी देणार असा सवाल जनता करू लागली आहे. गरीब व गरजू रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या आरोग्यसेवा पुरविणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी होत नाही.  याबाबत आमदार सुरेशजी भोळे (राजुमामा) यांच्या उपस्थितीत शासनाचे प्रधान सचिव व वरिष्ठ विधी सल्लागार उदय शुक्ल यांना हे निवेदन देण्यात आले. शासनाच्या सवलतींच्या अटी व रुग्णसेवेची माहिती दर्शनी भागात लावणे व समाजसेवा शाखा दृश्यमान ठेवणे बंधनकारक करावे. मोफत व सवलतीत दिलेल्या सेवांचा तपशील रुग्णाला लेखी स्वरूपात देणे आणि शासन निधीचा स्वतंत्र ऑडिट रिपोर्ट सादर करणे आवश्यक करावे. धर्मादाय संस्था नोंदणी प्रक्रिया राज्यभर एकसमान व पारदर्शक पद्धतीने जिल्हास्तरावर राबवावी.  उच्च न्यायालयाच्या निर्णयांच्या अनुषंगाने विशेष बैठक घेऊन तातडी...

नवनियुक्त पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे यांचा सत्कार

Image
नवनियुक्त पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे यांचा सत्कार मुंबई / रमेश औताडे  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार गट) उत्तर पश्चिम जिल्हा, जोगेश्वरी तालुक्याच्या वतीने मेघवाडी पोलीस स्टेशनचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे यांची सदिच्छा भेट घेऊन जाहीर सत्कार करण्यात आला. एस बी वन मिल स्पेशल प्रदीप यादव यांच्या सहकार्याने पार पडला. या वेळी मेघवाडी परिसरातील कायदा सुव्यवस्था आणि नागरिक व महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी तालुका अध्यक्ष विनयजी साळवी, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष (युवक) सचिनभाऊ लोंढे, महिला तालुकाध्यक्ष संजीवनी कोलते, रोहिणी तांबे, युवक वार्ड अध्यक्ष फिरोज शेख, जिल्हा सहसचिव (युवक) तन्नोभाई यांनी केली. कार्यक्रमाचे आयोजन वॉर्ड ७९ युवक अध्यक्ष नितीन लोंढे यांनी केले.

मंत्रिमंडळ निर्णय

*| महासंवाद | DGIPR NEWS |‍ मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५ |* *मंत्रिमंडळ निर्णय* ▶ महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती; लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर ▶ राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ; क्विंटलमागे १५० ऐवजी १७० रुपये मिळणार ▶ सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी देण्याचा निर्णय ▶ तीन महामंडळाच्या कर्ज योजनेतील जामिनदारांच्या अटी शिथिल, शासन हमीस पाच वर्षे मुदतवाढ कर्ज प्रक्रिया सुटसुटीत होणार, प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार https://mahasamvad.in/175136/  *नागपूर विभागातील १,५८२ रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १३.८१ कोटींची मदत* https://mahasamvad.in/175142/  *‘कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ २०२५’ चा उद्या प्रारंभ* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन https://mahasamvad.in/175148/  *रक्षाबंधनादरम्यान प्रवासी वाहतुकीतून एसटीला १३७ कोटी रुपयांचे उत्पन्न -मंत्री प्रताप सरनाईक* प्रवाशांचे आभार मानत कर्मचाऱ्यांचेही मंत्री सरनाईक यांच्याकडून अभिनंदन https://mahasamvad.in/175139/...

जीवन शिक्षणावर आधारित शिक्षक कार्यशाळा

Image
जीवन शिक्षणावर आधारित शिक्षक कार्यशाळा मुंबई / रमेश औताडे  शालेय विद्यार्थ्यांना जीवन शिक्षणाचे धडे देणारी देशातील अग्रगण्य सामाजिक संस्था संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षकांसाठी एका अनोख्या कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक विश्वस्त आणि शिक्षणतज्ञ मोहन सालेकर यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.  यावेळी प्रतिष्ठानच्या प्रांत संयोजिका नम्रता पुंडे विभाग संयोजिका सुचित्रा परब आदी मान्यवर उपस्थित होते. सोलकर म्हणाले, आज अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती अमली पदार्थांचे सेवन वडीलधाऱ्यांबद्दल अनादर मनाची चंचलता उग्रता आणि सहनशीलतेचा अभाव दिसत आहे. आज अल्पवयीन मुलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे,त्याची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने शासनाला आणि शाळांना याबाबत पावले उचलण्याच्या संदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत. संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती देताना संयोजिका नम्रता पुंडे म्हणाल्या की,गेल्या २२ वर्षांपासून प्रतिष्ठान शालेय विद्यार्थ्यांना भारतीय जीवन मू...

गोदरेज ग्रुपकडून आधुनिक अंगणवाड्यांची संकल्पना

Image
गोदरेज ग्रुपकडून आधुनिक अंगणवाड्यांची संकल्पना मुंबई / रमेश औताडे  पारंपरिक शिक्षण पद्धत व भविष्याचा वेध घेत आवश्यक असलेले अभ्यासक्रम याची योग्य प्रकारे सांगड घालत जर अंगणवाडीतूनच त्या बालकाला घडवले तर भविष्यात त्याला त्या बाळकडूचा खूप लाभ होईल. हाच धागा पकडत समाजाचे देणं म्हणून गोदरेज ग्रुप ने राज्यभर भविष्यातील आधुनिक अंगणवाड्या निर्माण करण्याचे कार्य सुरू केले आहे. अशी माहिती गोदरेज एंटरप्रायझेसच्या सीएसआर प्रमुख अश्विनी देवदेशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. खालापूर तालुक्यात तांबाटी गावात एकात्मिक बाल विकास सेवा व गोदरेज कंपनीच्या सामाजिक दायित्व फंडातून अंगणवाडीचे उद्घाटन नुकतेच देवदेशमुख यांनी केले. यावेळी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, सरपंच अविनाश आमले, पोलीस निरीक्षक सचिन पवार, राजेंद्र पाशीलकर, रमेश भांडारकर , तानाजी चव्हाण  ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ जाधव, संतोष दळवी, अरुणा सावंत, सुगंधा जाधव, ग्रामसेवक प्रशांत कदम उपस्थित होते.

नालायक भावांना राख्या नाही, बांगड्यांचं पार्सल पाठवणार – डॉ. सुधा जनबंधू

Image
नालायक भावांना राख्या नाही, बांगड्यांचं पार्सल पाठवणार – डॉ. सुधा जनबंधू मुंबई / रमेश औताडे राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये कार्यरत असलेल्या अनुसूचित जाती, जमाती व मागासवर्गीय महिला अधिकाऱ्यांना जातीय द्वेषाने पछाडलेल्या काही लोकांकडून बदनामीकारक बातम्यांच्या माध्यमातून, प्राणघातक हल्ल्यांच्या व खंडणीच्या धमक्यांद्वारे त्रास दिला जात आहे, असा गंभीर आरोप आंबेडकरी महिला मोर्चाच्या विदर्भ प्रदेश नेत्या डॉ. सुधा जनबंधू यांनी केला आहे. विशेषतः समाजकल्याण विभागातील महिला अधिकाऱ्यांवर अशा प्रकारचे हल्ले होत असून, हे  लोक समाजविकासाच्या मार्गात अडथळे निर्माण करत आहेत. त्यामुळे "असे नालायक भाऊ राखीसारख्या पवित्र सणास पात्र नाहीत. त्यांना राखी न पाठवता, बांगड्यांचं पार्सल त्यांच्या घराच्या पत्त्यावर पाठवणार आहोत," अशी घोषणा जनबंधूंनी केली. "भाऊ हा गुंडा असो वा निकम्मा, तो बहिणीच्या रक्षणासाठी सज्ज असतो. समाजातील प्रत्येक महिलेला बहीण समजून वागणं ही खरी राखी आहे. हेच स्मरण करून देण्यासाठी हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं. आ...

कुरेशी समाजाच्या व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

Image
कुरेशी समाजाच्या व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही -  उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई / रमेश औताडे  कुरेशी समाज हा परंपरेने मांस व्यापाराशी जोडलेला असून महाराष्ट्राच्या कृषी आधारित अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे. त्यामुळे या समाजाच्या व्यापाऱ्यांवर आणि जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात कुरेशी समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीदरम्यानच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी यासंदर्भात दूरध्वनीवर चर्चा करुन कुरेशी समाजाला जनावरांची वाहतूक करत असताना येत असलेल्या अडचणींबाबत माहिती दिली. जनावरांची वाहतूक करण्यासंदर्भात असलेल्या कायद्यात बदल करण्याबाबत कुरेशी समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करुन निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्याकडे केली.  कुरेशी समाजाच्या व्यापारी आणि जनावरांची वा...

डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांच्या शतजयंतीनिमित्त भव्य कृषी परिषद आणि प्रदर्शन

Image
डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांच्या शतजयंतीनिमित्त भव्य कृषी परिषद आणि प्रदर्शन मुंबई / रमेश औताडे प्रसिद्ध कृषी व पर्यावरण शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय शेती, सिंचन, गुंतवणूक, विपणन, विमा, अन्न प्रक्रिया, गोदाम व शितगृह आदी विषयांवरील परिषद व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य कार्यक्रम गुरुवार, ७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) येथील आर. एच. पाटील सभागृह, बी.के.सी. बांद्रा (पूर्व), मुंबई येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी १०.३० ते ११.३० वाजता मा. डॉ. सुजितकुमार शुक्ला, संचालक, भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आयसीएआर) व मा. श्री. अशोक किरणाळी, संचालक, कृषी निविष्ठा व गुणनियंत्रण, महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक श्री. अशोक कुमार पाठक, इसीजीसी लि. भारत सरकारचे महाव्यवस्थापक श्री. कुमार अंशुमान, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाचे मुख्य अर्थतज्ज्ञ श्री. ति...

एचआरडी अँटवर्प आणि भारत रत्नम मेगा CFC यांच्यात धोरणात्मक भागीदारी

Image
एचआरडी अँटवर्प आणि भारत रत्नम मेगा CFC यांच्यात धोरणात्मक भागीदारी  मुंबई / रमेश औताडे  युरोपमधील हिरा व दागदागिने प्रमाणन, शिक्षण व उपकरण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था HRD Antwerp हिने आता भारत रत्नम मेगा कॉमन फॅसिलिटी सेंटर (CFC), मुंबई येथे आपली अधिकृत सेवा सुरू केली आहे. ही भागीदारी प्रतिष्ठित IIJS प्रीमियर 2025 दरम्यान उघडकीस आली असून, भारतातील दागदागिन्यांच्या क्षेत्रातील गुणवत्ता व विश्वासार्हता वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. उद्घाटन समारंभात भारत रत्नम मेगा CFC चे CEO रवि मेनन, HRD Antwerp चे ग्लोबल मार्केटिंग, विक्री व शिक्षण संचालक टॉम नेय्स, तसेच HRD Antwerp इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक रामाकांत मिटकर उपस्थित होते. कार्यक्रमाला उद्योगातील प्रमुख उत्पादक, किरकोळ व्यापारी आणि बोर्ड सदस्य उपस्थित होते. मुंबईतील दागदागिन्यांचे प्रमुख केंद्र असलेल्या या परिसरात स्थापन झालेले हे सेंटर, नैसर्गिक व लॅबमध्ये विकसित झालेल्या दोन्ही प्रकारच्या हिरे व दागदागिन्यांच्या प्रमाणपत्र सेवांसाठी एक सर्वसमावेशक सुविधा म्हणून कार्य करेल. रवि मेनन म्हणाले, "भार...

खंडुराज गायकवाड यांचा संघर्षमय प्रवासाला शैक्षणिक यशाची साथ

Image
खंडुराज गायकवाड यांचा संघर्षमय प्रवासाला शैक्षणिक यशाची साथ मुंबई / रमेश औताडे मंत्रालयातील अनुभवी पत्रकार, लोककलावंतांचे आधारस्तंभ आणि लोककलेचे संशोधक खंडुराज गायकवाड यांनी अत्यंत प्रतिकूल आणि आव्हानात्मक परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करत एम.ए. (मराठी) पदवीत A- ग्रेड मिळवली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. खंडुराज गायकवाड हे गेली अनेक वर्षे महाराष्ट्र शासनाच्या विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय असून, विशेषतः लोककलेच्या संवर्धनासाठी ते झटत आले आहेत. केवळ व्यासपीठावरच नव्हे, तर प्रशासनिक आणि बौद्धिक पातळीवरही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशाचा गौरव करताना, डॉ. शिवाजी वाघमारे, संचालक – लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठ यांनी सांगितले, "खंडुराज गायकवाड हे केवळ पत्रकार किंवा कलाकार नाहीत, तर ते लोकसंस्कृतीचे जीवंत प्रतिनिधी आहेत. त्यांनी आपल्या शिक्षणात घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे." जगण्याच्या संघर्षातूनही शिक्षणाची वाट न सोडता, समाजासाठी आदर्श ठरणारा खंडुराज गायकवाड यांचा प्रवास आज अनेक तरुणांसाठी प्रेरणा...

विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती ची घोषणा

Image
विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती ची घोषणा मुंबई / रमेश औताडे आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडने अखेर २०२५ आकाश राष्ट्रीय हुशार विद्यार्थी परीक्षेची घोषणा केली आहे. ही परीक्षा ८ वी ते १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी असून, नीट जे ई ई , राज्य सी ई टी, एन टी एस सी आणि ऑलिंपियाड्ससाठी मार्गदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती व  रुपये २६.४ कोटींपर्यंत बक्षिसे दिली जातील. असे आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेसचे सीईओ दीपक मेहरोत्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही स्वरूपात परीक्षा २४ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान होणार असून शुल्क ३०० आहे. अर्ज www.anthe.aakash.ac.in या संकेतस्थळावर सुरु आहेत. अखेर परीक्षेत चांगल्या कामगिरीने आय आय टी व नामवंत इंजिनिअरिंग संस्थांमध्ये प्रवेशासाठी मार्ग मोकळा होतो. आकाश डिजिटल 2.0 व आकाश आय ए की एस टी  ही ए आय आधारित तयारीची नवी साधनेही उपलब्ध आहेत. अखेर २०२५ परीक्षेचा निकाल ऑक्टोबर २०२५ मध्ये जाहीर होणार असून, ५ वी ते १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी विषयानुसार प्रश्नपत्रिका असेल. विद्यार्थ्यांना त्यांच...