भारत रत्न अटलबिहारी वाजपेयींच्या जन्म शताब्दी वर्षाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

भारत रत्न अटलबिहारी वाजपेयींच्या जन्म शताब्दी वर्षाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई / रमेश औताडे 

भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्त पूर्व खासदार व जनसेवक  गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून व प्रमूख मार्गदर्शनात २५ डिसेंबर २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत बोरीवली कांदिवली चिकू वाडी येथे खेल महोत्सव आयोजित केला आहे.

२५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता कांदिवली येथील "स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया येथे" उभारलेल्या भारतरत्न अटलजींच्या भव्य पुतळ्याला पुष्पहार अपर्ण करून कार्यक्रमाची सुरवात होईल. याच दिवशी सायंकाळी महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुंबईतील मंत्री व आमदारांचा सत्कार व कवी संमेलाचे अयोजन असून पूर्व खासदार जनसेवक गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या  स्वर्गीय प्रमोद महाजन क्रिडा संकुलाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहोळा प्रमोद महाजन यांच्या कन्या पूर्व सांसद श्रीमती पूनम महाजन यांच्या शुभ हस्ते व माजी राज्यपाल उत्तरप्रदेश राम नाईक यांच्या अध्यक्षेखाली होत असून कार्यक्रमाला खासदार पीयूष गोयल सर्व आमदार जनप्रतिनिधी व नागरिक उपस्थीत राहत आहेत.

भारत रत्न अटलबिहारी वाजपेयींच्या जन्म शताब्दी निमित्ताने याच संकुलात खेल महोत्सव आयोजित केला असून पुरुष आणि महिला यांच्या प्रत्येकी 32 नामवंत संघ अनुक्रमे कब्बडी व क्रिकेट सामने खेळणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचे खेळाचे आयोजन उत्तर मुंबई खासदार पियुष गोयल करत आहेत.

१५ एकर जागेवर असलेल्या प्रमोद महाजन क्रिडा संकुलाच्या ठिकाणी २ किमी चा जोगर्स ट्रॅक व आंतर राष्ट्रिय स्तराचे फिफा फुटबॉल ग्राउंड विकसित होत असून याच मैदानावर टप्प्या टप्प्यात तरण तलाव, विवीध खेळासाठी इनडोअर स्टेडियम विकसित करण्याच्या मानस जनसेवक गोपाळ शेट्टी यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना बोलून दाखवला.

स्व. हिंदू-यदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असलेल्या क्रिडा संकुलात पुढे हॉकी सारख्या खेळ खेळला जाण्यासाठी निश्चित प्रयत्न केला जाईल असे प्रतिपादन जनसेवक गोपाळ शेट्टी यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केला. उत्तर मुंबई ला उत्तम मुंबई बनवण्यासाठी खा पियुष गोयल यांचे स्वप्न साकार करण्यासाठी व उत्तर मुंबईला "आंतर राष्ट्रीय खेल हब" बनवणार असल्याचे प्रतिपादन गोपाळ शेट्टी यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना बोलून दाखवले.

खेल महोत्सवाची सांगता महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून उत्तर मुंबई तसेच मुंबई च्या क्रिडा प्रेमींनी मोठ्यप्रमाणावर या कार्यक्रमात सहभाग घ्यावा असेही आवाहन शेट्टी यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

आता सहनशीलता संपली...राज्यभर १ ऑक्टोबरला रास्ता रोको करणार....अंगणवाडी महिलांचा सरकारला इशारा

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"