जेष्ठ कामगार नेते शांताराम भोईर यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
कामगारांना हक्काची नुकसानभरपाई नाही –
९ कोटींच्या देणीसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे
जेष्ठ कामगार नेते शांताराम भोईर यांची मागणी
मुंबई / रमेश औताडे
तळोजा येथील ट्रान्सपॉवर इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीतील १७५ कामगारांनी २४ वर्षे सेवा दिल्यानंतरही त्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. कंपनीकडून तब्बल ९ कोटी रुपयांची देणी प्रलंबित असून, कामगारांनी अनेक वेळा मागणी करूनही प्रशासन आणि सरकारकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.असे ट्रान्सपॉवर कामगार संघटनेते जेष्ठ कामगार नेते शांताराम भोईर यांनी सांगितले.
या लढ्यात आतापर्यंत ७१ कामगारांचे वृद्धापकाळाने निधन झाले असून, त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही मदत मिळालेली नाही,
ट्रान्सपॉवर इंजीनियरिंग लिमिटेड या कंपनीमधून १७५ कायम कामगारानं पैकी ७१ कामगार मयत झाले. उच्च न्यायालय लिक्विडेटर कार्यालय लक्ष देत नाही. कंपनीची मालमत्ता असूनही लिलाव करण्यासाठी टाळाटाळ होत आहे. गल्ली पासून दिल्ली पर्यंत सर्वांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. अशी माहिती ट्रान्सपॉवर कामगार संघटनेचे नेते शांताराम भोईर यांनी दिली.
ट्रान्सपॉवर कंपनीतील या कामगारांनी आपल्या हक्कासाठी वर्षानुवर्षे आंदोलने, न्यायालयीन लढा आणि विविध स्तरांवर पाठपुरावा केला. मात्र, व्यवस्थापनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. कामगार संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे.
शांताराम भोईर यांनी स्पष्ट केले की, "या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कामगार लवकरच पुढचे पाऊल उचलतील. जर सरकारने तातडीने हस्तक्षेप केला नाही, तर मोठ्या प्रमाणावर लढा उभारला जाईल.
१७५ कामगारांना त्वरित ९ कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी.
संघर्षादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या ७१ कामगारांच्या कुटुंबीयांना योग्य आर्थिक मदत मिळावी. मुख्यमंत्र्यांनी तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप करून अन्यायग्रस्त कामगारांना न्याय द्यावा.अशी मागणी शांताराम भोईर यांनी केली आहे.
कामगारांचे वास्तव भयानक आहे. सरकारने लक्ष द्यावे
ReplyDeleteकामगारांचे प्रश्न शांतराम भोईर यांनी खूप वर्षापासून लाऊन धरले आहेत.
ReplyDelete